Sunday, February 12, 2012

शाहिरांच्या बिदाग्या

Sunday, February 12, 2012

दुसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा दरबाराकडून शाहिरांना मिळालेल्या बिदाग्या-

तमासगीर सगनभाऊ

सन १८२१-२२

६७५ रू. नगद यापैकी २५ रू. पोषाकाचे

२४६ रू. ४ आणे सोन्याचे कडी

५६६ रू. कापडाबद्दल

सगनभाऊ पुणेकर

सन १८२२-२३

४७५ रू. नगदी खुद्द

१७० रू. ८ आणे कडी सोन्याची

३३६ रू. २ आणे सलामी बिदागीसह

३६ रू. राम जोडीदारास पोषाक

९७ रू. ८ आणे कृष्णा नाच्यांस

३२ रू. १० आणे फडकरी यास

सगनभाऊ

१८२३-२४

३२ रू. १० आणे फडकरी यास

१९२ रू. कडी सोन्याची

३ रू. फरासास

१८२४-२५

१०३ रू. बिदागी

१८४९-५०

२५ रू. बिदागी

परशराम बावीकर

९९ रू. रोख

२६ रू. कापड

श्रीपति सवाई फंदी

१८३८-३९

१९९ रू.

१८३९-४०

१९९ रू.  १५ आणे ६ पैसे

१८४०-४१

१९५ रू. १३ आणे ६ पैसे

१८४०-४१

३०० रू. + १०३ रू. २ आणे कापड + १९६ रू. १४ आणे रोख

१८४५-४६

४०० रू. रोख

बाळाजी फंदी

१८४९-५०

२० रू.

सवाई फंदी

१८४८-४९

४०० रू. रोख

संवत्‍ १८९५-९७ मध्ये श्रीपति सवाई फंदीस जी रक्कम मिळाली तिचा हिशोब लिहीतांना श्रीपति सवाई फंदी रू. ३०० पैकी वजा पोषाक रू. २०० कडे वजन तोळे १० मासे १॥ दर १९-१०-० प्रमाणे असे लिहीले आहे.

गाव मात्र कोणासही इनाम दिला जात नसे आणि शाहिर प्रभाकरला कधीही रोख रक्कम दिली गेली नाही. 

 


0 comments

Wednesday, February 01, 2012

पोवाडा

Wednesday, February 01, 2012

शाहिर, भांड, भालदार, भवय्ये, चितारी, गपी, विनोदी, कथाकारी, नकलाकारी वगैरे गुणीजनांना पदरी बाळगण्याची चाल रीत फार पूर्वीपासून राजे महाराजे, पेशवे पाळीत. शाहीरांसंबंधीचा उल्लेख ११व्या शतकाच्या सुमारास सांपडतो. भाटाला, शाहिरांना खूष होऊन पालखी व घोडा देत. शिवाजीराजांच्या पदरी भूषण कवी, परमानंद, जयराम पिंड्ये आदि गुणीजन होते. शिवाजीराजांनी अज्ञानदास ( अफझलखानाचा पोवाडा रचणारा शाहिर ), आणि तुळशीदास ( तानाजीचा पोवाडा रचणारा शाहिर ) यांना शेरभर सोन्याचा तोडा आणि घोडा दिल्याचा उल्लेख त्यांच्यांच पोवाड्यात सापडतो. संभाजी महाराजांच्या पदरी मोहनलाल व मतिराम असे दोन भाट होते.

शाहिरांची खरी चलती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सुरू होऊन दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत कळस गाठला. गंगुहैबतीचा फड सवाईमाधवरावांच्या वेळी उदयाला आला. होनाजीबाळाला कोंडणपूरचे कुरण इनाम मिळाले होते, शिवाय सालीना ३०० रूपये मिळत.

बडोद्याचे सयाजीरावही खास आश्रय देत. त्यांनी शाहीर बाकेरावास ६० रू. चा तोडा दिला होता.

१८१८ नंतर पोवाड्यांची चलती संपत आली, कारण इंग्रजी अंमलात पोवाड्यांना आश्रय नव्हता.

ज्यांनी कोणी पोवाडे आजपर्यंत जतन करून ठेवलेत, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.


0 comments

Saturday, January 28, 2012

कवी केशवसुत

Saturday, January 28, 2012

आमुचा पेला दुःखाचा

डोळे मिटुनी प्यायाचा…

मानवी जीवनाचे हें दुःखांनी कलुषित झालेले स्वरूप आहे त्या अवस्थेत पतकरणे हेंच केशवसुतांच्या वास्तववादाचें प्रमुख अंग होय. जीवन आहे हें असें अपूर्ण व दुःखपूर्ण आहे—हें जीवनाचे यथार्थ स्वरूप स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. हें मानवी जग अनेक व्यथांनी ओतप्रोत भरलेलें असून तें सर्वस्वी अपूर्ण आहे हें सत्य प्रथम गृहीत धरून, तें पतकरून, मग त्या दुःखपूर्ण व अपूर्ण जगाला शक्य तितकें आनंदमय, सुखमय व पूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करणे हें त्यांच्या काव्याचें रहस्य होय.

त्यांना ह्या वास्तव पृथ्वीचा त्याग करावयाचा नसून जमलें तर स्वर्गच खाली आणावयाचा आहे----म्हणजेच ह्या पृथ्वीला स्वर्गाचें स्पृहणीय स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांच्या काव्यात दिसतें.

हें जग मनुष्य़ निर्माण हो्ण्यापूर्वी स्वर्गतुल्य होतें पण पुढे मानव निर्माण करण्याची भलतीच कल्पना प्रूथ्वीच्या मनांत आली, आणि तिने मानवाची निर्मिति केली. पण तोच मानव आपली आई जी पृथ्वी तिलाच लाथेनें ढकलून तों स्वर्गात भरारी मारण्यास सज्ज झाला—आणि ही विलक्षण कृतघ्नता पाहिल्याबरोबर स्वर्ग भयंकर संतापला व त्या आवे्गानें तो इतका दूर निघून गेला की पृथ्वीचा व त्याचा संबंधच अशक्य झाला, हे विलक्षण वास्तववादी सत्य केशवसुतांच्या कवितेंत प्रकट होते.


0 comments

Thursday, January 26, 2012

वास्तु

Thursday, January 26, 2012

भारतात वास्तुशास्त्राचा विचार १९९० च्या दशकात होऊ लागला. त्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्र पाहात नव्हते. काही लोकांनी मग अर्थार्जनाचे साधन म्हणून याचा प्रसार करावयास सुरूवात केली. लोकांना भिती दाखवून पैसे उकळायला सुरूवात केली. १९९० पूर्वी पार आपण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मागे जाउन पाहिले असता कोणाही संतांच्या अभंगात वास्तुबद्दल उहापोह नाही. मग त्याकाळी वास्तुचे दुष्परिणाम जाणवत होते काय?

कोणताही गड बांधतांना, ताजमहाल बांधतांना, शनिवारवाडा, मंदिरे बांधतांना त्याकाळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला कोणत्याही दप्तरात उल्लेख आढळत नाही. आजसुद्धां हे तथाकथीत वास्तुशास्त्रज्ञ दावे करतात, त्यामध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचाच विषय आहे.

आहे, वास्तुशास्त्रावर मयमतम सार‍खे ग्रंथ आहेत, पण ते नीट समजावून घेऊन कोणीही मार्गदर्शन करीत नाही.

जाणकारांनी मयमतम् ग्रंथ अभासून अवश्य आपल्या वास्तुचा अभ्यास करावा.

 


2 comments

Tuesday, January 24, 2012

कलियुग

Tuesday, January 24, 2012

कजियुगांत  एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----

पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे

दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे

तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍

चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे

पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे

सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे

अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.

सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.

हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?

 


0 comments