मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock" to the teacher. News flared in social media and every small and big personality stood up to support him including Barack Obama and Mark Zuckerburg. He was invited to the White House and Facebook headquarters. Good for Ahmed, he had a chance to shoot for the stars now. His arrest record has been erased and after suspension is over, he can join back into school. He chose to take his family or his family chose to take him to another country "Quatar", seriously? 

I think the teacher and police officers did what they are supposed to do. The alleged clock did not look like a clock, when asked kid said "it is a clock" nothing else, not other explanation. What the officers supposed to do? If something was to go wrong, who was in responsible for risking lives of hundreds of other kids in that premise that time? The officials did their job, they should be commended publicly. The fame went to the kid, but what about the people who did their job? Think what should have happened if your kid was in the same school on same day, and the clock was not the clock. 

Now, if a kid comes up with a new "invention", we should whole heartedly support it. I am not sure a home built clock is an invention. The clocks had been in use for almost a thousand years now, a digital clock was invented by D.E Protzmann in 1956, so simply Zuckerburg and Obama along with entire media has to know it is NOT Ahmed's invention. Kids make clocks, and all kind of stupid things in this world while in school, they use creative ways to build world known concepts. That does not make their invention. The family never considered themselves to be American anyway, they fled to middle-east when they had first chance and sued the city for wrongful arrest. I am sure there would be a lot of schools in US would have loved to take him in just based on the fame of arrest (not talent). The fame of arrest warranted him a fair chance at anything he wanted or deserved, but he chose to take this to somewhere else. What a waste! Waste of media, time at whitehouse and other places he been to with his 10 minutes of fame. I am sure deserving kid could have turned it into gold, it was just not him.  Everyone rode the wave of politics and publicity, including Mr. President and world renowned techies, businessmen without paying attention to the story. I would agree the  arrest was wrongful, but there wasn't a single person qualified to attest that device was just a clock, rather nobody could take risking lives of other kids in the school.
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"अमेरिकेत वाढलेली, शिकलेली, आपल्या पायवर उभी असलेली. मुलगा अमेरिकन, हिंदु संस्कृतीची जाण असणारा. लग्नाच्या पद्धतीत थोडा फ़रक केला होता, जर अमेरिकेत होणार लग्न तर रिती बदलणारच ना! सप्तपदी आणि कन्यादान होणार नाही, पण बाकी सारे आणि "Wedding Vows" होणार असे समजले.
सुकन्या पण म्हणाली, "मला कोणीही दान करणार नाही, मी काही वस्तू नव्हे मालकी हक्क द्यायला. मी जीवनभर माय-बापाची लेक असणार आहे". विचार बरोबर आहे, पण मला वाटते, विचारकोन चुकला. (विचारकोन = Perspective, आजकाल मराठीपेक्षा इंग्रजी शब्द लवकर समजतात ना!). स्वतःचे लग्न कसे करावे हा आपापला प्रश्न आहे. पण आपण कधी हे जाणुन घेतलेच नाही की कन्यादान म्हणजे काय? पण त्याला चुकीचे ठरवुन मोकळे झालो. पण महित नसेल तर आपण काय करतो, विचारा की कोणाला तरी. हे आपण मान्य केले की जुनी प्रथा आहे म्हणजे ती नव्याकाळासाठी चालणारच नाही. कन्यादानामागची भावना तर सोडाच, कन्यादान ह्या शब्दाचा अर्थपण कळला नाही. दान म्हणजे काय? भीक नव्हे, देणगी नव्हे, बक्षीस नव्हे, उपहार नव्हे, खुप फरक आहे. इंग्रजाला पुण्यही कधी समजले नाही त्याला "Good deeds; moral or religious merit" असे ठरवले, आणि सद्‌कर्म आणि पुण्य एकच झाले. इंग्रजीत दानाला शब्दच नाही, ते त्याला "Gift, Giving or Donation" ठरवुन मोकळे झाले. (Ref: http://www.transliteral.org/dictionary/दान/word). नवे शिक्षण सारे झाले इंग्रजीत, गुण मिळवण्याच्या गडबडीत, ज्ञान मिळवायचे ते काही राहुनच गेले.

कन्या कोणी दान करतो काय? अरे कन्यारत्न हे अमुल्य असते ना? अगदी खरे.

लग्नापुर्वी वडिल-भाऊ मुलीची-बहिणीची काळजी घेतात, आणि मुलगी त्यांच्या घरची शान-आण-बाण असते. आपण पितृसंस्कृतीत आहोत, त्यामुळे, मुली लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जातात. त्या नवऱ्याचे घर स्वतःचे करतात. ज्या घरात मोठी झाली ते घर सोडुन जाणे किती अवघड असते हे मला कधी समजणार नाही, त्यासाठी मुलीचा जन्म घ्यावा लागेल. मुलीला समाजात फार महत्वाचे स्थान असावे असे शास्त्र सांगते. सुसंस्कृत घरात मुलीना मुलापेक्षा जास्त प्रेम आणि लळा लावला जातो कारण तीला साऱ्या जन्माचे प्रेम लग्नागोदर देऊन सासुरवाशीण  करावे. तीने सासरी जाऊन आपल्या माहेराचे संस्कार पुढे न्यावेत अशी अपेक्षा असते. ती दोन घरांना एकत्र आणते.माहेराचा वसा आणि सासरचा वारसा ती पुढच्या पिढीला देणार असते. तीने लग्नानंतर माहेराची काळजी विसरुन, सासरच्या माणसांची आणि त्या घराची काळजी करावी अशी अपेक्षा असते. आई-बाप-बहीण-भाऊ ह्यांना विसरुन नव्हे तर, त्यांना त्यांच्या काळजीतुन जर तीला मुक्त केले तर ती सासरची चिंता करु शकेल अशी अपेक्षा असते. लग्नापुर्वी ज्याप्रकारे ती माहेराचे हित बघत होती, तीने आता लग्नानंतर तिच्या सासरचे हित बघावे असा मानस असे. तीला माहेराच्या जवाबदारीतुन मुक्त करणे असा विचार असे. शिवाय, मुलीचे सासर दुसऱ्या गावी असेल तर ह्याला अजुन महत्व आहे.

मुली एका घरात जन्म घेतात पण दोन घरांना उजवतात. आयुष्यभर माहेरचा अभिमान बाळगून सासरचा मान वाढवतात. जन्मताना एका गोत्रात असतात पण लग्नानंतर त्यांचे गोत्र बदलते, कन्यादानात ती नवर्याचे गोत्र घेते. नवरा तिच्या सुखःदुखाची काळजी घेण्याची ग्वाही देतो. आता हि वडिलांची जवाबदारी नवऱ्याची होते.  तिच्यापासून होणारे अपत्य नवऱ्याचा वंश वाढवणार असते त्यासाठी तिचे गोत्र पण बदलते. धार्मिक नियमातून मुलीला तो आपल्या घरची बनवतो. पितृसत्ताक समाजात लग्नाने मुली खुप सारे गमावतात पण खुप सारे मिळवतात पण.

जग बदलले, लोक पण बदलले पण आपण प्रथा बदलल्या नाहीत, पण त्यांचा अर्थ मात्र विसरलो. प्रथांचे शास्त्रीय नसले तरी  त्यांचे प्रतिकात्मक महत्व आहे. कोणत्याही धर्मात प्रतीकात्मक प्रथा आणि रुढी काही संदेश देतात त्यांचा अर्थ समजून त्या कराव्यात. प्रथा जीवनातल्या महत्वांच्या बदलांना समजून घेऊन त्या प्रमाणे आपल्या विचारसरणीत बदल करण्याचा संदेश देतात, त्यासाठी  रीती सांगतात, ज्यामुळे बदलणाऱ्या जवाबदाऱ्या आपल्या मनावर बिंबवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करातात. कन्यादान केल्याने नवरे जवाबदार होतात असे नाही पण या रिती समजुन घेऊन केल्यातर दोन्ही घरातील सदस्यांना  (सासर आणि माहेर) बदलणाऱ्या जवाबदाऱ्यांची  जाणीव करून द्यायला मदत नक्कीच होईल.




विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व थरांतील प्राणिसृष्टीचा आधार घेतो आणि धर्मतत्त्वाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून पाहातो, परंतु तो अयशस्वी होतो. म्हणून शेवटी तोच भगवंत चौथ्या अवतारात पूर्ण माणूस नाही आणि पूर्ण पशू नाही असा नृसिंहाचे रुद्रभीषण रूप घेतो. एवढे जगावेगळे भयानक रूप घेऊन त्याने केले काय तर हिरण्यकश्यपूला त्याचे पोट फाडून ठार केले ! झाले, लागलीच धर्माचे रक्षण झाले, धर्मोत्सव, विजयोत्सव सुरू झाले, नृसिहाचे देव्हारे सजू लागले ! कर्तुमकर्तुम्‍ सामर्थ्य असलेल्या नृसिंहाला त्याच्या दृष्टीने य: कश्चित असलेल्या एका राक्षसाला आमनेसामने आव्हान देऊन ठार करता येऊ नये ? आणि त्याऐवजी तो नृसिंह त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार करून त्यात स्वत:चे कर्तव्य केल्याचे समाधान मानतो ? हा कोणी एक राक्षस मनात आणताच उघड उघड धर्माला पायदळी तुडवतो ह्याचा अर्थ काय ? ईशनिर्मित धर्मतत्त्व कोणाही बलबंताने पायदळी तुडवण्याच्या योग्यतेचेच होते की काय ? पुराणे तर असे सांगतात. मग ईशप्रणित धर्मतत्त्वाचा उदोउदो कशासाठी ?
यापुढील पाचव्या अवतारात भगवंताने माध्यम म्हणून मनुष्यरूप घेण्याचा प्रथमच प्रयत्न केला ! हा प्रयत्न एका नराधम राक्षसासाठी, त्याच्या संहारासाठी नव्हता तर एका पुण्यवंत, धर्मशील, आचारनिष्ठ अशा बळीराजासाठी होता ! अहर्निश चाललेल्या दानधर्माने म्हणे बळीराजाची पुण्यसंपदा इतकी वाढली की, तो कोणत्याही क्षणी देवांचा राज होण्याची शक्यता निर्माण झाली. आता सन्मार्गाने जाऊन जर एखादा भूलोकीचा राजा स्वपराक्रमाने स्वर्गलोकी गेला तर त्याचा आवर्जून सत्कार करावयाचा की त्याला फसवून, शब्दात बांधून घेऊन पाताळात गाडून टाकावयाचा ? भगवंताच्या पाचव्या अवताराचे नाव आहे वामन. वामन म्हणजे लहान रूप. वामन हे नाव ठेवण्यात पुराणांना जरी कौतुक वाटत असले किंवा भगवंत रवरोरवरीच बटुरूपाने अवतीर्ण झाले म्हणून त्यांना वामन म्हणत असले तरी, बळीराजाची महात्मता एवढी विशाल होती की, त्याच्या तोडीस तोड रूप घेण्याचे भगवंताला धैर्य झाले नाही, आणि म्हणूनच त्याने बळीराजाच्या धर्मतेजाने दिपून जाऊन स्वत: वामन रूप घेतले असावे ! ह्या पाचव्या अवताराचे कार्य काय तर बळीराजाला नामशेष करणे ! तीन पावले भूमी मागण्याचे निमित्त करून वामनाने शेवटी बळीला फसवून पाताळात लोटले असले तरी त्या प्रकारणी दिलेला शब्द पाळण्यात विजय झाला तो बळीराजाचाच. वामनाचा नव्हे ! वामनाने याचना केली आहे ती तीन पावले भूमीची ! बळी आपली भूमी देण्यासाठी वामनाला शोधत त्रैलोक्यात हिंडत नव्हता. जो याचना करतो तो भगवंत कसला आणि जो याचक आहे तो अवतार घेऊन साधणार काय ? ज्याच्याजवळ तीन पावले भूमीही नाही, असली तरी मागितल्याशिवाय ज्याला ती मिळत नाही तो धर्मसंस्थापन ते काय करणार ? बरे तीन पावले म्हणून ज्याने बळीराजाजवळ भूमी मागितली ती तरी खर्‍या अर्थाने त्याने घेतली का ? तर तसे पुराण सांगत नाही. वामन आकाराने जरी लहान असला तरी त्याचे एक पाऊल म्हणे एका लोकाला व्यापून उरले ! ज्याला एका पावलात सर्व भूमी पादाक्रांत करणे सहज शक्य होते त्याने मग बळीराजाकडे याचना करावीच का ? आणि केलीच तर मग मनुष्य रूपला शोभेल अशीच पावले का टाकू नयेत ? ती वामनाची पावले इतकी विस्तीर्ण का ? तर तो म्हणे भगवंताचा अवतार ! असे हे अचाट सामर्थ्य फक्त भगवंताचेच असावयाचे ! आणि इतके करूनही ह्या वामनाने बळीला पाताळात लोटून धर्मस्थापना केली का ? तर त्याचे नाव नको ! आजही वामनाची मुद्रा समाजमनावर मुद्रांकित होण्याऐवजी बलीराजाचीच मुद्रांकित होऊन राहिली आहे. आम्हाला तर असे वाटते की, युगानयुगे माणूस क्वचितच उदात्त भूमिकेवरून वागतो, पण फार करून क्षुद्रपणानेच वागतो, त्याचे कारण भगवंताने मनुष्यरूपाने घेतलेल्या वामनावतारात त्याच्या हातून झालेली ही महत्त्वाची पहिली चूक तर नसावी ? बळीसारखा पुण्यश्लोक सम्राटाच्या बलवत्तर अस्तित्वाला खो देण्यासाठी भगवंताने वाममार्गाचा आश्रय घेण्याचा निर्णय वामन अवतार घेण्यापूर्वीच घेतला, आणि ही क्रिया करण्यासाठी माध्यम म्हणून वापर केला मात्र माणसाचा ! का ? आपण मनुष्यरूपात अवतीर्ण झालो तर बळीचा तर काटा काढता येईलच, शिवाय आपल्या सदभुत लीलांमुळे आपण मानवातही पूजनीय होऊ असा मोह तर भगवंताला झाला नाही ? साक्षात भगवंत मनुष्यरूपात अवतीर्ण झाल्याबरोबर ईश्वराच्या अपेक्षेप्रमाणे निष्क्रिय माणूस त्याच्या नादी लागला, बळीराजासारखा सक्रिय माणूस फसवला गेला आणि उघड पडला तो भगवंत !
महाभारत-एक सूडाचा प्रवास मधून,
ब्लॉगरच्या वाचकांसाठे
आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस.
भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्ता मिळाली, आणि मला वाटते आता राजकीय संक्रमण सुरू झाले आहे.
कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत खूप देशाचे नुकसान केले, आणि आता त्यांच्यावरच संक्रांत आली आहे. सर्व सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. आधार कार्डाचे भूत डोक्यावर ठेवले आहे.
गॅस साठी पहिल्यांदा पूर्ण पैसे साधारण १००० पर्यंत द्यायचे आणि नंतर ते अनुदानाचे पैसे बॅंकेतून परत घ्यायचे. गरीब माणसाने प्रथम एवढे पैसे कोठून आणायचे याचा विचार नाहीच.  किती किती समस्या करून ठेवल्यात या पक्षाने.
असो पण आता वेळ आली आहे, संक्रमण करण्याची आणि आता खर्‍या अर्थाने तिळगूळ वाटायचेत ते एप्रिल मधील लोकसभा निवडणूक झाल्यावरच.
पुन्हा एकदा तिलगूळ घ्या गोड बोला.
खूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे.
आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू  झालेली.
पण काहीतरी झाले आणि  एका नवीन माणसाने क्रांती घडवून आणली, आणि भल्याभल्यांची दातखीळ बसली, तो गृहस्थ म्हणजे अरविंद केजरीवाल.
दिल्लीत त्याने जो चमत्कार करून दाखवला, खरंच राजकारणाची त्याने भाषाच बदलून टाकली. जी आश्वासने दिली, ती पूर्ण करण्याचे वचन पाळले. दुसर्‍या राज्यातील सरकारांना देखील आपली समीकरणे बदलावी लागतील.

आज लोकांना त्यांच्यातील आणि त्यांची दुःखे समजून घेणारा कोणीतरी पाहिजे, तोच त्यांचा देवदूत असतो.
बघू यात काय होते ते, आज एवढेच पुरे.

आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा वासना आणि कामानामय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात.हिच आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्मात म्हणून संबोधले जाते. 

वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते. भूताप्रेतांची गती तसेच शक्ती अपार असते यांचे वेगवेगळे प्रकार असतात.हिंदू धर्मातात गती व कर्मनुसार मेलेल्या जीवांचे वर्गीकरण केले जाते.आयुर्वेदात 18 प्रकारचे प्रेतात्मा आहेत असे सांगितले आह तसेच पिचाश, प्रेत, आसरा, डाकिन, शाकिन, ब्रह्मसमंध, मुंजा, गिऱ्हा, लावसटीन, हडळ, हाकाट्या, वेताल, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिचाश, विरीकास असेअनेक प्रकर सांगितले जातात .


या प्रेतयोनीत जाणारे लोक अदृश व बलवान बनतात परंतु सगळेच मरणारे जीव प्रेतयोनीत जात नाहीत वा सगळेच बलवान होत नाहीत. ते आत्माच्या कर्म व गतीवर अवलंबून असते.
भूतानमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे

  1. प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत .
  2. हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात.
  3. शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात.
  4. डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात.
  5. जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ' अलवंतीण 'असे म्हणतात ! हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अलवंतीण हमखास दिसते .
  6. ' अस्रा ' सात असून त्या ब्राम्हण स्त्रियांप्रमाणे दिसतात . प्रत्येक अस्रेचा पोशाख वेगवेगळा असतो . या अस्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे वळतात . मुसलमानातील ' परिस ' व हिंदूंमधील ' अस्रा ' एकच होत .
  7. ब्रम्ह राक्षस ब्राम्हणाचा जर खून झाला तर तो ब्रम्हराक्षस होतो . गिऱ्हा पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. गिऱ्हा नेहमी ज्या ठिकाणी मारतो तेथेच घुटमळत असतो .
  8. विद्वान ब्राम्हण मारून जर पिशाच्च योनीत गेला तर “ब्रम्ह्समन्ध” होतो .ब्रम्ह्समन्ध सहसा कोणाला त्रास देत नाहीत उलट लोकांची मदत करतात . ब्रम्ह्समन्ध माणसांप्रमाणेच दिसतो . त्यांना स्पर्श केला तर ते ' केळीच्या खुंट्या ' प्रमाणे थंड स्पर्श जाणवतो.
  9. "वेताळ” हा भूत - पिशाच्चांचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणेच असतात . डोळे हिरव्या रंगाचे असून डोक्यावरील केस ताठ उभे असतात . तो आपल्या उजव्या हातात चाबूक व डाव्या हातात शंख धारण करतो . तो फेरीस जातो त्या वेळी संपूर्ण हिरवा पोशाख करून पालखीतून किंवा घोड्या वरून फिरतो . त्याच्या आगेमागे बरीच भूते असतात . त्यांच्या हातात जळत्या मशाली असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारीत असतात
  10. खवीस- खवीस पठाण लोकांचे भुत आहे, अफगाणिस्तान, गल्फ ई देशांत जास्त प्रमाणात असतें काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखल जात . खविस नेहमी त्यांच्या कुटुंब बरोबर राहतात . खविस लग्न सुध्धा करतात आणि त्यांना मुल देखील होतात. अस म्हणतात की खाविस लोखंडाहून जास्त बळकट असतो. जो पण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व ती व्यक्ती श्रीमंत बनते.
  11. चकवा :- हा भूताचा प्रकार नसून ही एकप्रकारची भूतांची भूल देण्याची पद्धत आहे. हा जास्त करून रात्री दिला जातो . यात त्या व्यक्तीला एकप्रकारचा आभास होतो . आणि तो व्यक्ती त्या आभासाच्या पाठीपाठी जातो . आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेत . अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकाच जागेवर भटकत असते पण तिला त्याच भान राहत नाही .
  12. मानकाप्या :- याला स्वताला मुंडक नसत . हा कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो . अस म्हणतात कि मानकाप्या हा लोकांची मुंडकी उडवतो . हाकाट्या . जे लोक अपघातात मारतात ते हाकाट्या होतात . हाकाट्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो, याला जर चुकून ओ दिलीत की काम तमाम. हाकाट्या निर्जन स्थळी जास्त आढळतो .
  13. कर्णपिशाच्च भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच्च म्हणतात. कर्णपिशाच्च हा साधनेद्वारे प्राप्त करता येतो . पण एकदा का त्याला वश केल का तो आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतो . साधकाचा शेवटी अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो.

© My Horror Experience. A facebook post By Mangesh Padawale

मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस भराच्या कष्टानंतर घरी आल्यावर मानवाला अति समाधान मिळते.

मय नावाच्या वास्तु शास्त्रज्ञाने रावणाची लंका बांधली, तेव्हा त्याने सांगितले की प्रत्येक वास्तूचा ( घर, दुकान, मंदिर किंवा असेच कांही ) एक गृहपती असतो, त्यालाच वास्तुपुरुष म्हणतात. घर बांधताना कळत नकळत जीव जंतू मारले जातात, त्यांचे पाप नष्ट व्हावे म्हणून सुध्दा वास्तुयज्ञ करतात. वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा करुन, त्या सोबत पाच रत्न ठेवून, वास्तुपुरुषाची प्रतिमा उलटी, आग्नेय दिशेस छोटासा खड्डा करुन पुरतात. हाच त्या घराचा वास्तुपुरुष होय. प्रत्येक सणावारी त्याला नैवेद्य अर्पण करतात, असा एक कुळाचार आहे. कांहीजण वास्तुपुरुषाच्या वाढदिवशी ( ज्या दिवशी वास्तुपुरुष पुरला तो दिवस ) सुद्धां नैवेद्य समर्पण करतात.

जर वास्तुपुरुषाला नियमीत नैवेद्य अर्पण केला तर, तो संतुष्ट राहून, घरावर कृपा करतो आणि त्याच्या आशीर्वादाने त्या वास्तुत धनधान्य, संपत्ती, समाधान, पुत्र - पौत्र यांची सतत समृद्धी असते. कारण वास्तुपुरुष नेहमी ‘ तथास्तु ’ म्हणत असतो. म्हणून घरात कांहीही वाईट बोलू नये, वाईट आचरण करु नये, अशुभ - अभद्र बोलू नये असा अलिखीत संकेत आहे.

वास्तुपुरुषाला भूक लागल्यास तो घरभर फिरतो, अन्न शोधतो आणि त्याला अन्न न मिळाल्यास तो उपाशी पोटी घराला शाप देतो, म्हणून वेळोवेळी नैवेद्य दाखवावा. घरात कोणीही अगदी अतिथी सुध्दां आले आणि त्यांनी अन्न मागितले असतां अन्न नाही असे सांगण्याची वेळ आली तर वास्तुपुरुष ‘ तथास्तु ’ म्हणतो, आणि मग घरात अन्न नसण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून जेवण झाल्यावर गृहिणींनी थोडे तरी अन्न झाकून ठेवावे.

पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

हिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने धर्मराजाला सुचविले, सर्वांचे भोजन झाले आहे, तरी आता त्यांना तृप्तीचा ढेकर देण्यासाठी, हे धर्मराजा सर्वांना सुवासिक असे कांहीतरी खाण्याची व्यवस्था कर. आणि त्याप्रमाणे सर्वांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न झाली. श्रीकृष्णाचीच इच्छा म्हटल्यावर धर्मराजांनी आणि इतर पांडवांनी वासुकी नागावर ही कामगिरी सोपवली. आता तो वासुकी नागच, जाऊन कोठे जाणार तर तो पोचला थेट पाताळात. आणि काय करावे हे न सुचून त्याने नागराणीची भेट घेतली. यावर नागराणीने लगेच आपल्या करंगळीचा छोटासा तुकडा कापून दिला आणि म्हणाली हेच घेऊन जा. करंगळी कापल्यावर रक्ताची धार लागली आणि काय करावे हे न समजून वासुकीने तो तुकडा पृथ्वीवर आणला आणि जमिनीत पुरला. पुरताना जमिनीवर रक्त सांडले. त्यातून एक वेल उगवली त्यालाच पांडव नागवेल म्हणू लागले. नागाने लावलेली वेल आणि रक्तातून उगवलेली वेल म्हणून या वेलीची पाने खाली असता तोंड सुवासिक होऊन रक्तासारखे लाल रंगू लागले.

विडा शृंगारप्रधान असल्याने ब्रह्मचारी पुरुष अथवा विधवा स्त्रियांनी खाऊ नये.

पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्यांना घरामध्ये बोलावून भोजनादी सोयी उपलब्ध करून, त्यांचा आत्मा शांत होऊ देण्याचा कुलाचार भारतात होता.  पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने आतासारखी नव्हती, लोक पायी अथवा घोड्यावरून प्रवास, तीर्थयात्रा करीत, प्रवासात जिथे थांबतील तिथे त्यांचा पाहुणचार होत असे.

एवढेच नव्हे तर, माध्यान्हकाळी घरातील यजमान आणि इतर मंडळी अतिथीची थोडा वेळ वाट पहात असत, कारण अतिथी हा देवासमान मानला जायचा. देवयज्ञ म्हणजे यजमानाने भोजन करण्यापूर्वी वैश्वदेव करणे. आपल्या अन्नातील थोडातरी भाग देव, मानव, पशू, पक्षी, पितर वगैरे सर्वांना अर्पण करणे तसेच घरामध्ये उखळ, जाते, पाणवठा, सूप अशा पाच ठिकाणी किंवा कळ्त नकळत माणसाच्या हातून जीवहिंसा घडते, त्याचे पापक्षालनार्थ वैश्वदेव करण्यावा हिंदू धर्मात रोजचा कुळाचार होता.  वैष्वदेवासाठी चुलीवर शिजवलेल्या भांड्य़ातील भातापैकी थोडा भात घेऊन त्यावर तूप घालून अन्नशूद्धी करतात. मग त्याचे तीन भाग करून एकाभागाची अग्निदेवाला आहुती देतात, दुसर्‍याने भूत यज्ञ म्हणजे बलिहरण करतात आणि तिसर्‍याने पितरांसाठी घराबाहेर जाऊन काकबळी देतात. भारतीय संस्कृतीत अशी वैश्वदेवाची कुळाचार पध्दती होती. परंतु आता कालपरत्वे ही पध्दत नष्ट होत चालली आहे, परंतु ह्यातील फायदा जाणला जात नाही हे दुर्दैव आहे. 

ज्ञानेश्वर म्हणतात

कुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।

मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥

आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.

रामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच.

जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते.  त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • राग यमन
    राग यमन मधील काही रचना - यमन रागातील प्रार्थना, मराठी, हिंदी चित्रपटगीते, भावगीते या विषयीची सूची- मराठी चित्रपटगीते - १) ब्रह्मा विष्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...
  • पावसासाठी प्रार्थना
    मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
  • दहावीचा अभ्यास कसा करावा - १
    दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...
  • पोवाडा
    शाहिर, भांड, भालदार, भवय्ये, चितारी, गपी, विनोदी, कथाकारी, नकलाकारी वगैरे गुणीजनांना पदरी बाळगण्याची चाल रीत फार पूर्वीपासून राजे महाराजे, प...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ▼  2016 (1)
    • ▼  February (1)
      • The Fame of the Clock
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose