ही म्हण मला फार खरी वाटते, जगात कोठेही जा, पंजाबी आणि बटाटा जगात सगळीकडे सापडतात. आपण भारतीय पोटापायी आपला देश सोडुन कोठेही जाण्यासाठी तयार असतो. बायकोने कोठेतरी वाचले, आजकाल काय तर म्हणे भारतीय पोटासाठी भारतातपण (परत?) जात आहेत. अहो आम्हाला पैसा पाणी ठिक मिळत असेल तर, का नाही? नेहमी आम्ही या पोट-स्थलांतराला गोडगोड नाव देतो, आधी काय तर "Brain Drain"... याला मराठीत काय म्हणतात, मला पण सांगा. आता काय तर म्हणे, "Brain Gain", बायकोला म्हटलं, "तु पण भारतात जाऊन ये, तुला पण थोडासा वाढवुन मिळतोय का ते बघ". काही नाही हो, याचा आणि मेंदुचा काही संबंध नाही. लवकरात लवकर कोठेही कमवता येते त्यावर सगळे ठरते आहे. आजकाल अमेरीकेतील बहुतेक सारे काम भारतात जात आहे त्यामुळे भारतात पगार वाढले आहेत, अमेरीकेपेक्षा भारतातच सुखसुविधा चांगली मिळते आहे. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरीकेत आजकाल वीसा, GC, आणि चांगला पगार मिळणे फार अवघड झाले आहे.
आजकाल अंतराळात पण पर्यटन शक्य आहे, मला हे नक्की माहीत आहे की जर वृद्धीला जागा असेल तर आम्ही तेथे नक्की असु. नुसते असणार नाही, खुप असणार. बऱ्याच आफ्रिकन देशातली अर्थव्यवस्था भारतीय लोकांच्याहाती आहे. भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या राष्ट्रीय जेवण-खाण्यात "Chicken Tikka Masala" आला आहे. शिकागो, न्यु जर्सी सारख्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिनी देशप्रेमाची मिरवणूक निघते. अमेरीकन Party मध्ये भारतीय जेवण येते आहे. अमेरीकन माणुस Infosys, TCS सारख्या देशी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे, काहीजण तर बंगळुरात नोकरी पण करायला तयार आहेत. अशा लहान सहान गोष्टी जर जवळून निरखल्या तर मला सांगा या brain drain आणि brain gain च्या बोलण्यात काय अर्थ आहे? मला असे म्हणायचे नाहिये की आम्ही डोक्यासाठी काम करत नाही, पण हे नक्की आहे की अशा गोष्टी नुसत्या दिखाव्याच्या आहेत. लोक कोणाला समजावत आहेत की मी भारतात "Brain Gain" साठी जात आहेत. असे काही नाहीये. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे, लोकांच्या अपेक्षा लवकर आता भारतात पण पुर्ण होत आहेत. सगळा पोटाचा खेळ आहे. भारतीय कंपन्या आता अमेरीकन/युरोपीयन कंपन्यासाठी सेवा उद्योग करणार असतील तर त्यांना परदेशी स्थाईक/शिक्षित भारतीय हवे आहेत, त्या लठ्ठ पगार द्यायला तयार आहेत, जो घ्यायला तरूण तंत्रज्ञपण तयार आहेत, मग हा Brain Gain झाला कसा?
Popular Posts
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...
-
खूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...

No comments:
Post a Comment