आज भारतात येऊन १० दिवस होत आहेत. कितीही टाळले तरी महाजालाविना जगणे अशक्य झाले आणि हा मी इथे आलो. काही म्हणा आज इथे धूळ, धूर, आवाज, अशक्य लोकसंख्या... पण सगळे माझे आहे. मुंबईत उतरताना ऊर भरून आला. आपले लोक, आपली भाषा, सगळेच आपले. अगदी झकास....
भारताच्या संविधानाप्रमाणे जर प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळणार असतील तर, आज पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना इतरांच्या पुढे कसे पाठवले? खरे तर येथे पहिला-दुसरा अशी स्पर्धा नसवी. प्रत्येकाला हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करणारे सरकार कधी मिळणार माझ्या भारताला? या राजकारणी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पक्षपाती मंत्रीमंडळांनी आजपर्यंत लोकांना वाईट सवय़ी लाऊन देशाचे नुकसानच केले आहे. त्यात आता मनमोहन सिंग यांची पण भर पडली याची मला खंत वाटली.
देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा - पंतप्रधाननवी दिल्ली, ता. ९ - अल्पसंख्याकांसाठी आणि त्यातही मुस्लिमांसाठी असलेल्या विकास योजनांसाठी देशाच्या साधनसंपत्तीतून प्राधान्याने निधीची तरतूद करावयास हवी. साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केले. ..... राष्ट्रीय विकास परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानांचे वक्तव्य अनुचित, आक्षेपार्ह आणि निषेधार्ह असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
पंतप्रधान म्हणाले, ""विकासाची फळे अल्पसंख्याकांपर्यंत विशेषतः मुस्लिमांपर्यंत पोचण्यासाठी आपण कल्पकतेने योजना आखल्या पाहिजेत. यासाठी राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा अधिक जबाबदारीने वापर करावयास हवा. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांचा नियोजन आयोग आढावा घेईल आणि मूळ उद्दिष्टांपासून दूर गेलेल्या योजना बंद करेल. केंद्राच्या निधीच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्यांनी त्यासाठीचा अधिकाधिक वाटा उचलायला हवा.''
नेहमी दुखावलेल्या समाजाचे लाड करुन भारतात सामाजीक विषमता वाढवल्याने आज कोणताही राजकारणी या विषमतेविरुद्ध बोलण्याचे धाडस करु शकत नाही. आजच्या भारतात जर कोणी तोंड उघडले की लाड करण्याशिवाय ते काही बोलुच शकत नाहीत.
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात ...
-
दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...