आपल्या पंतप्रधानांचे डोके ठिकाणावर आहे का?

भारताच्या संविधानाप्रमाणे जर प्रत्येक भारतीयाला समान हक्क मिळणार असतील तर, आज पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना इतरांच्या पुढे कसे पाठवले? खरे तर येथे पहिला-दुसरा अशी स्पर्धा नसवी. प्रत्येकाला हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करणारे सरकार कधी मिळणार माझ्या भारताला? या राजकारणी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या पक्षपाती मंत्रीमंडळांनी आजपर्यंत लोकांना वाईट सवय़ी लाऊन देशाचे नुकसानच केले आहे. त्यात आता मनमोहन सिंग यांची पण भर पडली याची मला खंत वाटली. 

देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा - पंतप्रधान

नवी दिल्ली, ता. ९ - अल्पसंख्याकांसाठी आणि त्यातही मुस्लिमांसाठी असलेल्या विकास योजनांसाठी देशाच्या साधनसंपत्तीतून प्राधान्याने निधीची तरतूद करावयास हवी. साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे केले. ..... राष्ट्रीय विकास परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधानांचे वक्तव्य अनुचित, आक्षेपार्ह आणि निषेधार्ह असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
पंतप्रधान म्हणाले, ""विकासाची फळे अल्पसंख्याकांपर्यंत विशेषतः मुस्लिमांपर्यंत पोचण्यासाठी आपण कल्पकतेने योजना आखल्या पाहिजेत. यासाठी राज्यांना केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा अधिक जबाबदारीने वापर करावयास हवा. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांचा नियोजन आयोग आढावा घेईल आणि मूळ उद्दिष्टांपासून दूर गेलेल्या योजना बंद करेल. केंद्राच्या निधीच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्यांनी त्यासाठीचा अधिकाधिक वाटा उचलायला हवा.''

नेहमी दुखावलेल्या समाजाचे लाड करुन भारतात सामाजीक विषमता वाढवल्याने आज कोणताही राजकारणी या विषमतेविरुद्ध बोलण्याचे धाडस करु शकत नाही. आजच्या भारतात जर कोणी तोंड उघडले की लाड करण्याशिवाय ते काही बोलुच शकत नाहीत.

Vishal Khapre

No comments: