मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

जर हा विषय आताच्या पिढीतील तरुणांना विचारला तर साहजिक त्यांचे उत्तर असेल आंतरजातीयच काय पण आंतरधर्मिय विवाह का नकोत? जगाच्या पाठीवर कोठेही जा सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो, अगदी अमेरिकेत जरी शस्त्रक्रिया करायला गेला तरी तेथील कोणाचेही रक्त चालते, किडनी खराब झाली तर  ती सुद्धा कोणाचीही चालते,तर मग लग्नासाठीच हि जाती धर्माची बंधने का असावीत? प्रजननाची क्रिया सर्व धर्मात एकच असते, तर मग मुला मुलींनी आम्तरधर्मिय विवाह केल्यास काय बिघदणार आहे? परंतु काही कर्मठ प्रामाण्यांना हा प्रकार पटत नाही, आणि का पटत नाही त्याचे समर्पक उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते.

प्रेमावर आज जग चालले आहे, प्रेम ही भावना असते, तेथे जात, पात किंवा धर्माचा विचार होत नाही. त्याप्रेमातून ज्या नवबालकाचा जन्म होतो तो सोबत धर्म घेऊन येत नाही. खरे तर आता सरकारनेच नोकरीतून, शाळेत प्रवेश देताना, अगर कोनतीही सवलत देताना जात आणि धर्माचा उल्लेख टाळायला पाहिजे. जेव्हा सरकार अशी पावले उचलील तेव्हाच समाजातून जाती धर्माचे उच्चाटन होईल. मोठमोठी भाषणे देनारे मात्र घरातील मुलामुलींवर संस्कार वेगळेच करतात. त्यांची मुले परजातीच्या प्रेमात पडली तर कोण आकांडतांडव करतात, त्यांना सर्व बाजूंनी विरोध करतात. आता हे थांबले पाहिजे. आताची पिढी जी प्रेमात जात, पात धर्म पाळत नाही ती एक प्रकारे ही संकल्पनाच नष्ट करीत आहे.

ही जी जात आहे, ही जाता जाता जात राहिली तर जाताना जातीच्या समस्या सोडवून जाईल.

आजकाल NRI मुलांची लग्न म्हण्जे चट मंगनी पट शादी असतात. आईवडिल मुलगी पसंद करतात, मुलाला फोटो दाखवतात आणि मग chatting ने मुलीशी बोलण होतं.मुलगी आवडली तर लवकरात लवकर सुट्टी टाकुन मुलगा लग्नाला उभा राहतो.मधल्या वेळात मुलीला passport सारखे सोपस्कार करायला लागतात. मुलीचे आईवडिल NRI जावई मिळाला म्हणून खुश असतात. मैत्रिणीसुद्धा मुलीला चिडवायला सुरुवात करतात आणि मुलगी मात्र नवीन देश आणि नवरा कसा असेल या विचारात असते. आतापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली राहिलेल्या तिला या सर्व नवीन गोष्टिंनी धडकी भरते. पण हि सुरुवात असते. मुलगी नवऱ्याबरोबर नवीन देशात येते आणि स्वतःचा संसार आई, सासु च्या शिकवणीने, उपदेशाने,मदतीने सुरु करते. गाडी आता कुठे रुळावर येत असते आणि तेवढ्यात कुठेतरी गडबड होते. दोनजणांच्या छोट्या घ्ररट्यात तिसरा पाहुणा यायची चाहूल लागते. माहेरचे,सासरचे सर्व खुश असतात आणि परत एकदा मुलीला धडकी भरते. आई, सासु,ताई, मैत्रिणी सगळ्यांचे परत एकदा सल्ले सुरु होतात. पण महत्वाची गोष्ट अशी असते कि, घरापासुन लांब असणाऱ्या त्या मुलीला काहीच कळत नाही. नवऱ्यालाही काही माहीत नसतं. तो बिचारा ओळखीच्या चार मित्रांकडुन याबाबतीत माहिती मिळवण्यात लागलेला असतो. सुरुवात insurance प्रमाणे जवळ असलेला Doctor शोधण्याने होते. बहुतेकवेळी हा doctor म्हणजे मित्रांनी त्यांच्यावेळी शोधलेलाच असतो. सर्वसाधारण भावना हिच कि, जर चार देसी त्या doctorकडे जातात तर आपल्यालाही चालेल. बऱ्याचवेळी हा doctorहि देसीच असतो. कारण, बहूतेक इथल्या doctorकडे जाणं म्हणजे फार मोठ दिव्य वाटत असतं.

पण एखादा असा असतो जो वेगळ्या doctorकडे जायच ठरवतॊ.कुठल्याही doctor कडे गेल तरी मोठे forms भरायला लागतात. त्यामध्ये लिहायची माहिती फ़कत नवरा आणि बायको यांच्यापुरती म्रर्यादित नसुन ती family history नावाच्या प्रकाराखाली माहेर आणि सासरपर्यन्त पसरते. त्यात विचारलेले रोग कधी ऐकण्यात पण आलेले नसतात.  स्वतःबद्द्लही इतकी खोलवर माहिती लिहायची बहुतेकदा पहिलीच वेळ असते. बऱ्याच कष्टांनंतर एकदाचा form भरला जातो आणि doctorशी पहिली भेट होते.

एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार
राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? आता यावर काय उपयायोजना आखल्या म्हणजे रोगाचा फैलाव थांबेल? सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ राहते, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

सिकेल सेल अनिमिया हा एक जनुकिय दॊष आहे. रक्तात असणा‍ऱ्या तांबड्या पेशींमध्ये हीमोग्लोबिन नावाचे प्रोटिन असते.हे प्रोटिन शरीरात ऑक्सिजन वाहायचे काम करते. हीमोग्लोबिन ४ वेगवेगळ्या प्रोटिन भागांनी(subunits) बनलेले असते. २ भाग अल्फ़ा आणि २ बेटा प्रकारचे असतात. अल्फ़ा आणि बेटा हे प्रोटिनच्या  structures  साखळीचे प्रकार आहेत. बेटा साखळीत जेव्हा एक nucleotide  glutamateची जागा valine नावाचा दुसरा nucleotide घेतो, तेव्हा हीमोग्लोबिनचे structure  बदलते. याचा परिणाम म्हणजे सगळॆ हीमोग्लोबिनचे रेणू एक्मेकांना चिकटतात.  या आकार बदललेल्या हीमोग्लोबिन रेणुंमुळे तांबड्या पेशींचा गोल आकार खुरप्याच्या आकाराप्रमाणॆ होतो. य़ामुळॆ तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांना चिकटु लागतात आणि परिणाम ऑक्सिजन पुरवठ्यावर होतो.

Sickle-shaped red blood cells

प्रत्येक माणसाला एक gene आई आणि एक gene वडिलांकडून मिळ्तो. जर दोन्ही genes मध्ये वरच्याप्रमाणॆ बदललेला nucleotide  असेल तर त्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो. पण जर फ़क्त एकच gene कमतरता असलेला असेल आणि दुसरा gene चांगला असेल तर त्या माणसाला carrier म्हणतात. अशा माणसाला अनिमियाचा त्रास होत नाही.

सिकेल सेल अनिमियाचा मलेरियाशी जवळचा संबंध आहे. सिकेल सेल अनिमिया मलेरिया असणाऱ्या सर्व भागात आढळ्तो. मलेरियाचा जीवाणु एक प्रकारच्या मादी डासाच्या चावण्यामुळे पसरतो. मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करतो आणि तिथेच वाढतो. पण जर सिकेल सेल अनिमियामुळॆ तांबड्या पेशींचा आकार बदललेला असेल तर मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करु शकत नाही. ज्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो किंवा जो माणुस सिकेल सेल अनिमियाचा carrier असतो त्याला, मलेरिया होण्याचे chances  कमी असतात.

भारतात जिथे मलेरिया अतिशय मोठ्या प्रमाणात आढळ्तो तिथे सिकेल सेल अनिमिया असणं,आश्चर्याचं नाही. बहुतेक आपले gene मलेरियापसुन वाचण्यासाठी तांबड्या पेशींचा आकार बदलतात,पण त्याचा परिणाम सिकेल सेल अनिमियात होतो. हि फार चांगली गोष्ट आहे कि, आता या रोगाची गंभीरता लक्षात घेउन त्यावरती आता ठोस पावलं उचलली जातील.

एक बरे झाले, कोर्टानेच शाळांना चपराक दिली, मुलाखतीच्या नावावर अगदी डोनेशन ठरवले जायचे. लोअर के.जी. काय? उप्पर के.जी. काय? एवढे लहान वय असते काय मुलांचे शाळेत जाण्याचे. अशी भिती वाटत होती की, लग्नातच येणार्‍या बाळासाठी शालेतील सीट बुक करावी लागते की काय? पालकांची मुलाखत कशासाठी? परदेशात सहा वर्षाव्या मुलांनाच शालेत प्रवेश देतात. खरे तर ही चार वर्षांची मर्यादासुद्धा सहा वर्षांची करावी.
http://www.esakal.com/esakal/12152007/Specialnews8BE1B611A8.htm



नर्सरीत प्रवेशासाठीची वयोमर्यादा चार वर्षे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, ता. १४ - खासगी शाळांना अधिक स्वायत्तता देतानाच, बालवाडीत (नर्सरी) प्रवेश घेण्यासाठीची वयोमर्यादा चार वर्षेच कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. ....
प्रवेशावेळी पालकांची मुलाखत घेण्याचे कारण नाही; पण अनौपचारिक मुलाखतीस हरकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

- विनाअनुदान शाळा म्हणजे व्यापारी संस्था नव्हे
- तीन वर्षे हे मुलांना शाळेत पाठविण्याचे वय नव्हे
- प्रवेशावेळी पालकांची मुलाखत गरजेची नाही; मात्र गरजेपुरत्या संवादावर निर्बंध नकोत
- पहिलीत प्रवेशाचे वय सहा वर्षेच कायम राहील
----------------------------------------------------------------
वाचकहो, खालील बातमी वाचलीत, पुरस्कार. बहिणीवा पुरस्कार भावालाच. आता पुरेना, नवीन उभारणार्‍या संगीतकारांना द्या ना पुरस्कार. यांचे नाव झाले, यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात आणखी एकाची भर. खरे तर पंडितांनीच म्हणायला पाहिजे होते की, आता बस कोणा दुसर्‍याला द्या पुरस्कार. पण हा  मानव  स्वभाव आहे प्रसिद्धीसाठीची कोणतीही संधी माणूस सोडत नाही.  खरे तर अजूनही संगीतकार होते ते नक्कीच पुरस्काराच्या तोडीचे होते. आता यापुढे तरी पुरस्कार देणार्‍यांनी, आणि घेणार्‍यांनी विचार करावा.
 
http://www.esakal.com/esakal/09092007/PuneDFBD8B4A1F.htm


 
हृदयनाथ मंगेशकरांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

पिंपरी, ता. ९ - आशाताई आणि माझे नाते हे केवळ बहीण-भावाचे नसून आई-मुलासारखे आहे. तिच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा लतादीदी आणि मास्टर दीनानाथांच्या स्वरांचा सन्मान आहे, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज येथे व्यक्त केली. .......
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखा व कलारंग प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा "आशा भोसले पुरस्कार' ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या वेळी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, हेमेंद्र शहा, दीपक पायगुडे, विजय जोशी, रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे व्यासपीठावर होते. वक्‍त्यांची अनौपचारिक भाषणे आणि त्यांनी सांगितलेल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या विविध आठवणींमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ""आशाताईंच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच तिच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. लतादीदीच्या आणि आशाताईंच्या अमृतमहोत्सवाचा आनंद तर आहेच; आशाताईंनी संगीताचे सर्व प्रकार समर्थपणे हाताळले. विलक्षण उत्साही असलेली आशाताई पंचाहत्तरीची झाल्याचे अजिबात वाटत नाही. सुरवातीपासून तिला खूप धडपड करावी लागली आहे. मी लहान असताना पायाच्या दुखण्यामुळे ती मला कडेवर घेऊन सर्व कामे करत असे. मी संगीतबद्ध केलेले तिचे पहिले गाजलेले "जिवलगा राहिले रे दूर घर माझे..' हे गाणे तिने विलक्षण गायले
 
राज ठाकरे म्हणाले, ""मंगेशकर आणि पुरंदरे कुटुंबाचे माझ्यावर व्यक्तिगत मोठे ऋण आहेत. या दोन घरांना मी कधीही नकार देऊ शकत नाही. अपमान, वेदना, दुःख सहन केल्याशिवाय नवीन मूर्ती आजपर्यंत झालेली नाही. हृदय पिळवटून टाकल्यावर असा कलाकार जन्माला येतो. बाळासाहेबांनी (हृदयनाथ) संगीतबद्ध केलेली लतादीदींनी गायलेले ज्ञानेश्‍वरांचे अभंग, अशा कलाकृती समाधी लागल्याशिवाय घडू शकत नाहीत.''

श्री. पुरंदरे म्हणाले, ""मंगेशकर कुटुंबाची पाच भावंडे म्हणजे स्वर्गात सरस्वतीवर वाहिलेल्या सोनचाफ्यातील फुलांमधून पृथ्वीवर घरंगळत आलेली ही फुले आहेत. बालगंधर्व सुद्धा मास्टर दीनानाथांचे हेवा करत, यातच त्यांच्या आवाजाचे महत्त्व समजून येते. त्यांच्या आवाजात विलक्षण गोडवा होता. आशाताईंचा आवाज म्हणजे पंचामृतातील मध आहे. त्यांच्या गायनातील असामान्य आवाजाप्रमाणेच त्यांचे गद्य शब्दही अलौकिक अनुभूती देतात. त्यांना मानवी दुःखाची जाण आहे.''

श्री. भोईर यांनी प्रास्ताविक केले. श्री. घांगुर्डे यांनी परिचय करून दिला. सतीश दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सांकला यांनी आभार मानले.

विलक्षण उत्साह अन्‌ जिद्द
हृदयनाथ म्हणाले, ""विलक्षण उत्साही असलेली आशाताई पंचाहत्तरीची झाल्याचे अजिबात वाटत नाही. सुरवातीपासून तिला खूप धडपड करावी लागली. अनेक प्रकारची आव्हाने तिने समर्थपणे पेलली. मी लहान असताना पायाच्या दुखण्यामुळे ती मला कडेवर घेऊन सर्व कामे करत असे, हे मी कधीही विसरू शकत नाही.''
सरकारकडे बहुतेक असे एक खाते असावे कि, तेथे फक्त नविन कोणता कर लावावा यावर संशोधन होत असावे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कर घ्यावा, आणि कामावर ठेवणार्‍याकडून सुद्धा घ्यावा. मेहनत करणारे विद्यार्थी, कामावर ठेवणारे पगार देणार आणि कर कोण घेणार तर सरकार. आईवडिल कष्ट करून शिकवणार, लहानपणी खस्ता खाणार, स्वतः त्रास काढणार त्यांचे काय? जर कामावर ठेवणार्‍यांना कर द्यायचा असेल तर ते त्यांना कामावर ठेवणार नाहीत, मग त्या विद्यार्थांच्या भविष्याचे काय? आईवडिल मुलांना शिकवतात आणि जर एखाद्या मुलाचे लग्न झाले तर सासरकडच्या मंडळींनी मुलाच्या आईवडिलांना, सरकारप्रमाणेच कर द्यायला नको का? हा कर लावला तर करांची एक मालिकाच तयार होईल. सरकारने तर आता एक स्पर्धा जाहीर केली पाहिजे कि, जो कोणी भारतीयांवर  जास्तीत जास्त कर कसे लावता येतील, कसे वसूल करता येतील, याबद्दल सविस्तर संशोधन करेल त्याला 'करमहर्षी" पुरस्कार जाहीर करून जमा झालेल्या करातून काही हिस्सा द्यावा. भारतीय माणूस फारच सोशिक आहे, तो कधीही, कुठेही तक्रार करणार नाही.  खरोखरच औरंगजेबाच्या जिझीया कराची आठवण होते.
 

Sakal Papers International Marathi News Daily - Pune




परदेशात नोकरी? "एक्‍झिट टॅक्‍स' भरा!  
नवी दिल्ली, ता. १९ - देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांतून पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून "एक्‍झिट टॅक्‍स' आणि अशा विद्यार्थ्यांना कामावर ठेवणाऱ्या संस्थांकडून "ग्रॅज्युएशन टॅक्‍स' आकारण्यात यावा, अशी शिफारस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संसदीय समितीने केली आहे
 
 
 
 
भारताची न्यायव्यवस्था काय म्हणते,शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. बरोबर असेच ९९ अपराधी तर सुटत नाहीत ना? तीन तीन कोर्टातून साक्षी पुरावे तपासून,
हायकोर्टात शिक्कामोर्तब होऊन, सुप्रीम कोर्टात अपील होऊन फाशी कायम होते, शिवाय अपराध्याला पूर्ण संधी दिली जाते, तरीही राष्ट्रपतीकडे ही प्रकरणे वर्षानुवर्षे पडून रहावीत, म्हणजे ज्यांची या अपराध्यांमुळे हानी झाली आहे त्यांचे काय? बरोबर आहे हि प्रकरणे राष्ट्रपतींकडे पाठवूच नयेत. आणि शिक्षेची अंमलबजावणीसाठी सुद्धा मुदत असावी.
संजय दत्तबद्दल मिडीयावाल्यांनी दिवसरात्र न्युज दिल्या, अगदी कंटाळा येईपर्यंत, परंतु या कोणालाही एवढे समजले नाही कि, त्या बॉम्बस्फोटात ज्यांचे नातेवाईक, मुले, कर्ते पुरुष, आईवडिल, मुलेबाळे गेली, संपत्तीची हानी झाली, त्यांची साधी मुलाखात घ्यावी. अरे त्यांना विचारा, त्यांना न्याय करू द्या या अपराध्यांचा. एका तरी वृत्तपत्रवाल्यांनी त्या पिडीत लोकांवर अग्रलेख लिहीला काय? त्यांच्या मुलाखती छापल्या काय? त्यावेळच्या स्फोटाची छायाचित्रे छापली काय? नाही त्यांची आठवण कोणालाच नाही. देवा परमेश्वरा, आता तूच या सर्वांना बुद्धी दे बाबा. 
 
 
http://www.esakal.com/esakal/08182007/Pune0EFE30C321.htm


 
पुणे, ता. १७ - ""मुंबई बॉंबस्फोटांतील आरोपींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी किती दिवसांमध्ये होईल, हा प्रश्‍न आहे. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली, तरच गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखविता येईल आणि त्यांच्या मनात कायद्याविषयी भीती बसेल,'' असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज व्यक्त केले. ........
राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज किती प्रलंबित ठेवावा हे ठरविले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

निकम म्हणाले, ""न्याय प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळेच आज गुन्हेगारांना कायद्याविषयी भीती नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी फक्त कायदे कठोर करून चालणार नाही, तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरपणे झाली पाहिजे. पुण्यातील राठी हत्याकांडातील आरोपीला देण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली आहे. मात्र, त्यानंतर त्याचा दयेचा अर्ज पडून असल्याने अजूनही अंमलबजावणी झालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे.''

खालील बातमी आहे दैनिक सकाळ मधील. एवढी मुले शाळा कॉलेजमधून पास होत असताना एक सचिव मिळू नये? आहे के नाही कमाल. ते तर सोडा एवढ्या मोठ्या देशाला राष्ट्रपती मिळत नाही. शोधावा लागतो, मग पहिली स्त्री म्हणून अगतीक व्हावे लागते. किती जणांना त्या माहित असतील. अरे आम्हाला किरण बेदी पन चालल्या असत्या. हिंदू राष्ट्राच्या सर्वोच्च पदी हिंदूच राष्ट्रपती असावा हे तर आम्ही केव्हाच विसरून गेलोय, तीच कथा शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्राचीही.
 
राष्ट्रपतीपदासाठी कोण कोण चालले असते हे कुणी सांगू शकेल काय?

 
 
 

Sakal Papers International Marathi News Daily - Pune


कुणी सचिव देता का, सचिव?
पुणे, ता. १७ - अनेक महत्त्वाचे प्रश्‍न प्रलंबित असताना दुसरीकडे सहकार खात्याचे गाडे सचिवांविना अडले आहे. गेले काही दिवस खात्याला पूर्णवेळ सचिव नसल्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले अनेक निर्णय रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.
 
 
 
 
 

 

 

*********************
दुरुस्ती केलेली

*********************

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर

http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm

जन्माला आल्याआल्या आपल्याला माणसांची ओळख सुरू होते. कळत नसते पण तोंडओळख होते. आजूबाजूचे लोक येऊन हसत बोलत असतात. सर्व जण गोडच बोलतात कारण त्यांना पक्के माहित असते कि, या बालकापासून काहिही फायदा तोटा नाही. पण त्याच लहान बाळाने अंगावर ’सू’ केली, कि लगेच त्याला त्याच्या आईकडे दिले जाते. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला जग कळते आणि आपल्यालाही जग ओळखते. शिक्षण पूर्ण होते, कामधंदा सुरू होतो, आणि संपर्कातील माणसांची संख्या वाढते.

जन्माला येताना काही नातेवाईक अपरिहार्य असतात, टाळता येत नाहीत, नातेवाईकांनाही आपले नाते टाळता येत नाही. मग होतात मित्र, ते जोडणे, मात्र आपल्या हातात असते, पण पन्नास टक्केच बरे का, कारण त्यालाही चॉइस असतोच ना? जो प्रकार मुलांच्या बाबतीत तोच मुलींच्या बाबतीतही. बालपणातले मित्र तरूणपणात, तरूणपणातले नंतर कमीकमी होत जातात, तर काही संगतीत राहतात. कधी नातेवाईक जवळचे तर कधी मित्र जवळचे असतात. किती प्रकार ना? नातेवाईक, जवळचे लांबचे, मित्र, शेजारीपाजारी, कधितरी कुठेतरी ओळख झालेले, शाळेतील मित्र, घराजवळचे मित्र, ऑफिसातले मित्र, व्यवहारातील ओळख झालेले, रस्त्यात भेटल्यावर पत्ता शोधत घरी येणारे, नुसतेच हाय करणारे, प्रवासात भेटणारे, किती प्रकार. 

घर असते, येणारे घरीच येणार, कधीतर बळेच घरी येणार. आता आपण हे ठरवायचे कि, कोणाला घरी आणायचे कोणाला नाही, नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच विचार केलेला बरा नाही का?

रस्ता, गल्ली, घराचे अंगण, दरवाजा बाहेर, दरवाजाच्या आत, हॉलमध्ये, आपल्या समोर, आपल्या शेजारी, फक्त बोलण्यापुरते, चहापुरते, चहासोबत काही खायला देण्या पुरते, काही सोबत जेऊ शकतात, तर काही पार स्वैपाकघरात सुद्धा येऊ शकतात. आता एवढ्या प्रकारात कोणाला कशी वागणूक द्यायची ते आपण ठरवायचे असते,  काय? काही माणसे रस्त्यात भेटल्यावर तिथेच सोडून द्यायचे असतात, तर काही पार स्वैपाक घरात न्यायच्या लायकीचे असतात, मग तिथे नातेवाईक का मित्र हा विचार नसतो. रस्याच्या लायकीचा जर स्वैपाकघरापर्यंत पोहोचलातर काय अनर्थ होईल कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा प्रत्येकाची जागा आपणच ठरवायची असते, एवढेच नाहीतर त्यांच्या जागासुद्धा प्रसंगाप्रमाणे, त्याच्या वागणूकीप्रमाणे बदलायच्या असतात, तिथे कोणाचीही भिडभाड ठेऊ नये, नंतर जड जाते, आयुष्य बदलून जाते, संसार उधळून जातो. दारावरच्या कोणालाही त्याच्या वागणूकीप्रमाणेच हळूहळू आत येऊ द्यावे, आणि तसेच बाहेरही ढकलण्याची मानसिक तयारी ठेवावी. आपणही दुसर्‍याच्या घरी जाताना विचार करावा कि आपली तिथे कोणती जागा आहे.

मात्र घरातील देवाचे स्थान अशा ठिकाणी असावे कि त्या ठिकाणी कोणीही पोहोचता कामा नये, कोणालाही तेथपर्यंत नेऊ नये.

शेवटी काय तर माणसाची प्रसिद्धी, प्रतिष्ठा कशावरून ओळखायची तर, त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक जमतात, त्यावरच ना?       

आपल्या भारतात जगातील एक आश्चर्य आहे, म्हणजे ताज महाल. आपण भारतीयांनी जीवाचा आकांत करुन त्याचं स्थान कायम केले. जर ताज महाल हे एक आश्चर्य आहे, तर ते जगातील इतरांनी मान्य केले किंवा नाही यात काय फरक पडतो? जर जागतिक मत बघुन हे ठरत असेल तर आपली लोकसंख्या बघता, साती आश्चर्ये भारतीय किंवा चिनी बनवता आली असती. जगातील काही सत्ये ठरवण्यासाठी आपण लोकशाहीचे नियम वापरु नयेत असे मला वाटते. काही वर्षांपुर्वी जगातील लोकप्रसिध्द गाणे  यावर असाच लोकशाही प्रयोग झाला होता. वंदे मातरम हे त्यात पहिल्या क्रमांकावर आले. त्यावेळी, लोकांच्या मान्यतेची गरज होती. जगातील आश्चर्ये मात्र या लोकशाही प्रकाराल अपवाद नाही का. थायलॅंडमधील हिंदु मंदिराला तो दर्जा मिळावा म्हणुन हिदुवादींनी आवाहन केले होते, मग आपण ताजच का वर आणला? माझ्यामते, हा सर्व प्रकार पर्यटन सस्थां आणि उद्योगांनी फक्त गाजावाजा करत, प्रोत्साहनासाठी केला होता. जर ताज आश्चर्यात आला नसता तरी ज्यांना तेथे जायचे ते जाणारच, आणि ताजचे सौंदर्य त्यांना भुरळ पाडणारच. पण ताज महाल मध्ये  आश्चर्य ते काय?


"खुप मोठे हो ते बांधकाम" म्हणुन?

शाह जहान खूप मोठा बादशहा होता, त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे बांधले, त्यात फार काय ते कौतुक हे? अहो जागा फुकट, कामगार फुकट. खर्च तो फक्त सामानाचा, आणि नंतर त्या कामगारांचे हात कापणार्‍या सैनीकांचा. बस्स. झाला तयार तुमचा ताज महाल. एवढ्या मोठ्या बादशहाने जो बांधला त्यात कौतुक ते काय? कारण त्याच्या ऐपतीपेक्षा लहानच आहे तो.
अजुनही ताजवरील संशय काही कमी होत नाहीत. पु. ना. ओकांच्या म्हणण्याप्रमाणे, तो तेजोमहालय आहे. आता हे मात्र मला माहित नाही. पण इतिहास हा कायम, राज्यकर्त्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे बदलल्याची उदा. आपल्याला इतिहासात दिसतातच. त्यामुळे, सध्याच्या सरकारने तो बदलला किंवा शाह जहानने तो बदलला हे कोडे सुटणे अबघडच आहे.

बायकोसाठी बांधला म्हणुन?

आता मुमताजमहल मेल्यावर बांधला ना? नव‌र्‍याने बायकोसाठी ती मेल्यावर बांधले म्हणुन? खरे बघाल तर बायको मेल्यावर त्याच्या आनंदात आज अनेकजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे ताज महाल बांधतील. ;)  शाह जहानने फक्त मुमताजमहल साठीच का बांधला? त्याच्या इतर बायकांनी काय गुन्हा केला? (तु.मा.प्री. शाह जहानचा जनानखाना बराच मोठा होता.) मुमताजमहल खुप सुंदर होती म्हणे. पण तरी, दिल्लीच्या राजाने हे आश्चर्य आग्र्याला का बांधले? जर त्याला आपल्या समोर आवडतीच्या आठवणीसाठी तीच्या इतके सुंदर हवे होते तर त्याने इतक्या दूर का बनवले? हे मात्र कोडेच आहे. जागा सुंदर होती म्हणून असेल.


प्रेम वेडे असते म्हणुन?

आजवर प्रेमवीरांच्या नावात लैला-मजनू, हीर-रांझा अशी नाबे होती. (त्यांची लग्ने झाली नव्हती म्हणा. ) मग त्यात शाह-मुमताज हे नाव का येत नाही कोण जाणे? या बादशहाला चार मुले, सगळेच मुमताज महलची नव्हती. मग शाह जहान हा एक पत्नीव्रता नव्हता तर.

 

मरताना ताज बघत मेला म्हणुन?

आता असे खरे की शाह जहानने त्या ताज महालला बघत प्राण सोडले. पण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्या आज्ञाधारक मुलाने अशी सोय केली त्याची की बस्स, दुसरे काही दिसतच नव्हते त्याच्या खोलीतुन (हो, महालातुन नव्हे.).  कैदेत मिळणारी प्रत्येक सोय आवडीची नसते, पण चालवुन घ्यावी लागते. याशिवाय, शाह जहानचा इतिहास वाचला तर तुम्हाला माहीत असेलच की शाह जहानने सेवेतल्या दासींवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न अनेकदा केला होता. औरंगजेबाने शाह जहानला याबाबत एक पत्र लिहिले होते. हे सारे त्या ताजमहालकडे बघत बरं का!

सुंदर वास्तु

अतिशय रमणीय वास्तु, पटते हे. अगदी खरे. ताज बघता एकही जण निराश होत नाही. अप्रतिम, बस्स!!. या बाबत काही वादच नाही. हे एक कारण असु शकेल.

 

तरीपण, हातच्या काकणाला आरसा कशाला, ताज हे आश्चर्य आहे. मानणे किंवा नाही हे आपण आपले ठरवायचे. त्यासाठी कोणत्याही ब्रिटिश प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

प्राच्यां दिशि शिरश्शस्तं याम्यायामथ वा नृप ।
सदैव स्वपतः पुंसो विपरीतं तु रोगदम् ॥
( विष्णुपुराण ३।११।११३ )
सदैव वर्ज्यं शयनमुदक्शिरास्तथा प्रतीच्यां रजनीचरेश ।
( वामनपुराण १४।५१ )
नोत्तरापरावाक्शिराः ।
( विष्णुस्मृति ७० )
नोत्तराभिमुखः सुप्यात् पश्चिमाभिमुखो न च ॥
( लघुव्याससंहिता २।८८ )
उत्तरे पश्चिमे चैव न स्वपेद्धि कदाचन ॥
स्वप्नादायुः क्षयं याति ब्रह्महा पुरुषो भवेत् ।
न कुर्वीत ततः स्वप्नं शस्तं च पूर्वदक्षिणम् ॥
( पद्मपुराणा, सृष्टि० ५१।१२५-१२६ )
उदक्‌शिरा न स्वपेत तथा प्रत्यक्‌शिरा न च ।
प्राक् शिरास्त स्वपेद् विद्वानथवा दक्षिणाशिराः ॥
( महाभारत, अनु० १०४।४८ )

अर्थ- नेहमी पूर्व आणि दक्षिणेकडे डोके करून झोपावे. उत्तर किंवा पश्चिमेकडॆ डोके करून झोपू नये त्यामुळे आयुष्य क्षीण होते तसेच शरीरीत अनेक व्याधी(रोग) उत्पन्न होतात.

 

न भग्ने नावशीर्णे च शयने प्रस्वपीत च ।
( महाभारत, अनु० १०४।४९ )
'न भिन्ने'
( विष्णुस्मृति ७० )
न शीर्णायां तु खट्‌वायां शून्यगारे न चैव हि ।
( कूर्मपुराण, उ० १९।२९ )

अर्थ- तुटलेल्या शय्येवर(खाटेवर) झोपू नये.

 

 

07262007

भूमिष्ठमुद्‌धृतात् पुण्यं ततः प्रस्त्रवणोदकम् ।
ततोऽपि सारसं पुण्य तस्मान्नादेयमुच्यते ॥
तीर्थतोयं ततः पुण्यं गाङ्गं पुण्यन्तु सर्वतः ।
( अग्निपुराण १५५।५-६ )
भुमिष्ठादुद्‌धृतं पुण्यं ततः प्रस्त्रवणादिकम् ।
ततोऽपि.....................
( गरुङपुराण, आचार० २०५।११३-११४ )

अर्थ- विहीरीच्या पाण्यापेक्षा झर्‍याचे पाणी पवित्र असते. त्यापेक्षा जास्त पवित्र सरोवराचे(तळ्याचे) पाणी, त्यापेक्षा जास्त नदीचे पाणी पवित्र समजतात. देवाचे तीर्थ त्यापेक्षा जास्त पवित्र तर गंगा नदीचे पाणी सर्वात जास्त पवित्र मानले गेले आहे.

 

 

तैलाभ्यङ्गे चिताधूमे मैथुने क्षौरकर्मणि ।
तावद्भवति चाण्डालो यावत्स्नानं न चाचरेत् ॥
( चाणक्यनीति ८।६ )

अर्थ- अंगाला तेल लावल्यावर, स्मशानातून परतल्यावर, स्त्रीसंग केल्यावर आणि हजामत(केस कापणे)केल्यावर, जोपर्यंत मनुष्य स्नान करत नाही तोपर्यंत तो चांडाळ योनीत असतो.  

 

07252007

रेखाप्रभुत्यथादित्ये त्रिमुहूर्तगते रवौ ।
प्रातः स्मृतस्ततः कालो  भागश्चाह्नः स पञ्चमः ॥
तस्मात्प्रातस्तनात्कालात्त्रिमुहूर्तस्तु सङ्गवः ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तस्तु तस्मात्कालात्तु सङ्गवात् ॥
तस्मान्माध्याह्निकात्कालादपराह्ण इति स्मृतः ।
त्रय एव मुहूर्तास्तु कालभागः स्मृतो बुधैः ॥
अपराह्णे व्यतीते तु कालः सायाह्न एव च ।
दशपञ्चमुहूर्ता वै मुहूर्तास्त्रय एव च ॥
( विष्णुपुराण २।८।६१-६४ )
प्रातःकालो मुहूर्तांस्त्रीन सङ्गवस्तावदेव तु ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्ततः परम् ॥
सायाह्नस्त्रिमुहूर्त्तः स्याच्छ्राद्धं तत्र न कारयेत् ।
राक्षसी नाम सा वेला गर्हिता सर्वकर्मसु ॥
( मत्स्यपुराण २२।८२-८३; पद्मपुराण, सृष्टि० ११।८३-८५ )
मुहूर्तानां त्रयं पूर्वमह्नः प्रातरिति स्मृतम् ।
जपध्यानादिभिस्तस्मिन् विप्रैः कार्यं शुभव्रतम् ॥
सङ्गवाख्यं त्रिभांग तु मध्याह्नस्त्रिमुहूर्तकः ।
लौकिकं सङ्गवेऽर्थ्यं च स्नानादि ह्यथ मध्यमे ॥
चतुर्थमपराह्णं तु त्रिमुहूर्तं तु पित्र्यकम् ।
सायाह्नस्त्रिमुहूर्तं च मध्यमं कविभिः स्मृतम् ॥
( महाभारत, अनु० २३।३५ )
त्रिमुहूर्तस्तु प्रातः स्यात्तावानेव तु सङ्गवः ।
मध्याह्नस्त्रिमुहूर्तः स्यादपराह्णस्तथैव च ॥
सायं तु त्रिमुहूर्तः स्यात्पञ्चधा काल उच्यते ।
( प्रजापतिस्मृति १५६-१५७ )

 

अर्थ- दोन घटका अर्थात ४८ मिनीटांचा एक मुहूर्त होतो. १५ मुहूर्तांचा एक दिवस होतो तर १५ मुहूर्तांची एक रात्र होते. सूर्योदयापासून पुढे ३ मुहूर्तांचा ’प्रातःकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’संगवकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’मध्यान्हकाल’, नंतर ३ मुहूर्तांचा ’अपरान्हकाल’, आणि त्यानंतर ३ मुहूर्तांचा ’सायंकाल’ असतो.

 

 

रात्रौ च वृक्षमूलानि दूरतः परिवर्जयेत् ॥
( मनुस्मृति ४।७३; विष्णुधर्मोत्तर० ३।२३३।१६५ )
'नक्तं सेवेत न द्रुमम्
( शुक्रनीति ३।२९; अष्टांगहृदय, सूत्र० २।३७ )

 

अर्थ- रात्री झाडाखाली झोपू नये अथवा राहू नये.

 

 

07242007

स्त्रानमूलाः क्रियाः सर्वाः सन्धोपासनमेव च ।
स्त्रानाचारविहिनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ॥
( वाधूलस्मृति ६९ )
न हि स्नानं विना पुंसां प्राशस्त्यं कर्मसु स्मृतम् ॥
( लघुव्याससंहिता १।७ )
आस्नातो नाचरेत्कर्म जपहोमादि किञ्चन ॥
( बृहत्पराशरस्मृति २।९३ )
विना स्नानं तु यत्कर्म पुण्यकार्यमयं शुभम् ।
क्रियते निष्कलं ब्रह्मस्तत्प्रगृह्णन्ति राक्षसाः ॥
( स्कन्दपुराण, ब्रह्म० चातुर्मास्य० १।२४ )

अर्थ- स्नान(आंघोळ) न करता जे पुण्यकर्म केले जाते, ते निष्फळ होते. ते पुण्य राक्षस घेऊन जातात.

 

 

स्त्रवन्ती चेत् प्रतिस्त्रोत प्रत्यर्क चान्यवारिषु ।
मज्जेदोमित्युदाहृत्य न च विक्षोभयेज्जलम् ॥
( महाभारत, आश्व० ९२ )

अर्थ- जर नदीत स्नान करावयाचे असेल तर, नदी ज्या बाजूने वहात येते, त्या बाजूला तोंड करून स्नान करावे आणि दुसर्‍या जलाशयात, किंवा अन्य ठिकाणी, स्नान करताना सूर्याकडे तोंड करून स्नान करावे. 

 

07232007

खालील बातमी आहे दैनिक 'सकाळ' मधील, नीट वाचावी आणि विचार करावा.

Sakal Papers International Marathi News Daily - Pune


शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद - डी. एस. कुलकर्णी

पुणे, ता. १७ - ""शहरात नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूल हा सर्वांत मोठा विनोद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, त्यात थोड्या सुधारणा केल्या असत्या तर वाहतूक आणखी सुरळीत झाली असती, असे मत "डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले.

शहरात हा पूल बांधण्याचा विनोद वर्षभर चालला होता, सर्व पुणेकर हैराण झाले होते तेव्हा हे महाशय कोठे होते? या साहेबांचा पुण्यात फार मोठा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना या पुलाचे बांधकाम चालले होते हे माहित होते तर त्यांनी त्याच वेळेस सुधारणा का सांगितल्या नाहित, नंतर जाहीरपणे बोलण्यात काही अर्थ आहे काय? माहित आहे कि आता काहीच होऊ शकत नाही मग बोलायला काय जाते? जेव्हा वरील विधाने केली त्याच वेळेस त्यातील सुधारणा का सांगितल्या नाहीत. पुढे मागे भविष्यात त्याचा दुसर्‍या पुलांच्या बांधकामाच्या वेळेस उपयोग होईल ना? कोणत्याही कामाला नंतर कशी नावे ठेवायची, त्याची कशी वरात काढायची हे भारतीयांना बरोबर माहित आहे. हि खोडी सामान्य पुणेकरांना नाही बरं का? हे काम अशी थोर मंडळीच करतात. पुण्याची वाहतूक सुरळीत व्हावी असे त्यांना वाटले असते तर त्यानी त्याच वेळेस वेळोवेळी जाहीर करायला पाहिजे होते, पुणेकरांनी नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला असता. जर त्याबद्दल त्यांना माहीत होते, आणि त्यांनी सांगितले नाही तर त्यांनी पुणेकरांचे फार मोठे नुकसान केले आहे. खरे तर हे नंतर जाहीर करून तेच फार मोठा विनोद करीत आहेत.कृपया त्यांनी, कुलकर्णी साहेबांनी, आठवा 30 सप्टेंबर 1993, किल्लारीचा महाभयंकर भूकंप. किती हानी झाली, किती लोकांना प्राण गमवावे लागले.खूप दुःखाचे प्रसंग आले लोकांवर. मग काही दिवसांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषकार मा. नलिनी केळकर(नक्की नाव माहित नाही, माहित असणार्‍यांनी दुरूस्ती करावी) यांनी जाहीर केले कि, भारताच्या कुंडलीनुसार हा भूकंप होणारच होता, मग काय लोक चिडले, त्यांनी त्यांना जाब विचारला, जर हे तुम्हाला माहित होते तर तुम्ही एवढी हानी का टाळली नाही, याला तुम्हीच जबाबदार आहात. बस, मला वाटते नंतर त्यांचे नावच ऐकायला मिळाले नाही. घडलेल्या घटनांचे भविष्य सांगायला यांची काय जरूरी आहे. एखादी गोष्ट माहित असूनही लपवून ठेवली जाते, आणि त्यात जनतेचा संबंध असेल तर, अशा माहिती लपवून ठेवणार्‍याला योग्य शासन झालेच पाहिजे. खूप जाणकार भविष्य भास्कर, ज्योतिष भास्कर, शिरोमणी आहेत त्यांनी खालील घटनाचे भविष्य का सांगितले नाही? कारगील युद्ध, भयंकर पूर, क्रिकेटचा वर्ल्ड कप, निवडणुकीतील अंदाज वगैरे. भविष्य सांगणारे आणि वेधशाळा यात काहीच फरक नाही. पाउस पडेपर्यंत वेधशाळा काहीच अंदाज करीत नाही, पण लगेच अंदाज केला जातो, पुढील दोन दिवसात आकाश ढगाळ राहून, हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. आणि पुढील दोनच काय तर आठवडाभर पाउस पडत नाही. आता आपणच तुलना करावी. त्यापेक्षा रस्यावरचा भविष्य सांगणारा पोपट बरा. सर्व जाणकार, भविष्य सांगणारे,ज्ञानी, अभियंते, थोर उद्योगपती, मंत्र, तंत्र शास्त्र पारंगत, सर्वांना विनंती, जे काही असेल ते आधीच सुचवा, नंतर नको.

'नैकः सुप्याच्छून्यगेहे'
( मनुस्मृति ४।५७ )
'नैकः सुप्याच्छून्यगृहे'
( कूर्मपुराण, उ० १६।६७ )
'नैव स्वप्याच्छून्यगेहे'
( पद्मपुराण, स्वर्ग० ५५।६७ )
'नैकः सुप्यात्व्कचित्छून्ये'
( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६।६२ )
न श्मशानशून्यालयदेवतायतनेषु ।
( विष्णुस्मृति ७० )
'न देवायतने स्वपेत्'
( कूर्मपुराण, उ० १६।८७; पद्मपुराण, स्वर्ग० ५५।८९ )

अर्थ - घरात कुणीही नसतांना एकट्याने झोपू नये. मंदिर आणि स्मशानात झोपू नये.

 

नान्धकारे च शयनं भोजनं नैव कारयेत् ॥
( पद्मपुराण, सृष्टि० ५१।१२४ )

अर्थ - अंधारात झोपू नये.

 

07212007

'नार्द्रपादस्तु संविशेत्'
( मनुस्मृति ४।७६; अत्रिस्मृति ५।२५; महाभारत, अनु० १०४।६१ )
'नार्द्रपादः स्वप्यात्'
( विष्णुस्मृति ७० )
शयनंचार्द्रपादेन........नैव कारयेत् ॥
( पद्मपुराण, सृष्टि० ५१।१२४ )
'नार्द्रपादः स्वपेन्निशि'
( महाभारत, शान्ति० १९३।७ )
'संविशेन्नार्द्रचरणः'
( स्कन्दपुराण, ब्रह्म० धर्मा० ६।७३ )
अनार्द्रपादः शयने दीर्घां श्रियमवाप्नुयात् ॥
( अत्रिस्मृति ५।२६ )

 

अर्थ- ओल्या पायांनी झोपू नये. कोरड्या पायांनी झोपल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते.

 

 

प्राक्‌शिरःशयने विद्याद्धनमायुश्च दक्षिणे ।
पश्चिमे प्रबला चिन्ता हानिमृत्युथोत्तरे ॥
( भगवंतभास्कर, आचारमयूख )

 

अर्थ- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास धन आणि आयुष्याचा नाश होतो. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास प्रबळ चिंता उत्पन्न होते. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास नुकसान आणि आयुष्य क्षीण होते. 

 

07202007

आपण जेव्हा ’आस्था’ किंवा ’संस्कार’ वाहिनी पाहतो, तर त्यावर कितीतरी बाबा, महाराज, गुरू, माता, मा, आई, सद्‌गुरू, पंडित,परमपूज्य, साध्वी अजून कितीतरी विशेषणे असतील, तर सर्वजण आपापल्या परीने प्रवचन, कीर्तन, उपदेश करीत असतात. याशिवाय दूरदर्शनवर न दिसणारे अजून कितीतरीजण असतील. एवढे झाले भारतीयांना उपदेश देणारे. त्यात परत वेगवेगळ्या भाषेत प्रवचन सांगणारे.

भारतातील या सर्व महान अशा संत या मंडळींचा मला आदरच आहे, त्यांचा अपमान किंवा त्यांना बोल लावण्याचा माझा हेतू नाही. पण आता या सर्वांचे पूर्वायुष्य, चरित्र प्रसिद्ध करण्याची इच्छा आहे, त्यावरून सर्व लोकांना अधिक ज्ञान, प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महान कार्यापासून सामान्य जनता स्फूर्ती घेईल.

या सर्व भारतातील महात्म्यांची एक Directory करण्याचा माझा प्रयत्न आहे, तेव्हा मला मदत करावी, म्हणजे सर्व सामान्य जनतेपर्यंत त्यांची ओळख होईल. हि माहिती संकलीत केल्यावर जागतिक स्तरावर पोहोचवता येईल. सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. 

महात्म्याचे नाव, त्यांचे शिक्षण, त्यांच्या गुरूंचे नाव, त्यांचे मूळ गाव, विशेष असा विषय ज्यावर ते सहज प्रवचन करतात,

विशेष ज्ञान, त्यांचा पूर्वीचा व्यवसाय (शक्य असल्यास, त्यांच्या परवानगीने), काही विशेष कार्य, असामान्यत्व, चमत्कार,  भविष्यातील समाजकार्य, जर काही आश्रम मठ स्थापन केले असतील तर तेही द्यावेत. पण हि माहिती देताना आपला

email id, आपले नाव, त्रोटक माहिती देणे जरूरीचे आहे. 

मी सर्वांना आवाहन करतो कि, मला सूची तयार करावयाची असल्याने ज्या कोणाला, कोणा महाराज, मातांबद्धल माहिती असल्यास जरूर कळवावी. वरील मुद्यांव्यतीरिक्त अन्य विशेष माहिती असल्यास कळवावी.

सर्वोऽयं ब्राह्मणो लोके वृत्तेन तु विधीयते ।
वृत्ते स्थितस्तु शूद्रोऽपि ब्राह्मणत्वं नियच्छति ॥
( महाभारत, अनु० १४३।५१ )

अर्थ- सदाचारी असल्यामुळेच ब्राह्मण समुदाय आपल्या ब्राम्हण पदावर स्थित आहे. सदाचारी शूद्रसुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त करू (या जन्मी) शकतो. 

आचाराल्लभते चायुराचाराल्लभते प्रजाः ।
आचारादन्नमक्षय्यमाचारो हन्ति पातकम् ॥
आचारः परमो धर्मो नृणां कल्याणकारकः ।
इह लोके सुखी भूत्वा परत्र लभते सुखम् ॥

( देवीभागवत ११।१।१०-११ )

अर्थ- सदाचाराने दीर्घायुष्य, संतान प्राप्ती होते, अन्नाची उपलब्धता वाढते. सदाचार सर्व पापांचा नाश करतो. मानवजातीसाठी सदाचार कल्याणकारी धर्म मानला गेला आहे. सदाचारी मनुष्य इहलोकी सुख भोगून परलोकीही सुखी होतो. 

 

 

07192007

वृत्तं यत्‍नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च ।
अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥
( महाभारत उद्योग० ३६।३० )

 

अर्थ- प्रयत्नपूर्वक सदाचाराचे रक्षण केले पाहिजे. धन तर येत जात असते. धनाचा नाश झाल्यास मनुष्याचाही नाश होतो असे समजत नाहीत, परंतु जो सदाचाराने भ्रष्ट होतो त्याला नष्ट झाला असेच समजले पाहिजे.

आचारप्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः ।
आश्रमाचारयुक्तेन पूजितः सर्वदा हरिः ॥
( नारदपुराण, पूव० ४।२२ )

अर्थ- सदाचारापासून धर्म प्रकट होतो, धर्मापासून भगवान विष्णू प्रकट होतात. अंततः जो आपल्या जीवन आश्रमात सदाचाराशी संलग्न आहे, त्याच्याकडून सदा सर्वदा श्रीहरी पूजीत आहेत.  

 

07182007

सदाचारवता पुंसा जितौ लोकावुभावर्पिं ॥
साधवः क्षीणदोषास्तु सच्छब्दः साधुवाचकः ।
तेषामाचरणं यत्तु सदाचारस्स उच्यते ॥

( विष्णुपुराण ३।११।२-३ )

अर्थ- सदाचारी मनुष्य इहलोक परलोक दोन्ही जिंकून घेतो. संत या शब्दाचा अर्थ आहे साधू आणि साधू म्हणजे तो जो दोषरहित आहे.अशा साधूपुरूषाचे जे आचरण आहे, तेच सदाचरण होय.

 

आचारहीनः पुरुषो लोके भवति निन्दितः ।
परत्र च सुखी न स्यात्तस्मादाचारवान् भवेत् ॥

( शिवपुराण, वा० उ० १४।५६ )

अर्थ- आचारहिइन मनुष्याची या जगात निंदा होते तर तो स्वर्गात सुद्धा सुख प्राप्त करू शकत नाही. तरी सर्वांनी सदचरीत व्हावे.

उद्या- अनमोल विचार - ४ 

07162007

आचारः फलते धर्ममाचारः फलते धनम् ।*
आचाराच्छ्रियमाप्नोति आचारो हन्त्यलक्षणम् ॥

( महाभारत, उद्योग० ११३।१५ )

अर्थ- सहाचारच धर्म सफल बनवतो, सदाचारापासून धनरूपी फळ मिळते, सदाचारापासून संपत्ती प्राप्त होते, तसेच सहाचार अशुभ लक्षणांचा नाश करते.

कलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽर्थतः ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः ॥
वृत्ततरस्त्वविहीनानि कुलान्यल्पधनान्यपि ।
कुलसंख्या च गच्छति कर्षन्ति च महद् यशः ॥

( महाभारत, उद्योग० ३६।२८-२९ )

अर्थ- ज्या कुळात धन, मनुष्य आणि गाई विपुल प्रमाणात असूनही, जे कुळ सदाचाराने हीन आहे, त्याची गणना उच्च कुळात होत नाही. परंतु जी कुळे धनवान नसूनही सदाचाराने संपन्न आहेत, त्यांची गणना मात्र उच्च कुळात होते आणि त्यांना महान यश प्राप्त होते.

 उद्या- अनमोल विचार - ३

हिंदू धर्म सनातन धर्म आहे. हिंदू धर्मात वेद, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये वगैरे प्रचंड साहित्य आहे, यातून आपल्या पूर्वजांनी अनमोल शिकवण दिलेली आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने उपदेश केलेला आहे. आपण रोज त्याची माहिती करून घेऊ यात. आयुष्यात काय करावे, आणि काय टाळावे याची जाणीव होते. माणसाचे आचार विचार कसे असावेत याबद्दल ऋषी मुनींनी काय सांगितले आहे ते रोज याठिकाणी मनन करू यात.

आचारहीनं न पुनन्ति वेदा
यद्यप्यधीताः सह षड्‌भिरङ्गैः ।
छन्दांस्येनं मृत्युकाले त्यजन्ति
नीडं शकुन्ता इव जातपक्षाः ॥

( वसिष्ठस्मृति ६।३; देवीभागवत ११।२।१ )

अर्थ - आचारहीन मनुष्याने, 'शिक्षा, कल्प, निरुक्त, छन्द, व्याकरण आणि ज्योतिष’ या सहाही अंगांनी वेदांचे अध्ययन केले असता सुद्धा वेद त्याला पवित्र करण्यास असमर्थ आहेत. ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी घरटे सोडून देतात, त्याचप्रमाणे मृत्युसमयी वेद त्या मनुष्याचा त्याग करतात. 

 

आचाराल्लभते ह्यायुराचारादीप्सिताः प्रजाः ।
आचाराद्धनक्षय्यमाचारो हन्त्यलक्षणम् ॥

( मनुस्मृति ४।१५६ )

अर्थ - मनुष्य सदाचाराने दीर्घायुष्य प्राप्त करतो, गुणवान संतान प्राप्त करतो, अक्षय धन संपत्ती प्राप्त करतो  त्याचप्रमाणे सदाचाराने वाईट लक्षणांचा नाश होतो.

उद्या - अनमोल विच्रार - २
 
पुण्याच्या दैनिक सकाळ मधील या दोन बातम्या. विचार करायला लावणार्‍या. एक कायदा राबवणारे आणि दुसरे उद्या कायदा शिकून कायदा पाळणारे, भारताचे आधारस्तंभ. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवताना ज्यांनी प्राण दिले की ज्या गुरूजनांनी यांना शिक्षण दिले त्यांचे पुण्य कमी पडले, म्हणून आजहे  वाचावे लागले. अरे, लिहा रे कुणीतरी यावर.
 
 
http/www.esakal.com/esakal/07132007/PuneEC40304BA1.htm


 
दारूच्या नशेत पोलिस हवालदाराचा गोंधळ

पुणे, ता. १२ - दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालून नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका पोलिस हवालदाराला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जंगली महाराज रस्त्यावरील मॉर्डन कॅफे हॉटेलजवळ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. .......
 
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना अटक

पुणे, ता. १२ - दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या २४ वाहनचालकांना काल रात्री बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. रुक्‍मे यांनी या मद्यपींची, एक हजार रुपयांच्या रोख जातमुचलक्‍यावर आज सुटका केली. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश असून ढोले पाटील रस्त्यावरील पबमधून ते बाहेर पडले होते. ........
या रस्त्यावर लश, टेन डाउनिंग स्ट्रीट (टीडीएस) हे पब; तसेच बार रेस्टॉरंट आहेत. रात्री उशिरा येथून बाहेर पडलेले मद्यपी तरुण-तरुणी घरी जायला निघाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले. या सर्वांविरुद्ध मद्य पिऊन वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दुचाकी; तसेच चारचाकी चालकांचा समावेश आहे.

 

उद्या शुक्रवार १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता माउलींची पालखी जेजुरी कडे मार्गस्थ होईल. सासवडमध्ये आपले बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेउन माउली विठ्ठल भेटीसाठी, वारकर्‍यांसोबत पंढरपूरला निघतात.   
'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पावले पंढरीकडे आपोआप चालतात. 

पांडुरंगाच्या सेवेनं, प्रेमानं देव प्रसन्न होतो. पण देवाजवळ मागणे काहीही नाही. वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. येथे देव-भक्ताचं नातं नाही, ते माता-मुलाचं नातं आहे. येथे बाळ आईची किती वाट पाहतं नाही. आईचे डोळे मात्र बाळासाठी आसुसलेले असतात.
"वाट पाहे उभा भेटीची आवडी
कृपाळू तातडी उतावीळ'
जर देव पांडुरंगच आमची वाट पाहत असेल, तर आम्ही त्याच्यापाशी धावत का जायचे नाही? ही तर सख्याचं दर्शन घेण्याची वारी असते. ’भेटीलागी जीव लागतसे आस’ अशी आस लागलेली असते, तेव्हाच जगाचा विसर पडून पावले आपोआप टाळ मृदुंगाच्या गजरात नाचू लागतात.

पालखी जेजुरीला येणार, आणि वारकरी खंडोबारायाचे दर्शन घेणार, त्यात पांडुरंगाचे रूप पाहणार.

जेजुरीबद्धल थोडेसे-जेजुरीला खंडोबाचे मंदीर आहे. मंदीर गडावर असून साधारण २०० पायर्‍या आहेत. मुख्यतः धनगर लोकांचे भक्तिस्थान आहे. शिवाजीमहाराज नेमाने दर्शनाला येत. खंडोबाला मल्हारी मार्तंड सुद्धा म्हणतात. गजर करताना ’येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणतात. येळकोट म्हणजे कानडीत, येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी, खंडोबाचे सात कोटी सैन्य होते. खंडोबाला भंडारा खोबरे उधळले जाते. 

माउलींची पालखी १४ जुलै,शनिवारचा मुक्काम-वाल्हे

तुकाराम महाराजांची पालखी १४ जुलै, शनिवारचा मुक्कम-उंडवडी गवळ्याची

 १२ जुलै २००७ 

आज दि. १० जुलै पुणे मुक्कामी वारकरी समाजाला जेवण असते. जेवण अत्यंत साधे, भाकरी, भाजी, फोडणीचा भात, एखादा गोड पदार्थ. पण त्यात आनंद भरलेला असतो. वारकरी  जेव्हा जेऊन तृप्त होतो तेव्हा वाढणा‌र्‍याला जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येणार नाही. राती सर्व वारकरी कीर्तन करतात, हरिपाठ होतो, आणि दुस‍र्‍या दिवशी सकाळी लवकर उठून माऊलींना सोबत करायची आहे, संत संगत करायची आहे, या ओढीनेच केव्हा झोप लागते कळत नाही. 
दि. ११ जुलै रोजी बरोबर सकाळी ६ वाजता पालख्या आरती करून निघतील. तेव्हा सर्व दिंड्या आपापल्या जागेवरच येणार, नंबराला लागणार. दुपारी ११ वाजता दोन्ही पालख्या हडपसरला थांबणार. जेवण करणार आणि माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघणार. सासवडला जाताना रस्त्यात दिवे घाट येतो, पालखीच्या रथाला १२ बैल जुंपतात. घाट चढतानाचे दृश्य फारच अप्रतीम असते. प्र्त्येकाच्या खांद्यावर भगबी पताका. सबंध घाट असा भगवामय होऊन जातो. सासवडला माऊलींचे बंधू सोपानदेव महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन करून, एक दिवस मुक्काम करून मगच पालखी पंढरपूरला निघते.

पंढरीच्या वारीचे हे वेळापत्रक आहे. यात कधीही बदल होत नाही. हे वेळापत्रक राबवण्यासाठी कोणत्याही यंत्रणेची गरज

भासत नाही.

WariTimeTable2007

वरील वेळापत्रक दैनिक सकाळ मध्ये छापून आलेले आहे.

दरवर्षी प्रमाणे, ज्येष्ठ महिना आला आणि वारीचे वेध लागले, वेध कसले? पांडुरंग दर्शनाचे, संतांच्या सहवासाचे. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतून वारकरी आळंदी, देहूला जमू लागले. आठशे वर्षांपूर्वी सुरु झालेला हा सोहोळा अखंड सुरू आहे.   ज्ञानेश्वरांचे आई वडीलही नेमाने पंढपूरला जात. तुकोबारायांच्या घराण्यातही वारी होती.तुकोबारायांनी वारीला सामुदायिक रूप दिले.

तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा, त्यानंतर नारायणबाबा यांनी ही प्रथा पुढे सुरू ठेवली. नारायणबाबांनी तुकोबारायांच्या व ज्ञानोबांच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. "ज्ञानोबा-तुकाराम' हा भजनघोषही त्यांनीच दिला. नारायणबाबा तुकाराम महाराजांच्या पादुका सप्तमीला पालखीत ठेवीत आणि अष्टमीला आळंदीला जात. तेथे ज्ञानोबारायांच्या पादुका घेत आणि तेथूनच नवमीला वारीला निघत. १६८० ते १८३२ पर्यंत ही प्रथा कायम राहिली.

हंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. शिंदे यांचे आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी १८३२ मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका म्हणे गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंतची वारी पायी करीत. माऊलींच्या पालखीचा श्रीमंती थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. लष्करी शिस्तीचा सोहळा हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र सुरू करतानाच, या सोहळ्याला शिस्तही लावली. हि शिस्त वारकर्‍यांनी कोणाच्याही नेतृताशिवाय पाळली.

श्री संत ज्ञानेश्‍वर व श्री संत तुकाराम यांच्या पालख्या पुण्यात म्हसोबा नाक्‍यावर (नवमीला सायंकाळी) भेटतात. त्यानंतर माऊलींची पालखी भवानी पेठेत विठोबाच्या देवळात, तर तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेत निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्काम करते. दशमीला विश्रांती घेऊन एकादशीला दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात.

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर, लोणी, यवत, वरवंड, पाटस, बारामती, अकलूज या मार्गे पंढरपूरला जाते.तर माऊलींची पालखी सासवड, जेजुरी, वेल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, नातेपुते, माळशिरस या मार्गे पंढरपूरला जाते.  

तारीख ९ जुलैला पालख्या पुण्यात मुक्कामी य्रेऊन ११ तारखेला पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. वारकरी आपली सर्व खरेदी पुण्यातच करतो. त्यात प्रामुख्याने पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टीकचे कापड खरेदी केले जाते. पुणेकरांचे अहोभाग्य, दोन्ही पालख्यांचे दर्शन होते. पुण्यात जागोजागी वारकरी भोजन दिले जाते. सकाळचा चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण दिले जाते.

पालखी सोहळ्यात ज्ञानदेव महाराजांच्या पालखीपुढे 27 व मागे 105 दिंड्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे 18 व मागे 69 दिंड्या आहेत. काही वर्षे सातत्याने पालखीबरोबर चालल्याशिवाय पालखी सोहळा दिंडीला मान्यता देत नाही.

पुण्याबद्दल थोडेसे - इ.स. ८ व्या शतकात पुणे 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात पुणे 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर "पुण्यनगरी"नावाने ओळखले जाउ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. आता हे शहर "पुणे" या अधिकृत नावाने ओळखले जाते.

तारीख ९ जुलैचा कार्यक्रम

पुण्यात आगमन आणि मुक्काम.

मुक्कमाचे ठिकाण

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी-पालखी विठोबा मंदीर भवानी पेठ, पुणे.

तुकाराम महाराजांची पालखी- श्री निवडुंगा विठोबा मंदीर नाना पेठ, पुणे.

"स्टार माझा" ही नवीन मराठी बातम्यांची नवीन वाहिनी सुरु झाली आहे. आज चुकुन त्यांच्या संकेतस्थळावरुन नजर घालता आणि लक्षात आले की तेथे ती वाहिनी बघता येते. आणि तेही चक्क फुकट!!

बघा http://www.starmajha.com/

आणखी एक उदाहरण, ज्यामुळे आज अशा अनेक गोष्टी इतिहासात दडुन गेल्या आहेत. आपण जो पर्यंत या सर्वांचा विचार करत नाही तो पर्यंत हे सारे ठिक आहे. पण निसर्ग या सार्‍याचा हिशेब नक्की देणार हे आपल्याला माहीत आहे ना?

रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'

सुनीत भावे - सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ - गेल्या काही वर्षांत पाषाण, बावधन, औंध परिसरातील अनिर्बंध बांधकामांनी रामनदीचा ४४ टक्के भाग "गिळंकृत' केल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. .........
पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात "जिओ-अप्रेझल ऑफ रूरल- अर्बन इंटरफेस अलॉंग नॉर्थ-वेस्ट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ः स्टडी बेस्ड्‌ ऑन जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम' या विषयावर संशोधन सुरू आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुरस्कृत केलेल्या या संशोधनात, शहरात नव्याने समाविष्ट गावांमधील भू-पर्यावरणीय बदलांची नोंद घेण्यात येत आहे. त्यात रामनदीच्या ५१ चौरस किलोमीटर खोऱ्यातील विशेषतः शहराच्या हद्दीतील ४४ टक्के भाग अतिक्रमणांनी व्यापला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मूल घाबरते तेव्हा आईजवळ जाते, आई त्याला पदराखाली घेते, तेव्हा त्या बाळाला जगातील सर्वात सुरक्षित जागा वाटते.

साडी कितीही भारी असो, तिचा पदर पाहिला जातो, त्यावरून तिची किंमत ठरते. ऊन असो अगर पाऊस, पदर डोक्यावर घेतला कि, संरक्षण. तो पदर जो सात फेर्‍यांच्या वेळेस गाठ बांधला जातो, तो जन्मजन्मांतरीची गाठ बांधतो. जेव्हा प्रियकर समोर असतो, अबोला असतो, गालावर गुलाबी लाली असते तेव्हा तो पदर बोटावर गुंडाळला जातो आणि  सर्व मनातले गुपीत उघड करतो. बंगालमध्ये हाच पदर तिजोरीच्या चाव्या सांभाळतो. जेव्हा स्व-संरक्षणाची वेळ येते तेव्हा हाच पदर खोचला जातो. पैसे म्हातारपणासाठी वाचवायचे असतील तर, पदराला दोन पैसे गाठ मारायला सांगीतले जातात. पैसे ठेवायला जागा नसेल तर पदराचा कोपरा कामाला येतो. अरेरे, लहान बाळाचे नाक कशाने पुसायचे, पदर काय कामाचा मग? खांद्यावरचा पदर डोक्यावर गेला कि, देवाचा, थोरामोठ्यांचा आशिर्वाद मिळतो. द्रौपदीच्या पदराला दुःशासनाने हात घातला आणि श्रीकृष्णाने लाखो साड्या पुरवल्या, पदराची लाज सांभाळली.  

हाच पदर पडला तर, विश्वामित्र व्हायला वेळ लागत नाही.  

पदर पारदर्शक असला तरी सुरक्षीत वाटतो ना? पण तोच पदर थोडासा जरी घसरला तर........? 

कल्पनाच न केलेली बरी.

भारतात दहावीचा निकाल 71 टक्के लागला, का नाही लागणार? प्रत्येकाला 30 मार्क वाढवून दिले. का तर, गणितातील प्रश्न चुकीचा होता. गणितात पास न होणारी मुलेही पास झाली. सर्वांना जर सरसकट 30 मार्क वाढवून दिले तर ज्या विद्यार्थ्याला 120 च्यावर मार्क आहेत त्यांना 150 च्यावर मार्क का नाही पडले? त्यांचे काय? त्या सर्वांवर अन्याय नाही काय?

ज्या विद्यार्थ्यांना गणितात 5 मार्क मिळाले ते सुद्धा पास झाले ना. म्हणजे यावर्षी 30 मार्कांच्या खाली कोणीच नाही.

किती छान गोंधळ घातला आहे ना? पुस्तकात चुका होतात, त्या नंतर कळतात, छापल्या जातात, ते पुस्तक तयार करणारे, छापण्या आधी बघत नाहीत, छापल्यावर कळते, आहेत कि नाही हुशार लोक?

सगळ्यात महत्वाचे, मी तर म्हणतो दहावीला कोणाला नापासच करू नये, म्हणजे कोणालाही वाईट वाटणार नाही. सगळे पास. 5-10 टक्के वाला आणि 98 टक्केवालाही पुढे कॉलेजला जाईल, जो जास्त टक्केवाला तो प्रवेश घेईल. सर्वांना पास करण्याचे फायदे-

  1. सर्वांना आनंद
  2. शाळांचा निकाल 100 टक्के
  3. पुन्हा ऑक्टोबर बॅच नको
  4. अकरावीला भरपूर विद्यार्थी असल्यामुळे शिक्षणसम्राटांना नवीन कॉलेजेस काढता येतील, त्यांचा धंदा वाढेल. कॉंपीटिशन वाढल्यामुळे भरपूर डोनेशन मिळतील.

आता अभ्यासक्रम बदलण्याची काय आवश्यकता होती? तोच अभ्यासक्रम चालला असता ना? नाहीतरी या ज्ञानाचा पुढील आयुष्यात काहीच उपयोग नाहीये. फक्त मार्क मिळविण्यासाठीच अभ्यास करायचा ना? मग काय फरक पडतो? पावसाचे चक्र शिकून काय करणार सांगा ना? उलटे लिहीले तर पाउस नाही पडणार? पण मार्क मात्र नाही पडणार.ते चक्र शिकून नंतर काय? थोडा विचार करा त्या चुकीच्या पुस्तकामुळे काय फरक पडला असता. उलट सरकारने जाहीर अरायला पाहिजे होते कि, या पुस्तकाच्या विषयात सर्वांना परिक्षेत कोणीही नापास होणार नाहीत. पुस्तके नवीन छापण्याचा खर्च वाचला असता. देशाचे नुकसान टळले असते. परीक्षेनंतर सगळे विसरायचेच असते.

खरे तर कोणालाही कधीच नापास करू नये. अगदी पदवीधरापर्यंत. पुढे जाऊन सगळेजण आपापल्या कुवतीप्रमाणे जीननात पुढे जातील.

यानंतर खेळ खंडोबा - 2 मध्ये.   

मागे आपण सगळी तयारी पाहिली. आता आपण परदेशात जाईपर्यंतचा प्रवास पाहू यात.

विमानतळावर शक्यतो तीन तास आधी पोचावे. तिकीटावरची तारीख आणि वेळ नीट पाहाबी. कारण वेळ सलग चोवीस तासांची असते म्हणजे, 23 June 2007 रोजी 0100 वाजता म्हणजे 22 व 23 तारखेच्या रात्री एक वाजता. पण 23 June 2007 रोजी 1300 वाजता म्हणजे 23 June 2007 ला दुपारी एक वाजता.

गेल्यावर ट्रॉली घ्यावी, त्यावर सामान ठेवावे, आपणच ढकलावी, कारण पुढे आपल्यालाच ढकलावी लागते. passport, Air ticket ची पर्स जवळ बाहेर ठेवावी. दारात तिकीट दाखवून आत जावे. सर्व सामान X-Ray मशीन मध्ये द्यावे, पलीकडच्या बाजूने बाहेर आल्यावर कर्मचारी बॅगांना सिल करतात. तेथून Boarding pass च्या रांगेत उभे रहावे. तिथे तिकीट पाहून, सामानाचे वजन करतात, जास्तीचे काढायला लावतात, कोठे टाकायचे पंचाईत होते, म्हणून एखाद्या माणसाला आत तिकीट काढून न्यावे म्हणजे त्याच्याकडे परत देता येते. तेथील कर्मचारी पूर्ण सहकार्य करतात. हातातील बॅगांचे वजन सुद्धा चेक होते. तो अधिकारी , परदेशात आपण कोठे जानार आहोत, तिथला पत्ता विचारतो, तेव्हा आधीच एका कागदावर लिहून जवळ ठेवावा, कारण परदेशातील पत्ता आठवत नाही, पुढे पदेशातही तो कागद उपयोगी पडतो, कारण त्यावर फोन नंबरही असतो.नंतर आपल्याला Boarding Pass मिळतो, त्यावर Seat No., Flight No. असतो. नंतर Custom chech असते तिथे Camera दाखवावा. म्हणजे येताना त्यावर Duty पडत नाही. पुढे Immigration check मध्ये X-Ray हातातील सामान आणि आपल्याला सुद्धा त्यातून जावे लागते. त्या Metal Detector खाली महिलांना त्रास होतो, कारण बांगड्या, हेअर पिन वाजतात. अशावेळेस त्यांना बाजूला घेउन महिला पोलीस Hand detector ने चेक करतात. आत गेल्यावर आता मात्र कोणत्याही  परीस्थितीत बाहेर येता येत नाही.

आता विमानात प्रवेश. तिथे प्रथम First class, नंतर अपंगांना, नंतर मुलेबाळे असणार्‍यांना सोडतात. नंतर मागील नंबराप्रमाणे सोडतात, तेव्हा नीट ऐकून जावे. घाई करू नये.

विमानात गेल्यावर सीट नंबर पाहून बॅग वर ठेवावी, जवळ ठेवू नये. सर्व सूवना पाळाव्यात. विमानात सर्व मिळते, तेव्हा लाजू नये, जेवणात काय पाहिजे ते मागून घ्यावे. जेवढे पाहिजे तेवढे मिळते, त्यामुळे उपाशी राहू नये. एअर होस्टेस इंग्रजी बोलतात, पण न समजल्यास समजावून सांगतात. आपल्याला मिळेल याची वाट न पाहता, मागून घ्यावे. Cold-drink, चहा कॉफी, पाणी पाहिजे तेवढे मिळते. औषधे, गोळ्या सुद्धा मिळतात. शांतपणे, आनंदात प्रवास करावा.

विमान वर जाताना आणि खाली येताना पट्टा बांधावा. विमान थांबल्यावर घाई करू नये, नीट शिस्तीत बाहेर यावे. सामान घ्यायला विसरू नये.

बाहेर आल्यावर Immigration ला रांग लावावी. तिथे Passport दाखवावा लागतो, त्यावर शिक्का मारतात. Passport मात्र आठवणीने परत घ्यावा, नीट ठेवावा, यानंतर लागत नाही.

आता सामान घ्यायला जावे. जाताना ट्रॉली बरोबर घ्यावी. तिथे फिरत्या Conveyor वरून बॅगा येतात, जर गर्दीत बॅगा घ्यायला जमले नाही अणि पुढे गेली तर काळ्जी करण्याचे कारण नाही, गोल फिरून ती परत येते. नाहीतरी आपण खुणेला रूमाल बांधलेला असतोच. त्या बॅगा आणि हातातील सामान पुन्हा Custom मध्ये X-Ray साठी टाकावे लागते, तिथे आक्षेपार्ह वस्तू सापडल्यास बॅगा उघडायला लावतात, त्यावेळेस शांतपणे उघडायच्या, वाद करायचा नाही. जे फेकतात ते फेकू द्यायचे, मोह करायचा नाही. परदेशात सर्व नियमाप्रमाणे वागतात, भावनेला जागा नाही. तिथे आपले काहिही ऐकत नाहीत. नाहीतर सरकारी प्रक्रिया चालू होतात, ते आपल्याला जमत नाही. यानंतर सर्व पूर्ण होते, आपण बाहेर यायला हरकत नाही. बाहेर आपल्याला आपली माणसे भेटतात. मग खरा आनंद होतो, आपल्याला आणि आपल्या माणसांना. परदेशातील सुख विमानतळापासून सुरू होते. साहजीकच भारताच्या वतावरणाची तुलना सुरू होते.

पण जर कोणी भेटले नाहीतर घाबरून जावू नये, फोन करावा. जर जमत नसेल तर कोणालाही एखादा डॉलर दिल्यास तो फोन लावून देतो. न जमल्यास विमानतळावरच टॅक्सी बुक करून जावे. परदेशात अजिबात फसवणूक होत नाही, हि गोष्ट कायम लक्षात ठेवा.

सातव्या भागात- परदेशात कसे रहावे, आणि येतानाचा प्रवास. परदेशात आनंद घ्या, भरपूर फोटो काढा.

Passport, visa झाला, आता विमानाचे तिकीट पाहिजे. सिझन प्रमाणे, एअरलाइन्स प्रमाणे तिकीटांची किंमत कमी जास्त होते तेव्हा सगळीकडे चौकशी करावी, घाई करू नये. काही प्रवास थेट Direct असतो तर काही थांबून विमान बदलून करण्याचा असतो. उदा. ऑस्ट्रेलियाला जायचे असेल Delta airlines थेट नेते, साधारण बारा तासांचा प्रवास असतो. पण जर Singapore Airlines चे तिकीट घेतले तर विमान सिंगापूरला बदलावे लागते. तेथे खूप  लांब चालावे लागते. दुसर्‍या गेटला जावे लागते. जर ते शक्य नसेल, मुलेबाळे सोबत असतील, वय जास्त असेल, किंवा अन्य काही अडचण असेल तर Direct तिकीट घ्यावे. तिकीट आल्यावर तारीख वेळ तपासून घ्यावी.

परदेशात जाताना काय काय वस्तू बरोबर न्यावयाच्या आहेत, त्यांची प्रथम यादी तयार करावी. खराब होणारे पदार्थ शेवटी आणावेत. प्रत्येक माणसाला ठरावीक वजन न्यायला परवानगी असते. तसे त्या Airlines च्या कार्यालयात विचारून घ्यावे. कोणाचेही ऐकू नये. खूप वेगवेगळे सल्ले मिळतात. सल्ले देणारे इथेच राहतात, पुढे विमानतळावर आपल्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला दोन बॅगा, हातात साधारण आठ किलोची एक हॅंडबॅग, शिवाय स्त्रीयांना पर्स बाळगता येते. कॅमेर्‍याच्या बॅगेचे वजन होत नाही. परदेशात खाद्य पदार्थ, पातळ द्रव पदार्थ, धारदार वस्तू जसे चाकू, सुई, पिन, टाचण्या वगैरे, अंमली पदार्थ न्यायला बंदी आहे. त्या वस्तू टाळाव्यातच. लॅपटॉपचे वजन होत नाही.

सर्व सामान भरताना प्रत्येक वस्तू नीट पॅक करावी. Spring balance (वजनाचा ताणकाटा आणावा, तसा स्वस्त मिळतो, म्हणजे घरीच वजन करता येते.) वजन जास्त असेल तर विमानतळावर काढायला लावतात. तिथे फेकून द्यावे लागते. उगीचच धावपळ होते. मानसिक त्रास होतो, काय फेकावे कळत नाही.

आता बॅगा नीट भरल्यावर प्रत्येक बॅगेत काय भरलेय याची यादी तयार करा. ती पुढे उपयोगी पडते. एखादी शाल वर बरोबर ठेवावी, कदाचित विमानात थंडी वाजते. विमानतळावरही उपयोगी पडते. लगेच लागणारी औषधे, चष्मा, सुपारी, जवळ बाळगावी.

महत्वाचे- परदेशात जाताना आरोग्य विमा करणे फार महत्वाचे असते. विमा घेताना त्यांच्या अटी नीट पाहून घ्याव्यात. नियमात बारीक अक्षरात काय लिहीलय ते नीट वाचून घ्यावे. ICICI prudential, New India Assurance, Bajaj वगैरे कंपन्या आहेत. जाण्याच्या आदल्या दिवशी घ्यावा. तारीख, वेळ, नाव, नावाचे spelling, passport नंबर, देश नीट तपासून घ्यावे. आपण निरोगी असाल तरी पॉलिसी घ्या, कारण परदेशात डॉक्टरचा खर्च परवडत नाही. मुख्य म्हणजे आपण निर्धास्त राहू शकतो, मानसिकदृष्ट्या. 

ज्या देशात जायचे आहे त्या देशातील चलनात पैसे घ्यावेत. काही रक्कम बाळगायला परवानगी असते, कारण मध्ये फोन करणे, तिकडे उतरल्यावर घरी जाण्यासाठी, विमानतळावर काही खाण्यासाठी पैसे लागतात.

आता बॅगा भरल्या, याद्या तयार झाल्या, हातात नेण्याच्या बॅगा तयार झाल्या. Passport, Air ticket ठेवण्याची छोटी पर्स आणावी, आणि त्यात पासपोर्ट, तिकीट ठेउन सतत जवळ बाळगावे. लक्षात ठेवा, सर्व काहिही हरवले तरी चालेल, पण passport अतिशय महत्वाचा आहे, कारण तीच तुमची ओळख आहे. सर्व ठिकाणी तो दाखवावा लागतो. विमानतळावर किंवा कोठेही, कोणालाही Passport, अधिकृत माणसाशिवाय इतरांना  दाखवू नये. बॅगांना कुलूप लाऊ नये. बॅगेच्या हॅंडलला ओळखीसाठी एकाच रंगाचा रूमाल अथवा रिबन बांधावी, परदेशात विमानतळावर बॅगा ओळखताना मदत होते कारण सर्व बॅगा सारख्याच दिसतात. बॅगा बदलल्यास खूप घोटाळा होतो.

घरची सर्व तयारी झाली, पुढील भागात विमानतळापासूनचा प्रवास पाहू यात.   

Passport हातात आल्यानंतर परदेशी जाण्यासाठी त्या देशाचा Visa मिळवावा लागतो. प्रत्येक देशाची पद्धत, नियम, कालावधी वेगवेगळा असतो. प्रथम त्या देशाचा नकाशा पाहून माहिती करून घ्यावी. Internet वर सर्व माहिती मिळते. आता आपण "अमेरिका" देशाच्या व्हिसाबद्धल माहिती घेऊ यात.

अमेरिकन व्हिसासाठी त्यांची वेब साइट आहे" VFS USA" ती उघडली असता त्यात सर्व नियम पहायला मिळतात. सर्व online भरून printout काढाव्यात. अमेरिकेत ज्यांच्याकडे जायाचे आहे, त्यांचा पत्ता आणि त्यांचे Invitation letter, Bank statements, नोकरीची कागदपत्रं, सरकारी नोकरीत असल्यास त्यांचे NOC लागते. धंदा असेल तर Income-Tax return जरूरी आहे. त्यांच्या साईट वरच Interview ची तारीख मिळते. त्यात वेळ सुद्धा असते. जमल्यास सर्व नियमांची printout काढून जवळ ठेवावी. सर्वात महत्वाचे- दोन्ही हातांच्या तर्जनीच्या (अंगठ्या जवळील बोटे) बोटांचे ठसे Finger print घेतात. जर बोटाला काही जखम झाली असल्यास परत घरी पाठवतात, आणि  अमेरिकन विमानतळावर Imimgration च्या वेळेस पुन्हा ठसे पाहतात म्हणून मधल्या काळात बोटे फार सांभाळावीत.

महत्वाचे नियम-

  1. Visa ची फी HDFC बॅंकेत भरावी. तेथे गुलाबी आणि लाल रंगाच्या पावत्या मिळतात त्या जपून ठेवाव्या.
  2. सर्व कागदपत्रांची फाईल बनवावी. त्यात क्रमाने कागदपत्रे लावावीत.
  3. Net वरून ज्या अर्जांची Printout काढल्यात त्यांच्या, passport च्या, वर सांगितलेल्या कागदपत्रांच्या तीन xerox काढून ठेवाव्यात.
  4. मुंबईची appointment असेल तर पाच दिवस आधी, फक्त कामाचे दिवस धरून, लक्षात ठेवा, त्यांच्या कार्यालयात कागदपत्रे नेउन द्यावी लागतात. तेव्हा पाच दिवसांची वाट न पाहता लगेचच सादर करावीत.
  5. स्थानिक कार्यालयातून मुंबईचा पत्ता बरोबर घ्यावा. तिथे सर्व स्वछ विचारावे, ते सर्व आनंदाने महिती देतात.
  6. मुंबईला वेळेआधी एक तास पोहोचावे. २०० रु. भरल्यास त्यांच्याकडून व्यवस्था केली जाते. त्याच्या गेस्ट हाउस वरून नेतात आणि आणून सोडतात. मुंबईला जवळच parking ची व्यवस्था आहे. तिथेच हॉटेल आहेत. एस.टी. रेल्वेने गेल्यास टॅक्सीने जाता येते.
  7. कार्यालयात मोबाईल फोन, धारदार वस्तू, खाण्यापिण्याचे सामान सोडत नाहीत, आणि तिथे ठेवण्याची सोय नसते फेकून द्यावे लागते, तेव्हा बरोबर नेऊ नये. आत गेल्यावर परत बाहेर कोणत्याही कारणास्तव सोडत नाहीत तेव्हा सगळी कागदपत्रे बरोबर न्यावीत. B.P. डायबेटिसचा वगैरे त्रास असल्यास गोळ्या बरोबर ठेवाव्यात. एवढे होऊनही काही अडचण आल्यास तेथील माणसाला न लाजता सांगावे’
  8. आत गेल्यावर भाषा विचारतात तेव्हा आपल्याला समजेल ती भाषा सांगावी, त्या भाषेचा दुभाषी देतात. इंग्रजी येण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपल्या भाषेत आपण उत्तरे बरोबर देउ शकतो. आपल्या भाषेतीलच दुभाषी घ्यावा. उत्तरे देतान गडबड झाल्यास व्हिसा नाकारला जातो.
  9. आत नंबरप्रमाणे बोलावत नाहीत तेव्हा रांगेत गडबड करू नये. चार पाच तास थांबण्याची तयारी करून जावे.
  10. आत मुलाखत देताना जेवढे विचारतील तेवढ्याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यावीत, अजिबात जास्त, अवास्तव बोलू नये. अनावश्यक माहिती देऊ नये. विचारतील तेवढीच कागदपत्रे दाखवावीत, म्हणून कागदपत्रे नीट लावून घ्यावीत तेथे शोधत बसू नये. न विचारलेली कागदपत्रे दाखवू नयेत.
  11. मुलाखत झाल्यावर visa मिळाला असल्यास लगेच सांगतात, मग तीन दिवसात कुरीयरने visa घरी येतो. जर नाकारल्यास तेथेच passport परत देतात.

तीन दिवसांनंतर घरी पासपोर्ट येतो, तेव्हा HDFC ची पावती दाखवावी लागते, नाहीतर कुरीयरवाला कुरीयर देत नाही. visa आल्यावर  नीट तपासून पहावा. चूक असल्यास स्थानिक कार्यालयात लगेच तक्रार करावी, नाहीतर परदेशात फार त्रास होतो, आपण कल्पना करू शकत नाही.

Travel agency मध्ये सुद्धा visa, तिकीट काढून देतात.

सर्वसाधारण सर्व देशांच्या पद्धती सारख्याच असतात, प्रत्येक देशांची Web site असते, त्यावर पूर्ण माहिती मिळते.

Visa मिळाल्यावर पुढे काय तयारी असते ते पुढील भागात पाहू.

मित्रांनो आपण काल थोडक्यात काय काय करावे लागते ते पाहिले. आत या ठिकाणी आपण पासपोर्ट कसा काढायचा ते पाहू.

पारपत्र(passport) म्हणजे आपल्या देशातून बाहेर (अन्य कुठल्याही देशात) जाण्यासाठी मिळालेली परवानगी. हि परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या विदेश मंत्रालया कडे अर्ज करावा लागतो. सर्व मोठ्या शहरांमध्ये कार्यालये असतात.

कोणत्याही भारतीय नागरिकास पारपत्र(passport) मिळतो.

पारपत्र मिळण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे-

  1. पासपोर्ट साईज फोटोग्राफ-४ प्रती
  2. रेशन कार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी एटेस्टेड)
  3. फोटो आयडेंटिटी- निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (झेरॉक्स प्रती वरीलप्रमाणे)
  4. शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेच्या पुराव्यासाठी (झेरॉक्स प्रती वरीलप्रमाणे)
  5. लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पारपत्राच्या  

     अर्जात दिलेल्या प्रमाणे एफेडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.

passportसाठी अर्ज पोस्टात किंवा पारपत्र ऑफिसात फक्त रु.१० ला मिळतात. यात सर्व माहिती असते.

अर्ज भरतांना काळ्या शाईने भरावेत. अर्जातील सर्व स्पेलिंग अगदी तंतोतंत जोडणार्‍या कागदपत्रांप्रमाणेच पाहिजे. उदा. जर शाळा सोडल्याच्या दाखल्यात DILIP चे स्पेलिंग DILEEP असेल तर तसेच पाहिजे. सर्व अर्ज स्वच्छ अक्ष्ररात भरावा. जर अर्ज भरताना अडचण येत असल्यास पारपत्र कार्यालयाच्या बाहेर अगदी थोड्या पैशात मदत करतात त्यांचेकडून भरून घ्यावे म्हणजे चुकत नाही. पारपत्र काढून देणारे एजंट सुद्धा असतात.

सर्व अर्ज पूर्ण भरून पोष्टात किंवा पारपत्र कार्यालयात दोन प्रतीत सादर करून त्याची पावती मिळते.

महत्वाचे-ही पावती पारपत्र घरी य्रेईपर्यंत जपून ठेवावी या पावतीवरील नंबरप्रमाणेच पुढे सर्व विचार होतो.

          passportसाठी लागणारे शुल्क-साधे- रु.१०००/-  तात्काळ-रु.१५००/-

passportमिळण्यासाठी साधारण ४५ दिवस तर तात्काळ पारपत्र ७ दिवसात मिळते.

passportबद्धलच्या सर्व कारवाईची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते.

या पुढील पायरी म्हणजे पोलीस चौकशी. यानंतर अर्ज साधारण १५ दिवसांपर्यंत आपल्या भागातल्या पोलीस स्टेशनला येतो.पोलीस फोन करून घरी चौकशीला येतात तरी पण आपण इंटरनेटवर पाहून आपणच पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करावी. पोलीस चौकशीच्या वेळेस पुन्हा सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि दोन फोटो(म्हणून प्रथमच जास्त फोटो काढून ठेवावेत) द्यावे लागतात. इथेही एक फॉर्म भरावा लागतो.

आता जर आपण या वेळेस हजर नसू आणि अर्ज पोलीसांनी परत पाठविला तर पुन्हा passport कार्यालयात जाऊन एक अर्ज भरावा लागतो म्हणजे पुन्हा पोलीस चौकशीला अर्ज येतो.

पोलीस चौकशीत साधारणपणे खालील प्रश्न विचारले जातात.

  1. आपण या ठिकाणी किती दिवसांपासून राहता?
  2. हे घर स्वतःचे कि भाड्याचे?
  3. घरी कोण कोण असते?
  4. आपले शिक्षण किती पर्यंत झाले आहे?
  5. तुम्ही कुठे जाणार आहात?

सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक द्यावीत. साधारण आठ ते दहा दिवसात अर्ज पोलीसांच्या शिफारशीने passport office ला परत जातो

Passport पोस्टाने येतो. आल्यावर सर्व नीट तपासून पाहावे. नावातील spelling नीट तपासून पाहावे. काही चूक असल्यास ताबडतोब passport office ला कळवावे. नाहीतर प्रवासात फार त्रास होतो. 

या पूर्वी आपण मराठी विषय पाहिला आता आपण बाकी पाहू.

इतिहासात स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्यासाठी कोणी कसे बलिदान दिले ते शिकवतात. बाबर भारतात कधी आला. कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस, मंडेला, बहामनी, सुल्तान, त्यांच्या सनावळ्या, आई वडिलांची नावे. अरे काय चाललंय, या सर्वांचा पुढील आयुष्यातील व्यवहारावर काय परिणाम होणार आहे. दहावी झाली, बस सगळे विसरले तरी काहीही बिघडत नाही. मुले सर्व पाठ करतात, पण त्यांना स्वतःच्या मागील दोन पिढ्यांचा इतिहास माहीत नसतो. मुलाला पुढे काय करायचे आहे, त्याचा विचार नाहीच, बस शिका, निरूपयोगी शिका. मला सांगा पुढे नोकरी, धंद्यात, संसारात याचा काय फायदा?

भूगोलात काय तर अजून वेगळेच. टुंड्रा प्रदेशातील, आफ्रिकेतील लोकांचे राहणीमान, त्याची वेशभूषा, त्यांची घरे हे शिकायचे. विद्यार्थी कधीतरी तिकडे जाणार आहे काय? आणि जायचे असेल तर या माहितीवर तो तिथे राहू शकतो काय? आता तिथे तीच परिस्थीती असेल काय? अक्षांश रेखांश, द्या बघू बर एखाद्याला अक्षांश रेखांशात पत्ता, आणि त्याला जायला सांगा, काय होते? जगातील सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ करा, त्याचे नकाशे भरा, नद्या दाखवा, शहरे दाखवा, कशासाठी. जग एवढे पुढे गेलेले आहे हे सर्व इंटरनेट वर मिळत असताना, घोकंपट्टी का? तोच वेळ जरूरीचे शिकवा. मुलगा जगाचा अभ्यास करतो पण त्याला शाळेच्या रस्त्याव्यतिरीक्त रस्ता चुकला तर घरी कसे यायचे ते माहित नसते, ते कोण शिकवणार?

गणितात मुले नापास होतात आणि त्यांचे आयुष्य बरबाद होते. आता दहावीची कित्येक मुले गणितात नापास होतात, म्हणून पुढचे शिक्षण नाही, चांगली नोकरी नाही, म्हणून मनासारखी पत्नी नाही, सगळं आयुष्याचे गणित चुकते. कशापायी तर एका गणित विषयापायी. गणितात काय शिकतो पायथागोरस, बीजगणितातील सूत्रे, भूमितीचे प्रमेय, त्रिकोणमिती, आलेख, रचना, वेगवेगळ्या अकाराचे क्षेत्रफळ, घनफळ, ज्याचा आयुष्यात काहिही उपयोग नाही, त्या गणितासाठी मात्र आयुष्य बरबाद करून घ्यायचे. गणितात १०० पैकी १०० मार्क घेतलेल्याने काय उपयोग करून घ्रेतलाय? फक्त कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी. परिक्षेवरून घरी आल्या आल्या तो हे सर्व विसरलेला असतो. हा गणितात पाढे आले पाहिजेत, पण ते तरी कशासाठी, मुले मजेत कॅलक्युलेटर वापरतात. विचार करा, दुकानात हिशोबात वेळ घालवायचा की, कॅलक्युलेटर वापरायचा. जागा विकत घेताना फक्त फुटाचा विचार होतो. अजब शिक्षण आहे.

विज्ञानात शिका प्रयोगशाळेत कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन वायु कसा तयार करतात. काय घरी तयार करून श्वासोच्छवास करायचा आहे? की पाहुण्यांना आहेर करायचा आहे? ऑक्सिजची नळकांडी तयार करणार्‍यालाही याचा काही उपयोग नाही. तुरटी, मोरचूद, चुनखडीचे रासायनिक विश्लेषण शिका आणि दुकानात काय त्र सांगून विकत आणा? मुळात मोरचूदचा काही उपयोग होतो काय? झाडांच्या पानांची रचना, त्याच्या पेशी शिका. काय करणार जाणून? पावसाचे चक्र, कार्बनचे चक्र, नायट्रोजनवे चक्र सांगा या चक्रांचा नोकरी धंद्यासाठी उपयोग?

आता नवीन फॅड निघालय फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषा विषयाचे, त्याला डोंबलं कधी त्या देशात जायचा प्रसंग येणार नाही पण काय करणार, शिकतोय बिचारा. भले शेजारच्या राज्यातील भाषा नका का येईना. परिक्षेवरून घरी आला कि विसरतो, कारणा त्याचे त्या वाचून काहिही  अडत नाही.

 

उत्तरार्ध अपूर्ण - कसे शिक्षण पाहिजे ते पुढील भागात.     

मध्यंतरी मला एक पत्ता शोधून कार्यक्रमाला जायचे होते म्हणून रस्त्यात एका सुशिक्षीत माणसाला विचारले, तर त्याने बाजूला नेउन मला कसे जायचे ते सांगितले. आता त्याच्याच भाषेत त्याने मला कसे माझ्या पत्त्यावर पोहोचवले ते पहा.

" इथून पंधरा नंबरची बस पकडा. या मार्गाचे नाव आहे, जोशी मार्ग. हे जोशी म्हणजे या गावातील खूप मोठे प्रस्थ. त्यांचे चार बंगले होते, त्यांची मोठी शेती होती. ते रोज सकाळी मंदिरात मोठा दानधर्म करत. हा रस्ता आधी खूप छोटा होता. या रस्त्यावर नेहमी अतिक्रमण होत होते. लोकांना फार त्रास होतो. मग आम्ही मोर्चे काढले. ता शहराचा हजार वर्षांचा इतिहास आहे. येथे मोगलांनी राज्य केले. आताच्या नगरपालिकेत भ्रष्टाचार आहे." वगैरे वगैरे. एवढे होईपर्यंत अजून चार जण जमले. त्यांनी पत्ता सांगण्यात अजून गोंधळ करून ठेवला, पण आता हे सर्व ऐकण्यात खूप वेळ गेला.  ते काय सोडायला तयार होत नव्हते, बरं मी नवीन असल्यामुळे ऐकणे भाग पडले पण याचा परिणाम कय झाला. एवढे ऐकताना पुढचं विसरलो, उशीर झाल्याने कार्यक्रम संपला होता. माझा उद्देश होता पत्त्यावर पोहोचणे, पण यालोकांनी बाकी शिकवण्यातच मला माझ्या ध्येयापासून दूर केले. आत्ताचे शिक्षण असेच आहे, जगात कशाची गरज आहे, जग कुठे चालले आहे, याचा विचार सोडून आपण वेगळाच अभ्यास करत आहोत. आयुष्याची महत्वाची पंचवीस वर्षे वाया घालवत आहोत, जिथे सरासरी आयुष्यच पन्नास वर्षांचे आहे.

असाच एकदा रस्त्यात अपघात झाला होता, खूप गर्दी जमली होती, सर्वजण एकमेकाला शिकवत होते, शिवाय त्याला गाडी कशी चालवावी, नियम कसे पळावेत, सांगत होते पण त्याला कोणीही दवाखान्यात नेत नव्हते, तो बिचारा तडफडत होता. त्याला काय पाहिजे याचा कोणीही विचार करत नव्हते. त्याला उपचारांची जरूरी आहे, तेव्हा मात्र सर्वजण निघून जातात. असेच शिक्षणाचे झाले आहे, सर्वजण शिकवून मोकळे होतात, पुढे कोणीही मदतीला येत नाहीत, विद्यार्थ्याला वार्‍यावर सोडून देतात. शिक्षकाला विचारा मला त्रिकोणाच्या रचना शिकवल्या संसारात काय उपयोग आहे? मी जे वाण्याचे दुकान चालवतो तेथे काय उपयोग?

असेच आताचे शिक्षण झाले आहे. मुलाला पुढे काय करायचे आहे तो विचार नाही, या ज्ञानाचा भविष्यात उपयोग आहे काय? बस शिका. मूल अडीच वर्षांचे झाले की शाळा, त्याचा खेळण्याचा कोणीही विचार करत नाही. त्याला काहिही कळत नसते, कोण शिवाजी, झाडे कसे अन्न तयार करतात, पाउस कसा पडतो वगैरे. त्याला खेळू द्या. आनंद घेऊ द्या.

 नंतर अभ्यास सुरू होतो. पाहु यात एकेक-

मातृभाषा व्याकरण- समास, अलंकार, काळ, कर्तरी, कर्मणी प्रयोग खूप काही, याचा रोजच्या बोलण्यात काय उपयोग आहे काय?नवीन मूल बोलायला शिकते त्याला काय आई व्याकरण शिकवते काय? मूल व्याकरणात बोलते काय? मला व्याकरणा अजिबात येत नाही सांगा मला बोलता येणार नाही? काय अडतंय. इंग्रजीचे व्याकरण मुलगा रात्र रात्र जागून पाठ करतो, पण त्याला नी्ट बोलता ययेत नाही. भाषेच्या पुस्तकातील धडे काय तर लेखिकेला पाडावरचा चहा कसा आवडला, कोणत्या तरी अगम्य भाषेत लिहीलेली नल दमयंतीची कथा,  लेखकाने बालपणी काढलेले कष्ट, प्रवास वर्णने, ती तर आता जुनी झालेली असतात, तेथील आता सर्व बदललेले असते, त्याचा काय उपयोग, विद्यार्थी ते घेउन जाऊ शकतो काय? मुलांना निबंध लिहायला सांगतात, मी पक्षी असतो तर विनोदच आहे ना? तो पक्षी असून काय करणार आहे? उन्हाळ्यात परीक्षा देताना निबंध असतो पावसाळ्यातील एक दिवस आहे ना गंमत. काना मात्रा लक्षात ठेवा, बघा मि असा लिहीला काय आणि मी असा. शेवती मी मीच ना? आणि मधला णि पहिला काय आणि दुसराअ काय? अर्थात फरक पडतो काय? एका शब्दाला अनेक शब्द सुर्याची अनेक नावे रोजच्या जीवनात एवढ्या वेगवेगळ्या नावानी आपण सुर्य म्हणतो काय? मग कशाला एवढा खटाटोप. आता मी एवढ्या वेळेला सु ‍र्‍ह्स्व काढलाय, सूर्य बदलला की तुम्हाला अर्थ नाही कळला? पत्रलेखन असते, काकाने घड्याळ पाठवले आभार माना. अरे ज्याला काकाच नाही किंवा त्या काकाची परीस्थिती नाही हे ज्या विद्यार्थ्याला माहित असते, तो काय निबंध लिहीणार, खोटा खोटाच ना? शिकवा त्याला खोटी कल्पना करायला.

उत्तरार्ध अपूर्ण- यापुढील भागात दुसर्‍या विषयाचं बघू.

''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''

एक भक्तीरसपूर्ण, परमेश्वर भक्तीच्या अतीव आनंदाचा सोहळा अनुभवायचा असेल तर आळंदी, देहूहून दरवर्षी पंढरपूर कडॆ निघणा‌र्‍या पालख्यांसोबत चला. पांडुरंगाने नामदेवांना सांगितले, "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' आळंदीपासून श्री ज्ञानदेवांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला पायी नेली जाते. यात अनेकजण सामील होतात. ज्येष्ठ वद्य नवमीला माउली आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. या वारीत महाराष्ट्रातील तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही भाविक येतात.  एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, विविध चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी सहभागी होतात.

ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीहून, मंदिरातून ज्येष्ठ वद्य नवमीला निघते, आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो, आणि मार्गक्रमण करीत दशमीला पुणे मुक्कामी येते. वारीत लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण, सुशिक्षीत, अशिक्षीत सर्व प्रकारचे वारकरी असतात. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन वारीत येतो. सोबत फुले विकणारे असतात. स्त्रिया डोक्यावर तुळसी वृंदावन घेतात आणि हातात पाण्याची कळशी असती तहानलेल्याला पाणी देण्यासाठी. लोक पालखीच्या मागे पुढे चालतात. त्यांच्या दिंड्या असतात. दिंडी म्हणजे साधारण पंचवीस ते शंभर वारकर्‍यांचा समुदाय. पंधरा दिवस चालायचे असल्याने त्यांच्यासोबत पुढील रहाण्याची जेवण्याची सोय असते. दिंडीत दिंडीप्रमुख, विणेकरी, टाळकरी असतात. प्रत्येक मुक्कामी त्या त्या गावाचे गावकरी त्यांना जेवणाची मोफत सोय करतात. श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात

पुण्याला संत ज्ञानेश्वराची पालखी पालखी विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात उतरते. पालख्यांचा मुक्काम दोन दिवस असतो एकादशीला पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पालखी मार्गावर काही दिंड्या पालखीच्या पुढे तर काही पालखीच्या मागे असतात. हा क्रम कधीही चुकत नाही.

सर्व कार्य शिस्तबद्ध चाललेले असते. पोलीसांचा धाक नाही, स्वयंसेवक नाहीत तरीही एवढा मोठा लाखोंचा समुदाय अडीचशे कि.मी. चा प्रवास करून पंढरपूरला पोहोचतो, म्हणजे चेष्टा नव्हे. कोणाचेही नियंत्रण नाही फक्त विठ्ठल भेटीची आस. डोळे पंढरीकडे, तोंडात हरिनाम, कानात हरीगजर, पाय पंढरीच्या वाटेवर. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीकडे मार्गस्थ असतात.

पालखी मार्गावरील रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला असतो. आज वर्षानुवर्षे यात काहीही बदल नाही. सकाळी सहावाजता आरती होते. त्याआधी सर्व वारकरी जमतात. पुढील दिंड्या निघतात. पालखी निघते. मागून मागच्या दिंड्या निघतात, अगदी क्रमाने.दुपारची विश्रांती ठरलेली. जेवण झाल्यावर पुढील मुक्कामासाठी निघणार. मुक्कामी तळावर सर्व समुदाय एकत्र जमतो. पालखीसोबतचा चोपदार हातातील चांदीचा दंड वर करतो, आणि काय आश्चर्य एकदम शांतता. अजिबात आवाज नाही. आपण दहा माणसांना एक मिनीट शांत करू शकत नाही इथे तर लाखो वरकरी पण एक शब्द नाही. तो चोपदार दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम सांगतो, लाउड स्पिकर नाही, पण त्याचा आवाज शेवटपर्यंत जातो. हा प्रसंग अनुभवण्याचा, ऐकण्याचा नाही. नंतर आरती होते आणि पालखी विश्रांतीसाठी जाते. वारकरी विश्रांतीसाठी जातात. जेवण होते. रोज रात्री जागोजागी कीर्तन होते, नामाचा गजर होतो, अभंग म्हणतात आणि विश्रांती घेतात. कारण सकाळी पुन्हा माउलींची सोबत करायची असते. 

मार्गात फक्त भजन, ’ग्यानबा तुकाराम’ गजर. रस्त्यावर आजूबाजूला खाण्याच्या वस्तू वाटत असतात पण मार्ग सोडून कोणीही घेत नाहीत, हे तर काहीच नाही, मार्गावर पायाखाली पैसे जरी दिसतील तरी वाकून उचलणार नाहीत, मुळात खाली लक्ष नसतेच. ध्यान फक्त विठ्ठलाकडे. ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''

उत्तरार्ध उद्या---

भारतात कित्येक लाख मुले मुली शाळेत जातात. त्यातील कित्येक पास होतात. आता फक्त बारावी पर्यंतचाच विचार करू यात.

दहावीला सात विषय असतात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खूप मेहनत घेऊन अभ्यास करतात.खरे तर पहिलीपासूनच मुलांना कठोर परिश्रम करावे लागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास आणि अभ्यास.

अभ्यास तरी काय, इतिहास पाहू यात. मुलांना शिकवतात- मोगल(बाबर पासून औरंगजेब पर्यंत), इंग्रजांचा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत, गुप्त घराणी, कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस वगैरे वगैरे. मुले खूप कष्ट करून पाठ करतात.

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भूगोलात काय शिकवतात, तर सुदानचा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, गवताळ प्रदेश, ब्राझिल, आफ्रिका वगैरे येथील लोकांचे राहणीमान, हवामान, धंदे याचा कितपत उपयोग? कधीतरी टुंड्रा प्रदेशात जाण्याची शक्यता आहे काय? मुले हे सर्व धडाधड पाठ करतात, पण त्यांना विचारा, आळंदीला कसे जायचे तर त्यांना सांगता येणार नाही. सर्व देशांचे अक्षांश रेखांश माहित करून घ्यायचे कशाला तर परिक्षेत १० मार्कांचा प्रश्न असतो. बघू बरं आपण नागपूरचे अक्षांश रेखांश घेऊन नागपूरला पोहोचू शकतो काय? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भाषेत काय शिकवतात, तर कोणीतरी लेखिका पाडावरचा चहा प्यायला जाते, ते वर्णन. खूप पूर्वी शाहू महाराजांनी लिहीलेले पत्र, जुन्या भाषेतील नल-दमयंती स्वयंवर, कविता, प्रवास वर्णने(त्या काळातील स्थळे आज त्याच अवस्थेत असतील काय?), भरपूर व्याकरण(रोज बोलण्यासाठी व्याकरण जरूरी आहे काय? शाळेत न जाणारी मुले भाषा बोलत नाहीत का? त्यांना व्याकरण पाहिजे?) न अनुभवलेल्या विषयावर निबंध लिहायचा, खोटा खोटा. मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

विज्ञानात काय शिकवतात, प्रयोगशाळेत वायू कसे तयार करायचे, त्यांचा रंग, चव, गुणधर्म, उपयोग सांगा? पावसाचे, नायट्रोजचे,ऑक्सिजनचे चक्र उपयोग सांगा? पेशींची रचना मुले शिकतात आणि परीक्षा  झाल्यावर विसरतात, त्यांचे काय अडते? बेडकाच्या पेशीची रचना. तारेतून विजेचा प्रवाह कसा वाहतो. सर्व वस्तू जमिनीवरच का पडतात? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे? 

नागरिकशास्त्र काय शिकवते, सर्व संस्थांची कार्ये, भारताची राज्याघटना, संविधान, कर वगैरे. आणि जर विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम माहित नसतील तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

गणितात काय शिकवतात, त्रिकोणामिती, पायथागोरस,आलेख, वारंवारता, भूमितीचे प्रमेय,रचना खूप काही. पण जर फायदा तोटा कळत नसेल तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

पुढील लेखात आपण सविस्तर चर्चा करू यात. त्यासाठी आपण उदाहरणे पाहू.

आजच सर्व वृत्तपत्रांमध्ये, दूरदर्शनवर एक बातमी पहायला मिळाली, आणि खरोखर असे वाटू लागले कि, भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी सरकार किती काळजी घेते. भारतातील मुलांत स्वाभिमान नाही, म्हणून प्रसिद्ध अभिनेता "अमिताभ बच्चन" यांच्या दिवार चित्रपटावर आधारीत धडा N.C.E.R.T. च्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या सोबत त्या चित्रपटातील दृश्यही आहे.

सरकारने हे बरोबर ओळखले आहे कि, कोण्ताही विषय चित्रपट माध्यमातून शिकवल्यास मुलांना लवकर समजतो. यात सरकारने किती पक्षी मारलेत पहा. धडा समजला नाही तर C.D. आणली तर घरी बसून अभ्यास करता येईल, क्लास लावायला नको. आई वडील सुद्धा समजाउन घेतील. C.D. विकणार्‍यांचा धंदा होईल. एवढा  स्वाभिमान जागृत होईल कि,मुले काहिही फेकलेले उचलणार नाहीत.मुले आई वडिलांना विचारतील, आई मी पण एकदा बूट पालिशवाला होउन पाहू का? म्हणजे वास्तविकता कळेल. मग मुलांचा आदर्श अमिताभ बच्चन स्वभिमानी. हा चित्रपट पाहून मुलांना बिडी ओढणे स्वभिमानी वाटू लागेल. स्वाभिमानाची कल्पना स्वातंत्र्यवीरांकडे पाहून, त्यांची चरित्रे वाचून येत नाही. 

आता मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी चित्रपट माध्यम किती प्रभावशाली आहे पहा-

  1.  आईबद्दल प्रेम  दिवार,मा,
  2.  देशाबद्दल प्रेम   उपकार, L.O.C.कारगील, हकीकत,
  3.  मित्रता           दोस्ती, शोले,
  4.  माणुसकी        जिस देशमे, दो आखे बारह हाथ,
  5.  शत्रूवर मात     शोले,

वरील सर्व गुण मुलांच्या अंगी उतरवायचे असतील तर शाळेत फक्त सिनेमावरच धडे पाहिजेत.

नृत्यकलेसाठी मल्लिका शेरावत, राखी सावंत यांचे तास ठेवावेत.

फळा, खडूची गरज नाही, वर्गात मोठा पडदा लावायचा, सिनेमा दाखवायचा बस्‌.

मुलांनाही दप्तराचे ओझे नको, विषयवार C.D. नेल्या तर भागेल.

कविता काढून टाकाव्यात आणि चित्रपटातील गाणी ठेवावीत. गाणी किती प्रकारची आहेत- आईवर, देशावर, मित्रावर, जीवनातील तत्वज्ञानावर, निसर्गावर, प्राणीमात्रांवर, ईश्वरावर, कितीतरी विषयांवर. शिवाय चाली किती छान पाठांतराचा त्रासच नाही. 

हिंदू धर्मात अनेक सण आहेत. अनेक देव देवता आहेत. परंपरा आहेत. थोर धर्मगुरू, संत, विचारवंत होउन गेले. अनेक प्रकारच्या पूजा होतात. तसेच इतर धर्मात सुद्धा त्यांच्या प्रमाणे सण वार वगैरे असतात.

आता सर्व धर्मातील तत्व एकच आहे कि, परमेश्वर एकच आहे. कोणत्याही धर्मातील माणसाने केलेली प्रार्थना त्या एकाच परमेश्वराला पोहोचते. परमेश्वराने हे जग निर्माण केले, सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले, अगदी आई वडिल आणि त्यांची मुले याप्रमाणेच ना. या जगात धर्म कोणी जन्मास घातला,तर या मानवानेच ना? जो कोणी प्रथम मानव या पृथ्वीवर जन्माला आला त्याचा कोणताच धर्म नव्हता. कित्येक लाख वर्षांपर्यंत तर त्याला अन्न मिळविण्यासाठीच धडपड करावी लागत होती, तो कुठला धर्माचा विचार करतो. नंतर जेव्हा मानव वसाहती करून राहू लागला तेव्हा त्याला काही नियमांची आवश्यकता भासली आणि त्याने नियम, आचारसंहिता, कायदे बनविले आणि त्या त्या समाजाला नाव दिले आणि धर्माचा उदय झाला. प्रत्येक धर्माने आपआपले सणवार, पू्जा पद्धती, उपासतापास, परमेश्वराची संकल्पना आपापल्या प्रमाणे बनवली. प्रत्येकाने तारीख, वार, तिथी ठरवली. सगळ्या जगात, सर्व धर्मात एकच वार, तारीख असते. हे तारीख, वार, तिथी आपण आपल्या सोयीसाठी बनवली आहे. सूर्य, चंद्र यांच्या भ्रमणात काहीच बदल होत नाहीत. वर्षानुवर्षे झालेला नाही. ग्रह तार्‍यांत सुद्धा काहीही बदल केलेला नाही. माणसांच्या जन्म मृत्युत काहिही बदल नाही कोणीही अमर नाही.

आता असा विचार करू यात,जेव्हा हिंदू लोक दिवाळी करत असतात,तेव्हा मुस्लीम लोक रमजान ईद करतात. जेव्हा एका धर्माचे लोक पवित्र उपवास करतात त्याच वेळेस अन्य धर्मीय बकरी ईद निमीत्त बकर्‍यांचा बळी देत असतात. जर मानवधर्म एकच आणि सर्वांच परमेश्वर एकच, फक्त नावे वेगवेगळी तर काही लोकांचा उपास तर काही मांसभक्षण करतात, हे कसे काय? दिवस उजाडल्यावर (नेहमीप्रमाणेच) काहींना तो पवित्र (रमजानचा उपवास),तर काहींना तो शोकमय (गुड फ्रायडे) असे का? हिंदूंना गाय पवित्र तिची पूजा करतात, कारण तिच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, पण तिच गाय अन्य धर्मियांत कापून खातात, मग हे परमेश्वर पहात नाही काय? धर्मगुरूंनी लोकांना सांगितले का नाही?

आता दुसरा विचार असा, माणसाच्या मृत्युनंतर सर्वजण एकाच ठिकाणी (आत्मा) जातात. कघीही कोणीही परत आलेला नाही. हिंदू धर्मात दहा दिवस आत्मा घरी असतो असे मानतात, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात चाळीस दिवस मानतात, काही जण तर अजिबात मानत नाहीत, वेगवेगळ्या धर्माचे आत्मे वेगवेगळ्या वेळेस पृथ्वी कशी काय सोडतात? महत्वाचा मुद्दा असा कि, हे सर्व होणार नाही जर धर्म एकच असेल तर. म्हणून नवीन धर्म निर्माण करण्यापेक्षा त्याच धर्माचे पालन केले असते तर?

येशु ख्रिस्ताने ख्रिश्चन धर्म स्थापन केला, मोहम्मद पैगंबराने मुस्लीम धर्म, ज्यू लोकांचा वेगळा धर्म आहे, त्या त्या धर्मातील पुढील अनुयायांनी नवीन धर्माचा विचार न करता तोच ध्रर्म कसा वाढेल, त्याचा प्रसार कसा होईल, धर्माची शिकवण लोकांपर्यंत कशी पोहोचेल हे पाहिले, पण नवीन ध्रर्म स्थापन केला नाही, कारण त्यांना तशी गरज भासली नाही. मग हिंदू धर्मातच असे का व्हावे?

डॉ.आंबेडकरांचे बालपण,  शिक्षण ते हिंदू असतांना झाले. ते बॅरिस्टर झाले. कायदेपंडित झाले. नंतर त्यांनी भारताची घटना लिहिली. मग असे काय घडले कि त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्विकारावा? बरे एवढेच नाही तर त्यांच्या सोबत अनेक हिंदू धर्मीय बौद्ध झाले. त्या सर्वांचा नंतर काही विशेष फायदा झाला काय? फक्त राहणीमान आणि जीवनपद्धती बदलली. मग धर्म का बदलावा. मूळ हिंदू धर्माची शक्ति कमी झाली नाही काय?

हे फक्त एक विचार आहेत यात कोणाचाही अपमान, कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही, असे काही कोणाला जाणवल्यास त्याबाद्दल आम्ही दिलगीर आहोत.

देशभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेला अभिमान, हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यात विशेष काय? स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी म्हणे प्राण वेचले ती देशभक्ती असेल तर त्यावेळेस आम्ही जन्मलो नव्हतो, तो काय आमचा दोष?  आम्हीहि स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला असता.

चांगल्या, हुशार, निरोगी माणसाला जबरदस्तीने जेव्हा त्याला वेडा ठरवण्यासाठी रोज थोडे थोडे औषध देतात, मग तो कालांतराने वेडा होतो, असाच प्रकार शालेय जीवनापसून सुरु असतो, देशभक्त बनवण्याचा. मग काय देशभक्तीच्या व्याख्या सुरु होतात. क्रिकेटची मॅच चालू झाली कि शाळा, ऑफिस, कामधाम सोडून बस मॅचच. खेळाडू जिंकले कि, आनंद नाहीतर त्यांच्या घरावर दगडफेक.(तरी बरे क्रिकेट आपला खेळ नाही). 

देशभक्तीची व्याख्या प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे करतो. देशभक्तीत देशातील सर्व बांधव येतात ना? मग पाणी तंटा, सीमा वाद, नोकर्‍या या मुद्द्यांवरून लोकांची डोकी का फुटतात?

अफजल गुरुने संसदेवर हल्ला केला, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली, ते प्रकरण राष्ट्रपतींकडे भिजत पडलय, तिथे निर्णय होत नाही. ती कोणत्याप्रकारची देशभक्ती. पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला, झेंड्यासमोर कडक इस्त्रीचा गणवेश घालून, त्यावर मिळालेली पदके अडकवून सलामी द्यायची, नंतर आहेच भ्रष्टाचार. उरलेले दिवस भक्तीपूर्व देशभक्ती.

देशभक्तीचा एक अभूतपूर्व प्रकार म्हणजे, सरकारी सुट्ट्या. थोर पुरूषांच्या नावाने, भरपूर सुट्ट्या घेणारे खरे देशभक्त. रोग्यांची सेवा करण्याची शपथ घेणारे  डॉक्टर  जेव्हा धंदेवाईक होतात तेव्हा देशभक्तीची कल्पना येते. जेव्हा बोफोर्स तोफांचे प्रकरण बाहेर येते तेव्हा आपल्यात देशभक्ती किती आहे हे त्याच तोफा धडाडून सांगतात.

खरे देशभक्त तर सिनेमावालेच, कमीतकमी सिनेमा संपेपर्यंत तरी देशभक्तीत आकंठ बुडवतात. आठवा जरा--उपकार, बॉर्डर, मंगल पांडे वगैरे.पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला गरीब मुले रस्त्यावर झेंडे विकतात, लोक विकत घेतात, मिरवतात पण दुसर्‍या दिवशी रस्त्यावर लोळताना दिसतात, देशभक्ती. याच दिवशी रस्ते अडवून, मोठमोठ्याने स्पीकर लावतात,झाली देशभक्ती. 

देशाची मालमत्ता, संपत्ती सांभाळणे, त्याला नुकसान पोहोचू न देणे, ही देशभक्ती होउच शकत नाही. संप बंदच्या वेळेस जमावाकडून जे नुकसान होते ते काय?

 भारत पाकिस्तानची जेव्हा क्रिकेटची मॅच होते तेव्हा अगदी स्फुरण चढते, पण दुसर्‍या देशाबरोबर खेळताना होत नाही, ही मात्र देशभक्ती. देशभक्तीला कोणत्या तराजूने तोलायचे याला काहीही नियम नाहीत, प्रत्येकजण आपापला तराजू वापरतो.

म्हणून म्हणतो देशभक्ती म्हणजे काय या विषयावर पिएचडी करायला हरकत नाही. पण एक आहे तो पिएचडी करणारा देशभक्तच पाहिजे, नाहितर?

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ▼  December (4)
      • आंतरजातीय विवाह
      • NRIच्या बायकोची गोष्ट भाग-१
      • खुरप्या पेशींचा रोग
      • एक बरे झाले
    • ►  September (1)
      • पुरस्कार, प्रसिद्धीचे साधन
    • ►  August (6)
      • करमहर्षी
      • अजब तुझे सरकार
      • कमतरता
      • हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
      • जागा
      • जगातील आश्चर्ये आणि भारतीय माणूस
    • ►  July (22)
      • अनमोल विचार - ११
      • अनमोल विचार - १०
      • अनमोल विचार - ९
      • अनमोल विचार - ८
      • शहरात नव्याने बांधलेले उड्डाणपूल हा मोठा विनोद
      • अनमोल विचार - ७
      • अनमोल विचार - ६
      • भारतातील बाबा
      • अनमोल विचार - ५
      • आनमोल विचार - ४
      • अनमोल विचार - ३
      • अनमोल विचार -२
      • अनमोल विच्रार - १
      • यांच्या शिक्षणात काय कमी पडले?
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • पंढरीची वारी-वारकरी
      • बघा स्टार माझा !!
      • रामनदी गिळंकृत!, अनिर्बंध अतिक्रमणांची मगर"मिठी'
      • पदर
      • भारतातील शिक्षण - खेळ खंडोबा - 1
    • ►  June (12)
      • माझा विमान प्रवास - ६
      • माझा विमान प्रवास - ५
      • माझा विमान प्रवास-४
      • माझा विमान प्रवास-३
      • असे शिक्षण हवे कशाला? उत्तरार्ध - २
      • असे शिक्षण हवे कशाला ? उत्तरार्ध - १
      • पालखी सोहळा - पूर्वार्ध
      • असे शिक्षण हवे कशाला ?
      • भारतातील शैक्षणिक क्रांती
      • एक धार्मिक चिंतन-३
      • देशभक्ती म्हणजे काय हो?
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose