मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

या जगाची जेव्हा उत्पत्ती झाली,त्यानंतर काही वर्षातच प्राणी, वनस्पती जन्माला आले. देवाने प्रत्येक वनस्पती, प्राणी यांना ठराविक आकार, रूप, गंध, ज्ञान, जीवनपद्धती दिली,यामागे काहितरी कारण असले पाहिजे. या पृथ्वीवर सर्वांचा समतोल साधण्यासाठी काही जीवनप्रक्रिया आहेत.  यालाच आपण "अन्नसाखळी" म्हणतो. म्हणजेच उंदरांना सापाने खाल्ले नाही तर जगात उंदीर जास्त होतील आणि माणसांना राहणे कठीण होईल, तसेच सापांना गरुडांचे भय नसेल तर सापांच्या संख्येचा विपरीत परिणाम होईल.

जनावरांमध्ये शाकाहारी, मांसाहारी असे प्रकार असतात, आपण त्यांची संवय बदलू शकत नाही. माणसांची प्रवृत्ती सुद्धा शाकाहारी, मांसाहारी असते.हिंदू धर्मातील कांही देवतांना शाकाहारी, तर काही देवतांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात. म्हणजेच परंपरेने मांस भक्षणाची प्रथा होती.

मांसाहारी हिंदू मांस भक्षण करतात ते शेळी, मेंढी, यासारखे प्राणी, मासे वगैरे...आता असा विचार येतो की, जर जगातील बहुसंख्य माणसांनी मांसाहार केला नसता तर आज या सर्व प्राण्यांची संख्या किती वाढली असती, त्यांना किती अन्न लागले असते. भारताचा विचार केल्यास अन्नाचा पुरवठा झाला असता काय?हा समतोल राखण्यासाठीच तर आपण मांस भक्षण करतो म्हणून तर काही देवतांना मांसाचा नैवेद्य दाखवून मांस खातात. मग आपल्याला काही ठिकाणी असे का सांगितले जाते कि, मांसाहारी नको शाकाहारी व्हा.मांसाहार म्हणजे प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जलचरांचं(मासे,खेकडे वगैरे) मांस पोटात जाणे.

जर आपण सूक्ष्म विचार केल्यास, श्वासोच्छवास करणे प्रत्येकाला जरूरी आहे आणि हवेत सूक्ष्म जंतू असतात, ते पोटात जात नाहीत काय? पाण्याद्वारे जंतू जात नाहीत काय? मग मांसाहार करू नये हा प्रवाद कशासाठी?

प्राण्यांची हत्या करू नये हे ठीक आहे पण त्यांची संख्या मर्यादित ठेवावी हे तर खरे आहे ना?

म्हणूनच हिंदू धर्माची शिकवण, परंपरा योग्य आहे.या सर्व चालीरितींना आधार आहे.  माणसांची प्रकृती आणि प्रकृती, निसर्गाचा समतोल याचा पूर्ण चिचार झालेला आहे,यात नवीन काहीही भर घालण्याची गरज नाही.

हिंदू धर्मातील कोणाही संतांनी, महापुरूषांनी अथवा धर्मगुरूंनी मांस खाऊ नये असे सांगितले नाही कि कोणावर जबरदस्ती केली नाही. फक्त शुद्ध अंतःकरणाने पूजा अर्चा करावी असे सांगितले.

या जगात फक्त एकच धर्म सनातन आहे तो म्हणजे हिंदू धर्म. याला फार पुरातन परंपरा आहे. हिंदू धर्माला चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यांची शिकवण आहे.या ग्रंथांनी मनुष्याने आयुष्यात कसे वागावे,मानवधर्म म्हणजे काय,त्याचे पालन कसे करावे याबद्धल सविस्तर सांगितले आहे. संपूर्ण आयुष्याचे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम अशा चार आश्रमात भाग पाडून,त्या त्या वेळेसची आदर्श जीवनपद्धती हिन्दू ऋषी मुनींनी, धर्म शास्त्रकारांनी, थोर मोठ्या संतांनी, जुन्या विचारवंतांनी लिहून ठेवली आहे,आणि ती इतकी परिपूर्ण आहे कि बाकी सर्व त्या समोर गौण आहे. 

फक्त ३००० वर्षांपर्यंत जरी विचार केला तरी भारतात हिन्दू धर्माला एक विचार,आचार,जीवनपद्धती होती. भारताला खूप मोठी संतपरंपरा आहे. भारतात गौतम बुद्ध,गुरुनानक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगरैंसारख्या थोर विभूती झाल्या. शिवाजीमहाराज, राणा प्रताप सारखे थोर लढवय्ये झाले. महात्मा गांधीं सारखे देशभक्त झाले.

आता जर आपण नीट विचार केला तर असे लक्षात येईल की, या सर्वांचे पूर्वज कोण होते. हिंदूच ना? त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना? त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद्धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता? सर्वांनीच,होय ना? पण त्यांना दुसरा धर्म स्थापावा असे वाटले नाही, याचे कारण कोणी सांगेल काय? पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही? मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी? बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना? मग त्यासाठी नवीन धर्माचे व्यासपीठ कशासाठी?

नवीन धर्म स्थापला कि,त्यांचे अनुयायी तयार होतात, त्यांना धर्माचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.आता जर नीट विचार केला तर असे लक्षात येते कि नवीन धर्मापेक्षा हिन्दू धर्माचाच प्रसार का केला गेला नाही?

जगातील सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते कि, सर्वांचे अंतिम ध्येय एकच परमेश्वर प्राप्ती आहे.

येशु ख्रिस्ताने ख्रिश्च्न धर्म स्थापन केला, पण त्यानंतर कोणाही संतांना नवीन धर्माची आवश्यकता भासली नाही. सर्वांनी त्या धर्माचाच प्रचार आणि प्रसार केला. त्या धर्माचीच तत्वे लोकांना पटवून दिली आणि तीही एवढ्या प्रभावीपणे कि, लोकांनी धर्म बदलला आणि त्या धर्मात प्रवेश केला.

दरवर्षी महाराष्ट्रातील आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पंड्गरपूरला पालखी जाते, त्या पालखीसोबत लाखो वारकरी असतात, ते सर्व वारकरी संप्रदायाचे असतात, त्यांचा धर्म हिंदू आहे. या सोहोळ्यात दर वर्षी हजारो लोकांची भर पडते, का ते सर्व एकत्र येऊन वेगळा संप्रदाय स्थापन करू शकत नाहीत काय? नाही, तशी गरज भासत नाही कारण या धर्मातील तत्वे परिपूर्ण आहेत.

आता असा एक विचार येतो कि मग आर्य लोक जे भारतात आले त्यांचा धर्म हिंदूच ना? तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही? त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना? त्यात असं काय नव्हतं कि, वेगळा धर्म स्थापून ते सांगण्याची गरज भासावी.

आज भारतात हिंदू आहेत, शिख, बौद्ध, जैन, पारशी, मुस्लीम वगैरे अन्य धर्मीय आहेत. फार पूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. नंतर मोघलांनी भारतावर आक्रमण केले आणि इथल्या लोकांवर राज्य केले आणि इथेच स्थायिक झाले. नंतर इंग्रज आले ते सुद्धा इथेच राहिले, कित्येक हिंदू धर्मियांना त्यांनी धर्मांतर करायला लावले, असे ख्रिश्चन भारतात आहेत, त्यांचे चर्च आहेत तेथे ते लोक आहेत. म्हणजे इसवी सनापूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. म्हणजेच जसजशी धर्मांची संख्या वाढू लागली, तसतसे  मूळ धर्मातील अनुयायी वेगळे होऊ लागले, धर्माचा अभिमान वाढू लागला. प्रत्येकजण आपलाच धर्म श्रेष्ठ म्हणू लागले. आपापसात तेढ वाढली. मग असे वाटते कि, जगात एकच धर्म असावा काय? निदान भारतात तरी का नसावा? जगाच्या नकाशावर पाहिले असता भारत हा एकच असा देश आहे, कि जेथे धर्मांची संख्या जास्त आहे. इथे असेही काही लोक आहेत कि, ज्यांच्या पूर्वजांचा धर्म हिन्दू होता आणि ते आता दुसर्‍या धर्माचे आहेत.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक महापराक्रमी राजा होता.त्याचे राज्य फार मोठे होते.सर्व इतर राजे त्यांना घाबरून असत. राजाने राज्यात एक आचारसंहिता बनवली होती.कायदे बनवले होते. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. राज्यात अनेक छोटी छोटी राज्ये होती  पण त्यांचा राजा एकच होता. एके दिवशी काय झाले, एका गावातील एका माणसाने सांगितले, या राजाचे कायदे चांगले नाहीत, नियम बदलणे आवश्यक आहे, असे लोकांना पटवून देऊन नवीन राज्य स्थापन केले, लोक अज्ञानी होते, त्यांना समजलेच नाही कि, याने त्याच राजाचे नियम, कायदे फक्त वेगळ्या भाषेत सांगितले आहेत, ते बिचारे त्याच्याच मागे जाऊ लागले. मग अशा प्रकारे अजून काही जणांनी अजून वेगळे समुदाय स्थापन केले.अशा प्रकारे मूळ राज्याचे अनेक भाग पडले आणि त्याच्यात भांडणे होऊ लागली. जर नवीन काही निर्माण करण्यापेक्षा त्या मूळ राजाचेच राज्य वाढविले असते तर? 

ख्र्रिश्चन धर्माची स्थापना येशु ख्रिस्ताने केली,मुस्लीम धर्माची मोहम्मद पैगंबराने केली तशी हिंदू धर्माची स्थापना कोणी केली?

उत्तर अवघड आहे ना? पण तितकेच खरे आहे, हा धर्म पूर्णपणे संपूर्ण आहे. या धर्माचा पाया, तत्वे, परमेश्वराची संकल्पना एवढी भक्कम आहे कि कोणीही या धर्मापासून वेगळा विचार करण्याची गरज नव्हती आणि नाही.

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकेल काय? यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही,फक्त इतिहास जाणून घेण्याचा हेतू आहे.तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास आम्ही दिलगीर आहोत.

 भाग२-परत भेटू यात.

मित्रांनो आजच्या लेखाला आपण विमान प्रवास-२ म्हणू यात.

काल आपण थोडक्यात पाहिले. आज थोडे सविस्तर पाहू यात.

सद्ध्या भारतातून खूपशी मुले नोकरीसाठी अमेरीका,ऑस्ट्रेलियात वगैरे जातात. आणि साहजिकच त्यांना वाटते कि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे यावे. पण त्यासाठी काय काय करावे लागते त्ते मात्र ठाऊक नसते. तर आता आपण तेच जाणून घेऊ यात. आता यात जर कोणाला कांही सुचवायचे असेल तर त्यांनी बिनधास्त सुचवावे.

मागील वर्षी मी मिसेस बरोबर ऑस्ट्रेलियाला मुलीकडे तीन महिने राहून आलो. आणि आता अमेरिकेत मुलाकडे आलो आहे.

परदेशात जायचे म्हणले कि आनंद होतो पण पुढे काय काय अडचणी येतात त्या पाहू यात.(अजिबात घाबरू नये)

भारतातून परदेशात जाऊन पुन्हा भारतात येइपर्यंत येणारे टप्पे

  1. पासपोर्ट-अर्ज भरणे-पोलीस चौकशी-टपालाने पासपोर्ट घरी येणे
  2. व्हिसा- अर्ज कोठे करावा-त्याची फी काय? ती कोठे भरावी? त्या त्या देशाच्या वकिलाती मध्ये मुलाखतीला जावे लागते. तेव्हा तेथे काय आक्षेपार्ह असते. कोणती कागदपत्रे लागतात.ती किती दिवस आधी ध्यावीत. तेथ्रे संभाव्य कोणकोणते प्रश्न विचारतात. त्यावेळेस काय उत्तरे द्यावीत. पुन्हा पासपोर्ट कुरीयरने येतो तेव्हा काय करावे. कधी कधी परत जातो त्यावेळेस काय करावे.
  3. हेल्थ इंश्युरंस(आरोग्य विमा) घ्यावा काय,त्याबद्धल माहिती.
  4. विमान तिकीट-चांगली एअर लाइंस कोणती,तिकीट कमी कसे शोधावे,वगैरे.
  5. परदेशी जाताना प्रत्येक एअर लाइंसचे नियम वेगवेगळे असतात ते कसे पहावेत. त्याची काय काळजी घ्यावी.
  6. किती बॅगा असाव्यात, सामान कसे भरावे,किती भरावे,वजन कसे करावे,हातातल्या बॅगेत काय सामान घ्यावे,लहान लहान गोष्टी अशा पहाव्यात.
  7. विमान तळावर जाण्यासठी किती वेळ आधी निघावे,किती वेळा आधी पोहोचावे.
  8. विमानतळावर-बॅगा चेक करणॆ,बॅगाचे वजन बघणे,त्या कार्गोमध्ये देणॆ,इमिग्रेशन फॉर्म भरणॆ,तो ऑफीसर विचारणारी संभाव्य प्रश्ने,कस्टम क्लिअर करणॆ,बोर्डिंग पास घेणे,विमानात बसतांना पुन्हा चेकिंग,विमानात बसल्यावर काय काळजी घ्यावी,विमानात कोणकोणते फायदे करून घ्यावेत हे माहित नसते,विमान बदलण्याचे असेल तर कोणती काळजी घ्यावी,दुसर्‍या एअर पोर्टवर गेट कसे बदलावे,नवीन विमान बदलताना काय करावे,विमानात डिक्लेरेशन फॉर्म देतात तो कस भरावा.
  9. परदेशातील एअरपोर्टवर- इमिग्रेशन चेक करणे,सामान घेणे,सामान घेऊन कस्टम क्लिअर करणे, इथे जर बॅगा उघडायला लावल्या तर काय करावे,इथे भाषा येत नाही तेव्हा काय करावे,बाहेर कसे पडावे,समजा आपल्या माणसांची चुकामूक झाली तर काय करावे.
  10. परत येतांना वरील सर्व प्रक्रियांमधून जावे लागते,फक्त त्रास होतो तो भारतातून कस्टम मधून जातांना. इथेही आपल्या माणसांची चुकामूक झाल्यास काय करावे.

महत्वाच्या टिप्स

  1. पासपोर्ट सांभाळावा
  2. विमान तिकीट सांभाळावे
  3. सोबतच्या माणसापासून दूर जाऊ नये
  4. सरकारी अधिकार्‍याशिवाय इतरांना पासपोर्ट दाखवू नये
  5. शक्यतो कोणालाही आपला पत्ता देऊ नये
  6. फक्त अधिकृत माणसाकडेच चौकशी करावी,त्यांना अडचण सांगावी
  7. अनोळखी सामानास अजिबात हात लाऊ नये.
  8. शक्यतो इंटरर्नॅशनल रोमिंगचे कार्ड घालून मोबाईल फोन जवळ ठेवावा.
  9. आपली कागदपत्रे कोणालाही दाखवू नयेत.
  10. विमानतळावर अधिकृत टॅक्सी बुक करता येते तेथूनच टॅक्सी ठरवावी.

आज एवढे बस्‌,बाकी उद्या पासपोर्ट कसा काढावा याची माहिती घेउ यात.

आपण मराठी माणसे त्यांना विमान प्रवास म्हणजे काय कौतुक. मी मागील वर्षी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो.पासपोर्ट झाला .

व्हिसा झाला.विमान तिकीट आले. झाली तयारी बॅगा भरल्या. तेवढात एका नातेवाईकाचा फोन आला.अरे तुम्ही वजन चेक केले का ? विमानात जास्तीचे वजन सोडत नाहीत. जास्तीचे वजन फेकून देतात. झाले आले का टेंशन. भेटायला आलेल्या मंडळींनी सुद्धा तोच सूर ओढला. कोण किती कोण किती म्हणते. मग सिंगापूर एअर लाइंस ला फोन केला तर एका तिकीटावर फक्त २० किलोच मान्य होते. मग जास्तीचे सामान काढले. तरी टेंशन कायमच होते. पहिलाच प्रवास त्यामुळे आताच पुढील विचार सुरू झाले. विमनात कसे होईल,तिथे परक्या विमान तळावर कसे होईल, भाषा य्रेत नाही वगैरे वगैरे.

मुंबई विमान तळावरच त्रास सुरू झाला ट्रॉली घेण्यापासून ते पार इमिग्रेशन ते विमानात बसेपर्यंत. झाले या सर्वांतून पार पडल्यावर एकदाचे ४ तास उशीरा विमान निघाले.(उडाले). सिंगापूरला विमान बदलण्याचे होते. जसे सिंगापूर जवळ आले तसे त्या हवाईसुंदरीने सांगितले कि पुढचे विमान गेलेले आहे तेव्हा तुम्हाला पुढच्या विमानात बसवले जाईल. आम्हाला इथे दूसरी एस्‌.टी. पकडण्याची संवय तेव्हा कही कळेनाच. विमानात सगळे वातावरण अगदी गंभीर कोणी कोणाशी बोलत नाही.

सिंगापूरला आल्यावर पुढील विमानाचा बोर्डिंग पास दिला आणि जेवणाचे कूपन दिले ते कुठल्या एअर पोर्ट वरच्या हॉटेलचे होते. ते हॉटेल काही सापडेना कारण पुढील विमानाचे बसण्याचे ठिकाण शोधायचे होते. ते सापडेना फोन करावा तर कोणी सुट्टे पैसे देत नाही आणि त्यांची भाषा येत  नाही. अतिशय घाबरल्यासारखे झाले. कसे तरी दुसर्‍या विमानात येऊन बसलो आणि ऑस्ट्रेलिया विमानतळावर उतरलो. आता इथेही मोठा प्रश्न भाषेचा. पुण्यात कळले होते कि  इथे बॅगा चेक करतात. आता आला का प्रॉब्लेम. इमिग्रेशन झाले. कस्टमला त्या बाईने विचारले आणि विमानात जो डिक्लेरेशनचा फॉर्म दिला होता तो मागीतला आणि बॅगा उघडायला सांगितल्या आणि तपासून लोणची ,चटण्या, वगैरे खाण्याचे पदार्थ सोडत नाही म्हणाल्या मग काय करावे विचारले तर फेकून द्या म्हणल्या.मग काय जड अंतःकरणाने फेकून दिल्या.

आता महत्वाचा प्रश्न माझ्या सारखाच त्रास नवीन परदेशी येणार्‍या लोकांना होत असेल. पासपोर्ट पासून, व्हिसा, विमान तळावरच्या वेगवेगळ्या प्रक्रिया, विमानप्रवास, परदेशात विमानतळावर सामोरेजाणे,पुन्हा परतीचा प्रवास या सर्वांची माहिती असणे जरूरीचे आहे तेव्हा मि एकदा ऑस्ट्रेलिया वारी केली आणि आता अमेरिकेत आलो आहे तेव्हा मला आलेले अनुभव आणि पासपोर्ट काढण्यापासून परदेशात जाऊन पुन्हा भारतात परत येण्यासाठी काय काय करावे कोण कोणती काळ्जी घ्यावी ते लिहीणार आहे आता पुढील वेळी पासपोर्ट बद्धल माहिती करून घेऊ यात

आता इतकेच पुरे आपल्याला काही अडचणी असल्यास जरूर कळवा.   

आपण सारे भारतीय एका विशिष्ट धाग्यात बांधलेले आहोत, ज्याचे एक नाव म्हणजे संस्कृती. आपल्या प्रत्येक रितीला एक नाव आहे आणि त्याला कारण आहे. जी रित आपल्या पुर्वजांनी सांभाळली, ती रित इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे पुसट झाली, आणि त्यात त्यांची कारणे मात्र हरवली.

म्हणुनच एक प्रयत्न ....

संदर्भासहीत स्पष्टिकरण ...

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ▼  May (5)
      • एक धार्मिक चिंतन-२
      • एक धार्मिक चिंतन-१
      • माझा विमान प्रवास-२
      • माझा विमान प्रवास
      • भारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose