एक धार्मिक चिंतन-३

हिंदू धर्मात अनेक सण आहेत. अनेक देव देवता आहेत. परंपरा आहेत. थोर धर्मगुरू, संत, विचारवंत होउन गेले. अनेक प्रकारच्या पूजा होतात. तसेच इतर धर्मात सुद्धा त्यांच्या प्रमाणे सण वार वगैरे असतात.

आता सर्व धर्मातील तत्व एकच आहे कि, परमेश्वर एकच आहे. कोणत्याही धर्मातील माणसाने केलेली प्रार्थना त्या एकाच परमेश्वराला पोहोचते. परमेश्वराने हे जग निर्माण केले, सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले, अगदी आई वडिल आणि त्यांची मुले याप्रमाणेच ना. या जगात धर्म कोणी जन्मास घातला,तर या मानवानेच ना? जो कोणी प्रथम मानव या पृथ्वीवर जन्माला आला त्याचा कोणताच धर्म नव्हता. कित्येक लाख वर्षांपर्यंत तर त्याला अन्न मिळविण्यासाठीच धडपड करावी लागत होती, तो कुठला धर्माचा विचार करतो. नंतर जेव्हा मानव वसाहती करून राहू लागला तेव्हा त्याला काही नियमांची आवश्यकता भासली आणि त्याने नियम, आचारसंहिता, कायदे बनविले आणि त्या त्या समाजाला नाव दिले आणि धर्माचा उदय झाला. प्रत्येक धर्माने आपआपले सणवार, पू्जा पद्धती, उपासतापास, परमेश्वराची संकल्पना आपापल्या प्रमाणे बनवली. प्रत्येकाने तारीख, वार, तिथी ठरवली. सगळ्या जगात, सर्व धर्मात एकच वार, तारीख असते. हे तारीख, वार, तिथी आपण आपल्या सोयीसाठी बनवली आहे. सूर्य, चंद्र यांच्या भ्रमणात काहीच बदल होत नाहीत. वर्षानुवर्षे झालेला नाही. ग्रह तार्‍यांत सुद्धा काहीही बदल केलेला नाही. माणसांच्या जन्म मृत्युत काहिही बदल नाही कोणीही अमर नाही.

आता असा विचार करू यात,जेव्हा हिंदू लोक दिवाळी करत असतात,तेव्हा मुस्लीम लोक रमजान ईद करतात. जेव्हा एका धर्माचे लोक पवित्र उपवास करतात त्याच वेळेस अन्य धर्मीय बकरी ईद निमीत्त बकर्‍यांचा बळी देत असतात. जर मानवधर्म एकच आणि सर्वांच परमेश्वर एकच, फक्त नावे वेगवेगळी तर काही लोकांचा उपास तर काही मांसभक्षण करतात, हे कसे काय? दिवस उजाडल्यावर (नेहमीप्रमाणेच) काहींना तो पवित्र (रमजानचा उपवास),तर काहींना तो शोकमय (गुड फ्रायडे) असे का? हिंदूंना गाय पवित्र तिची पूजा करतात, कारण तिच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, पण तिच गाय अन्य धर्मियांत कापून खातात, मग हे परमेश्वर पहात नाही काय? धर्मगुरूंनी लोकांना सांगितले का नाही?

आता दुसरा विचार असा, माणसाच्या मृत्युनंतर सर्वजण एकाच ठिकाणी (आत्मा) जातात. कघीही कोणीही परत आलेला नाही. हिंदू धर्मात दहा दिवस आत्मा घरी असतो असे मानतात, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात चाळीस दिवस मानतात, काही जण तर अजिबात मानत नाहीत, वेगवेगळ्या धर्माचे आत्मे वेगवेगळ्या वेळेस पृथ्वी कशी काय सोडतात? महत्वाचा मुद्दा असा कि, हे सर्व होणार नाही जर धर्म एकच असेल तर. म्हणून नवीन धर्म निर्माण करण्यापेक्षा त्याच धर्माचे पालन केले असते तर?

येशु ख्रिस्ताने ख्रिश्चन धर्म स्थापन केला, मोहम्मद पैगंबराने मुस्लीम धर्म, ज्यू लोकांचा वेगळा धर्म आहे, त्या त्या धर्मातील पुढील अनुयायांनी नवीन धर्माचा विचार न करता तोच ध्रर्म कसा वाढेल, त्याचा प्रसार कसा होईल, धर्माची शिकवण लोकांपर्यंत कशी पोहोचेल हे पाहिले, पण नवीन ध्रर्म स्थापन केला नाही, कारण त्यांना तशी गरज भासली नाही. मग हिंदू धर्मातच असे का व्हावे?

डॉ.आंबेडकरांचे बालपण,  शिक्षण ते हिंदू असतांना झाले. ते बॅरिस्टर झाले. कायदेपंडित झाले. नंतर त्यांनी भारताची घटना लिहिली. मग असे काय घडले कि त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्विकारावा? बरे एवढेच नाही तर त्यांच्या सोबत अनेक हिंदू धर्मीय बौद्ध झाले. त्या सर्वांचा नंतर काही विशेष फायदा झाला काय? फक्त राहणीमान आणि जीवनपद्धती बदलली. मग धर्म का बदलावा. मूळ हिंदू धर्माची शक्ति कमी झाली नाही काय?

हे फक्त एक विचार आहेत यात कोणाचाही अपमान, कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही, असे काही कोणाला जाणवल्यास त्याबाद्दल आम्ही दिलगीर आहोत.

Unknown

1 comment:

Unknown said...

दिलगीरी व्यक्त केलया बद्दल धन्यवाद. भाऊ कापरे जर तुम्ही त्तकालीन हिँदु पद्धतीचा थोडा जवळ जाउन अभ्यास केला असतात, तर तुम्हाला डाँ. अंबेडकर आणि अंबेडकरी जनता यांच्या बद्दल प्रश्न पडलाच नसता.. बाकीच्या धर्म संस्थापकांबद्दल असणारे प्रश्नहि उलगडले असते..
रोहित मोरे 9860960606