वृत्तं यत्नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च ।
अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥
( महाभारत उद्योग० ३६।३० )
अर्थ- प्रयत्नपूर्वक सदाचाराचे रक्षण केले पाहिजे. धन तर येत जात असते. धनाचा नाश झाल्यास मनुष्याचाही नाश होतो असे समजत नाहीत, परंतु जो सदाचाराने भ्रष्ट होतो त्याला नष्ट झाला असेच समजले पाहिजे.
आचारप्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः ।
आश्रमाचारयुक्तेन पूजितः सर्वदा हरिः ॥
( नारदपुराण, पूव० ४।२२ )
अर्थ- सदाचारापासून धर्म प्रकट होतो, धर्मापासून भगवान विष्णू प्रकट होतात. अंततः जो आपल्या जीवन आश्रमात सदाचाराशी संलग्न आहे, त्याच्याकडून सदा सर्वदा श्रीहरी पूजीत आहेत.
07182007
0 comments:
Post a Comment