मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

जर हा विषय आताच्या पिढीतील तरुणांना विचारला तर साहजिक त्यांचे उत्तर असेल आंतरजातीयच काय पण आंतरधर्मिय विवाह का नकोत? जगाच्या पाठीवर कोठेही जा सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो, अगदी अमेरिकेत जरी शस्त्रक्रिया करायला गेला तरी तेथील कोणाचेही रक्त चालते, किडनी खराब झाली तर  ती सुद्धा कोणाचीही चालते,तर मग लग्नासाठीच हि जाती धर्माची बंधने का असावीत? प्रजननाची क्रिया सर्व धर्मात एकच असते, तर मग मुला मुलींनी आम्तरधर्मिय विवाह केल्यास काय बिघदणार आहे? परंतु काही कर्मठ प्रामाण्यांना हा प्रकार पटत नाही, आणि का पटत नाही त्याचे समर्पक उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते.

प्रेमावर आज जग चालले आहे, प्रेम ही भावना असते, तेथे जात, पात किंवा धर्माचा विचार होत नाही. त्याप्रेमातून ज्या नवबालकाचा जन्म होतो तो सोबत धर्म घेऊन येत नाही. खरे तर आता सरकारनेच नोकरीतून, शाळेत प्रवेश देताना, अगर कोनतीही सवलत देताना जात आणि धर्माचा उल्लेख टाळायला पाहिजे. जेव्हा सरकार अशी पावले उचलील तेव्हाच समाजातून जाती धर्माचे उच्चाटन होईल. मोठमोठी भाषणे देनारे मात्र घरातील मुलामुलींवर संस्कार वेगळेच करतात. त्यांची मुले परजातीच्या प्रेमात पडली तर कोण आकांडतांडव करतात, त्यांना सर्व बाजूंनी विरोध करतात. आता हे थांबले पाहिजे. आताची पिढी जी प्रेमात जात, पात धर्म पाळत नाही ती एक प्रकारे ही संकल्पनाच नष्ट करीत आहे.

ही जी जात आहे, ही जाता जाता जात राहिली तर जाताना जातीच्या समस्या सोडवून जाईल.

आजकाल NRI मुलांची लग्न म्हण्जे चट मंगनी पट शादी असतात. आईवडिल मुलगी पसंद करतात, मुलाला फोटो दाखवतात आणि मग chatting ने मुलीशी बोलण होतं.मुलगी आवडली तर लवकरात लवकर सुट्टी टाकुन मुलगा लग्नाला उभा राहतो.मधल्या वेळात मुलीला passport सारखे सोपस्कार करायला लागतात. मुलीचे आईवडिल NRI जावई मिळाला म्हणून खुश असतात. मैत्रिणीसुद्धा मुलीला चिडवायला सुरुवात करतात आणि मुलगी मात्र नवीन देश आणि नवरा कसा असेल या विचारात असते. आतापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली राहिलेल्या तिला या सर्व नवीन गोष्टिंनी धडकी भरते. पण हि सुरुवात असते. मुलगी नवऱ्याबरोबर नवीन देशात येते आणि स्वतःचा संसार आई, सासु च्या शिकवणीने, उपदेशाने,मदतीने सुरु करते. गाडी आता कुठे रुळावर येत असते आणि तेवढ्यात कुठेतरी गडबड होते. दोनजणांच्या छोट्या घ्ररट्यात तिसरा पाहुणा यायची चाहूल लागते. माहेरचे,सासरचे सर्व खुश असतात आणि परत एकदा मुलीला धडकी भरते. आई, सासु,ताई, मैत्रिणी सगळ्यांचे परत एकदा सल्ले सुरु होतात. पण महत्वाची गोष्ट अशी असते कि, घरापासुन लांब असणाऱ्या त्या मुलीला काहीच कळत नाही. नवऱ्यालाही काही माहीत नसतं. तो बिचारा ओळखीच्या चार मित्रांकडुन याबाबतीत माहिती मिळवण्यात लागलेला असतो. सुरुवात insurance प्रमाणे जवळ असलेला Doctor शोधण्याने होते. बहुतेकवेळी हा doctor म्हणजे मित्रांनी त्यांच्यावेळी शोधलेलाच असतो. सर्वसाधारण भावना हिच कि, जर चार देसी त्या doctorकडे जातात तर आपल्यालाही चालेल. बऱ्याचवेळी हा doctorहि देसीच असतो. कारण, बहूतेक इथल्या doctorकडे जाणं म्हणजे फार मोठ दिव्य वाटत असतं.

पण एखादा असा असतो जो वेगळ्या doctorकडे जायच ठरवतॊ.कुठल्याही doctor कडे गेल तरी मोठे forms भरायला लागतात. त्यामध्ये लिहायची माहिती फ़कत नवरा आणि बायको यांच्यापुरती म्रर्यादित नसुन ती family history नावाच्या प्रकाराखाली माहेर आणि सासरपर्यन्त पसरते. त्यात विचारलेले रोग कधी ऐकण्यात पण आलेले नसतात.  स्वतःबद्द्लही इतकी खोलवर माहिती लिहायची बहुतेकदा पहिलीच वेळ असते. बऱ्याच कष्टांनंतर एकदाचा form भरला जातो आणि doctorशी पहिली भेट होते.

एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार
राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? आता यावर काय उपयायोजना आखल्या म्हणजे रोगाचा फैलाव थांबेल? सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ राहते, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

सिकेल सेल अनिमिया हा एक जनुकिय दॊष आहे. रक्तात असणा‍ऱ्या तांबड्या पेशींमध्ये हीमोग्लोबिन नावाचे प्रोटिन असते.हे प्रोटिन शरीरात ऑक्सिजन वाहायचे काम करते. हीमोग्लोबिन ४ वेगवेगळ्या प्रोटिन भागांनी(subunits) बनलेले असते. २ भाग अल्फ़ा आणि २ बेटा प्रकारचे असतात. अल्फ़ा आणि बेटा हे प्रोटिनच्या  structures  साखळीचे प्रकार आहेत. बेटा साखळीत जेव्हा एक nucleotide  glutamateची जागा valine नावाचा दुसरा nucleotide घेतो, तेव्हा हीमोग्लोबिनचे structure  बदलते. याचा परिणाम म्हणजे सगळॆ हीमोग्लोबिनचे रेणू एक्मेकांना चिकटतात.  या आकार बदललेल्या हीमोग्लोबिन रेणुंमुळे तांबड्या पेशींचा गोल आकार खुरप्याच्या आकाराप्रमाणॆ होतो. य़ामुळॆ तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांना चिकटु लागतात आणि परिणाम ऑक्सिजन पुरवठ्यावर होतो.

Sickle-shaped red blood cells

प्रत्येक माणसाला एक gene आई आणि एक gene वडिलांकडून मिळ्तो. जर दोन्ही genes मध्ये वरच्याप्रमाणॆ बदललेला nucleotide  असेल तर त्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो. पण जर फ़क्त एकच gene कमतरता असलेला असेल आणि दुसरा gene चांगला असेल तर त्या माणसाला carrier म्हणतात. अशा माणसाला अनिमियाचा त्रास होत नाही.

सिकेल सेल अनिमियाचा मलेरियाशी जवळचा संबंध आहे. सिकेल सेल अनिमिया मलेरिया असणाऱ्या सर्व भागात आढळ्तो. मलेरियाचा जीवाणु एक प्रकारच्या मादी डासाच्या चावण्यामुळे पसरतो. मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करतो आणि तिथेच वाढतो. पण जर सिकेल सेल अनिमियामुळॆ तांबड्या पेशींचा आकार बदललेला असेल तर मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करु शकत नाही. ज्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो किंवा जो माणुस सिकेल सेल अनिमियाचा carrier असतो त्याला, मलेरिया होण्याचे chances  कमी असतात.

भारतात जिथे मलेरिया अतिशय मोठ्या प्रमाणात आढळ्तो तिथे सिकेल सेल अनिमिया असणं,आश्चर्याचं नाही. बहुतेक आपले gene मलेरियापसुन वाचण्यासाठी तांबड्या पेशींचा आकार बदलतात,पण त्याचा परिणाम सिकेल सेल अनिमियात होतो. हि फार चांगली गोष्ट आहे कि, आता या रोगाची गंभीरता लक्षात घेउन त्यावरती आता ठोस पावलं उचलली जातील.

एक बरे झाले, कोर्टानेच शाळांना चपराक दिली, मुलाखतीच्या नावावर अगदी डोनेशन ठरवले जायचे. लोअर के.जी. काय? उप्पर के.जी. काय? एवढे लहान वय असते काय मुलांचे शाळेत जाण्याचे. अशी भिती वाटत होती की, लग्नातच येणार्‍या बाळासाठी शालेतील सीट बुक करावी लागते की काय? पालकांची मुलाखत कशासाठी? परदेशात सहा वर्षाव्या मुलांनाच शालेत प्रवेश देतात. खरे तर ही चार वर्षांची मर्यादासुद्धा सहा वर्षांची करावी.
http://www.esakal.com/esakal/12152007/Specialnews8BE1B611A8.htm



नर्सरीत प्रवेशासाठीची वयोमर्यादा चार वर्षे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, ता. १४ - खासगी शाळांना अधिक स्वायत्तता देतानाच, बालवाडीत (नर्सरी) प्रवेश घेण्यासाठीची वयोमर्यादा चार वर्षेच कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. ....
प्रवेशावेळी पालकांची मुलाखत घेण्याचे कारण नाही; पण अनौपचारिक मुलाखतीस हरकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

- विनाअनुदान शाळा म्हणजे व्यापारी संस्था नव्हे
- तीन वर्षे हे मुलांना शाळेत पाठविण्याचे वय नव्हे
- प्रवेशावेळी पालकांची मुलाखत गरजेची नाही; मात्र गरजेपुरत्या संवादावर निर्बंध नकोत
- पहिलीत प्रवेशाचे वय सहा वर्षेच कायम राहील
----------------------------------------------------------------
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • अतिथी देवो भव
    पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...
  • सकारात्मक विचार
    आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ▼  December (4)
      • आंतरजातीय विवाह
      • NRIच्या बायकोची गोष्ट भाग-१
      • खुरप्या पेशींचा रोग
      • एक बरे झाले
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose