मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

मी महाजाल (Internet) प्रेमी आहे, त्यामुळे नजरेतुन ठळक बदल निसटणे जरा अवघड आहे.

 

आर्थिक वर्ष २००७ महाजालावर मराठी कवींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. बहुतेक सारे कवी आपल्या रचना फक्त अनुदिनी माध्यमाने प्रसारित करत असल्याचे प्रादुर्भावाने दिसुन येते. गुगलच्या ब्लॉगर ह्या नव्या संकरीत बियाणांचा वापर, वाढता महाजालाचा वापर आणि कविता सोडुन इतर महत्वाच्या विषयांवर कमी प्रादुर्भाव ही मुख्य कारणे असल्याचे दिसुन येत आहे. "प्रेम" या पारंपारिक आणि मुबलक खताच्या वापराने पीकाची वाढ चांगली झाल्याचे दावे करण्यात येत आहेत.

फुकटचे सेवादाते (Servers) आणि फुकटच्या प्रणाली (Software) यामुळे अनुदिनीकारांची संख्या वाढणे सहाजिक आहे. आता सगळेच काय लिहिणार, पण बरेच जण कविता लिहितात झाले. कदाचित कवी तेवढेच होते पण आता प्रसिध्दी माध्यम आवक्यात आले आहे. कवीला आता प्रकाशकाची गरज राहिली नाही, ते स्वतःच प्रकाशन करुन लोकांपर्यंत कविता पोहोचवतात. झकास!! नियम साधा आवडत नसेल तर वाचु नका. पण तुम्ही सांगा, हा सामान्य वाचकांवर अन्याय नाही का? अनेक विषय आहेत, समस्या आहेत, नव्या कल्पना आहेत, काही नसेल तर वृत्तपत्रे आहेत आणि त्यावर तुमचे विचार आहेत, पण महाजाली कवीच्या मनाला मुख्यतः प्रेम हाच जिव्हाळ्याचा विषय का वाटावा याला अजुन काही शास्त्रीय कारणे सापडलेली नाहीत.

काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्रतिज्ञेची आठवण झाली. पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी असे म्हणत आम्ही फक्त सुटीलाच जात राहीलो, आणि जीवनातील प्रत्येक घडामोड माझ्या प्रतिज्ञेला बोथट करत राहिली. मी दरवर्षी भारतात जायचा विचार करतो. दरवेळी जमतेच असे नाही. मात्र जेव्हा जातो तेव्हा हाच प्रश्न, आपण भ्रारतात का जातो?

जवळपास ४० वर्षांपुर्वी मुंबईचे गिरणी कामगार दरवर्षी सुटीला कोकणात जाणारे आणि मागील काही वर्षात अमेरीकन देसी संगणकी पेशेधारी भारतात जाणारे - दोन्ही सारखेच. दोघाच्या पिशव्यांची तपासणी करता लक्षात येईल की काळ बदलला पण जेमतेम जिन्नस तेच. आई वडीलांची खरेदी, नवीन उपकरणे आणि आपल्या गावी करायला गुंतवणुकीची रक्कम. आजकाल रक्कम महाजालावरुन जात असल्याने ती नसेल कदाचित. मागे राहीलेल्या नात्यांची ओढ ह्यांचा प्रवासाचा ताण कमी करते, पण ह्यांची ओढाताण मात्र इतके वर्ष तेवढीच आहे. वर्षभर अजिबात सुटी न घेता तीळ तीळ सुटी साठवतात, ती २-३ आठवडे भारतात घालवण्यासाठी. वेळ कमी आणि नातेवाईक जास्त. सुटी कसली ती तर वेळेवरची कसरतच म्हणायची. परतल्यावर सर्वातोंडी एकच "सुटी पुरेशी नाही".

मी "संगणकी" या भटक्या जमातीत (Nomadic Tribes, N.T. you know) मोडतो. माझ्या या जमातीविषयी बोलु तेवढे थोडे. पोटासाठी जगभर फिरणा‌र्‍या या जमातीतील लोक आता कायमचे परत जावे असा विचार करत आहेत, माझ्या काही जातीबांधवांनी प्रस्थान सुद्धा केले आहे. सध्या भारतात बरीच कामे मिळु लागल्याचे मी पण ऐकुन आहे, आणि इतर देशातील काम कमी होऊ लागले आहे. थोडक्यात काय तर माझ्या मते ही भटकी जमात आता भारतीय राहीली नसुन जागतिक भटकी झाली आहे. कारण ते आता भारतात माझा देश म्हणुन जात नसुन पोटासाठी जात आहेत. का जाऊ नये, कशासाठी? पोटासाठी?

काही  वर्षे अशीच उडून जातात, आणि या वार्षिक स्थलांतर करणा‍र्‍या पक्षांचे सारे गुण दाखवणार्‍या या भारतीयांच्या घरी नवी पिले जन्म घेतात. सुशिक्षीत आईबाप आपल्या पाखरांची चांगलीच काळजी घेत असताना त्यांना जाणवते की ही पिले काही भारतीय नाहीत. यांनी जर अभारतीय गुण दाखवले तर पंचाईत होणार हे जेव्हा मनी भरते त्यावेळी मात्र यांचे इतक्या वर्षांचे भारतपरतीचे स्वप्न परत उभारी घेते. मुलांना भारतीय बनवायची इच्छा ह्यांना खुपच लुभावते. पण ह्याचा कोणीच विचार करत नाही की आता भारतात सगळेच अमेरिकन ह्वायची मनोकामना बाळगुन आहेत. अनिवासी भारतीयांनी बघितलेला भारत सरासरी ५-६ वर्षे जुना आहे. आता सुटीवर जाणार्‍यांना भारतात सगळे सुंदर दिसत असते कारण ते बर्‍याच अवधीने भारतात फिरायला जातात. ज्यावेळी राहायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अमेरीका बरी पण भारत आवरा.

परत जाणारे हुशार आणि खुपसा अनुभव पाठीशी बांधुन जातात. त्यांना मिळणारे काम पण खुप सारा पैसा देते, पण ते काम तुमचा जास्तीत जास्त वेळ मागते. पण अजुन हे कळत नाही की भारतात आता सारे काही मिळते, पण अमेरीकेत तुम्ही मुलांना जेव्हढा वेळ देऊ शकता, तेव्हढा भारतात देणे शक्य होत नाही. आता यांची मुले भारतातल्या साध्या शाळांमध्ये शिकण्यास अपात्र असतात, ती फक्त आंतरराष्टीय शाळांमध्येच शिकु शकतात. शेवटी काय तुम्ही अमेरिकेत वाढणार्‍या मुलांप्रमाणे आपल्या मुलांना शिकवता, आणि त्यांना वेळही देऊ शकत नाही. भारतातले मागील काही वर्षातले बदल बघता, धक्का बसतो. मुंबई-पुणे सारख्या शहरात तुम्हाला अमेरिकेचे आभास होतात पण सामाजिक विषमता अमर्याद वाढली आहे, त्याकडे तुमचे लक्ष कधीच जात नाही. लहानपणी "Cartoon Network" बघणारी मुले थोडी वयात आली की "M-TV" बघतात. भारतात जाण्या अगोदर एकदा  M-TV वर "Rodies"  हा कार्यक्रम बघा, किंवा "Date - Meet or Delete" बघा, तुम्हाला सामाजिक विषमतेचा धक्का नक्की बसेल. आज जर ही अवस्था असेल तर विचार करा, तुमची मुले वयात येताना काय असेल.

मुलांच्या भवितव्याचा विचार करणार्‍या पालकांनो, कदाचित आज तुम्ही चांगला निर्णय घेत असाल, पण जरा भविष्याचा विचार करा. तरीही तुम्हाला मान्य असेल तर खुशाल जा. भारतातील मोठ्या शहरातील घटस्फोटाचे प्रमाण अपार वाढले आहे. अल्पवयीन समागम हे अगदी नित्य झाले आहे. आपल्या लाडक्यांना कसे मोठे करावे हा प्रत्येक पालकाचा आपपला प्रश्न आहे. मुलांचे आजी आजोबा जर मदत करणार असतील तर अगदी उत्तम. पण त्या वृद्धापकालीनांना हे नवे आंतरराष्टीय शाळांचे शिष्टाचार समजणे अवघड आहे हे ध्यानी ठेवा. वाढत्या धकाधकी जर तुम्ही मुलांना सुविधा देणार असाल आणि वेळेची जर टंचाई असेल तर तुम्ही भारतात जाऊन काय मिळवणार आहात? माझे अनेक मित्र सध्या त्यांच्या कुटुंबाबरोबर भारतात गेले आहेत. सुरवातीला सगळे छान असते, कारण नवे घर, नवीन तरतरी, ह्यातुन तुमचे डोळे उघडताना वर्ष उलटते. स्वतःची उलट तपासणी करता त्यांना पण लक्षात येत आहे की आता काय? भविष्यात बघण्याचे वरदान मला नाही, परिस्थितीचा अंदाज नक्की आहे. तुम्ही पण तो घेऊ शकता फक्त डोळे आणि मन उघडे ठेवा.

भारत चांगला नाही मला असे अजिबात म्हणायचे नाहीये, मात्र तो आता तुमच्या परिचयाचा राहीला नाहीये. तुम्हाला हव्या असणार्‍या सुखसुविधा तेथे आहेत, मात्र तुमचे बालपण जे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ इच्छीता ते आता तेथे नाहिये, हे ध्यानी ठेवणे आवश्यक आहे. जे तेथे नाही ते तुमच्या मुलांना देण्याचा हट्ट धरू नका आणि जे खरोखर तुम्हाला द्यावेसे वाटते, शिकवावे वाटते ते तुम्ही मुलांना कुठेही शिकवु शकता. त्यासाठी तुम्हाला भारताची गरज नाही, भारतीय संस्कारांची गरज आहे, जे तुमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा.

इतकी वर्षे भारतीय संस्कार जपुन अमेरिकेत भारत वसवणार्‍यांनो, तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात भारत कोठेही बसवु शकता. स्वतःवर आणि तुमच्या भारतीय मुळांवर तेवढा तरी विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ह्या विचारातुन माघारी फिरत गोर्‍या मित्राला म्हटले, माझी पिढी फारच कमनशिबी आहे.  उमेदीच्या दिवसात आईवडिल भारतात होते, म्हणुन स्वावलंबी म्हणा अथवा एकटे म्हणा, असे अमेरिकेत आहोत. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुठे असेन माहित नाही, आणि मुले मनाने माझ्या देशात असतील याची शाश्वती नाही. कसे ही असो माझे भाषण त्याला समजले का नाही कोण जाणे, पण मला मात्र समजले की मी काय करायला हवे.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • अतिथी देवो भव
    पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...
  • सकारात्मक विचार
    आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ▼  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ▼  February (2)
      • मराठी कवींचे विक्रमी उत्पादन
      • आपण भारतात का जातो?
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose