संस्कारांची वॉरंटी

कोणत्याही धर्मात असो, संस्कार हे होतच असतात, मग ते धार्मिक असो, मानसिक असो  अथवा मुलांवर असो, मला तर वाटते की, मुले सुद्धा आई वडिलांवर संस्कार करत असावेत.  जशी वस्तूला गॅरंटी असते, expiry date असते, तशी संस्कारांना सुद्धा असावी.

मुलांवर आई वडिल संस्कार करतात, मग ती मोठी झाली की, त्या संस्काराची guarantee संपते, आणि मग मुले मनासारखी वागू लागतात. काही वेळेस मुलांची लग्ने झाली की बदलली असे आपण म्हणतो, म्हणजेच काय तर त्यांच्यावर केलेल्या संस्कारांची expiry date संपलेली असते. जसे मालाची expiry date संपल्यावर आपण माल फेकून देतो, मग त्यात त्या मालाची काय चूक असते काय? मग आपण मुलांना तरी काय दोष द्यावा, आई वडिलांची guarantee संपल्यावर त्यांना दूर केल्यास त्या मुलांची काय चूक?

स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्यावर, मग देश प्रेम कमी होते, म्हणजेच काय तर देशप्रेमाची लोकांची guarantee संपलेली असते

परदेशात मुले मोठी झाल्यावर, त्यांना आईवडिल दूर करतात, ते काय तर त्यांनी मुलांची तेवढीच guarantee घेतलेली असते, त्यांच्या दृष्टीने त्यांची expiry संपलेली असते.

सर्व वस्तू expiry date नंतर अजिबात परत वापरत नाहित, त्यांचा उपयोग कायमच्या साठी संपलेला असतो, तीच  परिस्थिती नात्यात सुद्धा असते, पुन्हा कधीही ती जपली जात नाहित.

Unknown

No comments: