एकाद्याचे नशीब

आमच्या माहितीत एक गृहस्थ आहेत, ते वातुशास्त्रात अतिशय पारंगत आहेत, अगदी क्षणात अंदाज करतात. मग ते फेंगशुई शिकले, छान खूप पईसा मिळवतात, अगदी आनंदी आहेत. मला वाटते त्यांनी या सर्वांसाठी दोन चार लाख खर्च केले असतील, शिकण्यासाठी. लोकांचा त्यांच्यावर अतिशय विश्वास.मग त्यांच्या मनात काय आले कुणास ठाउक ते पत्रिकेद्वारे भविष्य पहायला शिकले. त्यात सुद्धा त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. आमच्या या ओळखीत अजून एकजण आहेत ते पत्रिका ते पत्रिका पाहण्यात तरबेज, त्याच प्रमाणे कोणालाही काही सांसारिक अडचण आल्यास देवाधर्माचे करायला सांगत, ते कोणत्यातरी देवाला संकटातील माणसांना नेत, तेथे त्यांनी एक दारूची बाटली, सिगारेट त्या देवाला द्यायला लावत, लोक श्रद्धेने देत, भली त्यांची कामे हो अथवा न होवो, समाधान तर मिळे,  पण हे त्या पहिल्या गृहस्थांना पटत नसे ते म्हणत, वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर असेल तर काहीही संकट येणार नाही. पत्रिका चांगली असेल तर काहीही प्रश्न निर्माण होत नाहीत. दुसरे गृहस्थही पत्रिका पाहून लोकांना सल्ले देत. सर्व काही बरोबर चालले होते.

मग परवा काय झाले, या दुसर्‍या गृहस्थांच्या घरी खूप कडाक्याचे भांडण झाले, बस्‍, यांनी लगेच पत्रिका परत पाहिली, पत्रिकेत तर ग्रहांची दशा उत्तम. हे महाशय तर वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये पारंगत, मग हे असे कसे झाले, अगदी बायको घर सोडून जायची पाळी आली. मग त्यांनी धीर करून या मित्रांना कल्पना दिली, तेव्हा असे ठरले की, त्याने त्या देवस्थानाला जायचे आणि दारूची बाटली आणि सिगारेटचे पाकीट द्यायचे, काय करणार शेवटी कोणालाही न सांगता त्याने तेथे जाऊन सर्व दिले बाबा. मग काय झाले माहित नाही पण त्याचे सर्व problem दूर झाले.

आता दुसर्‍या गृहस्थांची गंमत ते त्यांच्या लग्नाआधीच पत्रिका पहायला शिकले होते, त्यामुळे त्यांचा आग्रह जबरदस्त कि, पत्रिका जुळलीच पाहिजे मग बाकी सर्व गौण. ते पत्रिकेचे गुणमेलन तर पहातच पण त्या मुलीची व्यक्तिशः पत्रिकाही पहात, त्यात संतान योग ही पहात. झाले असी एक मुकगी चालून आली, पत्रिका उत्तम जुळली, संतान योग उत्तम, एक मुलगा आणि एका मुलीचा योग. लग्न पार पडले. आज त्याला दहा वर्षे झालीत, पण बाबाला संसार सुख अजिबात नाही. बायकोची रोज भांडणे, शांतता नाही, एकच मुलगी, ती अजिबात ऐकत नाही. मुलासाठी दुसरा chance घ्यावा म्हटले तर बायको तयार नाही, असा वैतागलाय ना घरी रात्री उशीरा जातो, आणि स्वैपाक स्वतःच करतो, तेव्हा जेवायला मिळते. आणि लोकांचे भविष्य पत्रिकेवरून तंतोतंत सांगतो, देवाला नेतो दारूची बाटली देतो, सर्वांचे प्रश्न सोडवतो, पण तो देव याचे काही ऐकत नसेल काय? याला याची पत्रिका कळली नसेल काय? त्या पहिल्या गृहस्थांना आपल्या घराचे वास्तुशास्त्र कळले नसेल काय? त्यावर उपाय सुचले नसतील काय?

जगात असे खूप प्रश्न अनुत्तरित आहेत. पण वरील घटना मान्यच कराव्या लागतात. नाहीतर हे वास्तुशास्त्रज्ञ त्यांच्या घरात योग्य ते बदल करून करोडोपती झाले नसते काय? पत्रिका पहाणार्‍यांनी स्वतःच्या पत्रिकेतील ग्रहांची शांई वगैरे करून भाग्या उजळून घेतले नसते काय? कमीतकमी पुढील शांकटे ओळाखून त्यावर मात नसती केली काय? सर्व अजब आहे.

Unknown

No comments: