मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

दैनिक सकाळच्या अग्रलेखातील हा भाग आहे. आज सारा देश वीजटंचाईने ग्रस्त असताना हा प्रकार होत असावा, हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव.

http://www.esakal.com/esakal/07252008/Sampadakiya83E73329AB.htm

संकट पाण्याचे अन्‌ विजेचे

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हजारो मेगावॉटची आश्‍वासने देत असले, तरी ते प्रत्यक्षात आलेले नाही. विजेचे अतिरिक्त उत्पादन करीत असलेल्या राज्यांकडून वीज घेण्यासाठीही धोरणात्मक पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. दाभोळच्या प्रकल्पाची क्षमता असली, तरी पुरेसा वायुपुरवठा होत नसल्याने उत्पादनावर मर्यादा येत आहेत. वायूबरोबरच कोळशाचाही तुटवडा या समस्येची तीव्रता वाढविणारा आहे. वीजउत्पादन कमी असल्याने भारनियमन करणाऱ्या आणि जनतेला वीजबचतीचे आवाहन करणाऱ्या राज्य सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या "वर्षा' या निवासस्थानी गेल्या तीन वर्षांत १६ लाख युनिट वीज वापरल्याचे वृत्त धक्कादायक आहे. वीजबिलाची रक्कमही २५ लाख रुपयांवर जाणे संतापजनक आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. विजेच्या उत्पादनापासून त्याच्या वापरापर्यंत राजकीय नेतृत्वाचे उत्तरदायित्व किती, हे यावरून स्पष्ट होते.

असा परखड अग्रलेख लिहील्याबद्दल दैनिक 'सकाळ' चे आभार. पण यावर उपाययोजना काय? जर १६ लाख युनिटचा ३ वर्षांसाठी हिशोब केलातर रोज सरासरी १५०० युनिट वीज वापरली गेली, म्हणजे महाराष्ट्रात अंधार आणि 'वर्षा' वर रोज दिवाळी.

हे शीर्षक आहे साधारण दहा बारा वर्षांपूर्वी गाजलेल्या लावणीचे, आणि ही लावणी गायली होती सुप्रसिद्ध अदाकारा सुरेखा पुणेकर यांनी. खरेतर या लावणी मुळेच त्यांचे नाव सार्‍या महाराष्ट्रभर झाले. ही आठवण येण्याचे कारण असे झाले,

काल झी मराठी वर ’ एका पेक्षा एक ’ कार्यक्रम चालला होता आणि त्यात सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर महागुरू होते, म्हणजे तसे ते या प्रत्येक कार्यक्रमात आहेत, आणि ते अशाच काही जुन्या आठवणी सांगत असतात. याच कार्यक्रमात ही लावणी ’ या रावजी बसा भावजी ’ एका कलाकाराने सादर केली, लावणी खूपच सुरेख झाली, आणि सुरेखा पुणेकर यांची आठवण झाली पण त्यानंतर महागुरू सचिन यांनी या लावणीबद्दल एक आठवण सांगितली,

आठवण कसली सत्य सांगितले.

ही लावणी त्यांचे वडील शरद पिळगावकर यांनी ’ नाव मोठं लक्षण खोटं ’ या जुन्या गाजलेल्या मराठी चित्रपटात सादर केली होती. 

अगदी कालपर्यंत शरद पिळगावकर यांचा साधा उल्लेखही कोणी केला नाही. किंवा नंतर कुणीही एका अक्षरानेही यांचे साधे आभार मानले नाहीत. कितीतरी कार्यक्रमात ही लावणी सादर करून कलाकार वाहवा मिळवतात, तर त्यांनी शरद पिळगावकर यांचा किमानपक्षी उल्लेख तरी करावा.

हा आहे अकरावीच्या प्रवेशाचा घोळ. ७०-३० चा गोंधळ न्यायालयानेच रद्दबादल ठरवला, हे एक बरे झाले. हे सर्व निर्णय आधी होत नाहीत तर अगदी ऐनवेळी घेतले जातात, आणि गोंधळाचे वातावरण तयार केले जाते.

http://www.esakal.com/esakal/07192008/Pune22E2D65DCA.htm

अकरावी प्रवेश - "पर्सेंटाईल' सूत्रानुसारच; सोमवारी यादी
पुणे, ता. १८ - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. २१) जाहीर होणार आहे. राज्य सरकारने या वर्षीपासून लागू केलेल्या "पर्सेंटाईल' सूत्रानुसार ही यादी जाहीर करण्यात येणार आहे.
"सीबीएसई' परीक्षा मंडळामार्फत परीक्षा दिलेले पंधराशे आणि "आयसीएसई' मंडळामार्फत परीक्षा दिलेल्या आठशे विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी अर्ज केले आहेत. दोन्ही मंडळांचे एक हजार ३०० विद्यार्थी आहेत. या वर्षी प्रवेशासाठी ५० हजार २१५ जागा उपलब्ध असून, प्रत्यक्षात ४९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. प्रवेशक्षमतेपेक्षा एकूण अर्ज कमी असले, तरी विज्ञान आणि वाणिज्य मराठी व इंग्रजी अभ्यासक्रमाचे अर्ज उपलब्ध जागांपेक्षा अधिक आहेत. याउलट कला शाखेच्या दोन्ही माध्यमांच्या सुमारे सत्तर टक्के जागा रिक्त राहणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी दोन अभ्यासक्रमांना अर्ज केल्याचे गृहीत धरले तरी पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या तुकड्या वाढवाव्या लागणार आहेत.
या अभ्यासक्रमांच्या सध्या उपलब्ध जागा आणि कंसात प्रवेशासाठीचे अर्ज असे- कला (मराठी) : ६९८० (१,८२५), कला (इंग्रजी) : २,७०० (७३९), वाणिज्य (मराठी) : ८,९०० (१०,१४७), वाणिज्य (इंग्रजी) : ११,७४० (१३,१४६), विज्ञान : १७,२७० (२३,३३८).
पुण्यात केवळ उच्च शिक्षणासाठीच देशातून विद्यार्थी येतात असे नाही. राज्याच्या इतर भागांतून; तसेच परराज्यातून अकरावीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कला शाखेच्या जागा रिक्त राहणार असल्या, तरी वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागांची कमतरता भासणार आहे. गरजेनुसार तुकड्या वाढविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढली तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे विभागीय उपसंचालक जी. के. म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
---------------
पर्सेंटाईल म्हणजे?
"पर्सेंटाईल' हे संख्याशास्त्रातील सूत्र आहे. या सूत्रानुसार प्रवेश द्यावेत, असा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला आहे. या सूत्रानुसार "सीबीएसई' व "आयसीएसई'च्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढण्यात येईल. त्यास शंभरने भागून येणाऱ्या आकड्यावरील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.

पर्सेंटाइल पद्धत म्हणजे विनोदच आहे. मुळात भारतात अशी वेगवेगळी बोर्ड का ठेवावीत, कळत नाही. सर्व भारतभर एकच अभ्यासक्रम ठेवला तर, सबंध देशातून कोणीही कोठेही प्रवेश घेऊ शकेल. महाराष्ट्र बोर्डातून पास झालेला, CBSE, ICSC बोर्डातून पास झालेला अकरावीला एकाच वर्गात बसतो ना? पण त्यांच्या मनात कुठेतरी तुलना सुरू असते. खरे तर भारतभर एकच अभ्यासक्रम असावा. फक्त त्या त्या राज्याची भाषा शिकवली जावी, एवढेच काय तर भाषासुद्धा ऐच्छिक ठेवावी. आता हा किती वैताग आहे ना? एवढ्या वर्षे बरोबर चालले, पण आता मात्र problem आला. नाहितरी भारतातील विद्यार्थ्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. शिक्षणमंत्र्यांना तर या गोष्टी पहायला वेळच नाही, विद्यार्थ्यांच्या हिता पेक्षा त्यांच्याकडे इतर कामे भरपूर आहेत.

एका मित्राने हे चित्र पाठवले आणि बघुन फार मजा वाटली.

पण आश्चर्य हे की या बयेकडे ही पिशवी आली कशी?

pic27753 [640x480]

१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही, ज्यांनी ज्यांनी मदतीचा पूर लोटला, त्यापुढे या पुरानेही लाजेने मान खाली घातली.

http://www.esakal.com/esakal/07122008/SpecialnewsB6BC46A2F9.htm

तडाखा आणि उभारी

पानशेत धरण फुटून मुठेला आलेल्या महापुरात पुण्याची वाताहत झाली. या महाप्रलयाला आज ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त "सकाळ'चे वाचक भास्कर दाते यांनी कळविलेला अनुभव.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

मल्टिमीडिया विभागामध्ये आणखी व्हिडीओ
बारा जुलैचा तो दिवस माझ्या अजून स्मरणात आहे. "सकाळ'च्या पहिल्याच पानावर "पानशेत धरणाच्या एका भिंतीचा भाग खचत चालला आहे. दुरुस्तीचे काम तेथील कर्मचारी जीव तोडून करीत आहेत,' ही छायाचित्रासह बातमी आली होती. परंतु येणाऱ्या गंभीर प्रसंगाची कल्पना त्या वेळी पुणेकरांना आली नसावी.
सकाळी वर्गमित्राबरोबर गरवारे महाविद्यालयात जाताना संभाजी पुलावर बरीच गर्दी दिसली. सर्व जण पुलाखालून वाहणाऱ्या पुराचे लोंढे बघत होते. हा पूर नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. पाण्याचा रंग गढूळ पाण्यासारखा काळा- प्रवाहाबरोबर मोठी झाडेझुडपे वाहत होती. पाणी पुलाच्या खाली पाच फुटांवर होते. कर्वे रस्त्याला जाईपर्यंत पाणी रस्त्याला लागले होते. मी माघारी फिरलो.
अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते. थोड्याच वेळात ते पुलावरून वाहू लागले, तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली. सर्वांची धावपळ सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास नदीजवळील रस्त्यांवर पाणी जोरात घुसले. बायकामुलांना घेऊन लोक सुरक्षित जागी पळू लागले. पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती. घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून जात होती. दुपारी चारपर्यंत पुण्यातील नदीजवळचा सखल भाग दीड मजला पाण्याखाली होता. शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेठा पाण्याखाली होत्या. अलका, डेक्कन, हिंदविजय, विजय, भानुविलास ही सिनेमागृहे पाण्यात होती. खडकी, पिंपरी, चिंचवड भागात गेलेली कामगार मंडळी नदीच्या एका बाजूस अडकली. संध्याकाळनंतर पाणी ओसरू लागले.
दुसऱ्या दिवशी पिण्याचे पाणी नाही, वीज नाही. त्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. त्या वेळी मदतीसाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते धावून आले. अनेक शाळा, मंगल कार्यालयांमध्ये पूरग्रस्तांना दोन-तीन आठवडे आसरा दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पुराने नव्या-जुन्या अनेक घरांना तडाखा बसला. संभाजी पुलाच्या फक्त कमानी शिल्लक राहिल्या होत्या. सगळीकडे दलदल आणि कुजलेल्या धान्याचा वास.
यातून पुण्याची घडी बसण्यास सहा महिने लागले. त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पुण्याला धावती भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून मदतीचा ओघ येऊ लागला. पुण्याने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. देवाची एवढीच कृपा म्हणायची, की हा महाप्रलय रात्री न येता दिवसा येऊन गेला.

पण त्यातसुद्धा काही लुटारू होतेच, ती आठवण सुद्धा ताजी आहे.

१२ जुलैला पूर आला, लोक कसे सावरणार, रात्री पुणं नीट झोपलं सुद्धा नाही, सकाळी १३ जुलैला बाहेर सगळा आरडाओरडा सुरू झाला, खडकवासला धरण फुटल्याबद्दल. लोक आधीच घाबरलेले त्यात ही बातमी, सगळेजण जे हातात मिळेल ते घेऊन पळू लागले, कोणी पर्वतीवर गेले, कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले, घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत. त्यावेळेस फोनची इतकी सुविधा नव्हती, म्हणून काही कळत नसे. सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होता. पण जसजसा वेळ जाऊ लागला, पाणी कोठे दिसेना, कारण लोकांत चर्चा असे इथपर्यंत पाणी आलंय, तिथपर्यंत पाणी आलंय, पण दुपार झाली तरी पाणी  कोठे दिसेना, हळूहळू लक्षात यायला लागले की, ही अफवा होती, म्हणून लोक घरी परतू लागले, तर काय पाहतात. त्यांची घरे चोर, दरोडेखोरांनी लुटली होती, पुरापेक्षाही हा महाभयंकर हाहाःकार होता, लोकांच्या भावनांशी चोरांनी अफवा उठवून खेळ केला होता.

ही आठवण आली की वाटते, माणसातल्या माणूसकीचा असाही पैलू परमेश्वरानी का निर्माण केला असावा कळत नाही.

अजून एक आठवण, त्याच वेळेस राजकपूरचा ’जिस देशमे गंगा बहती है’ हा चित्रपट श्रीकृष्ण टॉकीज मध्ये लागला होता, लोक नंतर म्हणू लागले, या सिनेमामुळेच पुण्यात गंगा वाहिली.

राग यमन मधील काही रचना -

यमन रागातील प्रार्थना, मराठी, हिंदी चित्रपटगीते, भावगीते या विषयीची सूची-

मराठी चित्रपटगीते -

१) ब्रह्मा विष्णू आणि महेश्‍वर
(आशा भोगले - आम्ही जातो आमुच्या गावा)

२) मागे उभा मंगेश
(आशा भोगले - महानंदा)

३) प्रथम तुला वंदितो
(वसंतराव देशपांडे - अष्टविनायक)

४) मला इश्काची इंगळी डसली
(उषा मंगेशकर - पिंजरा )

५) एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
(सुधीर फडके - वरदक्षिणा )

६) मंदिरात अंतरात तोच नांदताहे
(सुधीर फडके , उत्तरा केळकर - धाकटी सून)

७) देवा दया तुझी ही
(सुमन कल्याणपूर - बोलकी बाहुली )

८) जिथे सागरा धरणी मिळते
(सुमन कल्याणपूर - पुत्र व्हावा ऐसा)

९) पिकल्या पानाचा देठ की हो
(शोभा गुर्टू - कलावंतीण )

१०) टाळ बोले चिपळीला
(भीमसेन जोशी)

११) धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
(आशा भोसले व सुधीर फडके - धाकटी बहीण)

१२) लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
(सुमन कल्याणपूर - बाळा गाऊ कशी अंगाई )

१३) एकमुखाने बोला जयजय हनुमान
(महेंद्र कपूर)

१४) कबिराचे विणतो शेले
(माणिक वर्मा - देव पावला )

१५) जीवनात ही घडी अशीच राहू दे
(लता मंगेशकर - कामापुरता मामा )

मराठी भावगीते -

१) इथेच आणि या बांधावर
(माणिक वर्मा)

२) अजून या झुडुपांच्या मागे
(दशरथ पुजारी )

३) वार्‍यावरती घेत
(सुमन कल्याणपूर)

४) तोच चंद्रमा नभात
(सुधीर फडके)

५) शुक्र तारा मंद वारा
(अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा)

६) तिन्ही सांजा सखे मिळाल्या
(लता मंगेशकर)

७) घाल घाल पिंगा वारा
(सुमन कल्याणपूर)

टीप - यमन रागात ’म’ तीव्र असतो, परंतु काही वेळेला शुद्ध ’म’ वापरला जातो.
तसेच काही गाण्यात यमन आहे, परंतु कडव्यात दुसरा राग येण्याची शक्यता असते
(मिश्र राग शुद्ध कल्याण, यमन कल्याण इ. ) उदा.

१) लपविलास तू हिरवा चाफा -
(मालती पांडे )

२) शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली
(कुंदा बोकील)

३) का रे दुरावा का रे अबोला
(मुंबईचा जावई)

४) जिवलगा कधी रे येशील तू
(लता मंगेशकर-सुवासिनी )
यात यमन-केदार-मल्हार परत यमन.

५)नाच रे मोरा आंब्याच्या वनात
(आशा भोसले - देवबाप्पा)

६) किलबिल किलबिल पक्षी बोलती
(सुषमा श्रेष्ठ)

हिंदी चित्रपटगीते -

१) भुली हुई यादे

२) आसू भरी है
(परवरीश-मुकेश)

३) सारंगा तेरी याद में
(मुकेश)

४) चंदन सा बदन
(सरस्वती चंद्र - मुकेश)

५) कभी कभी ....खयाल आता है
(कभी कभी)

६) आपके हसीन रुखपे...
(महंमद रफी)

७)आपके अनुरोध पे
(अनुरोध-किशोरकुमार)

८) जिंदगी भर नहीं भूलेंगी
(बरसात की रात - महंमद रफी)

९) इन्हीं लोगों ने
(पाकिजा)

१०) तुम आशा विश्‍वास

११) वो जब याद आए

१२) जिया ले गयो जी मोरा सावरियां
(अनपढ-लता मंगेशकर)

१३) पान खाये सैय्या
(तिसरी मंजिल)

१४) अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं
(हम दोनो)
१५) इस मोडसे जाते है
(आँधी)

१६) कही ये वो तो नहीं
(हकिगत)

१७) तुम ना जाने किस जहा मैं खो गयी

१८) मन रे तू काहे

१९) रे मन सूर में गा

२०) मेरी आवाज ही  पहचान है, गर याद रहे,  नाम गुम जाएगा
(लता मंगेशकर)

२१) जा रे बदरा

२२) जब दिल जले शाम

२३) सलामे इश्क मेरी जा
(मुकद्दर का सिकंदर)
२४) मौसम है आशिकाना

२५) कुहू कुहू बोले
(स्वर्ण सुंदरी)
२६) गर तुम भुला न पाएंगे

सौजन्य - वरील सूची दि.६ जुलै २००८ च्या, लोकसत्ताच्या, लोकप्रभा पुरवणीत छापून आलेली असून, सुनीती जोशी, डोंबिवली, मुंबई यांनी ती पाठविली आहे.

पुण्याजवळ एका खेडेगावी साधारण पस्तीस वर्षांपूर्वी एका गरीब कुटुंबात एक मुलगा रहात होता. घरची गरिबी असल्याने शिक्षणापेक्षा कामाला जास्त महत्व दिले जायाचे, कारण तो काळच तसा होता, आताच्या सारखी कोणी फुकट पुस्तके वगैरे वाटत नव्हते. त्याकाळी खेडेगावात शाळेची सोय सुद्धा नव्हती, मुलांना तालुक्याला पुढील शिक्षणाला जावे लागायचे, आणि आई वडिल काय म्हणत, शिकून कुठे कुणाचे भले झाले आहे, त्यापेक्षा शेतात काम केल्यास चार पैसे तरी मिळतील. तशाही परिस्थितीत त्याने चवथी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, आता तालुक्याला पाचवी नंतर शिकायला जाणे म्हणजे अवघडच, मग त्याच्या मित्राच्या घरच्यांनी त्याची जबाबदारी घेतली, कारण त्याची मदत त्यांच्या मुलाला अभ्यासात होत असे, शिवाय सोबत ही होई. अशा प्रकारे तो अकरावी ( त्या काळी दहावी नव्हती, अकरावी नंतर साइड निवडावी लागे ) पहिल्या वर्गात पास झाला. परत गावी, आता काय करणार?  गावात सरपंचाच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी भाषणात त्याने पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली, सर्वांना त्याची घरची परिस्थिती माहित होती. त्याला डॉक्टर व्हायचे होते, कारण त्या गावात डॉक्टर नव्हता, म्हणून आजारी झाल्यास उपचाराविना लोक मृत्यु पावत.लोकांनी मग ग्रामपंचायतीची सभा बोलावून त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले, आणि त्याप्रमाणे सर्व गावकर्‍यांनी यथाशक्ती मदत केली, आणि तो खूप मेहनत घेऊन डॉक्टर झाला. गावात पहिला डॉक्टर म्हणून त्याचा सत्कार केला, तेव्हा त्याने गावाला वचन दिले, गावकरी लोकांची सेवा तो मोफत करील. आणि तो त्याप्रमाणे सेवा करू लागला.

पुढे त्याने पुण्याला रहायला जाऊन घरातच  दवाखाना उघडला, पण इथे आठवडाभर दवाखाना चालवून तो दर रविवारी आपल्या गावी जाऊन मोफत औषधपाणी करू लागला.

त्यांना आपण आता डॉक्टर माने म्हणू यात. मान्यांच्या हाताला गुण फार म्हणून लांबलांबून रुग्ण येऊ लागले, खूप गर्दी होऊ लागली, जवळपासचे सर्व दवाखाने बंद झाले. रात्री दोन तीन वाजेपर्यंत रुग्ण येऊ लागले. चांगल्यापैकी पैसा मिळू लागला, पण रविवारी गावाला जाणे चुकत नव्हते. नंतर घरापासून साधारण २५ कि.मी. वर जागा घेऊन मान्यांनी मोठे  hospital चालू केले, आणि ते तिकडेच रहायला गेले, इकदे दवाखाना ठेवला, तिकडे hospital चालू केले. आता त्यांचा दिनक्रम पहा - सकाळी तिकडे hospital मध्ये सकाळी ११ ते १ दवाखाना चालवायचा. तेव्हाच hospital मध्ये लक्ष द्यायचे. संध्याकाळी ५ वाजता निघून गणपतीचे दर्शन घेऊन पुण्यातील दवाखान्यात ७ वाजता हजर. तो पर्यंत पन्नासएक पेशंट वाट बघत बसलेले असतात. ते तरी काय करणार, हमखास गुण ना. फार लांबून लांबून पेशंट येतात.आणि फी पण कमी, तीन दिवसांच्या गोळ्या आणि इंजेक्शन मिळून फक्त ५० रूपये. त्यामुळे गर्दी फार. पार रात्री कधीकधी तीन वाजणार. मग दवाखाना बंद करून २५ कि.मी.घरी जायला चार वाजणार. पुन्हा सकाळी ११ वाजता बाबा दवाखान्यात हजर. मागील जवळजवळ २५ वर्षे मी पाहतोय, त्यांनी  कोणत्याही दिवशी सुट्टी घेतली नाही, कोणत्याही सणाला, अगदी दिवाळीलाही नाही. त्यात पण आजपर्यंत दर रविवारी गावाला जाण्याचा नेम चुकला नाही, नंतर त्यांनी मोठी गाडी विकत घेतली, रविवारी गावाला जा्णे आणि पेशंट गाडीत घालून आणणे, त्यांच्यावर उपचार करून गावाला परत नेउन सोडणे, हे कार्य अजूनही चालू आहे, ते गाववाल्यांचे उपकार अजूनही  विसरले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पुण्यात ते रविवारी नसतात, गावालाच जाणार. कारण त्यांच्या मदतीशिवाय शिक्षण शक्य नव्हते.

पेशंटच्या घरून visit साठी  call आल्यास ते कोणाच्याही घरी जात नाहीत, पेशंटला दवाखान्यात आणा म्हणतात, त्यांचे म्हणणे  नंबराला बसलेल्यांचा न्याय कोण करणार? ते सुद्धा तासन्‌तास बसलेले असतात ना? मग कोणी कितीही पैसे देऊ देत, घरी जाणे नाही. दवाखान्यात एवढी गर्दी असते तीन तीन तीस नंबर लागत नाही. सतत पेशंट तपासणे, फक्त रात्री १० वाजता १५ मिनीटांच्या विश्रांतीत ग्लासभर दूध घेणे.

एवढे काम, एवढी गाववाल्यांबद्दल कृतज्ञता हे आजकाल पहायला मिळत नाही. कित्येक कुटुंबे त्यांच्यावर आजारपणाआठी अवलंबून आहेत.  एक विचार मनात आला की भिती वाटते, त्यांच्या नंतर आमचे कसे होणार?

ही मनगढंत कथा नाही, सत्य आहे. आजपर्यंत दवाखान्याला आणि दर रविवारी गावाला जाण्याला, सणवार सुद्धा आडवा आलेला नाही. सतत ३५-४० वर्षे ही साधना, हे कार्य सोपे नाही, पण चालू आहे.

धडाधड घोषणा करायच्या, परिणामांची पर्वा करायची नाही, योजना नाही, बस फक्त श्रेय लाटायचे, हा तर आपल्या राजकारणी आणि अधिकारी लोकांचा हातचा मळ आहे. आता काय सामान्य गणित, कारण काय तर ज्या विद्यार्थ्यांना गणित घेऊन करियर करायचे नाही त्यांच्यासाठी. मग जर दहावीनंतर इतिहास भूगोलाची सुद्धा गरज लागत नसेल तर त्या विषयांचा अभ्यास करण्यात, आणि त्यावर वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे. ते विषयच पाचवी पासून कमी करावेत. याहि पेक्षा सातवीनंतर विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडू द्यावेत, कारण त्यांना काय करियर करायचे आहे ते त्यांना ठरवू देत. हा निर्णय ज्यांना माय मराठी बद्दल अभिमान आहे आणि ज्यांना फक्त शेतीच करायची आहे किंवा ज्यांना भविष्यात इंग्रजीचा काहिही उपयोग नाही, त्यांना इंग्रजी शिवाय दहावीला बसण्याची परवानगी असावी, त्यामुळे शाळांचे निकालही सुधारतील. बघा, भूगोलात शिकवतात, टुंड्रा प्रदेशातील लोकजीवन, याचा कधी आयुष्यात संदर्भ आला आहे काय, पण शाळेत नाही समजले तर मार्क नाही मिळणार.

http://www.esakal.com/esakal/07052008/MaharashtraDD1BF5F0A5.htm

सामान्य गणिताबाबत गोंधळात गोंधळ
मुंबई, ता. ४ - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून नववीसाठी सुरू केलेल्या सामान्य गणित विषयाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत अद्याप शाळांमध्ये संभ्रम आहे.
या संदर्भात अनेक शाळांनी पालक व विद्यार्थ्यांना दहावीनंतर करियरच्या दृष्टीने होणाऱ्या परिणामांची माहितीही दिलेली नाही. बहुसंख्य दुकानांमध्ये या विषयाच्या पुस्तकांचाही पत्ता नाही.
बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते आणि दहावीच्या परीक्षेत ते नापास होतात. त्यामुळे दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे गणित विषय घेऊन करियर करावयाचे नाही, त्यांना बीजगणित व भूमितीऐवजी सामान्य गणित हा पर्याय यंदा नववीपासून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. सामान्य गणित घेतल्यास दहावीला पुन्हा बीजगणित व भूमिती घेता येणार नाही. त्यामुळे दहावीनंतर करियरच्या दृष्टीने कोणते अभ्यासक्रम शिकता येणार नाहीत, याची कल्पना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळांनी देणे अपेक्षित आहे. त्यावर विचार करण्यास थोडा कालावधी देऊन सामान्य गणिताविषयी त्यांची संमतीपत्रे भरून घ्यावयाची आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी अजून पालक व विद्यार्थ्यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरुवात केलेली नाही.
या विषयाची पुस्तके अद्याप उपलब्ध न झाल्याने तो विषय कसा आहे, बीजगणित व भूमितीच्या तुलनेत सामान्य गणित अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी किती आहे, याची माहिती शिक्षक, विद्यार्थी व पालकांना नाही. शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले. सामान्य गणिताचा पर्याय स्वीकारण्यास अजून किती वेळ जाईल आणि त्यानंतर अभ्यासक्रम शिकवून होईल का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सामान्य गणितासाठी शाळांनी फारसा रस घेतल्याचे चित्र सध्या तरी नाही. सामान्य गणित घेणे, हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे, सक्तीचे नाही. ज्या शाळांचे बरेच विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण होतात, अशा शाळा दहावी निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामान्य गणिताची सक्ती विद्यार्थ्यांवर करण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

जर एखाद्या मुलीला लग्नानंतर नोकरी करायची नसेल तर तिने एवढे अवजड शिक्षण का घ्यावे. दहावीनंतर ज्याला जे करियर करायचे आहे त्याच प्रमाणे विषय निवडायचा अधिकार या लोकशाहीत असायला हवा, त्याने सरकारने ठरवलेल्या विषयांप्रमाणे अभ्यास करून मनस्ताप का करून घ्यावा, ही त्याच्या विचारस्वातंत्रावर गदा आहे. एखाद्याला पुढे डॉक्टर व्हायचे आहे, आणि केवळ दहावी पास होण्यासाठी पुढे गरज नसलेले विषय असल्यामुळे जर तो दहावी पास होत नसेल, आणि त्याचे करियर होत नसेल तर याला शिक्षणपद्धतीच जबाबदार आहे. शिक्षणमंडळाने ठरवलेले विषयच घ्यावेत, आणि गरज नसताना डोकेफोड करावी, हे लोकशाही राष्ट्रात घडू नये, आणि विद्यार्थांना निवडस्वातंत्र असावे.

मी एवढ्या शाळांतील भिंतीवरील सुविचार वाचले, पण कोठेही रहदारीचे नियम पाळावेत, रस्त्यावर पचापच थुंकू नये, पर्यावरण वाचवावे, असे सुविचारच लिहीलेले नाहीत.

सर्वसाधारणपणे परदेशातील मुलांबद्दल किंवा त्यांच्या आईवडिलांबद्दल बोलताना भारतीय लोक एकच पालुपद लावतात, गळा काढतात- संस्कारांबद्दल. म्हणे परदेशात राहून भारतीय लोक
भारतातील संस्कार विसरता, आणि त्यांना हे  सल्ला देतात मुलांना भारतात परत पाठवा नाहीतर ते भारतीय संस्कार विसरतील पण संस्कार संस्कार म्हणून जे थोडे भारतीय टाहो फोडतात त्यांना तरी संस्कार समजलेत काय? कशाला संस्कार म्हणायचे? आईवडिल मुलांना शिकवतात आणि त्यांच्याकडून म्हातारपणी सांभाळतील म्हणून आशा बाळगतात, म्हणून तर प्रत्येकाला एक तरी मुलगा हवा असतोच, भले मग कितीही मुली होऊ देत. म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे बघतात. ह्यालाच संस्कार म्हणायचे काय? आजही भारतात आपण ऐकतो कि मुलगा सुनेला घेऊन वेगळा झाला किंवा सुन मुलगा त्रास देतात. अगदी इस्टेटीसाठी भाऊ भावाला, मुलगा आईबापाला किंवा वेळप्रसंगी कोणी कोणाचाच विचार करत नाही आणि कोर्टाची दारे ठोठावतात. हेच संस्कार काय?
नुसते रस्त्यावर पाहा, अजिबात रहदारीचे नियम पाळत नाहीत चांगले सुशिक्षित लोक सिग्नल तोडतात, पादचार्‍यांना कुचलतात हेच काय संस्कार? रस्त्यात कुठेही पचापच थुंकायचे हेच संस्कार काय? ही सर्व मंडळी शाळेत नव्हती गेली काय? काय त्यांना शिक्षकांनी शिकवले नसेल काय? पण कोण हे लक्षात ठेवतो. शाळा संपली शाळेतील शिस्त संपली. कॉलेजच्या मुली मुले मिळून रेव्ह पार्टी करतात. आणि घाऊकपणे पोलिसांच्या हाती दारुच्या नशेत सापडतात मग पोलीस मुलींना सोडून देऊन मुलांवर खटले दाखल करतात. हेच संस्कार त्यांना कॉलेज शाळेत शिकवलेत काय?
मग संस्कार संस्कार असे बोजड शब्दांच्या कुबड्या का मिरवायच्या.
गणेश उत्सवाला वर्गणी साठी सक्ती करताना कुठलेच संस्कार बाळगले जात नाहीत. मोठे मोठे स्पीकर लावून, ३०-३० तास मिरवणूक काढून कोणते संस्कार प्रदर्शित केले जातात.
महात्मा गांधीच्या फोटोच्या साक्षीने जेव्हा भ्रष्टाचार चालतो तेव्हा खरोखरच संस्कारांच्या ओझ्याने, गांधी परत जन्माला येणार नाहीत.
शाळेत असताना थोर पुरुषांचे धडे वाचले जातात, सुविचार पाठ केले जातात. ते काय फक्त शाळेतच त्यावेळचे संस्कार व्यवहारात सोईस्करपणे विसरले जातात. हेच संस्कार मिरवण्यासाठी भारतात राहायचे काय? किंबहुना परदेशात गेलेला भारतीय संस्कारांचा बाउ करता, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून नीट पद्धतशीर आणि शांत जीवन जगत असतो.इथे संस्कारांच्या रगाड्यात, संस्कारी माणूस सुद्धा शांत जीवन जगू शकत नाही. कारण पाण्यात राहून कोरडे राहता येत नाही.
दुसर्‍याला वेळप्रसंगी मदत करावी, हे संस्कार आहेत, पण आम्हाला विचारा, रस्त्यावर अपघातात सापडलेल्याला दवाखान्यात पोहोचवल्यावर डॉक्टर आणि पोलीस याछ्यापासून काय त्रास होतो ते,
मदत करणारा पुन्हा आयुष्यात कोणाला मदत करणार नाही.
बेभानपणे बिघडलेल्या वाहतुकीत आपण एकटेच वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवू शकत नाही, त्याच प्रमाणे असल्या संस्कारात, संस्कारीत जीवन जगूच शकत नाही.
स्त्रिया आपली दारे झाडतात आणि कचरा शेजार्‍याच्या दारात लावतात, बसमध्ये जागा असूनही बस थांबवत नाहीत, मत मागायला येणारे पुढारी पुढील निवडणुकीपर्यंत तोंड दाखवत नाहीत, सुवर्ण पदकामध्ये भेसळ केली जाते, वाहन चालक आणि पोलीस यांच्यात आर्थिक संबंध येतात, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये माजलेला भ्रष्टाचार, हे सर्वजण शाळा कॉलेजची पायई चढलेत ना?यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी शिक्षकांनी काहीच संस्कार केले नसतील काय? एवढे सणवार कामधाम सोडून आपण ते अंगिकारिले आहेत? हे सर्व संस्कार धार्मिकतेचा आव आणून पार पाडायचे. हेच काय संस्कार?
बरोबर आहे परदेशात मुले आईवडिलांना संभाळत नाहीत, पण हे तिथे गृहित असते आणि त्याप्रमाणे आईवडिल स्वतःची व्यवस्था करतात, आणि मुलांनाही तशा पायावर उभे करतात, म्हणजे
अपेक्षा नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दुःख नाही. देवाधर्माचे नाहीत पण मेहनतीचे संस्कार आहेत. श्रीमंतीचे नाहीत पण प्रामाणिकपणाचे संस्कार आहेत. परदेशात मुले मुली एकदम मोकळेपणाने राहतात, म्हणून त्यांना संस्कार नाहीत, इकडे मुले मुली तेच, फक्त आडोशाला करतात.
आता संस्कारांची व्याख्या आहे, मला वाटेल तसे मी वागणार, पैशांचा माज करणार, आणि संस्कार कवडीमोलाने विकत घेणार.
संस्कार, भारतीयता, आपली माती, मराठीतील जन्म हे सर्व गोंडस शब्द आहेत, पण जर परदेशात राहण्यार्‍या भारतीयांची, परत भारतात येण्याच्या इच्छेविषयी टक्केवारी काढा, मला नाही वाटत कुणी इकडे परत येण्याचा विचार करेल.

सर्व भारतीय साहित्यीकांचा विरोध पत्करून अमेरिकेत संमेलन घ्यायचा ज्या मंडळींचा हट्ट होता त्यांना अमेरिकेतून चपराक मिळाली हे एक प्रकारे बरेच झाले. नाहितर हे एक पेवच फुटले असते. अगदी हळदीकुंकूसाठी सुद्धा आमंत्रणे येतील आणि इकडे  लगीनघाई उडणार. खरे तर त्या परदेशी लोकांना असले उद्योग सुचत नसतात. ज्यातून काहीच फायदा नाही, असले धम्दे ते लोक करत नाहीत. आपल्या लोकांना भरपूर वेळ असतो. आठवत असेल, काही वर्षांपूर्वी T.V. वर "रामायण" मालिका प्रसारित होत असे, तेव्हा सबंध भारतात रस्ते ओस पडत, लोक कामावर उशीरा जात म्हणून कामाच्या वेळा बदललेल्या होत्या.

 

http://www.esakal.com/esakal/07032008/SpecialnewsD5DFD586A8.htm

मराठी साहित्य संमेलनास अमेरिकेतूनच विरोध
पुणे, ता. २ - मराठी साहित्य अमेरिकेत रुजवण्याचा, साहित्यिक चळवळ उभी करण्याचा शाश्‍वत प्रयत्न अमेरिकेतील कोणत्याही मराठी मंडळाने केलेला नाही.
साहित्यिक कार्यक्रमांना संख्यात्मकदृष्ट्याही यापूर्वी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे, हे मान्य करत अमेरिकेतील "कॅलिफोर्निया आर्टस फाउंडेशन'ने साहित्य महामंडळास आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
८२ वे साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतल्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. अमेरिकेतील बे एरियामध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेल्या "कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशन' संस्थेतर्फे अध्यक्ष मुकुंद मराठे यांनी वरील आवाहन केले आहे.
""संमेलन अमेरिकेत घेतल्यास नेमके काय साध्य होईल, याचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे,'' असे सांगून बहुतांश मराठी साहित्यप्रेमींना संमेलनास हजर राहता येणार नसल्याचे स्पष्ट आहे, असेही मराठे यांनी म्हटले आहे. ""संमेलनाचा जिवंत अनुभव टेलिकास्ट वा इंटरनेटवरून पोचू शकणार नाही. संमेलनासारखा मोठा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहित्यिक लेखनाची, आस्वादाची सशक्‍त परंपरा महत्त्वाची असते. अशी परंपरा घडवण्याचा प्रयत्न कोणत्याही महाराष्ट्र मंडळाने येथे केलेला नाही. आस्वाद घेऊ शकणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या बे एरियामध्ये अत्यल्प आहे. विखुरलेली मंडळी असल्याने हे अवघड आहे. केवळ संमेलने भरवून स्टॅनफर्ड किंवा बर्कलीतील प्राध्यापकांना; तसेच मराठी जनांना पुढच्या पिढ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देणे अशक्‍य आहे. त्यासाठी व्यासंग, संस्कृतीची जाण या अत्यावश्‍यक गोष्टी आहेत. तीन दिवसांच्या संमेलनाने मराठी एकदम जागतिक पातळीवर पोचेल, ही अपेक्षा हास्यास्पद आहे. अशा संमेलनासाठीची योग्यता कमविण्यासाठी प्रदीर्घ काळ योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्‍यक आहे; अन्यथा संमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा एक खेळ होईल,'' असे मराठे यांनी म्हटले आहे.

हे संमेलन भारतात होते, तर त्याची काय फलनिष्पत्ती होते, हा संशोधनाचाच विषय व्हावा. खरा फायदा होतो तो प्रकाशकांचा आणि तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणा‍र्‍यांचा.

आजपर्यंत व्यापारी मालात भेसळ करतात, असे ऐकले होते पण सरकार सुद्धा! १९८४ पासून हे सत्र चालू आहे आणि त्या दोषी लोकांवर कारवाई नाही, आश्चर्य आहे. आता त्यांना त्या वजनाच्या सोन्याचे बाजारभावाप्रमाणे पैसे देणार म्हणे. पण आता त्याचा काय उपयोग. आता सर्व प्रकारच्या पदकांबद्दल शंका येते. खरे तर हा  त्या व्यक्तींच्या भावनांशी  खेळ आहे. जर सरकारक्स्डून असे होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? सरकार "सुवर्ण कमळ" म्हणून एक पुरस्कार देते, ते तरी खरे असेल काय? आधीच १४ कॅरेट, २४ नाही आणि त्यात ही भेसळ. आपल्या भारतीयांना एवढे सुद्धा समजत नाही काय, कि ह्या इंटरनेट वर्तमानपत्राद्वारे सर्व जगात या बातम्या वाचल्या जातात, तेव्हा परदेशी लोक काय म्हणत असतील, त्यांचे भारतीयांबद्धल काय मत होत असणार?

http://www.esakal.com/esakal/06282008/SpecialnewsAC5737F20C.htm

सरकारच्या सुवर्णपदकांमध्ये खोट; १९८४ पासून भेसळ
गजानन ताजने - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २७ - राज्यातील कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्‍तींना १९८४ पासून देण्यात आलेल्या सुवर्णपदकांमध्ये किमान दीड ते कमाल साडेनऊ ग्रॅम सोने कमी असल्याचे राज्य शासनाने अखेर कबूल केले आहे.
आता या पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना देण्यात आलेल्या सुवर्णपदकांत जेवढे सोने कमी असेल, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे भरपाई आणि जुन्या पदकासारखे नवे स्मृतिचिन्ह देऊन राज्य शासन चुकीची दुरुस्ती करणार आहे.
कृषी आणि पशुसंवर्धन विकास मंत्रालयाकडून कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात रोख रक्कम, १४ कॅरेट सोन्याचे ५० ग्रॅम किंवा २५ ग्रॅमचे पदक आणि सन्मानपत्र दिले जाते. मात्र, सुवर्णपदक काळे पडत असून, सोन्याचा मुलामाही निघत असल्याचे अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्‍तींना आढळून आले. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वर्षभरापूर्वी अनेक कृषितज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी व संस्थांनी निषेध करीत पुरस्कार परत केले. शासन प्रगतिशील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही विधानसभेत झाला. त्यामुळे कृषी विभागाने सुवर्णपदकांची प्रयोगशाळेत चाचणी घेतली. त्यात सर्व निकष धाब्यावर बसवून संबंधित संस्थेने सुवर्णपदकांची निर्मिती केली असून, त्यात धातूची भेसळ झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. सुरवातीला २००५ मध्ये दिलेल्या पदकांत भेसळ असल्याचा आरोप झाला होता.
मात्र, त्यानंतर त्यापूर्वीच्याही सुवर्णपदकांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी झाल्याने शासनाने १९८४ पासूनच्या पदकांची तपासणी केली. यात १९८४ ते २००४ पर्यंत देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ४.८३ ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत १.८८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले. याशिवाय २००५ मध्ये देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ९.२० ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत ३.०८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले.
कृषी विभागाने पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना त्यांच्या पदकांत सरासरी जेवढे सोने कमी आढळले, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे थेट घरपोच देण्याचे ठरविले आहे.
-------------------
ताम्रपदकांबाबत मौन
कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था, व्यक्‍तीसोबतच स्वातंत्र्यसैनिकांचाही सुवर्ण महोत्सवी वर्षात ताम्रपदक देऊन सरकारने सत्कार केला होता. या पदकांतील धातूतही भेसळ असून, पदके काळी पडली असल्याच्या तक्रारी करण्यात आहेत. मात्र, या तक्रारींबाबत सरकारने अद्यापही मौन बाळगले आहे.

पण नाही याची आम्हाला पर्वाच नाही, आपल्या झोळीत कसे जास्तीतजास्त पडेल याचाच विचार सर्वजण करतात. आता कुठेतरी हे बदलले पाहिजे. गुन्हेगारांना शासन झले तरच पुधील अनर्थ टळतील.
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ▼  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ▼  July (11)
      • रोज १५०० युनिट वीज
      • या रावजी बसा भावजी
      • अकरावीचा घोळ
      • बीडी जलाइले ... U.K. मे पिया....
      • १२ जुलै १९६१
      • राग यमन
      • विश्वास बसणार नाही
      • सोपे शिक्षण
      • संस्कार आणि संस्कार
      • परदेशातून नकार
      • सरकारी भेसळ
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose