दूरदर्शन व सेन्सॉर बोर्ड

दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी दूरदर्शनवर ’ झूठा कही का ’ सिरीयल होती, त्यात नायक १५ ओगस्टचे झेंडावंदन करतो पण त्यातील झेंड्याचे रंग विचीत्र होते, म्हणजे वर भगवा रंग नसून dark maroon रंग होता. जे राष्ट्रगीत गायले त्याची चाल तर ऐकवत नव्हती. ज्या पताका लावल्या होत्या त्याही तशाच.

दुसरी एक सिरीयल ’चार दिवस सासूचे’ त्यात पार्थ दुसरे लग्न करतो, असे दाखवले, भले ते स्वप्न असेल पण हे चूकच ना. द्विभार्याप्रतिबंधक कायदा नाही काय? हिन्दी सिरीयलमध्ये तर अनेक लग्ने दाखवतात, अनेक लफडी दाखवतात, का मुलांनी मग रेव्ह पार्टी करू नये? वहिनीसाहेबनी तर वैताग आणलाय, कसले जादुटोणा करतात, शिवाय एकामागून एक खून, पोलीस काय झोपलेत काय? वास्तव अजिबात नाही. असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील, पानेच्यापाने भरतील. ’सास भी कभी बहू थी’ मध्ये किती नवर्‍यांच्या किती बायका आणि कितीकांचे नवरे, आणि सगळे बेशरम, कोणालाच लाज लज्जा नाही. मुलांनी काय आदर्श घ्यावा. एका इंग्रजाने जेव्हा शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा तो एवढा भारावून गेला कि, तो म्हणाला असा शिवाजी इंग्लंडमध्ये पैदा झाला असत्ता तर आम्ही दुसर्‍या कोणावर साहित्यच लिहीले नसते, इतके असामान्य व्यक्तिमत्व भारतात होऊन गेले आहे. पण त्यांच्यावर एकही सिरीयल कोणी काढू नये, हे त्या शिवाजीमहाराजांचे दुर्दैव. टिपू सुलतानवर, बहादूरशाह जफरवर सिरीयल निघतात, पण स्वातंत्र्यवीरांवर नाही.

आता ह्या सर्वांचा गांभीर्याने विचार करून, दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची जरूरी आहे, म्हणजे या सर्वांना् खीळ बसेल. सिनेमात न होणारी हौस इथे भागवली जाते, कारण सगळं  रानच मोकळं आहे ना? कोणत्याही चॅनेलवर देशहितावर, समाज प्रबोधनवर जाहिरात अथवा कार्यक्रम नसतो.

सेन्सॉर बोर्डाची खूप आवश्यकता आहे. ओंगळ गाणी व प्रसंग, बेकायदेशीर कृत्याची चित्रणे, भडक बातम्या हे प्रकार बंद होतील.

Unknown

No comments: