मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

उद्या २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताचा ’चांद्रयान १’ हा उपग्रह जेव्हा अवकाशात, पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षा भेदून झेपावेल तेव्हा भारताच्या अवकाशपर्वाच्या नवीन सुर्योदयाची पहाट होईल. आम्हासर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येईल. चार दशकांपूर्वी केरळमधील तुंबा या अवकाशस्थळावरून ’रोहिणी ७५’ या अग्निबाणाने झेप घेतलेला दिवस आणि ’चांद्रयान १’ झेपावणारा उद्याचा दिवस अविस्मरणीय आहेत.  

’चांद्रयान१’ हे मुख्यतः दूरसंवेदक उपग्रह असून, त्याचे वजन १३०४ किलो आहे. तो चंद्राभोवती दोन वर्षे फिरत राहणार असून, चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्रिमिती चित्रण पाठवणार आहे.

ही चांद्रयानाची मोहीम यशस्वी होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व शास्त्रज्ञांचे परिश्रम फळाला येवोत. भारतसरकारची या दिवाळीसाठी ही सर्वात मोठी भेट असेल.

’चांद्रयान १’ मोहीम यशस्वीरित्या राबवणार्‍या भारत सरकारला, सर्व शास्त्रज्ञांना, अधिकारी वर्गाला, एवढेच काय अगदी चतुर्थश्रेणी कामगाराला, प्युन, स्वच्छता कर्मचार्‍याला, अगदी प्रत्येक घटकाला, ज्यांच्या सहभागाशिवाय हे अग्निदिव्य पूर्णा होऊच शकत नाही, अशा सर्व भारतीयांना, आम्हा सर्व भारतवासीयांच्या हार्दिक शुभेच्छा.

आताच्या या बेभरंवशाच्या जगात चोर, दरोडेखोरांपासून आपल्याला कोण वाचवू शकेल, परमेश्वर नाही तर, फक्त पोलीसच. पण का कोणास ठाऊक पोलीस मात्र सामान्य माणसाला मित्र वाटत नाही. आता याला पोलीस जबाबदार असू शकत नाही, नाही का?

जगात अनेक प्रकारची लोकं आहेत, त्यांच्याकडे पाहून तरी हे समजत नाहीना की, हा सज्जन की चोर? जगात चोर्‍या होतात, ज्यांचा माल चोरीस जातो त्यालाच दुःख होते ना? मग त्याला माल मिळवून देण्यासाठी कोण मदत करणार? अशा वेळेस जर पोलीसांशिवाय कोणाकडे मदत मागितली तर मिळू शकेल काय? पण पोलीस रात्रंदिवस मागे लागून चोराला शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेस कोणी सापडले तर तो कबूल करेल काय? मग पोलीसांना धाक दाखवावाच लागतो. कोणीही सहजासहजी कबूल करणार नाही? खूनाच्या केस मध्ये जर पोलीस म्हणू लागले, अरे सर्वजण खरेच बोलतात, तर कोणी आपण होऊन कबूल करणार नाही. कोणीही गुन्हेगार प्रेमाणे कबूल होत नाही. जर अशी वागणूक पोलीस देऊ लागले तर, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याचे काय?

गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, जैनांची मिरवणूक, शोभायात्रा, अशा कितीतरी बाबतीत पोलीसांना संरक्षणासाठी बदोबस्ताला जावे लागते, तेव्हा वेळेचे बंधन रहात नाही. पुण्यात गणपती विसर्जनाच्या वेळी तर पोलीस चाळीस चाळीस तास ड्युटी बजावतात. सगळेजण आपापल्य नादात असतात, पण त्यांच्ताकडे कोणाचेच लक्ष नसते. सणवर तर त्यांना माहितच नसतो. अरे, ते जर सणवार करू लागले  तर आपले संरक्षण कोण करणार.रोजच शिमगा होणार. आज पोलीस खाते आहे, म्हणून आपण रात्री शांत झोपू शकतो.

कल्पना करा, पोलीस खाते बंदच करून टाकले तर? कोणीही सबल दुर्बलांना त्रास देईल. स्त्रीया मुलींची अब्रू राहील काय? दिवसा ढवळ्या लोकांवर अत्याचार होतील. आता पोलीस आहेत तरी राजरोस खून होताहेत, दंगली भडकताहेत, लूटालूट होत आहे. मग दाद मागायला जागा नसेल तर? एखादा माणूस तक्रार द्यायला चौकीत जातो, तेव्हा त्याला माहित आहे की त्याची बाजू खरी आहे, पण हे त्यावेळेच्या पोलीसाला कसे समजणार? त्याला चौकशी करावीच लागणार? तक्रारदाराच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही. जर तक्रार करणाराच खून करून कोणा दुसर्‍याचे नाव घेत नसेल कशावरून? मग त्या माणसावर अन्याय नाही का?

वाहतूक पोलीस नसेल तरची कल्पना करा. चौकात काय हाल होतील, कोणीही वेळेवर घरी पोहोचू शकणार  नाही. लोकांना राग असतो, उगीचच थांबवून परवाना विचारतात, पण विना परवाना वाहन चालक असतातच ना? अपघात करून पळून गेलेल्याला पोलीस शोधून आणतात, तेव्हाच अपघातग्रस्ताला न्याय मिळतो ना?

जो पिडीत आहे त्याला विचारा पोलीसाचे महत्व. ज्याच्यासाठी पोलीस साक्ष द्यायला कोर्टात उभारतात, त्याला विचारा, बलात्कारीत स्त्रीला विचारा, अशिक्षीतांना विचारा पोलीस किती मित्र आहे ते.

स्त्री आणि पुरूष या दोन जाती देवाने निर्माण केल्या, आणि त्यांना नवीन संतती उत्पन्न करण्याची क्षमता दिली, जशी मानवाला तशीच प्राण्यांना देखील. खरं तर आपणही प्राणीच, फक्त प्रगत. आदिमानवाच्या काळी मनुष्य जंगलात प्राण्यांप्रमाणेच रहात होता ना! नंतर मानवाने प्रगती केली, तरी पण काही जणात अजूनही प्राण्यांचे रानटी गुण दिसतात, तो भाग वेगळा.

मानवाने व्यभिचाराची व्याख्या बनवली. विवाह संस्थेला मान्यता दिली, हे सत्कार्य आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी केले, अगदी रामायण महाभारताच्या काळातही विवाहसंस्थेला मान्यता होती, एवढेच काय राम एकपत्नीव्रती होता. नंतर विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली, भले समाज, जात, धर्माप्रमाणे रिती वेगवेगळ्या असतील.संतती औरस ही अनौरस हे ठरण्याच्या दृष्टीने विवाहाच्या वैधतेला मान्यता असणे जरूरीचे ठरते. पूर्वी विवाहविधी, समारंभ फारच किचकट होते पण आता खूप सुटसुटीत झाले आहेत. आणि हेही नको असतील तर अवघड आहे. कायद्याने विशिष्ट विधीचेही बंधन नाही, कायदा त्यात्या धर्माप्रमाणे केलेल्या विधीला मान्यता देते, एवढेच काय, नोंदणीविवाहही कायदेशीर असतो. लग्नसोहोळ्याच्या प्रथा जात, धर्म, जमात, स्थळ, कुटुंब प्रमाणे बदलतात, तरीही त्याला कायद्याने मान्याता आहे. आदिवासी समाजात फक्त मुलाने स्पर्श केला तरी बस्स‌‍! बौद्ध धर्मात बुद्ध प्रतिमेसमोर फक्त त्यांचा मंत्र म्हणतात. काही जमातीत फक्त हार घालण्याला, तर काहीत सात फेर्‍यांनाच महत्व आहे.

समजा स्त्री-पुरूष दीर्घकाल पती-पत्नीप्रमाणे एकत्र रहात आले, आणि त्यांना संतती झाली तर अडचण उत्पन्न होणार कारण त्यांच्या चारित्र्याबद्दल काय हमी. विवाह समाजाला जाहीर होणार नाही, कायदेशीर बाबी उत्पन्न झाल्या तर न्याय कसा होणार.

कायदेशीर नोंदणी आवश्यक आहे, कारण पुरूषाने स्त्रीवर अन्याय केला तर तिला न्याय कसा मिळणार, मालमत्तेचे वाटप कसे होणार.

कायदा असे मानतो की, सहसा कोणीही खोटे बोलत नाही, म्हणून शपथपत्राला, न्यायालयात गीतेवर हात ठेऊन घेतलेल्या शपथेला महत्व आहे, तो साक्षीदार खरेच बोलतो असे कायदा मानतो. कायद्याचा माणसातल्या माणुसकीवर सद्‌सद‌विवेकबुद्दीवर विश्वास आहे.

महागाई वाढली, आकाशा भिडली

दात अन्‌ अन्नातील दरी वासली

माझ्यातील वाघाची मेंढी झाली

आणि, सरकारी देवासमोर कापली

मुलं झाली, निसर्गानं वाढवली

डोनेशननं शिक्षणा गाडी अडली

खाल मानेनं लाचारीत नोकरी केली

मालकानं उठताबसता लाथ घातली

निसर्ग कोपला, आजारानं हाय खाल्ली

डाक्टरनं नखानं कातडी सोलली

माझ्यातील माणसाची मेंढी झाली

अन्‌ सरकारी इस्पितळात कापली

पोरगी घोर लाऊन वयात आली

काय करू, कसायाच्या गळ्यात बांधली

जावया मुखी लाख लाखोली

लेकीची रोजच लावतो बोली

सासर्‍याची जावयाने केली मेंढी

रगात नाय, पण पुरती कापली

नदी नाले विहीर आटली

पण डोळीस धार लागली

आकाशी नजर भिरू लागली

कुठलं ढग, नुसतीच काहिली

दुष्काळानं, किती बांगडी फुटली

लहानग्यांची सावली तुटली

शेतकर्‍याची बघ मेंढी झाली

मेंढीनं जरासी आत्महत्या केली

राजानं मदत जाहीर केली

उपाशी पोटी रांग लावली

शंभराची नोट दिसाया लागली

पदरी दहाची पवित्र झाली

मधली गळती, कुरतडली

काय करणार? नसती मिळाली

पोटाच्या आगीने मेंढी केली

दहाची खाल्ली,शंभराची ढेकर दिली

शेवटी देवाची आणा भाकली

त्याला फुरसत नाय गावली

वैतागून मोप भगती केली

रडतखडत देवाची पावलं आली

म्हणाला माणसांनी, माझीच मेंढी केली

राजकारण्यांनी निर्दयतेने कापली.

माणसातील वाघावी मेंढी झाली

उरली सुरली आशा संपली

मानेच्या कण्याची ताकद नुरली

स्वतःहून कापाया तयार झाली

कापून कापून, कापाया काय उरली?

आयुर्वेदात कोजागिरीला विशेष महत्व आहे, कारण कोजागिरीच्या चंद्राचा आकार नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. या दिवशी चंद्र विशेष आवुर्वेदिक शक्तीचा वर्षाव करीत असतो. यादिवशी दुधाची खीर अथवा मसाल्याचे दूध साधारण रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत चांदण्यात उघडे ठेऊन पितात. असं म्हणतात , हे दूध दम्याला गुणकारी असते.

तसं पाहिलं तर चंद्राचं नातं आपल्याला फार जवळचे आहे. भाऊबीजेला ज्या स्त्रीयांना, मुलींना भाऊ नसतो, त्या चंद्राला भाऊ म्हणून ओवाळतात. म्हणून लहान मुले चंद्राला "वांदोमामा" म्हणतात, आणि या मामावर अनेक बालगीते आहेत. तरूण, तरूणी तर या चंद्राला साक्षी ठेऊन प्रीतीच्या आणाभाका घेतात. चित्रपटात पूर्वी चंद्राच्या उपस्थितीतच प्रेम गाणी पूर्ण होत. तसं पाहिलं तर प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व आहे.

वैत्र - हनुमान जयंती, वैशाख - बौद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ - वट पौर्णिमा, आषाढ - गुरू पौर्णिमा, श्रावण - राखी पौर्णिमा, भाद्रपद - प्रोष्ठपदी पौर्णिमा, आश्विन - कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक - त्रिपुरी पौर्णिमा, मार्गशीर्ष - दत्त जयंती, पौष - शाकंभरी पौर्णिमा, माघ - माघी पौर्णिमा, फाल्गुन - होळी.

केव्हाही अनुभव घ्या, चंद्राच्या चांदण्यात शीतल, प्रसन्न, आल्हाददायक  वाटते. त्याच्या प्रकाशात फुले उमलतात, नव्हे तो हळूवारपणे त्यांना उमलण्यास मदत करतो. चंद्राला पाहून तर पृथ्वीवरील सागरालाही भरती येते तर मनुष्यप्राणी किंवा वनस्पतींची काय कथा.

कोजागिरीचा कुलधर्म फार महत्वाचा असतो. या दिवशी कोजागिरी व्रत करतात. आल्हाददायक वातावरणात  आकाशातून लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर येते आणि कोण जागलेले आहे हे पाहून त्याला सुख समृद्धी बहाल करते. म्हणून या रात्री जागे राहून घर उघडे ठेवतात. या रात्री लक्ष्मीची प्रतिक्षा करताना जागे राहून मनोरंजनाचे कार्यक्रम करतात, व्रतस्थ राहतात. रोजच्या धकाधकीच्या, चिंतेच्या वातावरणात कोजागिरी एक नवचैतन्य निर्माण करते.

कोजागिरीच्या चांदण्याचा  दुधाळ प्रकाश, त्याची शीतलता मनाची प्रसन्नता वाढविते, आणि आपणा निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जातो.

काल एका मंदिरात जाण्याचा प्रसंग आला. मंदिर फारच प्रसन्न होते. भारतात हिंदूंच्या मंदिरात त्या देवतेच्या समोरील बाजूस त्या देवतेच्या परम भक्ताची अथवा वाहनाची मूर्ती असते. उदा. रामा समोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, देवी समोर सिंह, महादेवासमोर नंदी वगैरे.

अषीच चर्चा चालली असता, असे जाणवले की या व्यतिरिक्त देवळाच्या गाभार्‍यात पितळेचे अथवा संगमरवरी दगडाचे कासव असते. प्रश्न पडला की कासवाचे प्रयोजन काय? ते काही कुठल्या देवाचे वाहन नाही. शिवाय सर्व प्रकारच्या देवळांतून कासव असतेच.

कोणी म्हणाले, अमृतमंथनासाठी कासवाने टेकूचे काम केले म्हणून त्याला इथे स्थान दिले गेले. कोणी म्हणाले, तो अत्यंत गरीब प्राणी आहे म्हणून. अजिबात काही पटेना. मग काही अर्थ लावता येईना. कारण जे कारण देले जाईल ते पटले पाहिजे ना! मग एकाच्या डोक्यात आले, तिथे एक आजोबा बसले होते त्यांना विचारू यात. त्यांनी सांगितले -

सर्व प्राणी आपल्या पिल्लांची काळजी घेतात, ती लहान असतात तेव्हा त्यांना हालचाल करता येत नाही. शिवाय त्यांना प्रेमाने वाढवावे लागते. संकटकाळी पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यांना माया द्यावी लागते. माणूस काय करतो, बाळाला जवळा घेतो. कोंबडी पिलांना पंखाखाली घेते. बाळ बिलगून बसते आणि प्रेमाने वाढते. कासवाच्या बाबतीत मात्र तसे काहीही घडत नाही, कासव पिल्लांना कशी माया देते माहित आहे, ते पिल्लांकडे फक्त पाहते, आणि पिल्लांची मायेने वाढ होते. कासवाला पिल्लांना जवळ घ्यावे लागत नाही.  म्हणून जे कासव देवळाच्या गाभार्‍यात असते. त्याला तुम्ही हात नाही लावला तरी, ते तुमच्याकडे पाहिल्यावर, देवाची माया तुम्हाला मिळते. बघा त्याच्या नजरेत एवढी शक्ती आहे.

खरोखर देवाची कमाल आहे, काय त्याने जग बनवलंय. मांजर पिलांच गळा दातात पकडून उचलते, पण पिलांना दात लागत नाही. मगर तोंडात पिले भरते, आणि हलवते, पण पिले गुदमरत नाहीत. अजब आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे कमिशनर म्हणाले, मुंबई काय कोणाच्या बापाची नाही. असं बोलायचं काही काम होतं का? पण नाही एवढ्या मोठ्या जागेवरून अशी खळबळजनक विधाने करायची नसतात, हे त्यांना कोणी सांगावं. म्हणजे महाराष्ट्रात, मुंबईत बसून असं विधान म्हणजे आहे की नाही गंमत. पेटले रान. बोलणारे बाजूला झाले, बाकीच्यांच्यात जुंपली. दसर्‍याला उद्धव ठाकरेंचे, अफाट जनसमुदायासमोर भाषण झाले, ते म्हणाले होय मुंबई आमच्या बापाचीच आहे. आज नारायण राणे काय म्हणतात ते पाहू या

http://www.esakal.com/esakal/10112008/Maharashtra94D466BB90.htm

मुंबई "यांच्या' बापाची कशी? - नारायण राणे
मुंबई, ता. १० - "उद्धव ठाकरे म्हणतात, मुंबई आमच्या बापाची आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारले, तर कळले सातबाराच्या उताऱ्यावर त्यांची कुठे नोंद नाही, मग मुंबई यांच्या बापाची कशी?'
अशा शब्दांत महसूल मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. शिवसेना आता बाळासाहेब चालवित नाहीत; तर दुसरेच कोणी तरी चालविते, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

किती बालीशपणा. मुंबईचे नाव सातबारा उतार्‍यावर असायला ती काय खाजगी मालमत्ता आहे काय? जेव्हा ’ भारत माझा देश आहे’ असे आपण म्हणतो, तेव्हा भारताचा सातबारा उतारा शोधायची गरज नाही. ठाकरे म्हणाले, याचा गर्भितार्थ असा की, महाराष्ट्रात जन्म घेतलेल्यांची मुंबई आहे.

जर आपल्या घरात चोर घुसला तर त्याला पेकाटात लाथ मारून हाकलून देतात, त्याला सातबारा उतारा दाखवत नाहीत. शनिवार वाडा, ताजमहाल, कुतुबमिनार, सर्व गड किल्ले, संसद अशा सर्वाचे सातबारा उतारे तयार करावे लागतील.

होय मुंबई आमच्या बापाचीच आहे, संयुक्त मुंबईचा लढा देतानाचा इतिहास मागे जाऊन पहावा.

  • संयुक्त महाराष्ट्राबद्दल CIIL येथील लेख
  • महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळातील संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयीची माहिती
  • ही संकेतस्थळे पहा, आणि ही पहा नावे हुताम्यांची

    हुतात्म्यांची नावे

    २१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे[१] १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

    मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

    जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

    एवढ्या आमच्या महाराष्ट्रीयांनी हौताम्य पत्करल्यावर आम्ही ठासून म्हणणारच "होय मुंबई आमच्या बापाचीच आहे" 

    भारत माझ्या बापाचा आहे, कारण स्वातंत्र्यलढ्याला नंदुरबारच्या शिरीषकुमार पासून जालीयनवालाबाग पर्यंतचा इतिहास आहे. हे आमचे दुर्दैव की आम्ही त्यावेळेस जन्मलेलो  नव्हतो, नाहीतर कोणी सांगावं आम्हीही शहीद झालो असतो.

    आपापसातले तार्किक वाद बाजूला ठेऊन सर्व राजकारण्यांनी आपल्या जन्मभूमी, मातृभूमीसा साठी हातात हात घालून सामना द्यायला पाहिजे.

    कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.

    1. भारतीय समाज आणि संस्कॄती वैवाहिक नात्यांवर अवलंबुन आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध समाजाला मान्य करावे लागतील. यावरुन आपले कायदे चांगल्या-वाईटाचा विचार न करता फक्त निवडणुकीतील मतांसाठी केले जातात हे लक्षात येत आहे. असे कायदे देशाच्या मुळावर आघात करत आहेत.
    2. सरकारने "पत्नी" या शब्दाची व्याख्या बदलली आणि सगळ्या विवाहबाह्य संबंधांना कायदेशीर करुन टाकले आहे. कोणतिही स्त्री आता विवाह बंधनात न अडकता पत्नीचे फायदे मिळवु शकते. स्त्री-पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण त्या नात्याला विवाहाचा दर्जा देणे हे अतिशय चूक आहे.
    3. सरकारने हा कायदा करताना सर्व द्वि-भार्या कयद्याचाही विचार करु नये हे अगदी चुकिचे आहे. आता जर कोणी विवहित पुरुष अन्य स्त्री बरोबर राहत असेल तर तो द्वि-भार्या कायद्यात अडकेल का?
    4. पण या कायद्याने सर्वात जास्त अडकला तो पुरुष, असे संबंध जर स्त्री-पुरुषाच्या परस्पर संमतीने घडत असतील तर फक्त स्त्री पोटगीला लायक कशी. आपल्या मुर्ख सरकारला "पती" या शब्दाची व्याख्या का बदलाविशी वाटत नाही? जर स्त्री आणि पुरुष कायद्यासमोर समान असतील तर त्यांना यात भेदभाव का? पुरुषाला पण पोटगीचा अधिकार का नसावा? सरकारच्या अशा व्यवहारामुळे, आपण अजुनही मानतो की स्त्री पुरूषापेक्षा जास्त कमत नाही.
    5. असे विवाहबाह्य संबंधाचे लोण "सुशिक्षीत-असंस्कॄत" उच्च-मध्यम वर्गीयांचे देणे आहे. विवाहबाह्य संबंधाचे खुळ भारतात पाश्चात्य प्रभावाने सुरु झाले आहे. जगातील व्यक्तीगत स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणा‍‍‍‍‍र्‍या अमेरिकेतही विवाहबाह्य संबंधानी पोटगी मिळत नाही. असे संबंध जगभरात तात्पुरते मानले जातात, ज्यामुळे स्त्री-पुरुषाला एकमेकांना समजण्याची संधी मिळते, आणि त्याचे रुपांतर विवाह व्हावे अशी सर्व सामान्य अपेक्षा असते.

    असे कायदे करणारे भारतात असतील तर भारतीय संस्कॄतीची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यात महत्वाचा वाटा "सेवानिवृत्त न्या. मल्लीमथ, एस. वर्धाचार्य, आयएएस अमिताभ गुप्ता, आयपीएस डॉ. माधव मेनन, पी. व्ही. सुब्बाराव आणि महाराष्ट्र सरकार" या मुर्खांचा नक्की असेल.

    http://www.esakal.com/esakal/10092008/Specialnews20416194EE.htm

    आमच्यावर कायद्याचा उलटा आसूड का उगारला जातो आहे?

    मी एक सामान्य स्त्री. समाजातल्या कोणत्याही सामान्य, मध्यमवर्गीय घरात आढळणारी. माझं घर, संसार, शिक्षण इतर कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणेच. परवा मी आयुष्याच्या वेगळ्या वळणावर येऊन उभी राहिले. एका अनपेक्षित, दुर्दैवी घटनेने माझं घर हादरलं. आमचा नीतिमूल्यांवरचा विश्‍वास उडाला. आमच्या घरातल्या अलीकडेच कामाला लागलेल्या मुलीने समोर आलेल्या वडिलांच्या- पोलिसांच्या भीतीने थेट आत्महत्या केली... वरच्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे ती निधन पावली. आम्ही सारे जण नखशिखांत हादरलो. गांगरून गेलो... काय करावं हे कळेना. थोड्याच वेळात पुढचे सोपस्कार सुरू झाले. पोलिस, वकील, हितचिंतक जमा झाले

    दैनिक सकाळ मधील अगतिकता. असे अनुभव अनेकांना येतात, पण कोणी पुढे येत नाही. कारण आजूबाजूची मंडळी खरे खोटे न पाहता, इतक्या दिवसांचा सहवास विसरून, यांनीच काहीतरी केले नसेल ना? अशा अविश्वासाच्या नजरेने पाहतात. आता हे कुटुंब अडकले, पैसापरी पैसा जाईल, शिवाय मानहानी वेगळी. यांना खूपच आर्थिक व्यवहार करावे लागतील. वकील मंडळी तर ताणून धरतात, म्हणतात काही काळजी करू नका मी आहे ना? जुळवून घ्यायच्या ऐवजी लावून देतात. खरं तर पोलीसांना कळत असते, पण ते तरी काय करणार, तक्रार आल्यावर. आता कोर्ट बाजी आली, पैसा आला. ह्या कुटंबाचे दुर्दैव बाकी काय?

    माणसानं मध्यमवर्गीय नसावं. कोणीही उठतं आणि पेकाटात लाथ घालतं.मग आपण कुत्र्यासारखं केकाटत बसायचं. सरकारचे कर भरायचे, भिऊन रहायचे. झोपडपट्टीत  राहणारा सुखी. राजकारणी सुखी. मी तर म्हणतो भिकारी अत्यंत सुखी, त्याचा शर्ट मागून घ्यावा.

    हा लेख वाचा, आणि जर कोणाजवळ उपाय असेल तर सुचवा.

    गेला अखेर ’सिंगूर’ बंगाल मधून टाटाचा ’नॅनो’ मोटारीचा प्रकल्प राज्याबाहेर गेला. राज्यकर्त्यांना यातून काय मिळाले. तरूणांनी किती मोठमोठी स्वप्ने पाहिली असतील. कित्येकांनी सुटे भाग पुरविण्यासाठी  कर्ज काढून कारखानदारी करण्याचे ठरवले असेल, त्यांचे पुढे काय? त्या कर्जाचे काय करायचे. याचा विचार राजकारण्यांनी केला आहे काय? आता देश परदेशातील उद्योग बंगालचा विचार का करतील? जे परदेशी गुंतवणुकदार असतील ते भारताताचा हजार वेळा विचार करतील.  कित्येकांची फसवणूक झालेली आहे, कामगारांची, छोट्या कारखानदारांची, शेतकर्‍यांची, पुरवठादारांची. याला जबाबदार कोण. नाहितरी टाटाचेही नुकसान झालेच असेल ना? बाकीची राज्ये त्यांना आमंत्रण देताहेत, मग बंगाल सरकारला कळू नये काय? नुकसान सहन करण्याची ताकद टाटात आहे, पण त्यांच्याशी संलग्न घटकात नाही. कंपनीला जेव्हा नुकसान होते तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागले तरी ते भविष्यात पण सामान्य माणसाला भोग लगेचच भोगावे लागतात, शिवाय मोठ्या कंपन्यांच्या मागे मोठ्या बॅंका उभारतात, सामान्य माणसाला नातेवाईक सुद्धा लांब करतात.राजकारणावर अर्थकारण अवलंबून असते, आणि त्यावरच विकास अवलंबून असतो. विरोध करणार्‍या राजकारण्यांचं काय गेलं? ते परत दुसरा मुद्दा घेऊन आंदोलन करायला मोकळे.

    ज्यांच्या  घरात चूल पेटणार होती, त्यांच्या घरात अंधार. जिथे कारखाने लोकांची पोटे भरणार होती, तिथे नुसत्या भिंती उभ्या असतील. कल्पना करवत नाही, त्यावर अवलंबून असणार्‍या लोकांचे काय हाल असतील. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी ज्या चालून आल्या होत्या, त्या या राजकारण्यांनी हिरावून घेतल्या. विकासाला खीळ बसली. खरं आहे हे उद्योग सरकारकडून अल्प किमतीत जागा घेतात, कर सवलत घेतात, नफा कमावतात, पण लोकांची पोटे भरली जातात ना.

    आता बाकीच्या राज्यांनी विचार करायची वेळ आलेली आहे, जे उद्योग सध्या चालू आहेत त्याना टिकवून धरावे, नाहीतर?  

    आम्हांला हे कळत नाही की, भारतात जे काही चाललंय ते जगापासून लपून रहात नाही, आपल्या वृत्तवाहिन्या हे काम चोख बजावतात. हे सर्व असे असेल तर परदेशी कंपन्या ज्या आता भारतात गुंतवणूक करून धंदा करताहेत त्यांनी वेगळा विचार करू नये.

    भारतात एक कायदा पास झाला, सुप्रीम कोर्टाने, शिक्कामोर्तब केले, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट प्यायला बंदी. भारतात जनता पान तंबाखू खाऊन पचापचा थुंकते, रस्ते लालीलाल करते, बसमध्ये बसून लोकांचे कपडे रंगपंचमीसारखे रंगवते त्यांना काही कायदा नाही. सिगारेट शौकिन सिगारेट ओढताना धूर काढतात, तो हवेत विरून जातो, पण या रंगार्‍यांचे काय? दारूच्य दुकानात बिअरची कॅन विद्यार्थी पीत उभारतात, त्यांच्या कडे कुणाचेही लक्ष नाही. आणि बिचारे सिगारेटवाले बरे सापडले.

    गुटखा तर राजमान्यच झालेला आहे, त्याचे दुष्परिणाम तरूण पिढी भोगती आहे. तरूण पिढी तर सिगारेटला हात लावत नाही, हे फार हलके व्यसन झाले, त्यांना पाहिजे गुटखा, दारू ( अजून भरपूर काही).

    भारतात कोर्ट कोणत्या कामात लक्ष घालेल, पत्ता नाही. एवढे खटले प्रलंबीत आहेत, एवढे साधे कैदी तुरूंगात सडताहेत, त्याचे काही नाही, कोणताही विषय घ्यायचा, ( जनहितार्थ याचिका दाखल करायला काय लागतंय) आणि त्यावर गुर्‍हाळ लावायचे. खरं तर आता जनहितार्थ याचिका दाखल करण्याची रूपरेखा ठरवण्याची वेळ आलेली आहे.अरे एवढी लोकसंख्या भराभर वाढती आहे, होऊ द्या की कमी.

    बंदीच आणायची तर, सायबर कॅफे मध्ये विद्यार्थी नको त्या साईट बघतात त्यावर आणा.

    काल धुळ्यात हिंसाचार झाला, बातमी आहे. त्यात शब्द असतात,’विशिष्ट जमात’ आणि हे सर्व बातमीदार स्वतः अनुभवलेले क्षण लिहीतो. असा उल्लेख करण्यापेक्षा सरळ सरळ लिहाना, कोणती विशिष्ट जमात होती ते. बातम्या फारच मजेदार असतात. एखाद्या भागात दंगल झाली तर लिहीतील, त्या भागातील निवडून आलेला राजकीय पुढारी, हे उघड सत्य असताना, शब्दांचे खेळ कशासाठी? पुण्यात तुकाराम महाराजांचे देऊळ, जिथे पालखी वर्षानुवर्षे थांबत असे, ते हलवले गेले, पण काही विशीष्ट, समाजाची प्रार्थनास्थळे, भर रस्ता अडवून उभी आहेत, त्यांचे काय? आडून आडून लिहीण्यापेक्षा सरळ नावालाच हात घालावाना.

    B.R.T. चा एवढा खेळ खंडोबा चाललेला असताना वर्तमानपत्राचे अग्रलेख झोपलेत काय? त्यांच्या तलवारीची धार बोथट झाली काय? खरे तर पत्रकारांनी निर्भिडपणे आपली मते मांडावीत.

    Newer Posts Older Posts Home

    Popular Posts

    • आत्मा
      आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
    • १२ जुलै १९६१
      १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
    • कन्यादान
      नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
    • The Fame of the Clock
      Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
    • वास्तुपुरुष
      मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
    • अवतार
      विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
    • अतिथी देवो भव
      पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
    • पाणी वाचवा
      पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
    • जात
      भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात ...
    • दहावीचा अभ्यास कसा करावा - १
      दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...

    Labels

    मी मराठी अनमोल विचार भारत TV

    Blog Archive

    • ►  2016 (1)
      • ►  February (1)
    • ►  2015 (2)
      • ►  July (1)
      • ►  January (1)
    • ►  2014 (2)
      • ►  January (2)
    • ►  2013 (1)
      • ►  October (1)
    • ►  2012 (22)
      • ►  November (4)
      • ►  July (1)
      • ►  June (1)
      • ►  February (2)
      • ►  January (14)
    • ►  2011 (15)
      • ►  December (2)
      • ►  November (5)
      • ►  October (8)
    • ►  2010 (64)
      • ►  July (1)
      • ►  June (6)
      • ►  May (6)
      • ►  April (8)
      • ►  March (5)
      • ►  February (13)
      • ►  January (25)
    • ►  2009 (66)
      • ►  October (13)
      • ►  September (4)
      • ►  August (3)
      • ►  July (1)
      • ►  May (3)
      • ►  April (10)
      • ►  February (16)
      • ►  January (16)
    • ▼  2008 (63)
      • ►  November (1)
      • ▼  October (12)
        • चांद्रयान १
        • पोलीस मित्र
        • विवाह संस्था
        • मेंढी
        • कोजागिरी
        • कासवाची माया
        • मुंबई आमचीच
        • मुर्ख सरकार, विवाहबाह्य संबंध आणि पुरुषांवर अन्याय
        • अगतिकता
        • सिंगूरचा धडा
        • सिगारेट बंदी
        • विशिष्ट समाज
      • ►  September (2)
      • ►  August (16)
      • ►  July (11)
      • ►  June (13)
      • ►  March (2)
      • ►  February (2)
      • ►  January (4)
    • ►  2007 (52)
      • ►  December (4)
      • ►  September (1)
      • ►  August (6)
      • ►  July (22)
      • ►  June (12)
      • ►  May (5)
      • ►  April (1)
      • ►  March (1)
    • ►  2006 (30)
      • ►  December (2)
      • ►  November (2)
      • ►  October (10)
      • ►  September (4)
      • ►  August (5)
      • ►  July (1)
      • ►  June (6)

    Popular Posts

    • पाणी वाचवा
      पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
    • The Fame of the Clock
      Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
    • कन्यादान
      नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
    • अवतार
      विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
    • मकर संक्रांत
      आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

    Follow us at FB

    Tweets by @tlf_org
    Copyright © 2015 मी मराठी माणूस

    Created By ThemeXpose