मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

हजारो वर्षांपूर्वी हे जग निर्माण झाले. पूर्वी माणूस अगदी रानटी होता. कोणतेही शोध लागलेले नव्हते. कपडे नाहीत, अन्न शिजवणे माहित नव्हते. युगे बदलली, रामायण महाभारत होऊन गेले. असं म्हणतात की, त्याकाळी प्रगत समाज होता. पण आदिमानवाचा काळ काय?

मानव प्रगती करू लागला, निरनिराळे शोध लागले, जगण्याची प्रवृत्ती तयार होऊ लागली. मानव मग जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी जमावाने राहू लागला. मग समाज निर्माण झाला, त्याचे कायदे कानून तयार झाले. मानवाला शोधांपासून जगण्याची आशा वाढली. तत्वज्ञान सांगणारी मंडळी उदयास आली. कारण जसे सुख वाढू लागले तसे दुःखही टोचू लागले.

याच उद्वेगातून सर्वसंगपरित्याग करणार्‍या संतमहात्म्यांनी जन्म घेतला. हे संत ऐहिक, भौतिक सुखाचा त्याग करू लागले. त्यांनी वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी, चैनी, अन्न, हास्य, काव्य शास्त्र विनोद सर्वांचा त्याग केला.  मग यांनाच वेगवेगळ्या नावाने संबोधले जाऊ लागले. ऋषी, साधू, संन्यासी, यती वगैरे.

आणि या सांप्रत काळात, असा त्याग करणार्‍या माणसाला आय टी प्रोफेशनल म्हटलं जाऊ लागलं.

आम्ही काल लिहील्याप्रमाणे शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला द्यावा तर आमच्या मते, ज्यांनी शांतता प्रस्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले त्यांना किंबहुना ते सतत त्याच ध्यासात असतात, अशा भारतीयांनाच मिळावा.

मुंबईत जिहादी हल्ल्यात दोनशेहून जास्त माणसे मारली गेली, पाकिस्तानविरुद्ध सज्जड पुरावा मिळून सुद्धा आपले पंतप्रधान मनमोहन सिंग फक्त खलिते पाठवतात, ते शांती राखायचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यांनाच पुरस्कार द्यावा.कारगीलच्या घुसखोरीनंतर वाजपेयी पाकच्या हुकुमशहा मुशर्रफ बरोबर आग्रा येथील शिखर परिषदेसाठी बोलावून चर्चा करतात, त्यांची बडदास्त ठेवतात, पण कारगीलचा मुद्दा सौम्यपणे हाताळण्याचे कसब दाखवतात, ते शांतीदूत नव्हेत काय? त्यांनाच पुरस्कार मिळाला पाहिजे.

भारतीय नेते शांततेची जपमाळ ओढत, जप करीत असतात. भारतातील नागरिक पाकिस्तानी जिहाद, हिंसाचार व स्वकीयांचे हत्याकांड हतबलपणे सोसतात, चकार शब्द काढत नाहीत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा स्वप्नातही काढत नाहीत. अमेरिकेने इराक मध्ये जेवढी माणसे मारली नसतील, त्यापेक्षा जास्त माणसे पाकच्या दहशतवादी हल्ल्यात भारतात मारली गेलीत, तरीसुद्धा जगातल्या कुठल्याही नेत्याने शांततेसाठी स्वकीयांचे इतके ह्त्याकांड सोसून समजूतदारपणा दाखवून,भारतीय नेते पाकिस्तानला न दुखावण्याचा प्रयत्न करताहेत आणि शांततेसाठी ब्लीदान करताहेत, त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, तेच भारतीय नेते खरे नोबेल पुरस्काराचे हकदार आहेत. यांचा विचार झालाच पाहिजे नाहीतर हा पुरस्कारच बंद करून टाकला पाहिजे.

अतिरेकीच खरे या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे  मानकरी आहेत कारण ते माणसांना मारून कायमची शांतता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहेत.

पुढील वर्षी भारतीयांच्या नावांचा जरूर विचार व्हावा, यासाठी शांततेच्या मार्गाने उठाव करावा, असे आम्हांला वाटते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला, याबद्दल भारतातील पत्रकार वर्तुळात सुद्धा कमालीचे आश्चर्य पसरले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच पुरस्कार दिला गेला, असे त्यांनी काय शांततेचे कार्य केले हे एक देवच जाणो. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानात, अमेरिकन सैनिक पाठवून, त्यांना आधुनिक शस्त्रसामुग्री पाठवणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे काय शांतीदूत बनू शकतात. अमेरिकेचे धोरण आहे, जगाला माण्डलिक बनवण्याचे, अशांना नोबेल पुरस्कार?

समितीपुढे दोन नावे होती, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलाय सारकोझी आणि ओबामा. त्यात निकोलाय यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तेव्हा त्यांच्या नावाचा विचार व्हायला पाहिजे होता. ओबामांने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कोणते बहुमोल योगदान दिले आहे, हा संशोधनाचाच विषय असेल. दीर्घकाळ जागतिक राजकारणात कार्यरत असणार्‍या व्यक्तींचा विचार का केला गेला नाही? रशियाचे पुतीन, भारताचे मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, श्रीमती सोनिया गांधी, अमेरिकेचे जॉर्ज बुश, ब्रिटनचे टोनी ब्लेयर ही नावे समितीला माहीत नव्हती काय?

गेल्या वर्षी महंमद अल बारदेई यांना शांततेचं नोबल मिळाले होते. तेव्हा तर या पुरस्काराची थट्टाच झाली होती. पाकिस्तान इराण, कोरीयाला अणु तंत्रज्ञान स्मगल करते, त्यावर बारदेई नियंत्रण ठेउ शकले नाहीत. इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून ते रोखू शकले नाहीत. मग त्यांनी शांततेसाठी काय केले म्हणून त्यांना हा पुरस्कार? कोफी अन्नान यांना शांततेचा पुरस्कार देण्यात आला, त्याचे काय कर्तृत्व? जेव्हा सद्दाम हुसेन यांनी तेलविक्रीत मोठा घोटाळा केला, जगात त्याची निंदा झाली, त्या घोटाळ्यात कोफी अन्नान यांचा मुलगा होता. त्याच्या चौकशी अयोगाचा निकाल अजूनही आलेला नाही. अन्नान यांच्या काळात आफ्रिकेत हजारो लोक उपासमारीने, युद्धात मारले गेले, महिला लैंगिक वासनेला बळी पडल्या हे अन्नान यांना रोखता आले नाही, अशा माणसाला पुरस्कार? समितीचे डोके ठिकाणावर आहे काय? यात काहीतरी काळाबाजार आहे असे वाटते. बलाढ्य अमेरिकेसमोर समिती झुकली. आठवते? एक अतिशय हलक्या पातळीवरचा पुरस्कार! - इराणच्या सामान्य लेखिकेला दिलेला पुरस्कार ती लेखिका - शिरीन इबादी. काय असेल हिचे शांतता कार्य?

बहुतेक हा पुरस्कार गुणवत्तेच्या कसोटीपेक्षा, जागतीक राजकाराणातील वजन आणि दादागिरीवर देण्यात येत असावा.

सर्व जगतातील सर्व थरातून म. गांधींचे नाव त्यांच्या अहिसा लढ्या संदर्भात घेतले जाते, लोकांच्या माना झुकतात. त्यांनी जी शांती अपेक्षिली होत, तो विचार तर आज पर्यंत कोणालाही शिवला नाही, त्यांना मात्र शांततेचा पुरस्कार नाही. आहे की नाही विनोद. 
भारतीयच शांततेच्या पुरस्काराला कसे पात्र आहेत, याची चर्चा उद्या.

महाराष्ट्रात निवडणुका आल्या आणि उमेदवारांची एकच गर्दी.त्यांची जाहीरनामा, वचननामा वाचला तर ही मंडळी महाराष्ट्र, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी भाषा, यासाठी काही करतील, असंभव. आमदार जेव्हा दाराशी  येतो तेव्हा  साधाभोळा असतो, पणा तोच जेव्हा पाच वर्षांनी  पुन्हा मत मागायला येतो तेव्हा कपाळाला भला मोठा भगवा टिळा असतो. हातात, गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या, चेहर्‍यावर  एक प्रकारची गुर्मी असते. हेच लोक वाड्या वस्त्या काबीज करून, दंडेलशाहीने भाड्याची घरे, जुने वाडे मोकळे करून घेतात, तेथील लोकांना देशोधडीला लावतात, कोणाकडे तक्रार करायची, सगळेजण मिळून वाटून खातात. महाराष्ट्रात आज घराणेशाही उदयाला आलेली आहे, त्याबद्दल आम्ही मागे ब्लॉगमध्ये लिहीले आहे.

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे अनुभवी नेते, पण त्यांनी सुद्धा वाली वारसांची सोय करून ठेवली. त्यांना काय आपल्या कार्यकर्त्यांमधून उमेदवार मिळू शकत नाहीत? सर्व जण का राजकारणात पडतात, कारण पुढील सात पिढ्यांची सोय करून ठेवता येते. हजारो लाखो तरूण आयुष्यभर घसा सुकेपर्यंत जयजयकार करीत होते, सतरंज्या उचलत होते, तेच आता म्हातारपणाला आलेत, नेते मंडळी फक्त त्यांना भत्ता आणिया राजकारण्यांनी भारतातील लोकशाहीचं जागतीक विडंबन केले आहे.

आम्ही स्वतःला मर्द मराठे म्हणवतो, कय तर म्हणे आम्ही पेटत नाही, पण जर का एकदा आम्ही पेटून उठलो तर देनियेला आग लावू, अरे पण बाबांने तुम्ही कधी पेटणार, कधीच नाही. मागील पन्नास वर्षे बेळगाव प्रश्न वाकुल्या दाखवतो आहे. लोकांनो, कार्यकर्त्यांने का तुमचं रक्त तापत नाही? या पुढार्‍यांच्या पालखीला खांदा लावताना जराही स्वाभिमान दुखावत नाही?

अण्णा हजारेंनी माहिती अधिकाराचा कायदा लोकांप्र्यंत आणून खूप काही केले, पण त्यांना सुद्धा प्रसिद्धीची नशा चढली, आता त्यांच्या कडून काय अपेक्षा कराव्यात? त्यांना आता काय काम राहिलेय? बस‍ खटले भरायचे, उपोषण करायचे  आणि आश्वसन मिळाले की लिंबू पाणी. झाले अण्णा मोकळे पुन्हा पुढील उपोषणाची जागा आणि निमीत्त शोधायला. अण्णा तुम्ही लिंबू सरबत बदनाम करून टाकलत.

चीड येते काय करणार? पंधरा कोटी जनतेतून त्यांना आपल्या मुलांशिवाय अन्य  उमेदवार मिळत नाही? राजकारणाचं गन्हेगारीकरण झालं, अशांना तिकीटं मिळतात ते काय राज्य करणार? आम्ही उमेदवारांना नावे ठेवतो आणि नोकरीसाठी शिफारसपत्र पाहिजे म्हणून लाळघोटेपणा करतो. गणपती उत्सव त्यांच्याच काळ्या पैशातून होतो ते आम्हाला चालते, दहीहंडी, नवरात्रात जेव्हा ते मिरवतात तेव्हा आपण कौतुकाने त्यआंच्याकडे पाहतो, मुलांना हात करून  दाखवतो.

हे राज्य आता भटके जमात, स्त्रिया, तरूण, कामगार, कष्टकरी, जाणते याचं आलं पाहिजे. नकोत ते आम्हाला म्हातारे, वय झालेले, पुन्हापुन्हा तेचतेच चेहरे बघायचा कंटाळा आलाय, ते चेहरे आता भेसूर वाटू लागलेत.

संभवामी युगे युगे, असे श्रीकृष्ण सांगून गेले, पण त्यांनी जरी जन्म घेतला तरी काहीही उपयोग होणार नाही, त्यापेक्षा सर्व पुतळ्यांनी जिवंत व्हावे आणि यांच्या पेकाटात लाथा घालाव्यात.

तेव्हा मतदारांनो मतपेटीच्या माध्यमातून या भुतांना गाडून टाका, दाखवा आपल्या एका मताचा चमत्कार.

दिवाळी आली, आनंदाचा सण, पण या महागाईच्या दिचसात आनंद कुठे आहे. भारतात जगणं मुष्कील झालंय. आता हे दिवस सणासुदीचे आहेत तसेच निवडणुकीचे, उमेदवारांच्या दिवाळीचे आहेत. या काळात अनेक, प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करीत आहेत, पण ते सोईस्कररित्या आपला मागील निवडणुकीतला जाहीरनामा, आश्वासने विसरली आहेत. कोणीतरी मागील जाहीरनामा सभेत मांडून आपण काय पुर्तता केली आहे ते सांगतो काय? प्रत्येक जण सामान्य जनतेला खुष करण्यासाठी चढाओढ करीत आहे. पण सर्व पोकळ आहे. माणसाला रोजची भ्रांत पडली आहे.

अन्नधान्य, वीज, भाजीपाला, शिक्षण, पेट्रोल, घर, कपडे या सर्व आवश्यक गोष्टी आहेत पण यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्या मानाने प्राप्ती काही  नाही. वीजेची बाब तर काही औरच, त्या दरवाढीला कोणी चाबूक लाऊ शकत नाही. आणि त्याला पर्याय नाही. काही दिवसापूर्वी टेलीफोन खात्याची मनमानी होती, त्यांना माज होता, पण मोबाईल फोन आला आणि त्यांची मस्ती उतरली. तसेच प्रायव्हेट ब्यॅंका आल्या आणि बाकीच्या ब्यॅंकांना आपली पायरी कळाली. काही वर्षांपूर्वी कर्ज मागायला गेले तर कर्जदाराला चोरच समजत होते आणि भिकार्‍याची वागणूक देत आणि आता कर्ज पाहिजे असे नुसते म्हणाले तरी, अगदी स्वप्नात सुद्धा, तरी ब्यॅंकवाले हात धुऊन मागे लागतात, पाया पडत्तात, कसेही करून कर्ज घ्या म्हणून. असो.

अन्नधान्न्याच्या किमती तर काळजाचा ठोका चुकवतात. तुरडाळ, साखर, चहा, तेल या रोज लागणार्‍या वस्तू पण तोलून मापून वापराव्या लागतात. फक्त तोच माणूस श्रीमंत ज्याच्या घरातील डबे या वस्तूंनी भरलेले असतील. कांदा त्याच्या गुणाने आणि भावाने, दोन्ही प्रकारे डोळ्यात पाणी आणतो. दूध रोजच लागते, काळा चहा पिऊ शकत नाही, मग चढ्या भावाने घ्यावेच लागते.

तिकडे शेतकर्‍याची दुःखे वेगळीच. खतांचा बियाण्यांचा भरोसा नाही. भेसळीची असतील तरी लगेच लक्षात येत नाही, दोन चार महिनांनंतर कळ्ते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यात परत पावसाचा प्रॉब्लेम. काय करावं? आता तर परतीच्या मान्सूनने वैताग आणलाय, सर्वत्र पूर आलेत.

यात स्वाईन फ्लूने आपला जोर दाखवून घेतला. अगदी आला आणि मानगुटीवरच बसला. दंगली तर पाचवीलाच पुजल्या आहेत. संप करणारे कशाचाच विचार करत नाहीत, फक्त आपला स्वार्थ बघतात.

रोज पेपर मध्ये काय तर सर्व उमेदवार एकमेकांवर चिखलफेक करताहेत. त्यांना कुठे वेळ आहे, मतदारला काय पाहिजे याचा विचार करायला.

या सर्वांचा विचार केल्यास मनात येते, का मतदान करावं?

होय, तुम्ही फक्त मत द्या आणि विसरुज जा. लोकशाही, आपला उमेदवार, आमदार, त्याचा पक्ष, त्याचा जाहीरनामा, त्याची निशाणी, यातले काही लक्षात ठेवायची गरज नाही. पाच वर्षात एकदा तुम्हाला मताचा अधिकार आहे. द्यायचे असेल मत तर द्या, नाहीतर नका देऊ. जेवढे कोणी मते देतील त्यावर तुमचा आमदार निवडून येणार आहेच. तुम्हाला तो आवडो किंवा नावडो, पुढली पाच वर्षे तो तुमच्या वतीने बोलणार आहे. ही आहे लोकशाही आणि त्यासाठी तुम्ही आपल्याला मतदान करावे ही प्रत्येक पक्षाची, उमेदवाराची, अपक्षाची इच्छा आहे. मग बदल्यात तुम्हाला काय मिळणार ? हा प्रश्न मूर्खपणाचा म्हणायला हवा. काहीही मिळेल. नुसते मागून तर बघा. फुकट घर, स्वस्तात धान्य, मोफत वीज, फुकट शिक्षण, बुडवलेल्या कर्जाची माफी, घरात मोफत रंगीत टीव्ही, रस्त्यावर भूक लागली तर वडापाव किंवा फराळ. नुसते मागायची खोटी आहे. प्रत्येक पक्ष अल्लादिनच्या दिव्यामधला राक्षस झाला आहे. आपण सगळे कर्मदरिद्रीए म्हणून काही मागायचा आळस करत आहोत. शेवटी बिचार्‍या त्या दिव्यातल्या राक्षसांनाच आपले डोके चालवून जाहीरनामे काढणे भाग पडते. सामान्य माणसाला काय हवे त्याचा शोध घ्यावा लागतो, त्याची यादी बनवावी लागते. त्याचे बाजारभाव शोधून स्वस्तात वा फुकट अशी वर्गवारी करावी लागते. अल्लादिनला फक्त त्या जुनाट जादूच्या दिव्यावर बोटातली अंगठी घासावी लागायची. आपल्याला फक्त एक दिवस मतदान केंद्रात जाऊन बोटावर काळ्या शाईचा डाग लावून घ्यायचा आहे तेवढाच. बाकीचे काम उमेदवार नावाचा दिव्यातल राक्षस पार पाडणार आहे. जेवढ्या काही समस्या आहेत ना तेवढ्यांचे समर्पक उत्तर व उपाय त्याच्याकडे सज्ज आहेत. आपण बोटाला शाईचा डाग लावून घेण्याने त्याचे काम अडले आहे तेव्हा तुम्ही फक्त मत द्या इतकेच. अल्लादिन तसा कमनशिबी, त्याच्याकडे त्या दिव्यातला एकच राक्षस असायचा. आपण साधी अंगठी घासली नाही तरी अर्धा डझनहून अधिक राक्षस हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तूरडाळीच्या किमती आभाळाला जाऊन भिडल्या म्हणून आपण रडत बसलेलो आहोत. एक मत देऊन या. बघा, आभाळातून तूरडाळींचा पाऊस पडू लागेल. काय समजता तुम्ही ? पावसाने दगा दिला असेल, आपले नेते दगाबाज नाहीत. ते एक रुपयात किलोभर तूरडाळ विकणारी दुकाने काढतील आणि तुमच्याकडे रुपया नसेल तर स्वस्त व्याजदराने तूरडाळ खरेदी करण्यासाठी बँकांनी कर्ज द्यावे, असाही आदेश काढतील. घाबरु नका कर्ज फेडायला. तूरडाळ खरेदी करा, त्यासाठी कर्ज काढा आणी सर्व विसरुन जा. कारण आपल्यात अजून काही अब्रुदार आहेत. ते तूरडाळीसाठी काढलेले कर्ज फेडता आले नाही मग आत्महत्या करतील. त्यामुळे तूरडाळ आत्महत्येचा नवा विषय तयार होईल आणि तूरडाळीसाठी काढलेले कर्ज माफ करायला सरकार हजारो कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करील. तुम्ही सन्मानाने जगायला मोकळे. कर्ज काढावे, कर्ज बुडवावे यासारखा सन्मान जगात कुठे मिळणार आहे ? नकारात्मक विचार करणे सोडून द्या. काय नाही त्यापेक्षा काय आहे त्याचा सकारात्मक विचार करा. आज पाऊस नाही, दुष्काळ आहे. खरीपाची पिके बुडाली आहेत ? फिकीर करु नका. शेतात पिकणारा माल नाही पिकला म्हणून बिघडत नाही. दुसर्‍या प्रांतातून, देशातून आयात करता येतो. आयात करायला सरकारच्या तिजोरीत पैसे असले म्हणजे झाले. पैशाची टंचाई अजिबात नसते. तिजोरीत पैसा नसेल तर सरकार कर्ज काढील. टांकसाळीमध्ये अधिक नोटा छापल्या की पैसा तयार झाला. मग कडधान्ये पिकली नाहीत, खरीप पिके बुडाली याची फिकीर कशाला ? निश्चिंत राहा. तुम्ही फक्त मत द्यायचे. बाकी सगळ्या गोष्टी आपले नेते आणि पक्ष पुरवणार आहेत ना ? कुठून हे सर्व करणार ? असे विचारायचे नाही. अल्लादिनने राक्षसाला तो प्रश्न विचारला का ?

दैनिक पुढारी वरून खास वाचक मित्रांसाठी

पाणी आणि दूध यांचे नाते काय सांगते. हंसाला दूध आणी पाणी वेगळे करण्याची कला अवगत आहे असे म्हणतात. पण वेगळे कशाला करायला पाहिजे.

दुधात पाणी मिसळले तर काय चमत्कार होतो पहा.

भेटीस आलेल्या पाण्याला, जणू मित्रच आलाय भेटायला असे समजून दुधाने स्वतःचे सर्व गुण पाण्याला देऊन टाकले. आणि पाण्याचे अस्तित्व दुधात मिसळून गेले. आणि हे पाणी दुधाच्याच भावाने विकू लागले. पुढे हे पाणी मिश्रीत दूध चुलीवर ठेवल्यावर, पाणी विचार करून, आपल्यासाठी दुधाला ताप लागतो हे पाहून, आपण आपले निघून जावे म्हणून आणि दुधाचा ताप वाचावा म्हणून स्वतःचे अग्नीत बलीदान केले म्हणजेच वाफ होऊन उडून गेले. आता ते दूध, आपल्यामुळे अग्नीने आपल्या मैत्राला जाळले, तेव्हा आपणही सहगमन करावे या विचाराने भराभर उसळी घेऊन, उकळून, उसळ्या मारून अग्नीत बलीदान करण्यास निघाले.

दुधाचे पातेल्याबाहेर उसळी घेणे न समजून गृहिणी, दूध उतू जाणे शांत होण्यासाठी, पाण्याचा हबकारा मारते, तेव्हा दुधाला आपला मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद होतो आणि ते मित्रप्राप्तीच्या आनंदात कसे शांत होते.

सज्जनांची मैत्री अशी असते.

चांगले मित्र योग्य वेळी भेटणे हा सुद्धा नशिबाचाच भाग असतो. वाईट संगत माणसाला रसातळाला नेते. हे सर्व कर्म आहे. त्या कर्माला नमस्कार असो.

ज्याने ब्रम्हांडगोलामध्ये, ब्रम्हदेवाला एखाद्या कुंभारासारखे कामाल जुंपले आहे.  ( जसे कुंभार मडकी घडवतो, त्याचप्रमाणे ब्रम्हदेव मुंडकी घडवून सृष्टीची निर्मिती सतत, अविरत करत आहे. ) ज्याने महासंकटपूर्ण अशा दहा अवतारांच्या जंजाळात विष्णूला कधी फेकले हे त्या विद्वान विष्णूलाही कळले नाही, ज्याने शंकराला हाती कवटी देऊन भिक मागावयास लावले, स्मशानात बसवून उलट त्याला त्याचाच अभिमान बाळगावयास लावले, आणि सूर्याला सतत तळपत ठेऊन, आकाशात उसंत न घेता जळत ठेवले, त्या कर्माला नमन करू यात. ही कदाचित् त्यांच्या पूर्वकर्माची फळे तर नसावीते, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुःख सांगण्यासाठी, वाटून घॆण्यासाठी त्यांना मित्र नसावेत. अगाध आहे. 

मुंबई-पुण्यासारख्या शहरात भंगारात पडून असलेल्या, जुन्या, मोडक्या सायकली गावातल्या मुलांची पायपीट वाचवू शकतात. त्या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी. कोणीही सहभागी होऊ शकतो असा हा प्रकल्प अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहाचावा म्हणून हा ई-मेल...


इथे होतं भंगाराचं सोनं

17 Feb 2009
जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.
गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.
त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.
विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.
आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.
मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.
एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.
केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीही उचला खारीचा वाटा

भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject_@_gmail.com [remove _ from address] या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.


सौजन्य - सुनील घुमे, अनिकेत वैद्य

गायक मन्नाडेंना त्यांच्या ९० व्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार २००७ सालासाठी जाहीर झाला हे ऐकून  किती बरे वाटले. नाही म्हणजे भारत सरकार जागे होईल का नाही हा चिचारच मनाला खात होता.

मन्नादांनी ३५०० पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत, त्यात सर्वात जास्त शास्त्रीय संगीतावर आधारलेली गायली म्हणून त्यांना तोच ठपका बसला, पण खरेतर असे नाही.

त्यांचे ’ ए मेरी जोहराजबी ’ हे रांगडे प्रीतीगीत ऐका, किंवा ’ ये रात भिगी भिगी ’ हे गाणे ऐका, आणि विचार करा दुसर्‍या गायकाच्या तोंडी हे गाणे शोभेल काय? ’ ए मेरी जोहराजबी ’ मध्ये तो जेव्हा म्हणतो ना ’ तुझपे कुर्बान मेरी जान मेरी जान मेरी जान’ अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. ’ एक चतुर नार ’ का यात धमाल नाही?’ आठवा शास्त्रीय संगीत पण विनोदी ढंगानं ’ फूल गेंदवा न मारो, न मारो, लगत करेजवामे चोट’

मन्नाडे म्हणजे समाधान मानणारे गायक. उगीच कुणाशीही वाद घालणे त्यांना पसंद नव्हते. त्यांनी तमन्ना चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं.

त्यांना १९७० आणि १९७१ साठी फिल्म पुरस्कारही मिळाले होते.

पुन्हा एकदा आम्हा रसिकांना दादासाहेब फाळके पुरस्काराचा अभिमान वाटू लागलाय.

एका वृत्तपत्रतील बातमी -

देशात कुठेही यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही प्रार्थनास्थळ उभारण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रसरकारला दिले. मंदिरे, मशिदी, गुरूद्वारा, चर्च तसेच इतर सर्वे समुदायाच्या प्रार्थनास्थळांसाठी हे निर्बंध लागू राहतील, असे न्या. दलवीर भंडारी आणि न्या. मुकुंदकम्‌ यांच्या खंडपीठाने आपल्या अंतरीम आदेशात म्हटले आहे. शिवाय हा आदेश भारतभर अंमलात आणावा. याला कारण असे झाले की, मे २००६ मध्ये गुजरात सरकारने अतिक्रमण करून बांधलेल्या  जागेतील सर्व प्रार्थनास्थळे तोडण्याचा आदेश दिला होता, यावर सादर झालेल्या याचिकेवर हा अंतरीम निर्णय देण्यात आला.

म्हणजे प्रार्थनास्थळांचे एवढे प्रस्थ माजले आहे की, यावर आदेश द्यावा लागत आहे. पण आम्ही भारतीय कधी विचार करतो का? कामापेक्षा आपल्याला देवधर्म जास्त महत्वाचे वाटतात. एकच उदाहरण देता येईल ते म्हणजे महाराष्ट्रातील गणेशोत्सव. काय त्याला विकृत रूप आले आहे. गणपती उत्सव झाल्यानंतर ती मुर्ती जवळच एखादे मंदिर बांधून त्यात वर्षभर ठेऊन पूजा केली जाते. पण यापासून रहदारीला काय अडथळा होतो आहे याचा विचारच नाही.

कोणीही उठसुठ उठतो (म्हणजे एकादा राजकारणीच म्हणा ना) आणि गल्लीतल्या मुलांना घेतो आणि देतो एक मंदिर बांधून. किती देव किती मंदिरे. गणना नाही. बरे त्यांची नावे सुद्धा अगदी मजेशीर. पुण्यातच पहा देवतांची नावे - पंचमुखी मारुती, भांग्या मारुती, जिलब्या मारुती, डुल्या मारूती, अवचित मारुती, भिकारदास मारुती, अकरा मारूती, वीर मारुती, दास मारुती, चिमण्या गणपती, पेशवे गणपती, उपाशी विठोबा वगैरे. इतकी देवळे आहेत ना? बस‌.

भक्त तरी किती चालू, गाडीवरून जात असताना फक्त मान झुकवणार, बस त्या देवाने ओ.के. म्हणायचे. देवाला पाया पडताना चप्पल हरवू नये म्हणून त्याच चपलेवर उभे राहून पाया पडायच्या. पाया पडताना मागे पहायचे नाही. कितीका रहदारीला त्रास होऊ देत. आम्हां हिंदूंना एवढे देव कोणी दिले असतील, ते एक देवच जाणो.

गंमत आहे, एका रस्यावर गणपतीचे मंदीर, पुढच्या चौकात हनुमानाचे मंदीर, मग पुढे दत्ताचे, त्या पुढे एखादी देवी वगैरे. आमचा भक्त काय करतो, गुरूवारी दत्ताला जाताना त्याला रस्यातील मारूती दिसत नाही, तर मंगळवारी त्याची देवीशिवाय कोणाचीही ओळख नसते.  अगदी ढुंकुनही पहात नाही. अशी भक्ती.

सकाळी दोन दोन तास  पूजा केल्याशिवाय मन भरत नाही.

जेवणात मीठ किती पाहिजे, फक्त चवीपुरते, पण ते पूर्ण ताटाच्या मानाने किती असते? चिमुटभर, पण त्याने जेवणाचे समाधान मिळते ना? मीठ जास्त किंवा कमीचा विचार करा. काय होई?. तसेच देवाचे स्थान सुद्धा आपल्या आयुष्यात मिठासारखेच असू द्यावे.

महात्मा गांधीजींचा आज जन्मदिवस, २ ऑक्टोबर. आज त्यांच्या कार्याचा आपण गौरव केला पाहिजे. जगाला अहिंसा शिकवली ती गांधीजींनीच. जगातील हे एकमेव आश्चर्य आहे की अजिबात रक्तेपात न करता, हिंसा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही.

म.गांधींनी अहिंसा तत्व पालनामध्ये प्रेमशक्तीला महत्वाचे स्थान दिले. कारण प्रेम कशाचीच अपेक्षा करीत नसते. त्यांनी प्रथम आपल्यातील परमेश्वराला जाणून घ्यायला शिकवले. त्यातून विनम्रता प्रकट होते. याच विनम्रतेतून आपल्यातील अहंभाव, अहंमन्यता गळून पडते. हिंसेतून जेव्हा फायदा, कल्याण वाटते, ते तात्पुरते असते, पण वाईट परिणाम कायम स्वरूपी असतात. त्यांना शांती पाहिजे होती, पण दुबळेपणा नको होता.

महात्माजींचं कौतुक सा‍र्‍या जगात होते पण त्याच भारतात मात्र काहीतरी गैरसमजूतीतून त्यांना तेवढा मान मिळात नाही. आज त्यांची जयंती आहे, पण त्यांच्या बद्दल लिहायला वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे ’ संपादकीय ’ लिहायला वेळ नाही. जे कार्य शिवाजी महाराजांनी केले आणि आपली मोगलांच्या तावडीतून सुटका केली, त्याचप्रमाणे इंग्राजांच्या पाशवी जाचातून म. गांधींनी सुटका केली. जर स्वातंत्र हिंसेतून मिळाविण्याचा प्रयत्न झाला असता तर ते अशक्य होते, कारण सत्ता इंग्रजांच्या हातात होती आणि मुख्य म्हणजे आपलेच भारतीय त्यांची सेवा इमानेइतबारे करीत होते, कारण त्यांची ठाम समजूत होती की इंग्रज भारतातून कधीही जाणार नाहीत. 

आजच्या पिढीला गांधीजींचे विचार वाचण्यासाठी वेळ कुठे आहे, गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला नैतिक अधिष्टान दिले.

गांधीजी काय किंवा कोणीही थोर पुरूष काय त्यांच्याबद्दल वाईट लिहायचेच ही फॅशन झाली आहे. गांधीजींचे विचार कृतिशील आणि अनुभवसिद्ध होते. गांधीजींचा मंत्र आम्ही जीवनात उतरवू शकले नाही.

चला आज आपण त्यांच्या कार्याचा गौरव करू यात.

सामाजिकदृष्ट्या अजूनही वृद्धांच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. कारण त्या समस्या सामाजिक आहेत हे लक्षातच येत नाही. मुळात घरगुतीसुद्धा लक्षात येत नाहीत. वृद्ध जर आर्थिकदृष्ट्या सबळ असतील तर त्यांच्या अनेक समस्यांवर आपोआपच उत्तरे मिळतील असे वाटते. त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, अनेक समाजोपयोगी कामात त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. पण त्यांना घरच्या माणसांकडून प्रथम आधार मिळाला पाहिजे.

तरूणपणी काही लोक मुळाबाळांना घडविण्याचे व्रत घेऊन आपल्या म्हातारपणाचा विचार करत नाहीत, सर्व मुलांच्या भवितव्यासाठी अर्पण करतात. पण काही जण थोडे राखून मुलांना मोठे करतात, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात आणि म्हणतात बाबा आता तुझे नशीब. तर काहीजण स्वतःच्या चैनीकडेच लक्ष देतात मग मुले कशीपण वाढतात.

आपल्या देशात ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात येतात. पण त्या उथळ आहेत त्याला अर्थ नाही. कायदा करून समस्या सुटत नाहीत. सामाजिक, भावनिक बंधन असावे लागते. आपल्या वृद्ध आईवडिलांचा संभाळ करावा, त्यासाठी कायदे केलेत, पण अशा उपचारांचा फायदा आहे काय? यासाठी कोर्टात जायचे म्हटले तरी पैसा पाहिजे शिवाय अंगात त्राण पाहिजे, या वयात शक्य आहे काय? वृद्धांच्या अनुभवाचा अपमान झाला नाही पाहिजे याचा विचार त्यांचे पोटचे गोळे करत नाहीत, तर इतरांचे काय?  ज्येष्ठांचा आदर करा ही आपली शिकवण आहे, पण तसे घडते?

सद्याचे जीवन धावपळीचे आहे मान्य आहे, पण म्हणून आपल्या वृद्ध मातापित्यांना संभाळायला नको काय? आजकालच्या जमान्यात वॄद्ध नोकरी करू शकत नाहीत.

शेवटी काय तर परावलंबी जीवन वाईट, आपल्याला कोणीतरी काहीतरी देईल मग आपण घास घेऊ ही भावना मरणप्राय वेदना देते, पण वाढलेल्या वयाने सर्व दारे बंद केलेली असतात.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तने.

मी एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे; पण वरिष्ठांनी एखादी चूक दाखवली, की खूप अस्वस्थपण येतो. मुख्य म्हणजे मी खूप काम करुनही मला कामाचे समाधान मिळत नाही. सारखी मनाची घालमेल सुरु असते. त्यातून नुकताच बीपीचा त्रास सुरु झालेला आहे. योग्य मार्ग सुचवावा.

आपण एकंदरीत हुशार आणि कार्यतत्पर अधिकारी आहात. आपले स्वतः बद्दलचे मत आणि इतरांचे आपल्याबद्दलचे मत यांच्या एकत्रीकरणातून आपली स्वतः ची विशिष्ट प्रतिमा आपण तयार करीत असतो. एकदा का ही स्वप्रतिमा तयार झाली, की आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करीत राहतो; मात्र सभोवतालची परिस्थिती व आपली जुळवून घेण्याची क्षमता यातील अंतर वाढत जाते, तेव्हा आपण ' मानसिक ताणाचा ' अनुभव घेतो. सातत्याने तणावाचे दडपण जाणवत राहिल्यामुळे आपणाला इच्छा असूनही आराम करता येत नाही, त्यामुळे शारीरिक थकव्याबरोबरच बौद्धिक थकवा जाणवतो, निराशा वाढते आणि मुख्य म्हणजे वस्तुनिष्ठपणे विचार करता येत नाहीत. सततच्या ताणतणावामुळे झोप लागत नाही. पचनसंस्था, स्नायू यावर अतिरिक्त दाब पडतो आणि डोकेदुखी, रक्तदाब, हदयविकार इत्यादींसारख्या शारीरिक आजारांना सामोरे जाव लागते. आपल्या ताणाचा वाढता भार सहन करावा लागण्यापाठीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण करीत असलेले अवास्तविक विचार होय.
बर्‍याच वेळा आपली स्वतः ची अशी अपेक्षा असते, की आपण कधीही चुकता कामा नये. चूक होणे ही भयानक गोष्ट आहे. आपण स्वतः कडून अशी बिनचुकपणाची अपेक्षा बाळगत असल्यामुळे छोटया चुकीबद्दलही विलक्षण अपराधी वाटते. कदाचित त्यामुळे आपला ताण त्यामुळे कायम राहत असेल; मात्र एक लक्षात घ्यायला हवे , ही चुका न होन्याची खरदारी आपण घेऊ शकतो; परंतु चूक झाली तर मनात अपराधगंड निर्माण होऊ द्यायचा नाही. या प्रकारचा वास्तविक, स्पष्ट आणि तर्काला पटणारा विचार मनात बाळगला, तर मानसिक ताणाचा त्रास होणार नाही. कामाच्या ठिकाणी पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळायला हवे हे खरे आहे; पण आपल्याला हवा तसा, हवा तेव्हा आणि हवा तेवढा पाठिंबा कोणी देऊ शकत नाही, हे वास्तव सत्य आहे. त्यामुळे आपणच आपल्याला प्रोत्साहित ठेवायचे, आपला आत्मविश्वास आपण वाढवायचा आणि आपल्या कामातील आनंद आपणच शोधायचा अशी वृत्ती आपण जोपासली, तर आपल्यावरील मानसिक ताण आपोआप कमी होत जातो. आपण सदैव तणावाखाली काम करत असू, तर अस्वस्थपणा व असमाधन टिकून राहते; पण जास्तीत वास्तविक व तर्कशुद्ध विचारांचा आधार घेत आत्मसमर्थनाची सवय मोडून काढायचा प्रयत्न करीत राहिलो, तर सहजपणे व आनंदाने आपण आपले काम पार पाडू शकू. साहजिकच अस्वस्थपणा कमी होऊन आपला B.P चा त्रासही कमी होईल, त्यासाठी -
* वस्तुनिष्ठ विचार करण्याची सवय लावा.
* विनोदबुद्धी शाबूत ठेवा.
* शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
* ताणरहित स्थितीत राहण्याचे प्रशिक्षण घ्या.
मुख्य म्हणजे ' ताणातही जग जगते, आनंदे हसते ' ही वास्तवता लक्षात ठेवली, तर आपल्यासारखे आनंदी आपणच !!

भरतात राजकारण म्हणजे चराऊ कुरण झाले आहे, कोणीही कसेही खा कोणी बोलणार नाही. असा विचार करून राजकारणी मंडळींनी आपल्या वाली वारसांना या धंद्यात ओढायचे ठरवलेले दिसते. बरोबर आहे, यात काही अक्कल लागत नाही, डिग्री लागत नाही.

भाजपाचे सर्वेसर्वा श्री.गोपीनाथ मुंडे यांची घराणेशाही- बंधू पंडितअण्णा मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. त्यांचे चिरंजीव धनंजय मुंडे परळी मतदारसंघासाठी, गोपीनाथरावांची कन्या सौ. पंकजा पालवे मुंडे उमेदवारी जाहीर. पंडितअण्णांचे जावई मधुसूदन केंद्रे गंगाखेड मधून उमेदवारी, धनंजय मुंडे यांना आष्टीतून उमेदवारी.

महाजन घराणेशाही - प्रमोद महाजन यांच्या कन्या सौ.पूनम महाजन राव घाटकोपर पश्चिम मतदार संघ.

विलासराव देशमुख - त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख राज्य विधान परिषदेचे सदस्य, अमित देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातू्न.

सुशीलकुमार शिंदे खासदार - वारसदार कन्या प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मधून उमेदवारी.

छगन भुजबळ - पुतणे समीर भुजबळ ना्शिकचे खासदार, स्वतः छगन भुजब्ळ येवल्यातून उमेदवार,माझगाव मधून पंकज भुजबळ.

गणेश नाईक - स्वतः पर्यावरण मंत्री, चिरंजीव संजीव नाईक ठाण्याचे खासदार, दुसरे चिरंजीव संदीप नाईक ऐरोली मधून उत्सुक.

रण्जीत देशमुख - कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, त्यांचे चिरंजीव आशिष देशमुख भाजपच्या तिकीटावर, तर अनिल देखमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख नागपूर पश्चिम मतदारसंघातून इच्छुक.

प्रमोद शेंडे - विधानसभेचे उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव शेखर शेंडे वर्धा मतदारसंघातून उमेदवारी.

रिपब्लिन नेते जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जगदीप कवाडे, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत, वर्धा जिल्ह्यातील सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख, लातूरचे खासदार जयंत आवळे यांचे चिरंजीव राहुल आवळे, तर भाजपचे खासदार संतोष दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला यांच्यासाठी उमेदवारी निश्चित करून घेतली. 

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

सकारात्मक विचार करा-

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

हे कुठेतरी मी वाचले होते........

फळांचे गुण दडले आहेत त्यांच्या आकारात
हे जग परमेश्वराने निर्माण केले आहे, अशी एक आपली श्रद्धा आहे. ती खरी मानायची तर माणूस हे परमेश्वराचे लाडके अपत्य मानायला हवे. याचे कारण म्हणजे परमेश्वराने निसर्गात ज्या गोष्टी तयार केल्या आहेत त्याचा मानवाला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल, याचाच विचार करुन तयार केल्या आहेत. शास्त्रज्ञांनीही तसे सांगितले आहे. अगदी फळांचाच आकार घ्या. फळांचे आकार मानवी अवयवांशी साधर्म्य राखणारे आहेत. इतकेच नव्हे तर ही फळे ज्या मानवी अवयवांसारखी दिसतात त्या अवयवांना ती उपयोगी पडतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गाजर गोल कापले की ते मानवी डोळ्यांसारखे दिसते. म्हणजे त्याच्या मधल्या भागाकडे नीट पाहिल्यावर तो बुबुळासारखा दिसतो. गाजर खाण्याने रक्ताची कमतरता भरुन निघते; पण त्याचबरोबर गाजर दृष्टी चांगली होण्यासाठीही तितकेच उपयोगी पडते.     टोमॅटो चिरला की आत त्याचे चार भाग दिसून येतात. माणसाच्या हदयाचेही चार भाग असतात आणि टोमॅटोत असणारे लाइकोपीन नावाचे द्रव्य हदयासाठी गुणकारी आहे. द्राक्षांचे घोस असतात. हे घोस रक्तपेशींप्रमाणे दिसतात. द्राक्षे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. आक्रोडाचा आतल्या भाग मानवी मेंदूसारखा दिसतो. बटाटयाचा आकार स्वादुपिंडासारखा आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोजच्या प्रमाणात कार्बोहायड्रेट तयार करण्याचे काम बटाटा करतो. कांदा चिरला की त्याचा आकार पेशींसारखा दिसतो. अलीकडेच एका संशोधनात आढळून आले आहे की, पेशींमध्ये नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात कांदा मदत करतो. लसूणदेखील शरीरातील नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतो. आहे की नाही निसर्गाची करणी माणसाच्या भल्याची ?

दैनिक ’पुढारी’ मधील एका लेखावरून, वाचकांच्या माहितीसाठी.

सुंदर कविता, व्यनी मदी गावली.

 

image001

निवडणुकांचे वातावरण जसे तापायला लागेल, तसे राजकीय नेत्यांच्या कामगिरीबाबतही जनतेत चर्चा व्हायला सुरुवात होईल. जनतेच्या पैशावर आपल्या लोकप्रतिनिधींची कशी मौज चालते, त्याचा एक आढावा.
आपण अगदी सकाळी उठल्यानंतर पहिला चहा घेतो तेव्हापासून सरकारला कर देऊन सरकारी तिजोरी भरत असतो. कारण चहाची पावडर आणि साखर खरेदी करताना आपण १२.५ टक्के सेवा कर भरलेला असतो. ऑफीसला जाण्याआधी तुम्ही दात साफ करणे आणि अगदी स्नान करण्यानेही सरकारी तिजोरीत भर पडत असते. तुम्ही जर दुचाकी किंवा चारचाकीतून ऑफीसला जात असाल तर ते वाहन खरेदी करतानाही अनेक प्रकारचे कर तुम्ही भरले आहेत. रोड टॅक्स म्हणजे रस्ता कर हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. याचा अर्थ आपण चालत असलेल्या पावलागणिक आपल्याला कोणत्या ना कोणत्या कराने वेढलेले आहे. सेवा कर, विक्री कर, अबकारी कर आणि पै पै करुन संपत्ती जमा केली असेल तर आयक ही आपल्याला भरावा लागतो. या शिवाय घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल हे वेगळे कर आहेत.
पण आपल्या यंत्रणेचा एक भाग असा आहे की, त्यांना या कराशी काही देणेघेणेच नाही. म्हणजे त्यांना कराची काही चिंताच नाही. कारण त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. जसा आपल्याभोवती प्रत्येक पावलागणिक कराचा विळखा पडतो, तसा त्यांच्या प्रत्येक पावलावर जणू गालिचा पांघरला आहे. ज्या देशातील ७० टक्के जनता गरीब आहे, त्या जनतेचे प्रतिनिधींचा हा थाट आहे. या लोकांना त्यांच्या प्रत्येक कामात सरकार सवलत देते.
आपण खात असलेल्या एका चपातीवर आपण तीन प्रकारचे कर भरतो. एक तर गहू बाजारात आल्यावर त्यावर बाजारशुल्क वसूल केले जाते. जेव्हा हा गहू किरकोळ बाजारात विकला जातो तेव्हा त्यावर १२.५ टक्के सेवा कर लागू होता. जर तुम्ही हॉटेलमध्ये खात असाल तर तुम्हाला साडेबारा टक्के वॅट करही द्यावा लागतो. याआधी गव्हाच्या आट्यावरही सेवा कर लागू केला जात होता. आता राज्यांनी तो रद्द केला आहे.
आपल्या देशातील खासदारांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाथी आठ रुपये प्रति किलोमीटर या दराने प्रवासाचा भत्ता दिला जातो. त्याचबरोबर देशात कुठेही येण्या - जाण्यासाठी मोफत फर्स्टक्लास एसी ट्रेनची सवलत दिलेली आहे. विमान प्रवासासाठी बिझनेस क्लासची वर्षात ४० तिकिटे मोफत मिळतात. दिल्लीत मोफत होस्टेलची सुविधाही त्यांना दिली जाते. खासदारांना देण्यात येणार्‍या मोफत सुविधांची यादी बघितली की डोळे फिरतात. त्यांना ५० हजार युनिटपर्यंत वीज मोफत वापरता येते. १ लाख ७० हजार लोकल फोन कॉल त्यांना मोफत आहेत. या सगळ्याचा हिशेब केल्यावर एका खासदारावर वर्षाला होणारा खर्च आहे बत्तीस लाख रुपये आणि एका खासदारावर पाच वर्षे होणारा खर्च आहे १ कोटी ६० लाख रुपये. या हिशेबाने सर्व ५३४ खासदारांवरील पाच वर्षांचा खर्च सुमारे ८५५ कोटी रुपये होतो. आणि हा सगळा पैसा तुम्ही आम्ही भरत असलेल्या कराचा आहे. या मोबदल्यात हे लोकप्रतिनिधी जनतेला काय देतात ? याचा आता जनतेने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपण कष्ट करुन पैसा मिळवतो, आणि करांच्या रुपाने प्रामाणिकपणे सरकारला देतो. लोकप्रतिनिधींना सवलती मिळायला हव्यात. कारण त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी ते नीट पार पाडतात का, हा प्रश्न आहे. आपण दिलेल्या पैशांतून त्यांना सवलती मिळतात. मग त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांना जाब आपण नाही विचारणार तर कोण ?

दैनिक पुढारीतील एका वाचकाचा संताप..............

’स्वाईन फ्लू’ ला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, गर्दी करण्याचे टाळा. पण ही गर्दी कशामुळे झाली याचा विचार कुणी केला आहे काय? मतांच्या राजकारणासाठी याच राजकारण्यांनी झोपटपट्ट्या नियोमीत करण्यासठी प्रयत्न केले. परराज्यातून माणसांचा लोंढा मुंबईत येत होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी धोक्याचा इशारा दिला होता त्यावेळी याच काही मराठ्यांनी, जे स्वतःला बुद्धीजीवी समजतात त्यांनी विरोध केला होता. तो मराठी आक्रमणावरचा बाळासाहेबांचा इशारा समजला असता तर आज ही पाळी आली नसती.  या लोंढ्यामुळे बकालपणा वाढला. स्वाईन फ्लू ला पोषक वातावरण मिळाले. कसे लोक गर्दी करण्याचे टाळणार. कारण आपणच या धार्मिक कार्यक्रमांना फाजील महत्व देऊन ठेवले आहे. शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीची दहीहंडी होणार नाही. म्हणजे श्रीकृष्णाची दहीहंडी राष्ट्रवादीची झाली काय?

आताआताच सरकारणे २००० पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या नियमित करण्याची घोषणा केली, त्यावेळी त्या लोकांच्या सुविधांचा विचार केला काय? नाही. हे सर्व घाणेरडे राजकारण फक्त मतांसाठीच असते.

गर्दी करायची नाहीतर या लोकांनी जायचे कुठे? औषध घ्यायला जायचे तर तिथे गर्दी, दवाखान्यात तपासायला जायचे तर तिथे गर्दी, मास्क खरेदी करायला गर्दी, एवढेच काय सकाळी प्रातर्विधी उरकायलाही गर्दी. कुठे थांबणार? महाराष्ट्राचे समीकरण आहे, शहर म्हणजे झोपडपट्टी म्हणजे गर्दी.

स्वाईन फ्लूचे भयानक सत्य काय तर, मानवी लोंढे, वाढती लोकसंख्या, अज्ञान, बकालीकरण, राजकारण, भ्रष्टाचार, कामचुकारपणा अगदी डॉक्टरांचासुद्धा, आणि झोपलेले सरकार.

पण एक आहे स्वाईन फ्लूने सर्वांना उघडे पाडले. 

 

१९९३ च्या मुंबई बॉम्ब खटल्याचा निकाल लागला, आणि तीन आरोपींना फाशीची सजा झाली. म्हणून भारतीयांनी अथवा ज्या कुटुंबाची हानी झाली त्यांनी आनंदी होण्याचे कारण नाही, कारण संसदेवरील हल्ल्यातला आरोपी अजूनही सहा वर्षानंतर, फाशीची शिक्षा होऊनही, आजपर्यंत तुरुंगात सरकारी खर्चाने बिर्यानी झोडत आहे, अगदी सर्व भारतीयांच्या नाकावर टिच्चून. याचा सर्व बोजा आपणासर्वांवरच पर्यायाने पडतो आहे. आता हे आरोपी सुद्धा जेल मध्ये सुरक्षितरित्या पाहुणचार झोडत बसतील.

भारतात हिंसाचार केल्यावर कायदाच संरक्षण देतो, आणि नंतरचे आयुष्य कामधंदा न करता मजेत घालवता येते म्हणल्यावर, पाकिस्तानातून काम नसणारे गरीब दहशतवादी बनून भारतात घुसतील नाहीतर काय? पाकिस्तानातील खेड्यात एवढे दारिद्र्य आहे की एकवेळच्या भुकेलाही अन्न नाही, मग पाकिस्तान तो बोजा सहन करणार नाही, तर त्यांना भारतात पाठवणार आणि भारतातल्या तुरूंगात त्यांच्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची सोय करणार अगदी माणसे मारून. जर त्याला शिक्षा झाली नाहीतर तो पुन्हा घातपाती कारवाया करायला तयार. हा आपल्या कायदाव्यवस्थेचा दुबळेपणा, आणि कमजोरपणा आहे. अजूनही आपण इंग्रजांच्या कायद्या व्यवस्थेला चिकटून आहोत. आपल्याला हे माहितच नाही की त्यावेळेस आतंकवादी नव्हते. भारतीय कायदाव्यवस्था पाहिल्यास कायदा पाळणे तापदायक आणि न पाळणे लाभदायक, असे चित्र ह्या आतंकवाद्यांनी सिद्ध केले आहे.

म्हणून म्हणतो भारतीयांनो कोणाला फाशी झाली, तर आनंदाने नाचू नका, खरा आनंद त्याला, त्या फाशी झालेल्याला झालेला असेल.

खालच्या कोर्टात शिक्षा झाली तर अपिलाला वरचे कोर्ट आहेच की. कधी कधी खालच्या कोर्टातील निकाल वरचे कोर्ट बदलते, आणि खालच्या कोर्टावर ताशेरे ओढते, आणि खालच्या कोर्टाला चूक ठरवते, म्हणजे गरीब माणूस जर वरच्या कोर्टात काही कारणामुळे जाऊ शकत नाही तर त्याने न्याय न मिळता नशिबाला दोष देत आयुष्य घालवायचे.

Follow us on

भारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी समजली जाते, त्याच लोकशाहीचे या लोकसभा निवडणुकीत जेम्तेम ५० टक्के मतदान करून मतदारांनी धिंडवडे काढले आहेत. कोणाही पुढार्‍याला काही समजत नाहीकी भाषणाला जमणारी गर्दी कुठे गेली. म्हणजे लोक फक्त गंमत पाहण्यासाठीच गर्दी करत होते तर. मतदारांनी भल्याभल्यांची गणिते चुकवली. हे असेच जर घडत राहिले तर एक वेळ अशी येईल की, मोजकेच शेकड्यात मतदान होईल. कोण पुढारी लायक आहे म्हणून उत्साहाने मतदान करावे. मतदान करून त्या उमेदवाराने पुढे अपेक्षाभंग करण्यापेक्षा नको ते मतदान. लोक मतदानाला जातील पण त्यांना नकारात्मक मतदान करण्याची सोय पाहिजे.

त्यासाठी मी एक पद्धत सुचवतो पहा -  मतदानाच्या बॅलेट मशिनवर प्रत्येक उमेदवाराच्या पुढे दोन बटने पाहिजेत. एक लाल आणि एक निळे किंवा हिरवे.प्रत्येकाला एका उमेदवारापुढे एकदाच बटण दाबता येईल. म्हणजे जर त्या मतदाराला कॉंग्रेसला मत द्यायचे आहे तर त्याने त्यापुधील निळे बटण दाबावे, आणि जर त्याला असे वाटत असेल की राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीच निवडून आला पाहिजे तर त्याला त्या उमेदवारापुढील लाल बटण दाबायची सोय पाहिजे ती पण एकदाच. म्हणजे जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा प्रत्येकाला होय आणि नाही अशी दोन प्रकारची मते पडतील.म्हणजे हे समजेल की निवडून आलेला उमेदवार किती लोकांना नको होता. जर त्या निवडून आलेल्या उमेदवाराला होय पेक्षा नाहीची मते जास्त मिळाली तर त्याची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी. पण या उमेदवारांना पुन्हा उभे राहू देऊ नये. जर कोणाही उमेदवाराला ५० ट्क्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक पसंती मिळत असेल तर त्याला कायम स्वरूपी निवडणुकीला अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून नकारात्मक मत फार महत्वाचे ठरवावे. एखादा उमेदवार निवडून जरी आला तरी त्याला  समजू दे किती मतदार  आपल्या  विरूद्ध आहेत ते.

आता विधानसभा निवाडणुका जवळ आल्यात.

एका संन्याशाला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत? त्या व्यक्तिने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. संन्याशाला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरून एक राजबिंडा तरूण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून संन्याशाने विचारले, हेच का ते भगवान? ती व्यक्ति म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना माननारे लोक त्यांच्या मागून जात आहेत.... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर, गुरू नानक, ज्ञानेश्वर वगैरे असे सर्वजण येऊन गेले.

भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. दुसरा दिवस उजाडला. सारे लोक कंटाळून गेले निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक म्हातारा एकटाच आला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज होते. संन्याशाने त्याला विचारले, आपणच भगवान का? म्हातारा म्हणाला, हो. संन्याशाने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही? तो म्हातारा म्हणाला, सारे राम, बुद्ध, येशु, महावीर वगैरेंबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. आतापयंत तू माझी वाट पहात उभा आहेस तर मग चल माझ्या बरोबर. भगवानांनी सांगितले, ते  बघ तिकडे दूरवर मी जातो तू माझ्या मागून ये. असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.

संन्याशाने पाहिले तर समोर एकदम गरम असे वाळवंट त्याला दिसले, तो विचार करू लागला आता आपण कसे जायाचे. मग त्याने  धीर  करून पाऊल पुढे टाकले, तर ती वाळू त्याला भासलीच नाही. तो भराभर पुढे चालू लागला, शेवटी वाळवंटपार पोहोचल्यावर त्याला भगवान भेटले. त्याने भगवानाला विचारले, आपण मला एकट्याला का बरे सोडून आलात, मी एवढ्या गरम वाळवंटातून कसा आलो असतो? तेव्हा भगवान म्हणाले, वेड्या मी तुझ्यासोबतच होतो मागे वळून पहा दोनच पावले दिसताहेत, ती माझी आहेत मी तुला कडेवर उचलून घेतले होते, म्हणून तुझे पाय भाजले नाहीत.

कोणाच्या मागे धावावे, हा विचार आपण करावा, आणि देवाच्या कडेवर बसावे.

भारतात लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला, आणि एक भयानक सत्य बाहेर आले. किती टक्के मतदान झाले? ५० टक्क्यांच्या वर कोठेच नाही. पुण्या सारख्या सांस्कृतिक शहरात ४६ टक्के मतदान व्हावे, आणि मुंबईसारख्या शहरात  ४० टक्के म्हणजे उमेदवारांची हार नाही काय?

मतदान न केलेले बहुतेक सर्वजण मध्यम वर्गीय आणि उच्च वर्गीय असणार. बरे लोकांनी काय म्हणून मतदान करावे. लोक भाषणाला हजेरी लवतात, पेपरमध्ये विराट जनसमुदायाचे चित्र छापून येते, पणा मतदान मात्र होत नाही, याचा उमेदवारांनी बोध घ्यावा. नुसती गर्दी जमली म्हणजे आपण बाजी मारली असे नाही.

लोक विचार करतात, आणि जाहीरनाम्यातली आश्वासने वाचून करमणूक करून घेतात. कारण लोक जाणतात, ही आश्वासने आमच्याच करातून आहेत. एवढी संपती जाहीर करतात, पण एका तरी लेकाच्याने, त्या संपत्तीतला वाटा देशाला, अनाथाश्रमाला दान केला आहे काय? कोणी म्हणले काय की, आम्ही झोपडपट्टी साठी एवढा निधी देतो. बस जेकाही आहे ते लोकांच्या पैशावर. एकमेकांबद्दल जाहीर सभेत चिखलफेक करायची, पण आपण मागील पाच वर्शात काय काम केले ते मात्र प्रत्येक उमेदवाराने सांगायचे टाळले, काय सांगणार काम केले असेल तर ना? उमेदवारंचे कार्यकर्ते कोणाच्याही  घरी आले  नाहीत. कोणाला स्लीपा वाटल्या नाहीत. लोक नाराज झाले.

हे जे काही मतदान झाले त्यात, पहिल्यांदाच कुतुहलाने मतदान करणारे १८ वर्षांचे मतदार असाणार? खालच्या वर्गातले मतदार असणार. सुशिक्षित मतदार नसणारच.

मतदान का करावे, हे लोकांना कळेचना. राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा लोकांना त्यांच्या समस्या महत्वाच्या वाटतात, आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही. बेरोजगारी, भारनियमन, अतिरेकी हल्ली, शिक्षणाचा खेळ खांडोबा, जागतिक मंदी, पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी या विषयावर जर कोणी आश्वासन देणार नसतील तर काय फरक पडतो कोणीही निवडून आले तर?

मतदान केल्यावर काय भरोसा तो उमेदवार पक्ष बदलणार नाही ते. कशावरून तो सगळी आश्वासने पाळेल. कारण नंतर त्याने आश्वासने पाळली नाहीत तर भारतात असा कोणताही कायदा नाही की त्या उमेदवाराला कोर्टात खेचता येईल. मग का मतदान करावं.

जगभर स्वईन फ्लु पसरत असताना भारताने खुप काळ्जी घ्यायला हवी आहे. सरकारने अतिदक्षता जाहीर केलेली असली तरी लोकांनी काळजी घेणे फार महत्वाचे आहे. WHO ने "पातळी ५" जाहीर केली आहे. "पातळी ५" म्हणजे आता ही साथ जगभरात पसरुन त्यामुळे मृत्यु होणारच. अमेरिका आणि युरोपातुन येणा‍र्‍या प्रवाशांना अतिशय कठीण होणार आहे. पण ह्या तापाचा आणि डुकराचा काही संबंध नाही हे फार जणांना माहीत नसेल.



View H1N1 Swine Flu in a larger map

निवडणुका पार पडल्या आणि बाबा मी एकदाचा निवडून आलो, काय काय भानगडी कराव्या लागल्या त्या माझ्या मनालाच माहीत. तेव्हा आभार प्रदर्शन करायला बोलावले आहे तेव्हा चार शब्द सांगावे म्हणतो -

मला मायबापांनो तुम्ही निवडून दिलेत त्याबद्दल आभार, नाहीतरी मी निवडून येणारच होतो, कारण आपण तशी फिल्डींगच लावली होती ना. सर्व निवडणूक केंद्रांवर आपली माणसेच पेरली होती, काय खर्च आला म्हणून सांगू. आपण आधी कायपण खर्च केला नाही, पण बुथवर मात्र मोकळा हात सोडला होता.

या भागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी सर्व कंत्राटे जवळच्या माणसांना (नातेवाईकांना) देईन म्हणजे काम बरोबर न झाल्यावर बोलता येते हो, आणि शिवाय त्यांनी एवढी मेहनत घेतली आपल्याला निवडून आणायला, ती उगाच काय?

मी प्रत्येकाला रोजगार मिळवून देईन, पण शिक्षण पाहिजे बरं का, नाहीतर एम्प्लॉयमेंट एक्चेंज मध्ये नाव नोंदवायला मदत करेन.

नळाला पाणी येण्यासाठी प्रयत्न करेन, पण जर पाणी नाहीच आले तर टॅंकरची सोय करेन, आणि प्रत्येकाला खास निधीतून फिल्टर देईन. शेवटी आम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी आहेच ना!

मुलांना मोफत शिक्षणाची सोय करेन. त्यांना दुपारी खिचडीचा कार्यक्रम असेल, त्यासाठी माझ्या शेतातील तांदूळ वापरेन, त्यासाठी निधी वापरला जाईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातील, गावाचे मुलं कशी फाडफाड इंग्रजी बोलली पाहिजेत.

शेतकर्‍यांना भरभरून कर्जे दिली जातील, कर्ज माफी नाही, कारण ती कर्जे मिळतील ती पुढच्या निवडणुकीपर्यंत फेडायचीच नाहीत, म्हणजे पुढील वेळेस ती तुम्हाला पूर्ण माफ केली जातील, याची मी हमी देतो.

आपल्या भागात साधा विमानतळ नाही म्हणजे, हा अपमानच आहे. यासाठी मी कसून प्रयत्न करेन.जगाशी सांपर्क नको काय?

प्रत्येक घरात एक एक T.V.तो पण रंगीत देणार आणि नाहीतर आपले भाषण कसे लोक पाहणार.

उन्हाळ्यात प्रत्येकाला A.C.ची सोय करणार, हप्ताने बॅंकेकडून घेऊन देणार, नव्वद टक्के सबसिडीवर.

गावात कोणत्या देवाचे देऊळ नाही ते बघा, आपण बांधू म्हणजे उरसाची सोय झाली, तमाशा आयताच आला की नाही!

आपण जाहीरनाअमा छापलाच नाही, उगाच कोणीतरी पुढील निवडणुकी पर्यंत जपून ठेवला म्हणजे आली का पंचाईत.

हे जे आपण करणार आहे ते सर्व खासदार निधीतून, तेव्हा कोणाच्याही बापाचे काही जाणार नाही, तेव्हा कोणीही माज करायचा नाही. जे जसं मिळेल तसं गोड मानून घ्यायाचं काय!

ही सगळी तयारी मी पुढची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन करीत आहे, एवढं ध्यानात ठिवा.   

( वरील सर्व कल्पनाविलास आहे, व्यक्तिगत कोणीही घेऊ नये )

अखेर अजमल कसाबचा खटला सुरू झाला आहे. ज्या माणसाने गोळीबार करताना मिडीयाने पुन्हा पुन्हा दाखविले, माणसांचे मुडदे पाडताना करोडो लोकांनी त्याला पाहिले अशा गुन्हेगारावर खटला चालू आहे. काय लोकशाहीची दुर्दशा ! न्यायालयात जेव्हा खुनाचा खटला चालू असतो तेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने पाहणार्‍या साक्षीदारावर विश्वास ठेउन कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देते, आणि इथे तर T.V. वर प्रत्यक्ष देशाने पाहिलेले असताना त्या कसाबवर खटला चालवावा म्हणजे काय?

आता त्याला न्यायालय सर्व संधी देणार. वर्तमानपत्रात त्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर अंदाज तरी करता येईल काय, किती खर्च येत असेल ते. आपण उलटा विचार करू यात असे पाकिस्तानात घडले असते तर काय पाकिस्तानने लाड पुरवले असते काय? अरे कसला खटला चालवता त्याला दाखवा तो कसा गोळीबार करतो ते आणि हाच पुरावा ग्राह्य धरून द्या ना त्याला जाहीर जाहीर फाशी, मग कोणीही माईचा लाल यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. द्या त्या अफझल गुरूला जनतेच्या हवाली करून, मग बघा जनता त्याचा काय न्याय करते ते.

कसाब काय तक्रार करतो, जग काय म्हणेल, पाकिस्तानचे संबंध कसे राहतील याच काय विचार करायचा? बंदूक चालवताना त्याने विचार केला होता? त्याने किती कुटुंबांना निराधार केले आहे, त्यांनी काय करावे. काय भारताची घटना आहे, ज्याने खुले आम, ज्यांचा कुठलाही गुन्हा किंवा दोष नसताना, दीडेकशे माणसांचे मुडदे पाडले, जे सर्व भारताने पाहिले, त्याला कायदा संरक्षण देतो, न्यायाची संधी देतो आणि त्याच्या सुरक्षेची काळजी घेतो, मोठी चेष्टा आहे.

आपण जगाला काय दाखवायचे की, आम्ही किती न्यायप्रिय आहोत, भले मग आमच्या निष्पाप जनतेवर कोणीही कसाही गोळीबार करावा.  काय न्याय मिळणार आहे त्या कर्तबगार अधिकार्‍यांना, काय न्याय मिळणार आहे त्या कुटुंबीयांना, आपण त्यांना न्याय नाकारतो आहोत, त्या कसाबाला न्याय देताना याचे भान सर्वजण विसरलेत.

लोकसभेला मते मागणारे, जनतेचे सर्व कनवाळू उमेदवार दणादण भाषणे ठोकताहेत, पण कोणीतरी या कसाबाबद्दल बोलत आहे काय? कोणी त्या पोलीस अधिकार्‍यांबद्द्ल बोलत आहे काय? त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे काय? अरे ह्या उमेदवारांना एकमेकांची उणीधुणी काढायलाच वॆळ नाही तर या देशाच्या प्रश्ना कडे कोण लक्ष देणार  आहे.

मतदान करणे हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे हे अगदी ठासून सांगितले जाते, पण अशा अयोग्य उमेदवारांना मत देऊन आपण काय साधणार आहोत समजत नाही. सुशिक्षित मतदार मतदान टाळतो. तो सर्व समजतो म्हणूनच ना. अशिक्षित उमेदवाराला कळत नसताना तो भावनेच्या भरात मतदान करतो.

उमेदवार जाहिरनामे प्रसिद्ध करतात, ते वाचून कोणाचा विश्वास बसणार आहे काय? असे शक्य आहे काय? मग अशी खोटी आश्वासने देणार्‍या उमेदवाराला काय म्हणून मत द्यायचे. मागील निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुन्हा उभे आहेत, पण त्यांनी जर मागील आश्वासने पूर्णा केली नाहीत तर त्यांना काय म्हणून मत द्यायचे. या वर्षी तर सर्वांनी बोलण्याचे ताळतंत्रच सोडले आहे. जनतेच्या विकासाबद्दल कोणी बोलत नाही पण एकमेकांची उणीधुणी काढण्याची जण स्पर्धा चालू आहे अशंना काय म्हणून मत द्यायचे? निवडून आल्यावर तो पक्ष बदलणार नाही याची काय हमी. पक्ष बघून मत दिले तर उमेदवार निवडून आल्यावर पक्ष बदलतो तेव्हा चिडचिड होते पण मग मतदान केल्याबद्दल पश्चात्तप होतो, ही वेळ येऊ द्यायची नसेल तर मतदानच नको ना. 

हे निवडून दिलेले उमेदवार संसदेत हजेरी लावत नाहीत. तिथे फक्त हेवेदावे काढले जातात. अधिवेशन उधळून लावले जाते. जनतेच्या विकासाचा विचार होत नाही, मग अशा उमेदवारांना मतदान करायचे काय?

मत देऊन निवडून आलेल्या उमेदवाराने कामे न केल्यास, मतदान केल्याचा पश्चाताप होण्या पेक्षा मतदान न केलेलेच बरे.

’असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्’ या संस्ठेने काही निष्कर्ष काढले आहेत त्याप्रमाणे पाच कोटीपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या ४० उमेदवारांपकी ११ विजयी झाले, तर पाच लाखापेक्षा कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांपकी कोणीही मागील निवडणुकीत विजयी झाले नाही. याचा अर्थ असा की ज्याच्याकडे पैसा कोट्यावधी रूपयात खर्च करण्याची ताकत आहे तोच उमेदवार निवडून येऊ शकतो.

या १५व्या लोकसभा निवडनुकीकरीता जे उमेदवार उभे आहेत त्यांची एकूण मालमत्ता ७०० कोटीपेक्षाही जास्त आहे. सर्वांनी भरभरून आश्वासने देली आहेत पण कोणीही दानशूर स्वःतच्या पैशावर नाही, जे काही करणार आहेत ते जनतेच्या कररूपी पैशातून. एकाही उमेदवाराने देणगी जाहीर केली नाही. कोणीही अनाथ संस्थांना मदत दिली नाही. देशाला मदत केली माही.

आकडेवारी सांगत आहे - कॉग्रेस पक्षात ४५, भाजपत ३०, बसपात २३, तर अपक्ष २२ उमेदवर करोडपती आहेत. एवढी मालमता कोठून जमवली हे कोणीही जाहीर केले नाही. यात आयकर विभाग काय करत आहे? त्यांना चौकशी करता येत नाही? त्यांना हे पाहता येत नाही का की या उमेदवारांवर जबाददार्‍या किती आणि यांच्याकडे मालमत्ता किती. कोणीतरी न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली पाहिजे.

मागील निवडणुकीत राहुल गांधींनी मागील निवडणुकीत ६२.३५ लाख रूपयाची मलमत्ता जाहीर केली होती तर यावर्षी त्यांनी २.३३ कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. शरद पवारांनी ८.७ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे, कोण विश्वास ठेवेल. खरंच पवार साहेब विनोद करतात.गंमत तर पुढेच आहे, त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी ५२.७६ कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

एक जळजळीत सत्य - देशातील ७७ टक्के लोकांचे रोजचे सरासरी उत्पन्न केवळा २० रूपयेअआहे तर लोकसभेतील ३५ टक्के लोकप्रतिनीधी कोट्याधीश आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये राहून निवडणुक लढविणारा उमेदवार निवडून आला की पाच वर्षाच्या आत आलिशान बंगला उभा करतो.  

मी माझ्या मनातील कप्पा रिता करीत होतो,

कारण तू येण्याचे वचन दिले होतेस,

वसंत्तात येण्याचे,

हळूवर मंद चाफ्याच्या सुगंधतून,

अल्लड बागडणार्‍या फुलपाखरातून,

गजगामिनीच्या चालीने,

नागीण वेणी डौलाने झुलवत,

मोगर्‍याचा गजरा माळून,

वसंतातील उन्हातून आल्यावर,

लालीलाल गालामधून,

सुंदर राजहंसी दंतपंक्तीतून,

आणि काय सांगू,

माझ्या हृदयाच्या मखमली पायघडीवरून,

तू येणार म्हणून माझे वाट पाहणे,

चातकाला लाजवीत होते,

माझी आर्त हाक जाणवून,

मदन मदनबाण मारायचा विसरला,

आतातरी तू ये,

तुझ्या येण्याच्या चाहुलीने,

हृदय थांबू दे,

म्हणजे ते वाट पाहणे नको,

कप्पे रिते नकोत,

मदनाला आपले काम करू दे,

आणि असे प्रेमवीर घायाळ होऊ देत.

सर्व वेलींवर फुले फुलू देत,

न फुलण्याचे पाप मला नको.

"देशाचा पंतप्रधान मुस्लिम झाल्या शिवाय मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाहीत" हे तारे तोडलेत जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी.निवडणुका जवळ आल्या की यांना मुस्लिमांबद्दल कळवळा येतो. जणू काही मुस्लिम मतदार आता यांच्या इशार्‍यावरच मतदान करतात. आता मुस्लिम मतदार सुद्धा विचार करू लागलेत. जे मुस्लिम राज्यकर्ते त्यांच्या देशात मुस्लिमांचे भले करू शकले नाहीत, ते इथे हिंदू राष्ट्रात काय भले होणार आहेत?  सध्या बेताल. मनाला येईल तशी खळबळजनक विधाने करण्यात सर्वजण निपुण झालेले आहेत. सर्वजण फुकटची प्रसिद्धी मिळवतात आणि त्यांना महत्व देतात चॅनेलवाले. कारण अशा बातम्यांवरच तर त्यांचे पोट अबलंबून आहे मग ते तरी बिचारे काय करणार?

आता याला शिवसेनाप्रमुख, नरेंद्र मोदी, राज ठाकरे सडेतोड उत्तरे देतील, पण तोंडसुख घ्यायला निमीत्त मिळाले ना. कोणत्याही धर्माचा नेता सत्तपदावर बसला म्हणून त्या धर्माचे भले होते हा विचार केव्हाच बाद झालाय. राजकारण्याला जात धर्म नाती नसतात, त्याला फक्त दिसत असते ती खुर्ची, मग तो कुणाचीही पर्वा करीते नाही. महाराष्ट्रावर मुस्लिम मुख्यमंत्री होते तेव्हा काय मुस्लिमांचे भले झाले. तीन राष्ट्रपती मुस्लिम होते, त्यांनी तोंड तरी उघडले काय? अस्स्ल राजकारणी मतांसाठी जातीचे राजकारण करतो, पण खुर्ची मिळाल्यावर खुर्चीचे राजकारण खेळतो, जात पात सर्व विसरतो.

देशात बहुसंख्य मंत्री संत्री हिंदू आहेत म्हणून काय भारतात हिंदूंचे भले झाले आहे काय? मायावतींनी दलीतांचे भले केले आहे काय? शाही इमामांना असे वाटत असेल की राजकारणी मुस्लिमांची मते मागायला त्यांच्या कडे येतील, तर तो त्यांचा भ्रम आहे.

मुस्लिम राष्ट्रात मुस्लिम अधिकारी पदावर असतात म्हणून काय तेथील जनता सुखी आहे, उलट भारतातले मुस्लिम जास्त सुरक्षित आणि सुखी आहेत.पाकिस्तानातील मुस्लिमांचे काय हाल आहेत, तालिबानचे भूत कसे डोक्यावर बसले आहे, हे इमामांना माहित नाही काय?

मुशर्रफ, भुत्तो, आयुबखान, याह्याखान, झरदारी, नवाज शरीफ यांची कारकीर्द धर्माच्या पायावरच उभी होती ना? आता त्या देशातील राजकारण धर्माभोवतीच केंद्रीत झाले असताना सुद्धा तेथील मुस्लिमांची दुरवस्था का आहे? विचारा पाकिस्तानातल्या आणि भारतातल्या मुस्लिमांना कॊणाची परिस्थिती चांगली आहे ते.

लक्षात घ्या विचार सर्व समाजाचा, नागरिकांचा त्यांच्या प्रश्नांचा, प्रगतीचा असतो. जात, धर्म, संघटना, संप्रदाय, यांचा नसतो.

कधीही नसतो.

भारतात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारांना अर्ज भरतांना मालमत्ता जाहीर करण्याचे बंधन आले. त्याप्रमाणे उमेदवारांनी आपले उत्पन्न जाहीर केले. पण गंमत अशी की, सर्व कोटीच्या कोटी उड्डाने आहेत. कोणीही लाखाच्या घरात नाही. विनोदाचा भाग म्हणजे काही उमेदवारांकडे कोट्याने संपत्ती आहे, पण त्याच्याजवळ गाडी नाही, का? तो गाडी घेऊ शकत नाही. पण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

निवडणूक आयोगाने जसे संपत्ती जाहीर करण्याचे बंधन घातले, त्यापेक्षा जास्त महत्वाचे त्या संपत्तीचा स्रोत जाहीर करण्याचे बंधन असायला पाहिजे. कोठून एवढी मालमत्ता गोळा केली हे पाहिले पाहिजे. यातील काही उमेदवारांकडे तर पॅन कार्ड सुद्धा नाहीत. मग ते टॅक्स भरतात काय असा प्रश्न निर्माण होतो.

हे उमेदवार जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध करतात, अगदी जणू काही सर्व फुकटच मिळणार आहे. त्यांचे काय जाते? सर्व बोजा शेवटी जनतेवरच येणार आहे ना. हे उमेदवार काय खिशातून घालणार आहेत. एका तरी उमेदवाराने आपल्या संपत्तीतील काही वाटा देशासाठी जाहीर केला आहे काय? कोणीतरी देणगी जाहीर केली आहे काय? कोण असे म्हणाले आहे काय की, मी माझ्याकडील दहा कोटी बॅंकेत ठेऊन त्यावरील व्याजापोटी काही गरीब मुलांचे शिक्षण करतो.

ज्यांनी जी संपती जाहीर केली त्यातील काही भाग देशासाठी देणगी देणे बंधनकारक ठेवावे. काही काही उमेदवारांकडे तर एवढी मालमत्ता आहे की, सर्व उमेदवाराची मालमत्ता एकत्रीत केली तर भारताचे दारिद्र्य दूर होईल. जे पक्ष जाहीरनामे जाहीर करतात त्यांच्याकडून अनामत रक्कम ठेउन घ्यावी. आणि त्यातून वचने पूर्ण करून घ्यावीत.     

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अल्पवयात १८व्या वर्षी समाधी घेतली. महाराजांनी लोकांना गीता समजत नव्हती म्हणून तिचे प्राकृत भाषेत भाषांतर केले, आणि लोकांना गीता समजली. याच ज्ञानेश्वरीवर आज भलेभले व्याख्यान, प्रवचन देतात पण संपत नाही. अहो, हे फक्त प्रवचन देतात पण त्यांना गीता समजलेलीच नाही. गीता समजून आत्मसात करून दिलेले प्रवचन लोकांच्या आत्म्यापर्यंत जाऊन भिडेल.

गीतेचे भाषांतर करताना महाराजांना संस्कृत येत होते का असा प्रश्न पडतो.  वयाच्या  सोळाव्या वर्षी महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली, त्या आधी ते तीन वर्षे ज्ञानेश्वरी लिहीत होते. शिवाय त्या भावंडांना ब्राम्हण समाजाने वाळीत टाकल्यावर त्यांना काशीला जावे लागले, इथे महाराष्ट्रात झगडावे लागले मग त्यांनी आपले संस्कृतचे शिक्षण कोठे पूर्ण केले असेल असा प्रश्न पडतोच ना? त्याच्या चरित्रात त्यांनी कोठेही गुरूकुलात शिक्षण घेतल्याचा उल्लेख नाही. जाणकारांनी स्पष्ट करावे.  

असो तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहील्यावर समाधी का घेतली कारण त्यांना गीता पूर्णपणे समजली होती. मग त्यांना दिव्य ज्ञान झाले की, हे सर्व जग मिथ्या आहे, हे जीवन निरर्थक आहे. गीतेतील तत्वज्ञान त्यांना अचूक समजले, आणि त्यांनी समाधी घेतली. आजकाल एवढे स्वतःला संत महात्मा म्हणवून घेणारे  स्वयंघोषीत आत्मे यांना गीता ज्ञानेश्वरी समजलेलीच नाही, असे म्हणावे लागेल, नाहीतर यांनी सुद्धा ज्ञानेश्वरांचा मार्ग आचरला असता. म्हणून प्रथम यांनी, आधुनिक महात्म्यांनी, गीता ज्ञानेश्वरी समजून घ्यावी, आणि मगच त्यावर भाष्य करावे.

भारतत निवडणुका जाहीर झाल्या आणि एकच गडबड. सगळे अगदी बांशिंग बाधून बोहल्यावर चढले. पाच वर्षे मतदारांना न ओळखणारे अच्च्नक ओळख दाखवू लागले. सर्व पक्षांनी आपापली जाहिरनामे, वचननामे जाहीर केले. पक्षात जाणकार जुने जाणते नेते मंडळी असतात, पण त्यांना एवढे साधे समजू नये की, मतदार आता कोणत्याही भूल थापांना फसणार नाहीत ते.

कॉंग्रेसने तीन रूपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले, तर लगेच भाजपाने दोन रूपये किलोचा भाव लावला. आता दुसर्‍या पक्षाने  एक किलोचा भाव लावावा. मग दुसरा पक्षतर पैसेच घेणार नाही, फुकट घरी अन्न धान्य. मतदारांना आता काम करायची गरजच काय? सगळं आयतं म्हणल्यावर कोण काम करेल. मग त्यांना काय काम उरणार, पाठवा मग सैन्यात, लढू द्यात तालीबानींशी, अतिरेक्यांशी. जर सगळम कसंफुकट तर शिक्षणा तरी कशासाठी?

कसे राजकारणी लोकांना आळशी बनवतात ना?

कोणीही मागील वचननामा दाखवून त्याप्रमाणे काम केले काय हे बोलत नाही. आणि मतदार तरी जुना मागील वचननामा लक्षात ठेवतात काय?

आर्थिक मंदीवर कोणी बोलत नाही, कायदा सुव्यवास्थेबद्दल कोणी बोलत नाही, स्त्रीयांच्या प्रश्नाबद्धल अवाक्षरही नाही, शेतकरी आत्महत्या करतात याचे कोणाला दुःख आहे काय?

हे जे वचवनामे आहेत ना हे कोर्टात जाऊन शपथपत्र, न्यायधीशासमोर करायला पाहिजेत आणि जर त्याप्रमाणे काम केले नाही तर त्या त्या निवडून आलेल्या उमेदवाराला सजा दंड ठोठावला पाहिजे, आणि त्याने दर वर्षी तसा अहवाल न्यायालयात सादर करायला पाहिजे. मगच असले निरर्थक वचननामे जाहीर करताना जरा तरी लाज बाळगतील.

भारताची लोकसंख्या जास्त असल्याने, विवाहही त्याच प्रमाणात होतात, पण भारतीय लोक नोंदणीबाबत मात्र टाळाटाळ करतात. सर्वोच्च न्यायालयाने विवाह नोंदणी संपूर्ण देशात सक्तीने लागू करण्याचा आदेश दिला आहे. मात्र कोणीही याचे तंतोतंत पालण करताना दिसत नाही. लग्न धुमधडाक्यात करतील, पण नोंदणी करणार नाहीत. कारण त्याचे महत्वच कित्येकांना माहिती नाही. नोंदणीचे महत्व समजावून सांगायला पाहिजे.

विवाह नोंदणीमुळे अनेक समस्यांतून सुटका मिळू शकते. मुख्यतः स्त्रियांना याचा जास्त फायदा होतो. बदलत्या जमान्यात स्त्रियांना याचा जास्त फटका बसतो. नवर्‍याच्या मृत्युनंतर  जेव्हा वाटणीचा भाग येतो, तेव्हा नोंदणीप्रमाणपत्रच कामाला येते. शहरी भागात सुद्धा या बाबत उदासीनता दिसून येते, तर ग्रामीण भागात याचे महत्व माहित नसते, आणि लोकांना वाटते, नको तो वैताग. या गोष्टी सजा आणि दंडात्मक कारवाई केल्याने साध्य होणार्‍या नाहीत, यासाठी प्रबोधनच पाहिजे.

आता कुठे लोकांना जन्म-मृत्यु दाखल्याचे महत्व कळू लागले आहे. कारण त्याचा फटका किती बसतो हे लोकांनी अनुभवले आहे. तरीही लोक वेळेवरच जागे होतात. ज्या समाजात बहुपत्नीत्व आहे, त्या समाजातील महिलांना तर हा कायदा म्हणजे वरदान आहे. मुस्लिम समाजात तर काजी वहीत नोंद करतो आणि ख्रिश्चन समाजात चर्चमध्ये पाद्री नोंद करतो, तशी काहीतरी सोय हिंदू धर्मातही पाहिजे, विवाह कार्यालयात तशी सोय करता येईल.

बदलत्या काळात घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊ लागली आहे, सबब महिलांना मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे, तेव्हा मुलामुलींच्या पालकांनीच पुढाकार घेऊन विवाह नोंदणी करून घ्यावी, मुलांना प्रोत्साहित करावे.  अन्यथा महिलांना पत्नीत्व सिद्ध न करता आल्याने अनेक हक्कांवर पाणी सोडून हात चोळत बसावे लागते.न्यायालयात पती विवाह झालाच नाही म्हणून अंग झकटतो. महीलांची जी प्रतारणा केली जाते त्याचे या नोंदणीमुळे निवारण होते.दिल्ली सरकारणे असे न केल्यास एक वर्षाची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे, आणि तो  योग्य आहे. असे सर्व राज्यांनी कायदे करावेत.

हे आहेत श्री. सोमनाथ चटर्जींचे संतप्त उद्‌गार -

http://beta.esakal.com/2009/02/19214512/somnath-chatarjee-angry-with-m.html

नवी दिल्ली - सभागृहाचे कामकाज सुरू होताना लोकसभा सदस्यांचा गोंधळ आणि त्यांना आवरण्यासाठी शाब्दिक छडी उगारून तयार असलेले "हेडमास्तर' सोमनाथदा हे चित्र नेहमीच दिसणारे. परंतु, आज एकाचवेळी भाजप, बसप, तेलगू देसम, तमिळनाडूतील खासदार असा सर्वपक्षीय गोंधळ झाला. वारंवार सांगूनही खासदारांनी कामकाज रोखून धरले होते. या लाजिरवाण्या प्रकारामुळे सोमनाथदांची उद्विग्नता टोकाला पोहोचल्याने अखेर, "तुम्ही निवडूनच यायला नकोत. तुम्ही जनतेचा विश्‍वासघात करीत असल्याने जनताच तुम्हाला धडा शिकवेल', असे कडक शब्दांत फटकारीत त्यांना कामकाज तहकूब करावे लागले.

 

जेव्हा संसद कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, शी, सोमनाथ चटर्जी, संतापतात तेव्हा, कल्पना करवत नाही की, खासदारांनी संसदेत किती भयंकर गोंधळ घातला असेल ते. हे खासदारांनो, आम्ही भारतीय जनता तुम्हाला कशाला निवडून देतो, संसदेत गोंधळ घालायला? अरे, तुम्ही आमचे प्रश्न सोडवावेत. भारताअच्या सुरक्षेची काळजी करा. मंदीची लाट आलेली आहे, त्यावर तोडगा काढा. गरीबी कशी हटवता येईल त्यांवर चर्चा करा. तुम्हाला परत निवडून देणे म्हणजे मुर्खपणाच ठरेल. पण नवीन जे येतील त्यांची काय कथा. ते सुद्धा असेच वागणार.

भारतीय राज्यघटनेत एक दुरूस्ती जरूरी आहे, जनतेला आता हक्क पाहिजे की बहुमताने त्या लोकप्रतिनीधीचे पद धोक्यात तेच मतदार आणू शकतील. किंवा त्यांनी काहीही गैरवर्तन केले की त्यांची उचलबांगडी झाली पाहिजे. कारण लोकप्रतिनीधींना आता, एकदा निवडून आल्यावर ह्टविण्याचा कायदा नाहिये. म्हणून त्यांना निवडून आल्यावर मस्ती येते.

ही बातमी पूर्ण वाचा.

दैनिक सकाळ मध्ये छापून आलेले एक पत्र -

स्त्री व पुरुष किंवा तरुण - तरुणी यांना परस्परांविषयी प्रेमभावना निर्माण होणे, ही वास्तविक निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे - जी माणूस टाळू शकत नाही. कारण तो निसर्गाच्या प्रभावाखालीच असतो. या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होणे हे जितके गैर आहे, तितकेच ती संयमाने व्यक्त करण्याचे मार्ग बंद करुन एकूणच ती भावना दडपणे, हे त्याहून गैर आहे. ' व्हँलेंटाइन डे ' ला मुला - मुलींनी एकमेकांना फूल वा भेटवस्तू देऊन मनातील मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा हा मार्ग निश्चितच सभ्य आणि उच्च अभिरुचिदर्शक आहे. अगदी होळीला तरुण - तरुणींनी एकमेकांच्या अंगाला रंग फासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य आहे. ज्या वयामध्ये एकमेकांविषयीच्या आकर्षणाची निसर्गतः सुरवात होते, त्या वयाच्या तरुण मंडळींची ही प्राथमिक गरज आहे. म्हणून तरुण मुलामुलींना हा साधा आनंद घेऊ द्यावा. जर दहशतीने, हिंसेने या भावनेचे प्रकटीकरण आपण बंद पाडू लागलो तर दुसर्‍या मार्गाने चोरुन, नजर चुकवीत तरुण मंडळी हे प्रयत्न करीत राहतील. मग ते नैतिक आहे का ? पुण्या - मुंबईसारख्या शहरात, जिथे पालक नोकरीमुळे जास्त व्यस्त आहेत तिथे ' सहलीला जातो सांगून एक दिवस एक रुम शेअर करुन राहणे ' असे मार्ग काही जण अवलंबितात. ' व्हँलेंटाइन डे ' सुद्धा जर त्यांच्यापासून हिरावून घेतला, तर मग ' रुम शेअर ' करणे हाच पर्याय तरुणांसमोर राहील आणि ती संख्या वाढीस लागेल. खरे तर मनात असणार्‍या राग व प्रेम या उद्रेकी भावनांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने निचरा होण्यानेच माणसाची त्या विकारातून मुक्तता होत असते आणि मनःस्वास्थ्य स्थिर राहते. मग असे मानसिक ' फिटनेस आणि हेल्थ ' जपणारे योग्य व सौम्य मार्ग संस्कृतीच्या सवंग किंवा चुकीच्या कल्पनांनी का बरं रोखून धरायचे ? त्यापेक्षा ' व्हँलेंटाइन डे ' चे मूळ स्वरुप तसेच ठेवून, त्याला ' भारतीय टच ' दिला तर ? ज्यांना ज्या प्रकारची प्रेमभावना व्यक्त करायची आहे, त्या रंगाचे फूल दुसर्‍याला देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळणे म्हणजे ' व्हँलेंटाइन डे. असा तो दिवस आपण भारतीय करुन घ्यावा.  ' व्हँलेंटाइन डे ' ला विरोध असणार्‍यांनी तो दिवस बंद करण्यापेक्षा बदलण्याचा प्रयत्न करावा.
मंगला सामंत, पुणे.

या पत्रात किती मार्मिक समाचार घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्वच दिवसांकडे पाहण्याची आज गरज आहे. राजकारणी मंडळी त्यांव्या स्वार्था साठी कोणालाही वेठी्स धरत्तात. शालाशाळांमधून ग्रुप स्थापन करून त्याला राजकीय रंग देतात. नवरात्रात, गणपतीत मिरवणुका काढतात. त्या मिरवणुका कोण आणि कशाप्रकारे आयोजित केल्या जातात, त्यात मुलामुलींचा काय सहभाग असतो, हे आता उघड गुपीत आहे. मग व्हॅलेम्टाईन डे ला विरोध का? कोणी तो साजरा केल्या शिवाय राहणार आहेत का? नवरात्रात गरबा खेळल्यानंतर रात्री मुलेमुली कोठे जाता याचा कोणी तपास केला आहे काय? रोज पेपरमध्ये मुलामुलींच्या खरेदीची छायाचित्रे छापून येतात, त्यात मुलामुलींचा उत्साह दांडगा दिसतो.

भारतात लोकशाही असताना, कोणी कोणता सण साजरा करावा, कोणी कशात आनंद घ्यावा हे सांगणारे, हे सवंग पुढारी कोण? जर कोणा मुलामुलीची तक्रार नसेल तर कोणी का आक्षेप घ्यावा. यात कोणताही अश्लीलपणा डोकावत नाही, शेवटी कोण कोणत्या नजरेने पाहतो, कोणात काय विकृती आहे, हे कोण सांगणार, आणि ते लोक त्याप्रमाणेच कृती करणार.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना ’भारतरत्न’ सन्मान, जो भारतात सर्वोच्च आहे, दि.१०-२-२००९ रोजी प्रदान करण्यात आला, त्यांच्या राह्त्या घरी, कारण त्यांची प्रकृती ठीक नसते, म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी तशी विनंती केली होती.

भारताच्या राष्ट्रपतींकडे जे सल्लागार आहेत, त्यांच्या बुद्धीची कीव येते, भारतरत्न पुरस्कार कोणी प्रदान करावा तर, केंद्रीय गृह विभागाचे अतिरिक्त सचिव ए. एफ. अहमद अणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते.

खरे पाहता हा  पुरस्कार रा्ष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देऊन त्याचा सन्मान वाढवायला पाहिजे होता. पण सरकारच्या अकलेच्या दिवाळखोरीचे काय वर्णन करावे. त्या महान गायहाची आणि त्या महान पुरस्काराची तरी लाज ठेवायला पाहिजे होती, त्यांना काय लायकी आहे की नाही? सर्वसामान्य दर्जाचा सचिव एवढा मोठा मानाचा पुरस्कार देतो, म्हण्जे त्या महान गायकावा, पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रात अग्रलेख आले पाहिजेत, आमदा खासदार जनतेने आवाज उठवला पाहिजे. राष्ट्रपतीभवनातून राजशिष्टाचाराचे कारण पुढे करण्यात आले. हे काय कारण झाले.बोरिवलीतील विपश्यना पॅगोडाचे उद्‍घाटन करण्यास, पुण्यातील रुग्णालयाच्या उद्‌घाटनाला त्या जाऊ शकतात, तेव्हा राजशिष्टाचार आडवा येत नाही काय?

महाराष्ट्राला देश पातळीवर किंमत दिली जात नाहे एवढे मात्र खरे.

भारतात निवडणुका जवळ आल्या की, पक्षा पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू होतात. दुसरा पक्ष कसा वाईट, कसा फसवतो हे गळा काढून सांगितले जाते, पण आपल्या पक्षाने मागील पाच वर्षात काय दिवे लावले, याकडे मात्र काणाडोळा केला जातो. भाजपने पुन्हा एकदा रामनामाचा जप चालवला आहे, आता जनता त्यांना फसणार नाही. नरेंद्र मोदी म्हणतात, कॉंग्रेसच्या घराणेशाही पासून सावध रहा. आता घराणे शाहीचा विचार केल्यास सगळ्यांनीच वारसांना भारत सोपवला आहे. सर्वजण आपल्या नातेवाईकांना राजकीय वारस बनवत आहे. शिवसेनेत काय झाले, पुत्रप्रेमापोटी काही अप्रिय निर्णय घेतले गेले, आणि आज मनसेचा उदय त्यातूनच झाला ना?

घराणेशाही कशी रूजत गेली पहा -

पं..जवाहरलाल नेहरू - इंदिरा गांधी - राजीव गांधी - सोनिया गांधी -   राहुल गांधी.  शरद पवार - अजित पवार - सुप्रिया सुळे.  सुनील दत्त - प्रिया दत्त.  वसंतदादा पाटील - नातू प्रतीक पाटील.  बाळासाहेब ठाकरे - उद्धव ठाकरे.  विलासराव देशमुख - अमित देशमुख.  पतंगराव कदम - विश्वजीत कदम.  मुरली देवरा - मिलींद देवरा.  छगन भुजबळा - पंकज भुजबळ.  नारायण राणे - निलेश राणे.  प्रमोद महाजन - भार्या पूनम महाजन.  गोपीनाथ मुंडे - कन्या पंकजा मुंडे.  गणेश नाईक - संजीव नाईक.

ही काही उदाहरणे. स्थानिक पातळीवरची यादी अजून कितीतरी मोठी होईल. या सर्वांची भविष्यातील राजकीय कारकीर्द उज्ज्वल होवो, ही सदिच्छा.

भारतात असा कायदा आहे का? की वारसांनी लोकप्रतिनिधी होऊ नये. सर्वात जास्त मक्तेदारी गाजवली ते नेहरू-गांधी घराण्याने. आताशी चित्रपटसृष्टीतही नट नट्यांची मुले मुली हक्काने तुटका फुटका अभिनय(?) करतातच ना? राजकारण तरी काय?, अभिनयाला तर इथे महत्व आहे. चित्रपटात तरी कॅमेर्‍यासमोर अभिनय करावा लागतो, त्याला टेक रिटेक असतो, पण राजकारणात Live अभिनय करावा लागतो, याला जास्त चातुर्य लागते.  

मतदार राजा, आज तू जरी मतदान न करता वैतागून घरी बसलास तरी, कोणी तरी निवडून येणार  आहे आणि तुझ्या माथी पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे. आज पाया पडणारे उद्या पायाखाली चिरडणार आहेत.

महाभारतात श्रीकृष्णाने म्हणल्याप्रमाणे, " यदा यदा ही धर्मस्य", आपण सर्वजण उद्धारकर्त्याची वाट पाहू यात.  

लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. घरोघरी उमेदवार मते मागण्यासाठी येतील, मागील सर्व विसरून मतदारही त्यांच्या, आश्वासनांना बळी पडतील. पण देश चालविणॆ, ही एक प्रकारची जबाबदारीच आहे, मग त्यासाठी लायक उमेदवार नको का? अगदी छोट्याशा नोकरीसाठीही काही निष्कर्श लावले जातात, तर या उमेदवारांसाठी नको का?

सर्वप्रथम वयाची अट महत्वाची आहे. काही ठराविक वयानंतर माणसाची निर्णयक्षमता कमी होते. विस्मरणाचा त्रास होतो. ज्याप्रमाणी सरकारी कर्मचार्‍याचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे असते त्याप्रमाणे उमेदवारला वयाच्या ५८व्या वर्षानंतर उमेदवारीस परवानगी नसावी. मुंबई बॉम्बस्फोट होऊन तीन महिने होत आले तरी, पाकिस्तानवर दबाव आणला जात नाही, ठोस निर्णय होत नाही, याचे कारण संसदेत सर्व मंडळी आयुष्याच्या उत्तरार्धात आहेत.

शिक्षण सर्वच क्षेत्रात जरूरीचे आहे, जर लोकप्रतिनिधी शिकलेला असेल तर, बाकी जगाशी संपर्कात राहू शकतो. शिवाय शिक्षणाने, माणसाला सत्य असत्याची चाड राहते. भारतात अनेक भाषा असल्याने, काही काही उमेदवारांना स्थानिक भाषेशिवाय अन्य कोणतीही भाषा समजत नाही, मग संसदेत कामकाज हिंदी अगर इंग्रजीत चालले असताना, हे लोक मखखपणे बसलेले असतात. तेव्हा उमेदवार कमीतकमी ग्रॅजुएट तरी असावा. शिक्षणाची अट महत्वाची आहे. शिवाय त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी एक समिती नेमावी, आणि त्या समिती समोर उमेदवाराने चाचणी द्यावी. यात उमेदवाराचे सामान्यज्ञान, घटनेतील तरतुदी, जगातील घडामोडींचे अद्ययावत ज्ञान, निर्णयक्षमता याची चाचणी घेण्यात यावी. या समितीत मानसोपचारही डॉक्टरही असावा.

ज्याप्रमाणे पासपोर्टसाठी पोलीस रिपोर्ट जरूरी आहे, त्याच प्रमाणे उमेदवारासाठीही ती तरतूद असावी.

उमेदवारचे चारित्र्य तपासावे, तशी त्याच्याकडून हमी घ्यावी. नव्हे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे. मागील पाच वर्षात वर्षात काय कार्य केले त्याचा तपशील मागावा. उमेदवार किंवा पक्ष जी आश्वासने देतो, त्याचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे, आणि नंतरच्या निवडणुकीच्या वेळेस तसे न घडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा.  आणि पुढे आयुष्यभर त्याला अपात्र ठरविण्यात यावे. त्यासाठी वेगळा कायदा करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने करावी.

भारतात आधुनिक रामायण, महाभारत घडवणारे हे लोकप्रतिनीधीच असतात.

भातरीय लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ तीन - निष्पक्ष राष्ट्रपती, भ्रष्टाचाररहित न्यायालये, पारदर्शी निवडणूक आयुक्त कार्यालय आणि सुजाण मतदार. न्यायालयात  भ्रष्टाचार चालतो, हे आता गुपीत राहिलेले नाही. कर्मचार्‍यांच्या निवॄत्तीवेतनाच्या रकमेची चौकशी सी.बी.आय. न्यायधीशांविरूद्ध करीत आहे त्याचे पुढे काय झाले? आमदार खासदार अथवा कोणीही लोकप्रतिनिधी निष्पक्ष आणि परिणामकारक पध्दतीने निवडून आला पाहिजे, याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते, पण आता तर त्या तिघा आयुक्तांतच सुंदोपसुंदी चालू आहे, आणि लोकसभेच्या निवडणूका तीन महिन्यांवर आलेल्या आहेत, तेव्हा निवडणूका पारदर्शी, निष्पक्ष होतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

भारतातील निवडणूक आयोग त्रिस्तरीय असून, एक मुख्य आयुक्त, आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात. मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांची मुदत २० एप्रिल पर्यंतच आहे, त्यानंतर अन्य दोन आयुक्तांमधून एक जण मुख्य  निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळेल. पण मुख्य निवडणूक आयुक्तांनी नवीन चावला या तिसर्‍या आयुक्तांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आणि त्यांना हटविण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस केली.आता सामान्य माणसाने काय विचार करावा?

नवीन चावला हे कॉंग्रेसला पोषक आहेत कदाचित् म्हणून कॉंग्रेस व त्याचे मित्र गोपालस्वामींची कृती पक्षपाती असल्याचे सांगतात.

निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक कार्यालयात असे घडत असेल तर निवडणूका पोषक वातावरणात पार पडतील? देशहीत साधले जाईल?

निवडणूक आयुक्त टी. एन‍. शेषन आठवतात, त्यांनी आचारसंहीता म्हणजे काय, याची ओळख मतदारांना करून दिली, आणि पक्षांची तसेच उमेदवारांची धाबी दणाणली. टी. एन‍. शेषन यांनी आयोगाला महत्व आणि आयोगाच्या मर्यादा स्पष्ट करून दिल्या. कित्येकांना तोपर्यंत निवडणूक आयुक्त असतात हे सुद्धा माहित नव्हते. सरकारला शेषन जड वाढू लागले. तेव्हा सरकार त्यांच्या खच्चीकरणाचे उपाय शोधू लागले. आणि त्यांना वेसन घालण्यासाठी त्रिसदस्य आयोग अतित्वात आला. आणि नंतर एकमेकांना पाण्यात पाहायला सुरूवात झाली, आणि आज हे महाभारत समोर आले.

भारत जागतीक महासत्ता होण्याचे स्वप्न एकीकडे बघत असताना निवडणूक आयोग आणि न्याययंत्रणा या संस्था डळमळीत होऊ लागल्या आहेत, याची भिती  वाटत  आहे. सगळे वातवरण गोंधळाचे आहे. या सर्व अंधूक आणि धूसर वातावरणात बिचारा मतदार स्वतःचे मत हरवून बसला आहे.    

’मराठा आरक्षण’ या विषयावर सद्या जोरात चर्चा चालू आहे.विशिष्ट हेतू विचार बाळगून मागासवर्गासाठी आरक्षण निर्माण झाले. मग आरक्षण असेल तर कमी मार्क असतानासुद्धा शिक्षण मिळते, हे हेरून मागासवर्गीयांनी अभ्यास करण्याचे सोडून दिले, म्हणून पिढ्यान्‌पिढ्या आपण मागासवर्गीयात अशिक्षितांची फळी निर्माण केली. आता मराठ्यांना आरक्षण पाहिजे. हे भूत त्यांच्या डोक्यात कोणी घुसवले, तर या राजकारण्यांनीच ना? या आरक्षणामुळे भारतीय समाजात दुफळी माजते. आरक्षणामुळे माणूस आपली जात शोधतो. मग त्यात खोटेपणा येतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे दलीतांना सवर्ण त्रास देत हे कबूल, त्यांना आरक्षणाची गरज होती, पण आता त्याचा फायदा घेऊन ती मंडळीही गब्बर झालीत. तेव्हा आता हा आरक्षणाचा कायदाच रद्दबातल ठरवला गेला पाहिजे.

ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला फळ मिळाले पाहिजे. कमी कष्टात मागासवर्गीय चांगल्या मोठ्या हुद्द्यावर नोकरी पटकावतो, आणि सवर्ण त्याच्या हाताखाली नोकरी करतो. आरक्षण नसणार्‍या विद्यार्थ्याने मरमरून अभ्यास करायचा, आणि कॉलेजात मात्र त्याच्या शेजारी आरक्षणावर प्रवेश घेऊन मागासवर्गीय त्याच्या शेजारी बसतो. पण मुळात शिक्षणात प्रगती कमी असल्याने तो मध्येच शिक्षण सोडून देतो हा भाग वेगळा. आता मरठ्यांना आरक्षण देऊन त्यांचीही हीच परिस्थिती होणार आहे. आज मराठे मागतात, उद्या सर्वच मागतील, मग ओपन कोणाला ठेवणार?

ब्राम्हणांनी कधीही आरक्षण मागितले नाही, कारण ते बदलत्या काळाप्रमाणे बदलले. पण हजारो वर्षांपासून मराठ्यांनी शेती सोडली नाही.पावसाळ्यात शेती आणि उरलेल्या हंगामात मुलूखगिरी. शिवाय मराठ्यांनी भाउबंदकी, पेटत ठेवली. बदलत्या जगाकडे लक्षच दिले नाही. शहाण्णवकुळींनी आपली कुळीच जपण्यात हयात खर्ची पाडली.

स्वाभिमानी मराठ्यांनो, आरक्षणाच्या कुबड्यांचा आधार सोडून द्या. असं का म्हणता आपण हलके आहोत. आरक्षण घेताना हिंमत हारावी लागते.आज तुम्ही आरक्षण घेताल, पण भविष्यातील पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. उद्या अशी परिस्थिती येऊ नये की, मागासवर्गीय आरक्षण धुडकाऊन देतील.

आम्हाला हे कसे कळत नाही की, जाती पातीच्या भिंती हे राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी उभ्या करताहेत.

जात मागासलेली नसते, लोक मागासलेले असतात. म्हणून सवलती लोकांना द्या जातीला नको. श्रीमंत मागासवर्गियाला आरक्षण नको, फायदे नकोत, तर गरीब उच्चवर्णियाला आरक्षण द्या.

काल दि.५ फेब्रुवारीला दैनिक ’पुढारी’ मधील एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले, ती बातमी अशी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या प्रशासनात दोघांना मंत्रीपदी नियुक्ती करून चूक केली असल्याचे मान्य केले. हे दोन मंत्री करासंबंधीच्या वादात अडकले असल्याने आपल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत अदथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत त्यंनी दोन सदस्यांना डच्चू दिला आहे.

कुठे अमेरिका आणि कुठे भारत. असे भारतात झाले असते? या दोन मंत्र्यांनी लगेच न्यायालयात धाव घेऊन मनाई आणली असती. मुळात असे झालेच नसते. गुन्हेगार तुरूंगातून निवडणूक लढवतात, जिंकून येतात. कर तर आपल्याकडे चुकवण्यासाठीच असतो. हे आपल्या कडे क्षुल्लक कारण झाले.

संजय दत्तचं, काय चाललंय. टाडा न्यायालयने त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावूनही तो बाहेरच आहे ना? त्याने सुप्रीम कोर्टाकडून जामिन मिळवला आहे, म्हणून तो बाहेर आहे, याचा अर्थ तो आरोपांतून मुक्त झालेला नाही. त्याच्या डोक्यावर सहा वर्षांची शिक्षा आहेच. घटनेतील कलम काय सांगते - ज्या व्यक्तीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली असेल त्याला न्यायालयाने शिक्षा दिलेल्या तारखेपासून सहा वर्षे आमदार किंवा खासदार होता येत नाही.

हे सर्व माहित असताना सुद्धा समाजवादी पक्ष त्याला उमेदवारी देत आहे. ज्यांनी संसदेवर हल्ल केला, त्यांच्यशी संबंध असलेला संजय आता त्याच संसदेत जाऊन लोकशाहीवर भाषण देणार. कर चुकवेगिरी तर फार लांबच.भारतात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, त्या गांधीजींच्या, गांधीगिरीचा आधार घेऊन संजय स्टार बनला. त्याच ग्लॅमरचा फायदा घेताना पक्ष त्याचे चरित्र पहात नाही.

कुठे अमेरिकेतील उदाहरण आणि कुठे भारतातील वास्तव.

हे असंच चालत राहणार, गुन्हेगार संसदेत जाणार, उजळ माथ्याने फिरणार. मग काय भविष्य असणार आहे. 

आधार - दैनिक पुढारी दि.५ फेब्रुवारी २००९   

फौजदारी आचारसंहितेत एकंदर ३४ दुरूस्त्या झाल्या. पैकी एका दुरूस्तीवर देशभरातील वकील संघटनांनी मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी कामकज बंद ठेवले होते. ती दुरूस्ती काय होती - सात वर्षापेक्षा कमी तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारच्या गुन्ह्यात पोलीसांनी तातडीने अटक न करता गुन्हेगारावर नोटीस बजावण्याचा पर्याय तपासाधिकार्‍याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर वकीलांचे म्हणणे न्यायाल्याचे अधिकार कमी होतात. यात न्यायालयाचे अधिकार कसे कमी होतात, याची चर्चा होत नाही. मुळात हा कायदा सरकारने घाईघाइने पास करावयास नको होता. यावर वकील, कायदेतज्ञ, पोलीस, सर्वसामान्य जनतेचे प्रतिनीधी, सामाजिक कार्यकर्ते यांची मते मागवायला पाहिजे होती. आरोपीला अथवा संशयिताला अटक करण्याच्या अधिकाराचा पोलीसांकडून गैरवापर होतो, अशा अनेक तक्रारी समाजाच्या विविध थरातून येत होत्या. पोलीसांच्या या वर्तनामुळे कदाचित‌ निरपराध व्यक्तींना त्रास होत असेल, पण पोलीसांना हे माहीत असते का? कोण चोर आणि कोण साव?

नेहमी आपण पाहतो पोलीसांची नेहमीच कुचंबणा होत असते. त्यांना राज्यकर्त्यांची मर्जी राखायची असते, त्यात पण राजकारणी इगो करत असतो, सामाजीक कार्यकर्ते, संस्था, मानवी हक्क सांभाळणारे  या सर्वांना तोंड द्यावे लागते. एखादा गुन्हा घडला की, पोलीसांच्या मागे गुन्हेगार लवकर पकडण्यासाठी, दबाव आणला जातो. सध्या गुन्हेगारी वाढत आहे त्याला आळा घालण्याचे काम पोलीसांचेच आहे. सामान्य लोकांच्या पोलीसांकडून फार अपेक्षा असतात, त्यातल्या त्यात ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो, तो तर आशेने पोलीसांकडे पहात असतो. त्यांना पोलीसांकडून धीराची अपेक्षा असते. जनता आणि गुन्हेगार यातला पहिला दुवा असतो, पोलीस. न्याय, न्यायालय, वकील नंतर. त्यामुळे पहिला आशेचा किरण असतो पोलीस.

महत्वाची गंमत म्हणजे, पोलीस जीवापाड मेहनत करून गुन्हेगारा विरुद्ध पुरावे गोळा करतात आणि सरकारी वकीलांच्या हातात देतात, मग न्यायालयात न्याय होतो तो सरकारी वकील किती चांगल्या प्रकारे बाजू मांडतो त्यावर. जर वकीलाला बाजू मांडता आली नाही तर, ताशेरे मात्र पोलीसांवर. या प्रक्रीयेतक काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे.

नवीन दुरूस्तीनुसार गुन्हेगाराला अटक न करता, नोटीस बजावण्याचा कार्यक्रम ठेवला तर,  तपास काम, मुद्देमाल हस्तगत करणे, पीडितांना धीर देणे पोलीसांना किती अवघड होऊन बसेल, याची कल्पनाच न केलेली बरी. सात वर्षांपेक्षा कमी सजा असलेले गुहे सुद्धा भयंकर असू शकतात. सोन्याचे दागिने चोरणार्‍याला जर अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले, तर नंतर पोलीसांचे काम अवघड होईल.

तेव्हा ही दुरूस्ती करण्याआधी अनुभवी, सिनीयर, रिटायर्ड पोलीस अधिकार्‍यांचे मत घेणे केव्हाही फायदेशीर राहणार आहे.

(वरील लेख माझ्या कुवतीनुसार लिहीलेला आहे, यात कुणाचा उपमर्द झाल्यास,अगर तसे वाटल्यास क्षमस्व.)

कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये जेवण वगैरे करून निघायला साधारण ११ वाजले असतील, विचार केला एक वाजेपर्यंत मुक्कामी पोचल्यावर झोप तरी होईल. वीस एक किलोमीटर आले नसेल, तर गडी रस्यातच आवाज करून बंद पडली. त्यावेळेस साडेबारा झाले असतील. सामसूम रस्ता काय करणार? उतरून काही प्रयत्न केला, पण गाडी चालू होईना. तेवढ्यात एकजण थांबला आणि त्याने चौकशी केली, आणि म्हणाला, जवळच छोटेसे गाव आहे तिथे म्हमद्याचं गॅरेज आहे, त्याच्याकडे जा म्हणजे तो काहेतरी करेल, तो राहतो तिथेच. इथे आडवाटेला थांबण्यापेक्षा आम्ही विचार केला, जाऊन तरी बघू . गावात तेवढेच सुरक्षीत.

आम्ही गाडी ढकलत गाव गाठले, इतक्या रात्री पण एकजण भेटला, त्याने गॅरेज दाखवले. आम्ही धाडस करून गॅरेजची कडी वाजवली, झोपेच्या डोळ्यानेच एका तरुणाने दार उघडले. आणि आमच्या मोटारसायकलकडे बघून त्याने ओळखले, आमचे काय काम आहे ते. तो म्हणाला," गाडी खराब झाली काय?" मी म्हणालो," हो" तर तो म्हणाला," बघतो, काय झाले ते, तुम्ही साहेब बसा, आणि ताईना आत पाठवा, थंडी आहे, आत बसतील, आपण शादीशुदा आहे, आपली बायहो आत आहे." पण आमची बायको ऐकेना, मला बाजूला घेऊन म्हणते," अहो, त्याला पहिले पैसे विचारा, कारण हे लोक, रात्रीची वेळ बघून लुटतात." मी म्हणालो," अरे, आता आपण कुठे जाणार. बघू काय होते ते." त्या म्हमद्याने गाडी तपासली आणि म्हणाला,"साहेब, टाकीत कचरा असेल. त्यामुळे गाडी बंद पडती आहे, शिवाय प्लग साफ करावा लागेल. पेट्रोल कदाचि‍त्‌ पुढे चालणार नाही." आता बायको तावातावाने मला बाजूला घेऊन म्हणते,"बघा मी म्हणत होते‌‌ ना? तो आपल्या संधीचा फायदा घेणार. त्याला सांगून टा्का रात्रीची वेळ आहे, आमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून. शिवाय एवढे काम पण नसेल." मी म्हणालो," बघू, तो काय म्हण्तोय ते तरी, पहिल्यांदा गाडी ठीक होऊ दे, मग पैसे सांगीतल्यावर बघू. गाडी ठीक होणे जरूरीचे आहे." आम्ही हे बोलत असेपर्यंत त्याने त्याच्या बायकोला सांगून चहा करून आणला. म्हणाला," साहेब, थंडी फार आहे, चहा घ्या बरे वाटेल. पण बघा आमचा चहा चालेल ना, कारण आम्ही मुसलमान, तुम्ही......" मी चहा घेतला पण आमच्या बायकोने काही घेतला नाही, तिच्या डोक्यात एकच हा आता किती पैसे घेतो.

साधारण अर्ध्या तासाने त्या म्हमद्याने गाडी दुरूस्त केली, तो पर्यंत हिचे एकच बघा मी सांगतेय तो गडबड करणार.

मग त्याला मी धीर करून विचारले," बाबा, छान झाले, एवढ्या रात्री आम्हाला कोणी मदत केली नसती. किती पैसे द्यायचे." मनात धाकधूक होतीच, तो आता काय सांगणार. कारण बायकोने मनात भिती भरून ठेवली होती.

तर म्हमद्या कसा म्हणतो," अहो, काय साहेब. चेष्टा करताय काय गरीबाची."

एवढे ऐकले आणि आमवी बायको काय म्हणती,"बाबा सांग किती द्याचे ते एकदाच, कारण आम्ही अडकलोय ना?" म्हमद्या म्हणाला," ताई मला काहिही नको, अहो मी काही पार्ट बदलले नाहीत. फक्त काम तर केलेय, शिवाय तुम्ही लांब जाणार आहात तेव्हा चार पैसे तुमच्या जवळ असलेले बरे. मी थोडे पेट्रोल टाकलेले आहे, पंपापर्यंत गाडी जाईल. तिथे पेट्रोल भरा आणि जावा. मला काही नको. पण जर ताई तुम्ही चहा घेतला असता तर बरे वाटले असते."

रात्रीच्या अंधारात हिचा चेहरा दिसला नाही, पण मी चेहर्‍यावरचे भाव ओळखले. त्या रात्री म्हमद्याच्या अल्ला मध्ये आम्हाला देव दिसला, आणि राम रहीम मधला फरक दूर झाला.

’सारेगामा इंडिया’ कंपनीतर्फे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील दुर्मिळ गायनाच्या सी.डी. प्रकाशीत करून कंपनी आम्हां गानरसिकांना धन्य केले आहे. पंडितजींना जेव्हा भारतरत्न पुरस्कार मिळाला, तेव्हाच खर्‍या अर्थाने भारतीय संगीताचा गौरव झाला. आणि आता ’सारेगाम”ने यावर कळस चढविला. नव्याने उभारी धरणार्‍या स्वरसाधकांना हे पडितजींचे गायन म्हणजे, आकाशातील अढळ धृवतार्‍याप्रमाणे मार्ग दाखवत राहील.

पंडितजींच्या, त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षी गायलेल्या बंदिशी ऐकायला मिळाव्यात, हे खरोखरच आमचे भाग्य. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी जेव्हा पंडितजींच्या गायनाने सांगत होत असे, तेव्हा ज्यांनी हा अनुभव घेतला त्यांचे भाग्यच काही थोर.

पंडितजींनी जवळजवळ सर्व रागांमध्ये गायन केले आहे.

आठवते, पुण्यात भिकारदास मारूतीसमोर ’आनंद निकेतन’ नावाचे ( अजूनही त्या दुकानावर पाटी आहे )दुकान होते, तेथे दुर्मिळ रेकॉर्ड, ७८ आरपीएम च्या मिळायच्या, त्या गृहस्थाकडॆ अनमोल संग्रह होता. गोहरजान, रसूलनबाई, निर्मलादेवी किती नावं सांगावीत. त्याकाळात टेप, सी.डी. नव्हत्या, फक्त ग्रामोफोनच. पण त्याचाही थाट काय सांगावा. त्याचा भोंगा असा चकचकीत पितळेचा पिवळा पॉलीश केलेला, अगदी थाटात तो घरात मिरवत असे.

असो, पुन्हा एकदा ’ सारेगामा इंडिया ’चे आभार. अशाच प्रकारच्या सी.डी. त्यांनी अजूनही प्रकाशीत कराव्यात, आणि आम्हां रसिकांना तृप्त करावे. 

दहशतवाद म्हणजे काय तर जबरदस्तीने, जी आपली वस्तु नाही ती धमकावून हेसकावून घेणे. दहशतवादाला जात पात धर्म कशाकशाची म्हणून चाड नसते. अतिरेकी हल्ल करतात, काहीतरी मागणी करतात, अपहरण करतात तेव्हाही मागणी करतात. मग आपलेच लोक जेव्हा आपल्यावर अत्त्याचार करतात, तो दहशतवाद नाही का? फक्त नाव वेगळे, शेवटी परिणाम तोच ना?  फक्त त्रास देण्याचा प्रकार वेगळा. जेव्हा सामूहीक हत्याकांड होते, सामूहीक बलात्कार केला जातो, तोही एक दहशतवादाचाच प्रकार का म्हणू नये? भारतात सामान्य माणसावर जे अत्याचार होतात, त्याची जी लूट चालली आहे, ते मरण तर आम्ही सामान्य रोजच भोगतो आहोत.

पेट्रोलचे भाव वाढले तर, रिक्षावाले, बसवाले भाडे वाढवतात, महागाई वाढते, पण आता भाव एकदम १० रूपयांनी मागील दोन महिन्यात कमी झाले,पण कोणीही भाडेवाढ कमी करत नाही, याला काय नाव द्यावे? हे तर रोजचेच मरण आहे ना?

आज बातमी आहे, पुणे माहानगरपालिकेत टेंडरसेलमध्ये गुंडगिरी झाली, दहशत माजवण्यात आली, एकाने तर म्हणे धमकावण्यासाठी रिव्हाल्वर काढले होते, हा दहशतवाद नाही काय?

सामान्य माणसाची, नियम धाब्यावर बसवू्न, राजरोस लूट चालली आहे. कोर्टात वकील मंडळी, त्यांना तर दरपत्रकच नाही, हॉस्पीटल मध्ये डॉक्टर मंडळी, रस्यावर रिक्षा बसवाले, शाळा कॉलेजत शिक्षणसम्राट या सर्व ठिकाणी लोकांना आर्थिकदृष्ट्या नागवे केले जात नाही काय? थोड्याफार फरकाने हा दहशतवादच होतो. या सर्व क्षेत्रात सर्वच मंडळी तशी नाहीत. खूपशे प्रामाणिकही आहेत. पण परिणाम होतातच ना?

शेतकर्‍यांच्या आत्महत्या कोणत्या प्रकारात मोडतात, कोणी समजावून सांगेल काय?  

शेवटी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद वाईटच, तो मोडून काढलाच पाहोजे.

पुणेकर्‍यांच्या जीवनात,ती कुठली अशुभ घडी होती देव जाणे, त्या मुहूर्तावर, कोणाच्या तरी डोक्यातून ही B.R.T. योजना बाहेर आली. आज दोन वषे झाली पण ती काय पुरी होई ना.

१) बस मार्ग रस्यातून, लोकांनी मुलाबाळांना घेऊन, ज्येष्ठ नागरीकांनी रस्ता ओलांडून बस पर्यंत पोचायचे कसे आणि उतरून रस्ता पार करून बाहेर यायचे कसे? रस्त्याच्या कडेला उभारल्यावर अगदी डोळ्यादेखत बस निघून जाते आणि आपण त्या बस पर्यंत पोहोचू शकत नाही, कारण बेशिस्त रहदारीतून वाट कशी मिळणार.

२) दुकानापासून खूपशी जागा सोडून पादचारी मार्ग, मग सायकल मार्ग, मध्ये बस मार्ग एवढे झाल्यावर  उरेल ती जागा सर्व वाहनांसाठी, म्हणजे रहदारी कर भरणार्‍यांसाठी सर्वात कमी जागा. टक्केवारी काढावी, बसची संख्या, वाहनांची संख्या, बसमधून प्रवास करणारी जनता, आणि वाहनांद्वारे प्रवास करणारे वाहन चालक. पण कोण बोलणार? एवढा रस्ता सायकलस्वार वापरणार आहेत काय, ही तर फूटपाथवर धंदा करणार्‍यांचीच सोय झालेली आहे.

३) जेवढे पैसे B.R.T. वर खर्च होताहेत त्यातून किती बस गाड्या आल्या असत्या, रस्ते किती सुधारले असते. एवढी बस संख्या वाढली असती तर किती जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली असती. पण नाही या B.R.T.मधून किती आर्थिक व्यवहार होत असतील आणि किती जणांची पोळी भाजून निघत असेल हे एक परमेश्वरच जाणो.

४) परदेशातही B.R.T. आहे पण ती रस्याच्या कडेने. जर आपण ही योजना रस्ताच्या कडेने राबवली तर, रस्त्यावर बसून धंदा करणार्‍यांचे काय? त्यांच्या कडून येणारा हप्ता बुडेल ते नुकसान कोणी सहन करायचे.

ह्या सारख्या अनेक बाबी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षात येतात, तर महानगरपालिकेतील इंजीनियर, पुढारी, सल्लागार यांच्या लक्षात येत नसेल काय? पण म्हणतात ना मिळून वाटून खाल्ले तर अजीर्ण होत नाही, तसलाच हा प्रकार आहे. आजपर्यंत पुण्यातील एकाही  वर्तमानपत्राच्या संपादकाला यावर अग्रलेख लिहावासा वाटला नाही, की कोणा पत्रकाराला B.R.T. चा सर्व्हे करून लोकांच्या मुलाखती, वाहनचालकांच्या मुलाखती घेण्याची बुद्धी झाली नाही. एवढेच काय ज्या बस प्रवाशांसाठी ही योजना आहे, त्यांचे मत काय?

हे सर्व घेऊन आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करण्यासाठी वकीलाकडे गेलो तर त्याने अगदी बहुमोलाचा सला दिला तो असा - हाय कोर्टात जाऊ नका. मला काय माझी फी मिळेल, पण मी एक सल्ला देतो, कशाला या भानगडीत पडता. त्या B.R.T.मध्ये खूप मोठ मो्ठ्या लोकांचे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांच्या पोटावर पाय आल्यावर ते गप्प बसणार आहेत का? तुम्हाला त्रास होईल. सगळं काम पूर्ण झाल्यावर कोणीतरी मोर्चा काढेल, योजना कशी जनतेला त्रासदायक आहे, हे पटवून दिले जाईल, मग कोणीतरी हायकोर्टात याचिका दाखल करेल, आणि मग ही योजना सफल झाली नाही म्हणून जनतेच्या हितार्थ रद्द करून परत सर्व अडथळे ( आता तेच अडथळे होणार ) काढण्यासाठी पुन्हा टेंडर काढली जातील, आणि पुन्हा आर्थिक व्यवहार ओघाने आलेच.

यात काही होणार नाही, फक्त जनता सुटकेचा श्वास सोडेल.

माहिती अधिकार हाच मुळी राबवायचा असतो मुख्यतः मंत्रांनीच. कारण ते जर धुतल्या तांदळासरखे असतील तरच राज्यकारभार सचोटीने चालणार ना?

http://www.loksatta.com/

‘माहिती अधिकारातून मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची माहिती देता येणार नाही’
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी/पीटीआय

मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेचा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या विनंतीनुसार देता येणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

पण पंतप्रधान कार्यालयच असे म्हणत असेल तर आनंदच आहे. मंत्री जर काळा पैसा जमा करत नसतील तर, त्यांना संपती जाहीर करायला काय अडचण आहे. परवाच न्यायाधीशांनी नकार दिला आणि आता मंत्री लोक. ज्यांनी आपणे होऊन कायदा पाळायचा, तेच त्याला सुरूंग लावायला निघालेत. वास्तविक पाहता मुळात हा कायदा असून नसल्यासारखा आहे.

जवळा जवळ दोन वर्षे माझा मित्र ट्रस्ट कडील माहितीसाठी पाठपुरावा करतोय पण कोणीही त्याला भीक घालत नाही. त्याने काही माहितीसाठी ट्रस्टकडे अर्ज केला. त्यांनी एक महिन्यात माहिती दिली  नाही म्हणून त्याने धर्मदाय आयुक्त माहिती अपील अधिकार्‍याकडे अपील दाखल केले, तिथे केस चालली, त्यात सहा महिने गेले, माहिती अर्धवट दिली गेली. मग त्याने त्यावर मुंबईला अपील केले ते चालले जवळ जवळ दोन वर्षे, त्या उच्च अपील अधिकार्‍याकडे एवढे खटले पडून आहेत आणि त्यांना एवढी कामे असतात की, ते महिनोन्‌ महिने जागेवर नसतात. शेवटी याने त्याचा नादच सोडून दिला. कायदा वगैरे सर्व ठीक आहे, श्री. अण्णा हजारे समाधानी आहेत, पण कितीजणांना माहिती मिळते याचा आढावा घेतला गेला आहे काय? काही वेळेस माहिती मागीतल्यास धमक्या मिळतात. पोलीसात तक्रार करावी तर, पोलीस म्हणतात, बाबारे का घरचं खाउन कशाला आम्हाला त्रास देतोस. तुला यापासून काय मेडल मिळणार आहे काय?  का सत्कार होणार आहे? गप आपलं काम करावं, खावं, आणि गप झोपावं. कोणी सांगीतला हा वसता घोर?

हे सगळं असं आहे, सर्व बरोबर आहे म्हणायचं आणि दोन घास खाऊन शांत झोपायचं.

दिनांक २८ जानेवारी रोजी अमेरिकेतील ख्यातनाम सामरिक तज्ञ अश्ले जे टेलीस, ज्यांच्या शब्दाला परराष्ट्र घोरणात मोठी किंमत आहे, म्हणाले’," बहुतांश दहशतवादी हल्ले भारताने सहन केल्यामुळे दुर्दैवाने भारत हा दहशतवादी हल्ले झेलणारा ’ स्पंज’ बनला आहे. आणि भारताच्या सहनशक्तीमुळे अमेरिका आदी देश बचावत आहेत."

श्री. टेलीस साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आमची ह्ल्ले सहन करण्याची परंपरा आजची नाही. अगदी महाभारतापासून चालत आलेली आहे. युधिष्टीराने द्युत खेळताना सहन शक्ती दाखवून, द्रौपदीचे वस्त्रहरण उघड्या डोळ्यानी पाहिले ना. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर २१ वेळा स्वारी करून लूट केली, कोणीही यावं आणि भारतावर स्वारी करून, मजा करावी. आम्ही दबणार आणि पुन्हा सावरणार, दु‍सर्‍या हल्ल्यासाठी. 

एवढे दहशतवादी हल्ले झाले, पण त्यातून कोणाला सजा झाली काय? आणि झाली असल्यास सजेची अंबलबजावणी झाली काय? जिथे प्रत्युत्तर दिले जात नाही, प्रतिहल्ले होत नाहीत, तिथेच पुन्हा पुन्हा हल्ले होत राहतात. दोन शेजार्‍यांच्या मुलांत भांडण असते. एक दुसर्‍याला नेहमी मारत असतो, मार खाल्लेल्या मुलाचे आईवडिल, दुसर्‍या मुलाच्या पालकांना वेळेवेळी समजावून सांगतात, पण हा प्रकार काही कमी होत नाही. मग एके दिवशी, हा मुलगा तिसर्‍याच मुलाला शिवी देतो, तर तो मुलगा त्याच्या अशी कानफटात लगावतो, की तो कायमचा बहिरा होतो. आणि त्या खोडकर मुलाची संवय कायमची सुटते. म्हणजेच कोणीतरी कानफटात लगावणारा पाहिजे.

साहेब, अमेरिकेवर ९११ चा हल्ल झाला, त्यावर अफगाणिस्तानात जी प्रतिक्रीया अमेरिकेने दाखवली, काय बिशाद आहे, पुन्हा अमेरिकेवर हल्ला होईल. भारताला आतापर्यंत खूप जणांनी ओरबाडले आहे, त्यातलाच एक भाग म्हणजे काश्मीर. मुंबईवर हल्ला झाला, सरकार काय करतंय, फक्त कागदी घोडे नाचवतंय. पलीकडच्याला काय फिकीर आहे. त्याने आपले पाणी जोखले आहे. त्याला पूर्वीचा अनुभव आहे ना. घरात साप शिरल्यावर सापाला ठेचायचे सोडून आपण आपल्या घराची सुरक्षितता वाढवीण्यावर वेळ आणि पैसा खर्च करीत आहोत.

साहेब, ह्या सर्वाला मूळ कारण भारत पाकिस्तान फाळ्णी. स्वातंत्र्ययुद्धात हिंदू मुस्लीमांनी खांद्याला खांदा लाउन इंग्रजांशी लढा दिला, पण नंतर ते एकमेकांचे कट्टर शत्रू का बनले?  त्याला कारण त्या वेळच्या नेत्यांचा खुर्ची बद्दलचा हव्यास. कदाचित्‌, कोण पंतप्रधान होणार या वरून झालेला वाद असेल. मग जीनांनी वेगळे पाकिस्तान मागितले, आणि सूडाचा प्रवास सुरू झाला.  म. गांधींनी अहिंसा गळी मारली आणि तिचा कसा आणि कोठे उपयोग करावा हे कळत नसल्याने भारताचा स्पंज झालेला आहे.

खरे दुःख तर पुढेच आहे, भारतीय जनताच आता राजकारणी आणि सत्ताधार्‍यांचा ’ स्पंज’ बनलेली आहे. सर्व बाजूंनी सर्व क्षेत्रात सामान्य जनतेला स्पंज बनवले आहे. वाटेल तसे दाबतात आणि आम्ही बिचारी सामान्य भारतीय जनता, दबून दबून परत मूळ अवस्थेला येतो, दुसर्‍याने दाबावे म्हणून.

शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सरकार दरबारी, न्यायालयात, गुंडांमार्फत अनेक ठिकाणी, एवढेच काय, रिक्षावाले, भाजीवाले, बसवाले सुद्धा वाटेल तसे ’स्पंज’ बनवतात.  

भविष्यात भारतीय जनतेच्या नशीबात काय वाढून ठेवले आहे,ते  ३३ कोटी देवच जाणोत, आणि त्यातील एकाने तरी येऊन आमचे रक्षण करावे, हीच प्रार्थना.

पुण्यात दि.२४ जानेवारी २००९ रोजी बहुभाषिक ब्राम्हण महाअधिवेशन झाले. खू्पसे मान्यवर महाराज, स्वामी, विचारवंत, ज्ञानी, राजकारणी, नेते मंडळी उपस्थित होती. मुळात असे जातीविषयक अधिवेशन भरवणेच गैर. त्याने जातीवादाला चालना मिळते. ब्राम्हण वर्ग म्हणजे ज्ञानी समजला जातो. कारण त्यांच्याकडे ज्ञानदानाचे कार्य होते. धर्माची व्याख्या करण्याचे काम होते. कोणत्याही विषयावर मतभेद झाल्यास, त्यावर साधकबाधक चर्चा, वादविवाद करून त्यावर मत ठाम करण्याचे काम ब्राम्हणांना शोभा देते, अरेरावीच्या जोरावर एखाद्याचे म्हणणे खोडण्याचे पाप कसे करू शकतात देव जाणे.

या अधिवेशनात डॉ. अश्निनी घोंगडॆ म्हणाल्य," आजच्या काळात संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल. त्याने ब्राम्हणत्व कमी होत नाही." यावर तेथे बराच गोंधळ झाला.अनेक श्रोते व्यासपीठाकडे धावून गेले, त्यांचे भाषण बंद पाडले. खरेतर या विषयावर चर्चा अपेक्षित होती. अजूनही ब्राम्हणांना संध्या, जानवे ओळखीसाठी लागते.

त्याच अधिवेशनात रामदेवबाबा काय म्हणाले," काही ब्राम्हण, पंडित तंबाखू आणि गुटखा चघळताना दिसतात. मग पुढे मांस दारूही ओघाने येते. या पुढे असेच वागाल तर निश्चितच संस्कृतीचे पतन होईल, म्हणून या अधिवेशनातून जाताना व्यसने सोडा." यावर कोणी काहीही बोलले नाही. संध्या करायची, जानवे घालायचे आणि व्यसने करायची, हे कोणत्या बुद्धीवंताच्या आचरणात बसते. रामदेवबाबांच्या वक्तव्यावर सर्व शांत होते, कोणी कसे म्हणाले नाही की ब्राम्हण व्यसने करीत नाहीत. असा शपथविधीचा कार्यक्रम कसा झाला नाही, असा ठराव का केला गेला नाही. मांसाहारी हॉटेलमध्ये गेल्यास कोणाची जास्त हजेरी असते हे न बोललेलेच बरे. संध्या नाही केली तरी चालेल, जानवे नाही घातले तरी चालेल, पण आचारधर्म पाळा ना?

जेव्हा पृथ्वीवर मानव निर्माण झाला  तेव्हा रानटी अवस्थेत मानवात जात होती काय? नव्हती. पण नंतर काही लोक इतरांना चार समजुतीच्या गोष्टी सांगू लागले, तेव्हा त्यांचा एक वर्ग निर्माण झाला, तोच ब्राम्हाण वर्ग. काही निधड्या छातीचे, बलदंड लोक शौर्य गाजवू लागले, त्यांना क्षत्रिय म्हणू लागले. अशा प्रकारे कर्माप्रमाणे जाती नि्र्माण झाल्या.

ब्राम्हणेतरांनी संध्या केली, जान्हवे घातले. मांस भक्षण नाही केलेतर, तो ब्राम्हाण होऊ शकतो काय? ब्राम्हणात रोटी बेटी व्यवहार होईल काय?

’पर्यायी माता’ ( surrogate mother), भारतात हा पर्याय मान्य होऊ शकेल काय? ज्या ठिकाणी अनाथ मुलांनी अनाथालये भरून जातात, पण त्या निष्पाप जीवांना कोणीही दत्तक घेत नाही. काही काही कुटुंबात चार चार पाच पाच मुले असतात, त्यांची आबाळ होते पण त्यांना कोणी मदतीचा हात देत नाही. स्त्रीयांच्या चारित्र्याबद्दलच्या संकल्पना दृढ आहेत, त्या समाजात ही पर्यायी म्हणा  किंवा भाडोत्री माता चालेल?

Surrogate Mother म्हणजे काय तर, पहिल्या प्रकारात ज्या जोडप्याला मूल होय नाही, त्यातील पतीचे शुक्रजंतू आणि पत्नीच्या बीजांडाचे फलन, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात केले जाते. मग त्या स्त्रीला मूल झाल्यावर, ते त्या जोडप्याच्या स्वाधीन केले जाते. दुसर्‍या प्रकारात पतीपत्नी व्यतिरीक्त दुसर्‍या अन्य पुरूषाचे शुक्रजंतू आणि या जोडप्यातील पत्नीच्या बीजांडाच्या सहाय्याने, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ तयार केला जातो, आणि त्यातून जन्मलेले मूल त्या दांपत्यास दिले जाते. या अवस्थेत त्या बाळाला पाच पालक असू शकतात.

आता यात स्त्रीने किती जणांना आपले गर्भाशय वापरू द्यायचे हा प्रश्न आहेच ना? पुरूषाने किती वेळा शुक्रजंतू दान करावयाचे. यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचा विचार भारतात चालू आहे म्हणे. म्हणजेच याला कायदेशीर मान्यता मिळणार. मग याला धंदेवाईक स्वरूप येणार. पैशांचे व्यवहार होणार.

यातून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात.

१) नवीन आईने बाळ देण्यास नकार दिला तर? कारण तिचे मातृत्व आड आले तर? मग कोर्ट कचेरी आली.

२) मालमत्ता वादात सापडली, तर  ज्याने शुक्रजंतू दान केले, त्याच्या मालमत्तेवर हा मुलगा किंवा मुलगी हक्क सांगू शकतो काय? कारण ह्या प्रकारात डॉक्टर पैशासाठी फुटला तर? आणि D.N.A. test  केली तर?

३) मरणानंतर अग्नि देताना हा मुलगा, दुसर्‍याच्या शुक्रजंतूंपासून निर्माण झाल्यामुळे, अस्तित्वातल्या बापाला अग्नि देऊ शकतो काय?

४) दत्तक मुलापेक्षा हे बरे, कारण कमीतकमी आईच्या बीजांडाचा तरी वापर झालेला असतो, त्यामुळे जिव्हाळा राहतो.

५) मुलाची खरी आई कोणती हा प्रश्न उरतोच ना?

६) ज्या दांपत्याने अशाप्रकारे मूल प्राप्त केले, आणि नंतर या दांपत्याला मूल झालेत तर? या मूलाचा इस्टेटीवर काय हक्क असेल? लग्न कार्यात काय अडचणी येतील?

७) दांपत्यातील पुरूषाला वंध्यत्व असेल तर पर्यायी बापाचा विचार होऊ शकतो काय?

यातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी असावी. तसा कोणताही हेतू नाही.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ▼  2009 (66)
    • ▼  October (13)
      • आय टी प्रोफेशनल
      • नोबेलचे (खरे!) मानकरी
      • नोबेल शांतता पुरस्कार
      • मतदान करा
      • का मतदान करावं?
      • जादूचा दिवा
      • मित्र आणि कर्म
      • तुमच्याकडे, तुमच्या आसपास जुनी सायकल आहे का?
      • मन्नाडे
      • देवालय न्यायालयात
      • गांधीजी
      • म्हातारपण
      • समाधान
    • ►  September (4)
      • घराणेशाहीचं चांगभलं
      • यशाचा मार्ग
      • फळांचे गुण
      • गणपती बाप्पा मोरया!!! - दीपा कुलकर्णी
    • ►  August (3)
      • काय मजा आहे
      • स्वाईन फ्ल्यू
      • फाशी आणि भारतात ?
    • ►  July (1)
      • ट्विटर आणि फेसबुक
    • ►  May (3)
      • नकारात्मक मत
      • भगवान
      • मतदान का नाकारावे
    • ►  April (10)
      • स्वाईन फ्लु (H1N1)
      • मी खासदार बोलतोय!
      • खटला सुरू झाला
      • मतदान
      • कोट्याधीश
      • ये
      • जातीचा पंतप्रधान
      • कोटींची मालमत्ता
      • गीता
      • वचननामा
    • ►  February (16)
      • विवाह नोंदणी
      • विश्वासघात
      • व्हॅलेंटाईन डे
      • अक्कल?
      • घराणेशाही
      • उमेदवारांचे निकष
      • निवडणूक आयोग
      • मराठा आरक्षण
      • कलम ३२४
      • फौजदारी संहितेतील बदल
      • एका रात्रीची गोष्ट
      • सारेगामा इंडिया
      • दहशतवाद
      • B.R.T. ?
      • माहिती नकाराधिकार
      • स्पंज
    • ►  January (16)
      • संध्या आणि जानवे
      • पर्यायी माता
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose