झोप

भारतीय माणसाला झोपेची किती गरज आहे, हे ठरविण्याची वेळ सुप्रीम कोर्टाला यावी, यातच सर्व काही आले.

http://www.esakal.com/esakal/01122009/Specialnews070373953A.htm

झोपेसाठी शांतता हा मानवी हक्कच - सर्वोच्च न्यायालय

 

आम्हाला झोप कामापेक्षाही जरूरी आहे. आता बघा दिवसातल्या २४ तासात कोणीना कोणी, कोठेना कोठे तरी झोपतच असतो, मग पूर्ण २४ तास ध्वनि बंद ठेवावा लागेल. प्रत्येक दुकानदाराला दुपारी जेवल्यावर झोप लागते. सार्वजनिक उद्यानात तर कायम झोपलेले असतात. तेव्हा तेथे कोणीही गोंधळ करू नये, म्हणून कोर्टात जाणे आलेच. आम्ही मतदार एकदा मत दिले की, पाच वर्षे झोपतो, राजकारणी मात्र २४ तास जागा असतो, म्हणूनच तो पाच वर्षाचा पूर्ण फायदा घेतो. आम्ही कुठल्यातरी चिट फंडात पैसे गुंतवतो आणि मजेत झोपतो.

जागेपणी सुद्धा झोपेसारखेच व्यवहार होतात. शेअर्स मध्ये पैसे टाकतात, दारात आलेल्या सेल्समनशी आपण झोपेतच व्यवहार करतो ना? कोणी सोन्याचे दागिने प्लेटिंग करून देतो म्हणल्यावर झोपेतच त्यावर विश्वास ठेवतात ना? अंगावर घाण पडली म्हणून पैसे पळवतात तेव्हा आपण झोपेतच असतो ना? शाळेतला विद्यार्थी वर्षभर झोपच काढतो आणि शेवटी अभ्यास करतो. आई वडिल मुलांच्या दहावीपर्यंत झोपेत असतात, आणि जागे होऊन क्लासेस शोधतात.

फक्त आपण एकाच वेळेस झोपत नाही, परिणामांची पर्वा करीत नाही, म्हणून भिकेला लागलोत, तरीही भारतीयांना जाग येत नाही, ते गाढ झोपेत आहेत,

आणि लोकसंख्या वाढत आहे.( यावर सुप्रीम कोर्टाचे काय म्हणणे आहे)

Unknown

No comments: