महाभारत

महाभारतावर आतापर्यंत कितीतरी जणांनी अभ्यास केलेला आहे. माझ्या सुद्धा मनात काहे प्रश्न उपस्थित झालेत, उत्तेरे शोधावीच लागनार.

जर द्रोणाचार्यांच्या अभ्यासशाळेत त्यांनी कौरव आणि पांडवात भेदभाव न करता दोघांनाही, सांभाळून घेउन, प्रत्येकवेळेस अर्जुनालाच पाठीशी घातले नसते तर, दुर्योधनाच्या मनात कायम लहाणपणीच पडवांबद्दल अढी निर्माण झाली असती काय? गुरूचे कर्तव्य द्रोणाचार्य विसरले. 

माता कुंतीने मंत्राचे सामर्थ्य, खरेपणा पाहण्यासाठी, कुमारीवयातच प्रत्यय घेतला आणि कर्णाचा जन्म झाला. कुंतीने हा विचारच केला नाही काय, की हा वर खर झाला, आणि अपत्यप्राप्ती झाली तर काय करायचे? बिचार्‍या त्या कर्णाचा काय दोष होता. त्याला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून जगावे लागले ना? त्या काळी वरदानाने प्राप्त झालेल्या संततीला मान्यता  होती. महाभारतात युद्धाच्या वेळेस शेवटी श्रीकृष्ण कर्णाची कुंतीशी ओळख मुलगा म्हणून करून देतो, तेव्हा कुंती कर्णाजवळ अर्जुनाचा वध न करण्याचे वचन घेते. मग त्याच वेळेस ती पांडवांना कर्नाबद्दल माहिती का देत नाही? तिचा आदेश सर्वांनी मानला असता ना? आयुष्यभर झालेल्या मानहानीला कुंती जबाबदार नाही काय?

जेव्हा इंद्रप्रस्थ मध्ये पांडव मयसभा उभारतात, त्यात अनेक चमत्कृती बनवतात, आणि कौरवांना आमंत्रण देतात. दुर्योधन मयसभा सहज कुतुहलाने न्याहाळत असताना, त्याला जाणीव होते, आणि तो आश्चर्यचकीत होऊन भारावून जातो, आणि एका क्षणी त्याला जमीन वाटून जेव्हा तेथे तो पाय टाकतो, तर तेथे पाणी असते, आणि त्यात तो पडतो. त्याच वेळेस द्रौपदी त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते," आंधळ्या बापाची मुले आंधळीच असतात." कोणा क्षत्रियाला  हा अपमान सहन होईल? दुर्योधनाचा आंधळा बाप म्हणजे द्रौपदीचा सासराच ना? मग तिला हे शोभले का? हाच राग मनात ठेऊन दुर्योधनाने महाभारत घडवले ना? कौरव मयसभा पहायला आल्यावर पांडवांनी, धर्माने तरी कौरवांना मयसभेची वैशिष्ट्ये समजावून सांगायला पाहिजे होती. हल्ली आपण सुद्धा आपले घर दाखवताना पाहुण्यांसोबत राहतो.मग हे सगळं पाहिल्यावर पांडवांनी हे मुद्दमच केले नसेल कशावरून?

त्याकाळात जातीय वाद भलताच फोफावलेला होता, शिक्षक सुद्धा जातीय वादाला महत्व देत. पहा, एकलव्याला द्रोणाचार्यांनी विद्यादान का नाकारले? अर्जुनच श्रेष्ठ पाहिजे म्हणून द्रोणाचार्यांनी किती विद्यार्थ्यांवर अन्याय केला. कर्णाने उत्तम विध्यार्थ्याचा परिचय देऊन सुद्धा परशुरामांनी कर्णाला केवळ तो ब्राम्हण नाही म्हणून शाप दिला, आणि कर्णावर अन्याय केला, त्याला माफ सुद्धा करता आले असते.

भीष्म लढाईत जिंकत आहेत हे पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाला शिखंडीच्या मागून बाण मारायला सांगितले, हे कपट श्रीकृष्णासारख्या देव माणसाने का करावे?

इंद्र देवाने कपटाने कर्णाकडून त्याची कवचकुंडले याचकाच्या रूपाने मागून अर्जुनच्या प्राणाची भीकच मागीतलीना?

असे अनेक प्रसंग आहेत. धृतराष्ट्र आंधळा असतानाही, भीष्माने बाहुबलाच्या जोरावर त्याच्या विवाहासाठी, गांधारीचा हात मागीतला, गांधारनरेश शकुनी काहीही करू शकत नव्हता. पण कोणा भावाला आपली बहीण, आयूष्यभर डोळे असून आंधळ्यासारखे वावरलेले आवडेल? त्याचा सूड घेण्यासाठी  शकुनीनी दुर्योधनाचे कान भरून त्याला अनेक पापे करायला भाग पाडले, आणि त्यांना विनाशाजवळ नेऊन ठेवले.

असे महाभारत पाहून काय बोध घ्यावा. आणि अशी कथा का लिहावी. आणि त्यालाच आपण महाकाव्य म्हणतो.

Unknown

1 comment:

Maithili said...

pahili gosht droupadi hasalyacha kinva kahi apamanaspad bolalyacha vyasanchya mahabharatat kuthehi ullekh nahi.
dusare mhanaje krishnane vaparali ti yuddhniti hoti. ase anek prasang chhatrapatinchyahi charitrat aadhalatat pan mhanun te kapat hote ka?
Tisare gandharichya vadilana drut rastrchya andhatva baddal mahiti hoti, tyani ti gandharila dili nahi hi tyanchi chook.
tyanantar karnachi kavach kundale hi tyachi extra power hoti. aajchya ghadilahi tumhi harmons & etc cha vapar karanarya players na diss qalified ch karatana? ka tyachehi kahi samarthan deta?
aani atta shevatache mhanaje hindu dharmala kontahi dharm granth nahi tya mule tyatoon kahi shikalech pahje ase kahi nahi. Mahabharatala aapan mahakavya mhanato. batami, itihas,aani kavya he phakt mahiti, manoranjan etyadinsathi vachavet.
mi kahi mahabharatachi abhyasak nahi pan mala mazya vachanatoon ji mahiti milali tila dharun kahi tari lihanyacha prayatna kela aahe. dhanyavad.