एका रात्रीची गोष्ट

कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये जेवण वगैरे करून निघायला साधारण ११ वाजले असतील, विचार केला एक वाजेपर्यंत मुक्कामी पोचल्यावर झोप तरी होईल. वीस एक किलोमीटर आले नसेल, तर गडी रस्यातच आवाज करून बंद पडली. त्यावेळेस साडेबारा झाले असतील. सामसूम रस्ता काय करणार? उतरून काही प्रयत्न केला, पण गाडी चालू होईना. तेवढ्यात एकजण थांबला आणि त्याने चौकशी केली, आणि म्हणाला, जवळच छोटेसे गाव आहे तिथे म्हमद्याचं गॅरेज आहे, त्याच्याकडे जा म्हणजे तो काहेतरी करेल, तो राहतो तिथेच. इथे आडवाटेला थांबण्यापेक्षा आम्ही विचार केला, जाऊन तरी बघू . गावात तेवढेच सुरक्षीत.

आम्ही गाडी ढकलत गाव गाठले, इतक्या रात्री पण एकजण भेटला, त्याने गॅरेज दाखवले. आम्ही धाडस करून गॅरेजची कडी वाजवली, झोपेच्या डोळ्यानेच एका तरुणाने दार उघडले. आणि आमच्या मोटारसायकलकडे बघून त्याने ओळखले, आमचे काय काम आहे ते. तो म्हणाला," गाडी खराब झाली काय?" मी म्हणालो," हो" तर तो म्हणाला," बघतो, काय झाले ते, तुम्ही साहेब बसा, आणि ताईना आत पाठवा, थंडी आहे, आत बसतील, आपण शादीशुदा आहे, आपली बायहो आत आहे." पण आमची बायको ऐकेना, मला बाजूला घेऊन म्हणते," अहो, त्याला पहिले पैसे विचारा, कारण हे लोक, रात्रीची वेळ बघून लुटतात." मी म्हणालो," अरे, आता आपण कुठे जाणार. बघू काय होते ते." त्या म्हमद्याने गाडी तपासली आणि म्हणाला,"साहेब, टाकीत कचरा असेल. त्यामुळे गाडी बंद पडती आहे, शिवाय प्लग साफ करावा लागेल. पेट्रोल कदाचि‍त्‌ पुढे चालणार नाही." आता बायको तावातावाने मला बाजूला घेऊन म्हणते,"बघा मी म्हणत होते‌‌ ना? तो आपल्या संधीचा फायदा घेणार. त्याला सांगून टा्का रात्रीची वेळ आहे, आमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून. शिवाय एवढे काम पण नसेल." मी म्हणालो," बघू, तो काय म्हण्तोय ते तरी, पहिल्यांदा गाडी ठीक होऊ दे, मग पैसे सांगीतल्यावर बघू. गाडी ठीक होणे जरूरीचे आहे." आम्ही हे बोलत असेपर्यंत त्याने त्याच्या बायकोला सांगून चहा करून आणला. म्हणाला," साहेब, थंडी फार आहे, चहा घ्या बरे वाटेल. पण बघा आमचा चहा चालेल ना, कारण आम्ही मुसलमान, तुम्ही......" मी चहा घेतला पण आमच्या बायकोने काही घेतला नाही, तिच्या डोक्यात एकच हा आता किती पैसे घेतो.

साधारण अर्ध्या तासाने त्या म्हमद्याने गाडी दुरूस्त केली, तो पर्यंत हिचे एकच बघा मी सांगतेय तो गडबड करणार.

मग त्याला मी धीर करून विचारले," बाबा, छान झाले, एवढ्या रात्री आम्हाला कोणी मदत केली नसती. किती पैसे द्यायचे." मनात धाकधूक होतीच, तो आता काय सांगणार. कारण बायकोने मनात भिती भरून ठेवली होती.

तर म्हमद्या कसा म्हणतो," अहो, काय साहेब. चेष्टा करताय काय गरीबाची."

एवढे ऐकले आणि आमवी बायको काय म्हणती,"बाबा सांग किती द्याचे ते एकदाच, कारण आम्ही अडकलोय ना?" म्हमद्या म्हणाला," ताई मला काहिही नको, अहो मी काही पार्ट बदलले नाहीत. फक्त काम तर केलेय, शिवाय तुम्ही लांब जाणार आहात तेव्हा चार पैसे तुमच्या जवळ असलेले बरे. मी थोडे पेट्रोल टाकलेले आहे, पंपापर्यंत गाडी जाईल. तिथे पेट्रोल भरा आणि जावा. मला काही नको. पण जर ताई तुम्ही चहा घेतला असता तर बरे वाटले असते."

रात्रीच्या अंधारात हिचा चेहरा दिसला नाही, पण मी चेहर्‍यावरचे भाव ओळखले. त्या रात्री म्हमद्याच्या अल्ला मध्ये आम्हाला देव दिसला, आणि राम रहीम मधला फरक दूर झाला.

Unknown

5 comments:

Ratan CHavan said...

MALA KHARACH ASHA GOSHTI KHUP AAWADTAT JYA FAKT "MANUS " HA EKACH VISHAY DOKYAT THEUN SARVANSHI VAGTAT.

mangesh B. Shirke said...

खरच अशी खुप चांगली मानस ही या जगामधे आहेत.

mangesh B. Shirke said...

खरच अशी खुप चांगली मानस ही या जगामधे आहेत.

mangesh B. Shirke said...

खरच अशी खुप चांगली मानस ही या जगामधे आहेत.

Unknown said...

khup chhan ...mast