कलम ३२४

काल दि.५ फेब्रुवारीला दैनिक ’पुढारी’ मधील एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले, ती बातमी अशी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या प्रशासनात दोघांना मंत्रीपदी नियुक्ती करून चूक केली असल्याचे मान्य केले. हे दोन मंत्री करासंबंधीच्या वादात अडकले असल्याने आपल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत अदथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत त्यंनी दोन सदस्यांना डच्चू दिला आहे.

कुठे अमेरिका आणि कुठे भारत. असे भारतात झाले असते? या दोन मंत्र्यांनी लगेच न्यायालयात धाव घेऊन मनाई आणली असती. मुळात असे झालेच नसते. गुन्हेगार तुरूंगातून निवडणूक लढवतात, जिंकून येतात. कर तर आपल्याकडे चुकवण्यासाठीच असतो. हे आपल्या कडे क्षुल्लक कारण झाले.

संजय दत्तचं, काय चाललंय. टाडा न्यायालयने त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावूनही तो बाहेरच आहे ना? त्याने सुप्रीम कोर्टाकडून जामिन मिळवला आहे, म्हणून तो बाहेर आहे, याचा अर्थ तो आरोपांतून मुक्त झालेला नाही. त्याच्या डोक्यावर सहा वर्षांची शिक्षा आहेच. घटनेतील कलम काय सांगते - ज्या व्यक्तीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली असेल त्याला न्यायालयाने शिक्षा दिलेल्या तारखेपासून सहा वर्षे आमदार किंवा खासदार होता येत नाही.

हे सर्व माहित असताना सुद्धा समाजवादी पक्ष त्याला उमेदवारी देत आहे. ज्यांनी संसदेवर हल्ल केला, त्यांच्यशी संबंध असलेला संजय आता त्याच संसदेत जाऊन लोकशाहीवर भाषण देणार. कर चुकवेगिरी तर फार लांबच.भारतात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे. ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, त्या गांधीजींच्या, गांधीगिरीचा आधार घेऊन संजय स्टार बनला. त्याच ग्लॅमरचा फायदा घेताना पक्ष त्याचे चरित्र पहात नाही.

कुठे अमेरिकेतील उदाहरण आणि कुठे भारतातील वास्तव.

हे असंच चालत राहणार, गुन्हेगार संसदेत जाणार, उजळ माथ्याने फिरणार. मग काय भविष्य असणार आहे. 

आधार - दैनिक पुढारी दि.५ फेब्रुवारी २००९   

Unknown

No comments: