नकारात्मक मत

भारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी समजली जाते, त्याच लोकशाहीचे या लोकसभा निवडणुकीत जेम्तेम ५० टक्के मतदान करून मतदारांनी धिंडवडे काढले आहेत. कोणाही पुढार्‍याला काही समजत नाहीकी भाषणाला जमणारी गर्दी कुठे गेली. म्हणजे लोक फक्त गंमत पाहण्यासाठीच गर्दी करत होते तर. मतदारांनी भल्याभल्यांची गणिते चुकवली. हे असेच जर घडत राहिले तर एक वेळ अशी येईल की, मोजकेच शेकड्यात मतदान होईल. कोण पुढारी लायक आहे म्हणून उत्साहाने मतदान करावे. मतदान करून त्या उमेदवाराने पुढे अपेक्षाभंग करण्यापेक्षा नको ते मतदान. लोक मतदानाला जातील पण त्यांना नकारात्मक मतदान करण्याची सोय पाहिजे.

त्यासाठी मी एक पद्धत सुचवतो पहा -  मतदानाच्या बॅलेट मशिनवर प्रत्येक उमेदवाराच्या पुढे दोन बटने पाहिजेत. एक लाल आणि एक निळे किंवा हिरवे.प्रत्येकाला एका उमेदवारापुढे एकदाच बटण दाबता येईल. म्हणजे जर त्या मतदाराला कॉंग्रेसला मत द्यायचे आहे तर त्याने त्यापुधील निळे बटण दाबावे, आणि जर त्याला असे वाटत असेल की राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीच निवडून आला पाहिजे तर त्याला त्या उमेदवारापुढील लाल बटण दाबायची सोय पाहिजे ती पण एकदाच. म्हणजे जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा प्रत्येकाला होय आणि नाही अशी दोन प्रकारची मते पडतील.म्हणजे हे समजेल की निवडून आलेला उमेदवार किती लोकांना नको होता. जर त्या निवडून आलेल्या उमेदवाराला होय पेक्षा नाहीची मते जास्त मिळाली तर त्याची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी. पण या उमेदवारांना पुन्हा उभे राहू देऊ नये. जर कोणाही उमेदवाराला ५० ट्क्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक पसंती मिळत असेल तर त्याला कायम स्वरूपी निवडणुकीला अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून नकारात्मक मत फार महत्वाचे ठरवावे. एखादा उमेदवार निवडून जरी आला तरी त्याला  समजू दे किती मतदार  आपल्या  विरूद्ध आहेत ते.

आता विधानसभा निवाडणुका जवळ आल्यात.

Unknown

1 comment:

आशा जोगळेकर said...

बरोबर आहे तुमचं