यशाचा मार्ग

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

मार्ग यशाचा जीवनात महत्वाचा

त्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-
दोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.
चंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते ? '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''
तर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.
नेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे -  ' मी.'  मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.

सकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-

प्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली ? का झाली ? माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले ? कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती ? असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.

सकारात्मक विचार करा-

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

म्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते ? मी काय करु शकतो ? हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.

हे कुठेतरी मी वाचले होते........

Unknown

No comments: