Friday, October 16, 2009

आय टी प्रोफेशनल

Friday, October 16, 2009

हजारो वर्षांपूर्वी हे जग निर्माण झाले. पूर्वी माणूस अगदी रानटी होता. कोणतेही शोध लागलेले नव्हते. कपडे नाहीत, अन्न शिजवणे माहित नव्हते. युगे बदलली, रामायण महाभारत होऊन गेले. असं म्हणतात की, त्याकाळी प्रगत समाज होता. पण आदिमानवाचा काळ काय?

मानव प्रगती करू लागला, निरनिराळे शोध लागले, जगण्याची प्रवृत्ती तयार होऊ लागली. मानव मग जंगली श्वापदांपासून बचाव करण्यासाठी जमावाने राहू लागला. मग समाज निर्माण झाला, त्याचे कायदे कानून तयार झाले. मानवाला शोधांपासून जगण्याची आशा वाढली. तत्वज्ञान सांगणारी मंडळी उदयास आली. कारण जसे सुख वाढू लागले तसे दुःखही टोचू लागले.

याच उद्वेगातून सर्वसंगपरित्याग करणार्‍या संतमहात्म्यांनी जन्म घेतला. हे संत ऐहिक, भौतिक सुखाचा त्याग करू लागले. त्यांनी वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी, चैनी, अन्न, हास्य, काव्य शास्त्र विनोद सर्वांचा त्याग केला.  मग यांनाच वेगवेगळ्या नावाने संबोधले जाऊ लागले. ऋषी, साधू, संन्यासी, यती वगैरे.

आणि या सांप्रत काळात, असा त्याग करणार्‍या माणसाला आय टी प्रोफेशनल म्हटलं जाऊ लागलं.


1 comments

Tuesday, October 13, 2009

नोबेलचे (खरे!) मानकरी

Tuesday, October 13, 2009

आम्ही काल लिहील्याप्रमाणे शांततेचा नोबेल पुरस्कार कुणाला द्यावा तर आमच्या मते, ज्यांनी शांतता प्रस्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले त्यांना किंबहुना ते सतत त्याच ध्यासात असतात, अशा भारतीयांनाच मिळावा.

मुंबईत जिहादी हल्ल्यात दोनशेहून जास्त माणसे मारली गेली, पाकिस्तानविरुद्ध सज्जड पुरावा मिळून सुद्धा आपले पंतप्रधान मनमोहन सिंग फक्त खलिते पाठवतात, ते शांती राखायचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यांनाच पुरस्कार द्यावा.कारगीलच्या घुसखोरीनंतर वाजपेयी पाकच्या हुकुमशहा मुशर्रफ बरोबर आग्रा येथील शिखर परिषदेसाठी बोलावून चर्चा करतात, त्यांची बडदास्त ठेवतात, पण कारगीलचा मुद्दा सौम्यपणे हाताळण्याचे कसब दाखवतात, ते शांतीदूत नव्हेत काय? त्यांनाच पुरस्कार मिळाला पाहिजे.

भारतीय नेते शांततेची जपमाळ ओढत, जप करीत असतात. भारतातील नागरिक पाकिस्तानी जिहाद, हिंसाचार व स्वकीयांचे हत्याकांड हतबलपणे सोसतात, चकार शब्द काढत नाहीत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा स्वप्नातही काढत नाहीत. अमेरिकेने इराक मध्ये जेवढी माणसे मारली नसतील, त्यापेक्षा जास्त माणसे पाकच्या दहशतवादी हल्ल्यात भारतात मारली गेलीत, तरीसुद्धा जगातल्या कुठल्याही नेत्याने शांततेसाठी स्वकीयांचे इतके ह्त्याकांड सोसून समजूतदारपणा दाखवून,भारतीय नेते पाकिस्तानला न दुखावण्याचा प्रयत्न करताहेत आणि शांततेसाठी ब्लीदान करताहेत, त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, तेच भारतीय नेते खरे नोबेल पुरस्काराचे हकदार आहेत. यांचा विचार झालाच पाहिजे नाहीतर हा पुरस्कारच बंद करून टाकला पाहिजे.

अतिरेकीच खरे या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे  मानकरी आहेत कारण ते माणसांना मारून कायमची शांतता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करीत आहेत.

पुढील वर्षी भारतीयांच्या नावांचा जरूर विचार व्हावा, यासाठी शांततेच्या मार्गाने उठाव करावा, असे आम्हांला वाटते.


2 comments

Monday, October 12, 2009

नोबेल शांतता पुरस्कार

Monday, October 12, 2009

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचा नोबल पुरस्कार बहाल करण्यात आला, याबद्दल भारतातील पत्रकार वर्तुळात सुद्धा कमालीचे आश्चर्य पसरले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षातच पुरस्कार दिला गेला, असे त्यांनी काय शांततेचे कार्य केले हे एक देवच जाणो. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानात, अमेरिकन सैनिक पाठवून, त्यांना आधुनिक शस्त्रसामुग्री पाठवणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे काय शांतीदूत बनू शकतात. अमेरिकेचे धोरण आहे, जगाला माण्डलिक बनवण्याचे, अशांना नोबेल पुरस्कार?

समितीपुढे दोन नावे होती, फ्रान्सचे अध्यक्ष निकोलाय सारकोझी आणि ओबामा. त्यात निकोलाय यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, तेव्हा त्यांच्या नावाचा विचार व्हायला पाहिजे होता. ओबामांने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कोणते बहुमोल योगदान दिले आहे, हा संशोधनाचाच विषय असेल. दीर्घकाळ जागतिक राजकारणात कार्यरत असणार्‍या व्यक्तींचा विचार का केला गेला नाही? रशियाचे पुतीन, भारताचे मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, श्रीमती सोनिया गांधी, अमेरिकेचे जॉर्ज बुश, ब्रिटनचे टोनी ब्लेयर ही नावे समितीला माहीत नव्हती काय?

गेल्या वर्षी महंमद अल बारदेई यांना शांततेचं नोबल मिळाले होते. तेव्हा तर या पुरस्काराची थट्टाच झाली होती. पाकिस्तान इराण, कोरीयाला अणु तंत्रज्ञान स्मगल करते, त्यावर बारदेई नियंत्रण ठेउ शकले नाहीत. इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून ते रोखू शकले नाहीत. मग त्यांनी शांततेसाठी काय केले म्हणून त्यांना हा पुरस्कार? कोफी अन्नान यांना शांततेचा पुरस्कार देण्यात आला, त्याचे काय कर्तृत्व? जेव्हा सद्दाम हुसेन यांनी तेलविक्रीत मोठा घोटाळा केला, जगात त्याची निंदा झाली, त्या घोटाळ्यात कोफी अन्नान यांचा मुलगा होता. त्याच्या चौकशी अयोगाचा निकाल अजूनही आलेला नाही. अन्नान यांच्या काळात आफ्रिकेत हजारो लोक उपासमारीने, युद्धात मारले गेले, महिला लैंगिक वासनेला बळी पडल्या हे अन्नान यांना रोखता आले नाही, अशा माणसाला पुरस्कार? समितीचे डोके ठिकाणावर आहे काय? यात काहीतरी काळाबाजार आहे असे वाटते. बलाढ्य अमेरिकेसमोर समिती झुकली. आठवते? एक अतिशय हलक्या पातळीवरचा पुरस्कार! - इराणच्या सामान्य लेखिकेला दिलेला पुरस्कार ती लेखिका - शिरीन इबादी. काय असेल हिचे शांतता कार्य?

बहुतेक हा पुरस्कार गुणवत्तेच्या कसोटीपेक्षा, जागतीक राजकाराणातील वजन आणि दादागिरीवर देण्यात येत असावा.

सर्व जगतातील सर्व थरातून म. गांधींचे नाव त्यांच्या अहिसा लढ्या संदर्भात घेतले जाते, लोकांच्या माना झुकतात. त्यांनी जी शांती अपेक्षिली होत, तो विचार तर आज पर्यंत कोणालाही शिवला नाही, त्यांना मात्र शांततेचा पुरस्कार नाही. आहे की नाही विनोद. 
भारतीयच शांततेच्या पुरस्काराला कसे पात्र आहेत, याची चर्चा उद्या.


0 comments

Sunday, October 11, 2009

मतदान करा

Sunday, October 11, 2009

महाराष्ट्रात निवडणुका आल्या आणि उमेदवारांची एकच गर्दी.त्यांची जाहीरनामा, वचननामा वाचला तर ही मंडळी महाराष्ट्र, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी भाषा, यासाठी काही करतील, असंभव. आमदार जेव्हा दाराशी  येतो तेव्हा  साधाभोळा असतो, पणा तोच जेव्हा पाच वर्षांनी  पुन्हा मत मागायला येतो तेव्हा कपाळाला भला मोठा भगवा टिळा असतो. हातात, गळ्यात जाड सोन्याच्या साखळ्या, चेहर्‍यावर  एक प्रकारची गुर्मी असते. हेच लोक वाड्या वस्त्या काबीज करून, दंडेलशाहीने भाड्याची घरे, जुने वाडे मोकळे करून घेतात, तेथील लोकांना देशोधडीला लावतात, कोणाकडे तक्रार करायची, सगळेजण मिळून वाटून खातात. महाराष्ट्रात आज घराणेशाही उदयाला आलेली आहे, त्याबद्दल आम्ही मागे ब्लॉगमध्ये लिहीले आहे.

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे हे अनुभवी नेते, पण त्यांनी सुद्धा वाली वारसांची सोय करून ठेवली. त्यांना काय आपल्या कार्यकर्त्यांमधून उमेदवार मिळू शकत नाहीत? सर्व जण का राजकारणात पडतात, कारण पुढील सात पिढ्यांची सोय करून ठेवता येते. हजारो लाखो तरूण आयुष्यभर घसा सुकेपर्यंत जयजयकार करीत होते, सतरंज्या उचलत होते, तेच आता म्हातारपणाला आलेत, नेते मंडळी फक्त त्यांना भत्ता आणिया राजकारण्यांनी भारतातील लोकशाहीचं जागतीक विडंबन केले आहे.

आम्ही स्वतःला मर्द मराठे म्हणवतो, कय तर म्हणे आम्ही पेटत नाही, पण जर का एकदा आम्ही पेटून उठलो तर देनियेला आग लावू, अरे पण बाबांने तुम्ही कधी पेटणार, कधीच नाही. मागील पन्नास वर्षे बेळगाव प्रश्न वाकुल्या दाखवतो आहे. लोकांनो, कार्यकर्त्यांने का तुमचं रक्त तापत नाही? या पुढार्‍यांच्या पालखीला खांदा लावताना जराही स्वाभिमान दुखावत नाही?

अण्णा हजारेंनी माहिती अधिकाराचा कायदा लोकांप्र्यंत आणून खूप काही केले, पण त्यांना सुद्धा प्रसिद्धीची नशा चढली, आता त्यांच्या कडून काय अपेक्षा कराव्यात? त्यांना आता काय काम राहिलेय? बस‍ खटले भरायचे, उपोषण करायचे  आणि आश्वसन मिळाले की लिंबू पाणी. झाले अण्णा मोकळे पुन्हा पुढील उपोषणाची जागा आणि निमीत्त शोधायला. अण्णा तुम्ही लिंबू सरबत बदनाम करून टाकलत.

चीड येते काय करणार? पंधरा कोटी जनतेतून त्यांना आपल्या मुलांशिवाय अन्य  उमेदवार मिळत नाही? राजकारणाचं गन्हेगारीकरण झालं, अशांना तिकीटं मिळतात ते काय राज्य करणार? आम्ही उमेदवारांना नावे ठेवतो आणि नोकरीसाठी शिफारसपत्र पाहिजे म्हणून लाळघोटेपणा करतो. गणपती उत्सव त्यांच्याच काळ्या पैशातून होतो ते आम्हाला चालते, दहीहंडी, नवरात्रात जेव्हा ते मिरवतात तेव्हा आपण कौतुकाने त्यआंच्याकडे पाहतो, मुलांना हात करून  दाखवतो.

हे राज्य आता भटके जमात, स्त्रिया, तरूण, कामगार, कष्टकरी, जाणते याचं आलं पाहिजे. नकोत ते आम्हाला म्हातारे, वय झालेले, पुन्हापुन्हा तेचतेच चेहरे बघायचा कंटाळा आलाय, ते चेहरे आता भेसूर वाटू लागलेत.

संभवामी युगे युगे, असे श्रीकृष्ण सांगून गेले, पण त्यांनी जरी जन्म घेतला तरी काहीही उपयोग होणार नाही, त्यापेक्षा सर्व पुतळ्यांनी जिवंत व्हावे आणि यांच्या पेकाटात लाथा घालाव्यात.

तेव्हा मतदारांनो मतपेटीच्या माध्यमातून या भुतांना गाडून टाका, दाखवा आपल्या एका मताचा चमत्कार.


0 comments

Saturday, October 10, 2009

का मतदान करावं?

Saturday, October 10, 2009

दिवाळी आली, आनंदाचा सण, पण या महागाईच्या दिचसात आनंद कुठे आहे. भारतात जगणं मुष्कील झालंय. आता हे दिवस सणासुदीचे आहेत तसेच निवडणुकीचे, उमेदवारांच्या दिवाळीचे आहेत. या काळात अनेक, प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करीत आहेत, पण ते सोईस्कररित्या आपला मागील निवडणुकीतला जाहीरनामा, आश्वासने विसरली आहेत. कोणीतरी मागील जाहीरनामा सभेत मांडून आपण काय पुर्तता केली आहे ते सांगतो काय? प्रत्येक जण सामान्य जनतेला खुष करण्यासाठी चढाओढ करीत आहे. पण सर्व पोकळ आहे. माणसाला रोजची भ्रांत पडली आहे.

अन्नधान्य, वीज, भाजीपाला, शिक्षण, पेट्रोल, घर, कपडे या सर्व आवश्यक गोष्टी आहेत पण यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्या मानाने प्राप्ती काही  नाही. वीजेची बाब तर काही औरच, त्या दरवाढीला कोणी चाबूक लाऊ शकत नाही. आणि त्याला पर्याय नाही. काही दिवसापूर्वी टेलीफोन खात्याची मनमानी होती, त्यांना माज होता, पण मोबाईल फोन आला आणि त्यांची मस्ती उतरली. तसेच प्रायव्हेट ब्यॅंका आल्या आणि बाकीच्या ब्यॅंकांना आपली पायरी कळाली. काही वर्षांपूर्वी कर्ज मागायला गेले तर कर्जदाराला चोरच समजत होते आणि भिकार्‍याची वागणूक देत आणि आता कर्ज पाहिजे असे नुसते म्हणाले तरी, अगदी स्वप्नात सुद्धा, तरी ब्यॅंकवाले हात धुऊन मागे लागतात, पाया पडत्तात, कसेही करून कर्ज घ्या म्हणून. असो.

अन्नधान्न्याच्या किमती तर काळजाचा ठोका चुकवतात. तुरडाळ, साखर, चहा, तेल या रोज लागणार्‍या वस्तू पण तोलून मापून वापराव्या लागतात. फक्त तोच माणूस श्रीमंत ज्याच्या घरातील डबे या वस्तूंनी भरलेले असतील. कांदा त्याच्या गुणाने आणि भावाने, दोन्ही प्रकारे डोळ्यात पाणी आणतो. दूध रोजच लागते, काळा चहा पिऊ शकत नाही, मग चढ्या भावाने घ्यावेच लागते.

तिकडे शेतकर्‍याची दुःखे वेगळीच. खतांचा बियाण्यांचा भरोसा नाही. भेसळीची असतील तरी लगेच लक्षात येत नाही, दोन चार महिनांनंतर कळ्ते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यात परत पावसाचा प्रॉब्लेम. काय करावं? आता तर परतीच्या मान्सूनने वैताग आणलाय, सर्वत्र पूर आलेत.

यात स्वाईन फ्लूने आपला जोर दाखवून घेतला. अगदी आला आणि मानगुटीवरच बसला. दंगली तर पाचवीलाच पुजल्या आहेत. संप करणारे कशाचाच विचार करत नाहीत, फक्त आपला स्वार्थ बघतात.

रोज पेपर मध्ये काय तर सर्व उमेदवार एकमेकांवर चिखलफेक करताहेत. त्यांना कुठे वेळ आहे, मतदारला काय पाहिजे याचा विचार करायला.

या सर्वांचा विचार केल्यास मनात येते, का मतदान करावं?


0 comments

Friday, October 09, 2009

जादूचा दिवा

Friday, October 09, 2009

होय, तुम्ही फक्त मत द्या आणि विसरुज जा. लोकशाही, आपला उमेदवार, आमदार, त्याचा पक्ष, त्याचा जाहीरनामा, त्याची निशाणी, यातले काही लक्षात ठेवायची गरज नाही. पाच वर्षात एकदा तुम्हाला मताचा अधिकार आहे. द्यायचे असेल मत तर द्या, नाहीतर नका देऊ. जेवढे कोणी मते देतील त्यावर तुमचा आमदार निवडून येणार आहेच. तुम्हाला तो आवडो किंवा नावडो, पुढली पाच वर्षे तो तुमच्या वतीने बोलणार आहे. ही आहे लोकशाही आणि त्यासाठी तुम्ही आपल्याला मतदान करावे ही प्रत्येक पक्षाची, उमेदवाराची, अपक्षाची इच्छा आहे. मग बदल्यात तुम्हाला काय मिळणार ? हा प्रश्न मूर्खपणाचा म्हणायला हवा. काहीही मिळेल. नुसते मागून तर बघा. फुकट घर, स्वस्तात धान्य, मोफत वीज, फुकट शिक्षण, बुडवलेल्या कर्जाची माफी, घरात मोफत रंगीत टीव्ही, रस्त्यावर भूक लागली तर वडापाव किंवा फराळ. नुसते मागायची खोटी आहे. प्रत्येक पक्ष अल्लादिनच्या दिव्यामधला राक्षस झाला आहे. आपण सगळे कर्मदरिद्रीए म्हणून काही मागायचा आळस करत आहोत. शेवटी बिचार्‍या त्या दिव्यातल्या राक्षसांनाच आपले डोके चालवून जाहीरनामे काढणे भाग पडते. सामान्य माणसाला काय हवे त्याचा शोध घ्यावा लागतो, त्याची यादी बनवावी लागते. त्याचे बाजारभाव शोधून स्वस्तात वा फुकट अशी वर्गवारी करावी लागते. अल्लादिनला फक्त त्या जुनाट जादूच्या दिव्यावर बोटातली अंगठी घासावी लागायची. आपल्याला फक्त एक दिवस मतदान केंद्रात जाऊन बोटावर काळ्या शाईचा डाग लावून घ्यायचा आहे तेवढाच. बाकीचे काम उमेदवार नावाचा दिव्यातल राक्षस पार पाडणार आहे. जेवढ्या काही समस्या आहेत ना तेवढ्यांचे समर्पक उत्तर व उपाय त्याच्याकडे सज्ज आहेत. आपण बोटाला शाईचा डाग लावून घेण्याने त्याचे काम अडले आहे तेव्हा तुम्ही फक्त मत द्या इतकेच. अल्लादिन तसा कमनशिबी, त्याच्याकडे त्या दिव्यातला एकच राक्षस असायचा. आपण साधी अंगठी घासली नाही तरी अर्धा डझनहून अधिक राक्षस हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तूरडाळीच्या किमती आभाळाला जाऊन भिडल्या म्हणून आपण रडत बसलेलो आहोत. एक मत देऊन या. बघा, आभाळातून तूरडाळींचा पाऊस पडू लागेल. काय समजता तुम्ही ? पावसाने दगा दिला असेल, आपले नेते दगाबाज नाहीत. ते एक रुपयात किलोभर तूरडाळ विकणारी दुकाने काढतील आणि तुमच्याकडे रुपया नसेल तर स्वस्त व्याजदराने तूरडाळ खरेदी करण्यासाठी बँकांनी कर्ज द्यावे, असाही आदेश काढतील. घाबरु नका कर्ज फेडायला. तूरडाळ खरेदी करा, त्यासाठी कर्ज काढा आणी सर्व विसरुन जा. कारण आपल्यात अजून काही अब्रुदार आहेत. ते तूरडाळीसाठी काढलेले कर्ज फेडता आले नाही मग आत्महत्या करतील. त्यामुळे तूरडाळ आत्महत्येचा नवा विषय तयार होईल आणि तूरडाळीसाठी काढलेले कर्ज माफ करायला सरकार हजारो कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करील. तुम्ही सन्मानाने जगायला मोकळे. कर्ज काढावे, कर्ज बुडवावे यासारखा सन्मान जगात कुठे मिळणार आहे ? नकारात्मक विचार करणे सोडून द्या. काय नाही त्यापेक्षा काय आहे त्याचा सकारात्मक विचार करा. आज पाऊस नाही, दुष्काळ आहे. खरीपाची पिके बुडाली आहेत ? फिकीर करु नका. शेतात पिकणारा माल नाही पिकला म्हणून बिघडत नाही. दुसर्‍या प्रांतातून, देशातून आयात करता येतो. आयात करायला सरकारच्या तिजोरीत पैसे असले म्हणजे झाले. पैशाची टंचाई अजिबात नसते. तिजोरीत पैसा नसेल तर सरकार कर्ज काढील. टांकसाळीमध्ये अधिक नोटा छापल्या की पैसा तयार झाला. मग कडधान्ये पिकली नाहीत, खरीप पिके बुडाली याची फिकीर कशाला ? निश्चिंत राहा. तुम्ही फक्त मत द्यायचे. बाकी सगळ्या गोष्टी आपले नेते आणि पक्ष पुरवणार आहेत ना ? कुठून हे सर्व करणार ? असे विचारायचे नाही. अल्लादिनने राक्षसाला तो प्रश्न विचारला का ?

दैनिक पुढारी वरून खास वाचक मित्रांसाठी


0 comments

Wednesday, October 07, 2009

मित्र आणि कर्म

Wednesday, October 07, 2009

पाणी आणि दूध यांचे नाते काय सांगते. हंसाला दूध आणी पाणी वेगळे करण्याची कला अवगत आहे असे म्हणतात. पण वेगळे कशाला करायला पाहिजे.

दुधात पाणी मिसळले तर काय चमत्कार होतो पहा.

भेटीस आलेल्या पाण्याला, जणू मित्रच आलाय भेटायला असे समजून दुधाने स्वतःचे सर्व गुण पाण्याला देऊन टाकले. आणि पाण्याचे अस्तित्व दुधात मिसळून गेले. आणि हे पाणी दुधाच्याच भावाने विकू लागले. पुढे हे पाणी मिश्रीत दूध चुलीवर ठेवल्यावर, पाणी विचार करून, आपल्यासाठी दुधाला ताप लागतो हे पाहून, आपण आपले निघून जावे म्हणून आणि दुधाचा ताप वाचावा म्हणून स्वतःचे अग्नीत बलीदान केले म्हणजेच वाफ होऊन उडून गेले. आता ते दूध, आपल्यामुळे अग्नीने आपल्या मैत्राला जाळले, तेव्हा आपणही सहगमन करावे या विचाराने भराभर उसळी घेऊन, उकळून, उसळ्या मारून अग्नीत बलीदान करण्यास निघाले.

दुधाचे पातेल्याबाहेर उसळी घेणे न समजून गृहिणी, दूध उतू जाणे शांत होण्यासाठी, पाण्याचा हबकारा मारते, तेव्हा दुधाला आपला मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद होतो आणि ते मित्रप्राप्तीच्या आनंदात कसे शांत होते.

सज्जनांची मैत्री अशी असते.

चांगले मित्र योग्य वेळी भेटणे हा सुद्धा नशिबाचाच भाग असतो. वाईट संगत माणसाला रसातळाला नेते. हे सर्व कर्म आहे. त्या कर्माला नमस्कार असो.

ज्याने ब्रम्हांडगोलामध्ये, ब्रम्हदेवाला एखाद्या कुंभारासारखे कामाल जुंपले आहे.  ( जसे कुंभार मडकी घडवतो, त्याचप्रमाणे ब्रम्हदेव मुंडकी घडवून सृष्टीची निर्मिती सतत, अविरत करत आहे. ) ज्याने महासंकटपूर्ण अशा दहा अवतारांच्या जंजाळात विष्णूला कधी फेकले हे त्या विद्वान विष्णूलाही कळले नाही, ज्याने शंकराला हाती कवटी देऊन भिक मागावयास लावले, स्मशानात बसवून उलट त्याला त्याचाच अभिमान बाळगावयास लावले, आणि सूर्याला सतत तळपत ठेऊन, आकाशात उसंत न घेता जळत ठेवले, त्या कर्माला नमन करू यात. ही कदाचित् त्यांच्या पूर्वकर्माची फळे तर नसावीते, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुःख सांगण्यासाठी, वाटून घॆण्यासाठी त्यांना मित्र नसावेत. अगाध आहे. 


0 comments

Monday, October 05, 2009

तुमच्याकडे, तुमच्या आसपास जुनी सायकल आहे का?

Monday, October 05, 2009

मुंबई-पुण्यासारख्या शहरात भंगारात पडून असलेल्या, जुन्या, मोडक्या सायकली गावातल्या मुलांची पायपीट वाचवू शकतात. त्या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी. कोणीही सहभागी होऊ शकतो असा हा प्रकल्प अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहाचावा म्हणून हा ई-मेल...


इथे होतं भंगाराचं सोनं

17 Feb 2009
जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.
गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.
त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.
विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.
आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.
मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.
एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.
केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीही उचला खारीचा वाटा

भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject_@_gmail.com [remove _ from address] या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.


सौजन्य - सुनील घुमे, अनिकेत वैद्य


0 comments

Sunday, October 04, 2009

मन्नाडे

Sunday, October 04, 2009

गायक मन्नाडेंना त्यांच्या ९० व्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार २००७ सालासाठी जाहीर झाला हे ऐकून  किती बरे वाटले. नाही म्हणजे भारत सरकार जागे होईल का नाही हा चिचारच मनाला खात होता.

मन्नादांनी ३५०० पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत, त्यात सर्वात जास्त शास्त्रीय संगीतावर आधारलेली गायली म्हणून त्यांना तोच ठपका बसला, पण खरेतर असे नाही.

त्यांचे ’ ए मेरी जोहराजबी ’ हे रांगडे प्रीतीगीत ऐका, किंवा ’ ये रात भिगी भिगी ’ हे गाणे ऐका, आणि विचार करा दुसर्‍या गायकाच्या तोंडी हे गाणे शोभेल काय? ’ ए मेरी जोहराजबी ’ मध्ये तो जेव्हा म्हणतो ना ’ तुझपे कुर्बान मेरी जान मेरी जान मेरी जान’ अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. ’ एक चतुर नार ’ का यात धमाल नाही?’ आठवा शास्त्रीय संगीत पण विनोदी ढंगानं ’ फूल गेंदवा न मारो, न मारो, लगत करेजवामे चोट’

मन्नाडे म्हणजे समाधान मानणारे गायक. उगीच कुणाशीही वाद घालणे त्यांना पसंद नव्हते. त्यांनी तमन्ना चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं.

त्यांना १९७० आणि १९७१ साठी फिल्म पुरस्कारही मिळाले होते.

पुन्हा एकदा आम्हा रसिकांना दादासाहेब फाळके पुरस्काराचा अभिमान वाटू लागलाय.


0 comments

Saturday, October 03, 2009

देवालय न्यायालयात

Saturday, October 03, 2009

एका वृत्तपत्रतील बातमी -

देशात कुठेही यापुढे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही प्रार्थनास्थळ उभारण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रसरकारला दिले. मंदिरे, मशिदी, गुरूद्वारा, चर्च तसेच इतर सर्वे समुदायाच्या प्रार्थनास्थळांसाठी हे निर्बंध लागू राहतील, असे न्या. दलवीर भंडारी आणि न्या. मुकुंदकम्‌ यांच्या खंडपीठाने आपल्या अंतरीम आदेशात म्हटले आहे. शिवाय हा आदेश भारतभर अंमलात आणावा. याला कारण असे झाले की, मे २००६ मध्ये गुजरात सरकारने अतिक्रमण करून बांधलेल्या  जागेतील सर्व प्रार्थनास्थळे तोडण्याचा आदेश दिला होता, यावर सादर झालेल्या याचिकेवर हा अंतरीम निर्णय देण्यात आला.

म्हणजे प्रार्थनास्थळांचे एवढे प्रस्थ माजले आहे की, यावर आदेश द्यावा लागत आहे. पण आम्ही भारतीय कधी विचार करतो का? कामापेक्षा आपल्याला देवधर्म जास्त महत्वाचे वाटतात. एकच उदाहरण देता येईल ते म्हणजे महाराष्ट्रातील गणेशोत्सव. काय त्याला विकृत रूप आले आहे. गणपती उत्सव झाल्यानंतर ती मुर्ती जवळच एखादे मंदिर बांधून त्यात वर्षभर ठेऊन पूजा केली जाते. पण यापासून रहदारीला काय अडथळा होतो आहे याचा विचारच नाही.

कोणीही उठसुठ उठतो (म्हणजे एकादा राजकारणीच म्हणा ना) आणि गल्लीतल्या मुलांना घेतो आणि देतो एक मंदिर बांधून. किती देव किती मंदिरे. गणना नाही. बरे त्यांची नावे सुद्धा अगदी मजेशीर. पुण्यातच पहा देवतांची नावे - पंचमुखी मारुती, भांग्या मारुती, जिलब्या मारुती, डुल्या मारूती, अवचित मारुती, भिकारदास मारुती, अकरा मारूती, वीर मारुती, दास मारुती, चिमण्या गणपती, पेशवे गणपती, उपाशी विठोबा वगैरे. इतकी देवळे आहेत ना? बस‌.

भक्त तरी किती चालू, गाडीवरून जात असताना फक्त मान झुकवणार, बस त्या देवाने ओ.के. म्हणायचे. देवाला पाया पडताना चप्पल हरवू नये म्हणून त्याच चपलेवर उभे राहून पाया पडायच्या. पाया पडताना मागे पहायचे नाही. कितीका रहदारीला त्रास होऊ देत. आम्हां हिंदूंना एवढे देव कोणी दिले असतील, ते एक देवच जाणो.

गंमत आहे, एका रस्यावर गणपतीचे मंदीर, पुढच्या चौकात हनुमानाचे मंदीर, मग पुढे दत्ताचे, त्या पुढे एखादी देवी वगैरे. आमचा भक्त काय करतो, गुरूवारी दत्ताला जाताना त्याला रस्यातील मारूती दिसत नाही, तर मंगळवारी त्याची देवीशिवाय कोणाचीही ओळख नसते.  अगदी ढुंकुनही पहात नाही. अशी भक्ती.

सकाळी दोन दोन तास  पूजा केल्याशिवाय मन भरत नाही.

जेवणात मीठ किती पाहिजे, फक्त चवीपुरते, पण ते पूर्ण ताटाच्या मानाने किती असते? चिमुटभर, पण त्याने जेवणाचे समाधान मिळते ना? मीठ जास्त किंवा कमीचा विचार करा. काय होई?. तसेच देवाचे स्थान सुद्धा आपल्या आयुष्यात मिठासारखेच असू द्यावे.


0 comments

Thursday, October 01, 2009

गांधीजी

Thursday, October 01, 2009

महात्मा गांधीजींचा आज जन्मदिवस, २ ऑक्टोबर. आज त्यांच्या कार्याचा आपण गौरव केला पाहिजे. जगाला अहिंसा शिकवली ती गांधीजींनीच. जगातील हे एकमेव आश्चर्य आहे की अजिबात रक्तेपात न करता, हिंसा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही.

म.गांधींनी अहिंसा तत्व पालनामध्ये प्रेमशक्तीला महत्वाचे स्थान दिले. कारण प्रेम कशाचीच अपेक्षा करीत नसते. त्यांनी प्रथम आपल्यातील परमेश्वराला जाणून घ्यायला शिकवले. त्यातून विनम्रता प्रकट होते. याच विनम्रतेतून आपल्यातील अहंभाव, अहंमन्यता गळून पडते. हिंसेतून जेव्हा फायदा, कल्याण वाटते, ते तात्पुरते असते, पण वाईट परिणाम कायम स्वरूपी असतात. त्यांना शांती पाहिजे होती, पण दुबळेपणा नको होता.

महात्माजींचं कौतुक सा‍र्‍या जगात होते पण त्याच भारतात मात्र काहीतरी गैरसमजूतीतून त्यांना तेवढा मान मिळात नाही. आज त्यांची जयंती आहे, पण त्यांच्या बद्दल लिहायला वर्तमानपत्रांच्या संपादकांकडे ’ संपादकीय ’ लिहायला वेळ नाही. जे कार्य शिवाजी महाराजांनी केले आणि आपली मोगलांच्या तावडीतून सुटका केली, त्याचप्रमाणे इंग्राजांच्या पाशवी जाचातून म. गांधींनी सुटका केली. जर स्वातंत्र हिंसेतून मिळाविण्याचा प्रयत्न झाला असता तर ते अशक्य होते, कारण सत्ता इंग्रजांच्या हातात होती आणि मुख्य म्हणजे आपलेच भारतीय त्यांची सेवा इमानेइतबारे करीत होते, कारण त्यांची ठाम समजूत होती की इंग्रज भारतातून कधीही जाणार नाहीत. 

आजच्या पिढीला गांधीजींचे विचार वाचण्यासाठी वेळ कुठे आहे, गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला नैतिक अधिष्टान दिले.

गांधीजी काय किंवा कोणीही थोर पुरूष काय त्यांच्याबद्दल वाईट लिहायचेच ही फॅशन झाली आहे. गांधीजींचे विचार कृतिशील आणि अनुभवसिद्ध होते. गांधीजींचा मंत्र आम्ही जीवनात उतरवू शकले नाही.

चला आज आपण त्यांच्या कार्याचा गौरव करू यात.


1 comments

म्हातारपण

सामाजिकदृष्ट्या अजूनही वृद्धांच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. कारण त्या समस्या सामाजिक आहेत हे लक्षातच येत नाही. मुळात घरगुतीसुद्धा लक्षात येत नाहीत. वृद्ध जर आर्थिकदृष्ट्या सबळ असतील तर त्यांच्या अनेक समस्यांवर आपोआपच उत्तरे मिळतील असे वाटते. त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, अनेक समाजोपयोगी कामात त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. पण त्यांना घरच्या माणसांकडून प्रथम आधार मिळाला पाहिजे.

तरूणपणी काही लोक मुळाबाळांना घडविण्याचे व्रत घेऊन आपल्या म्हातारपणाचा विचार करत नाहीत, सर्व मुलांच्या भवितव्यासाठी अर्पण करतात. पण काही जण थोडे राखून मुलांना मोठे करतात, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात आणि म्हणतात बाबा आता तुझे नशीब. तर काहीजण स्वतःच्या चैनीकडेच लक्ष देतात मग मुले कशीपण वाढतात.

आपल्या देशात ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात येतात. पण त्या उथळ आहेत त्याला अर्थ नाही. कायदा करून समस्या सुटत नाहीत. सामाजिक, भावनिक बंधन असावे लागते. आपल्या वृद्ध आईवडिलांचा संभाळ करावा, त्यासाठी कायदे केलेत, पण अशा उपचारांचा फायदा आहे काय? यासाठी कोर्टात जायचे म्हटले तरी पैसा पाहिजे शिवाय अंगात त्राण पाहिजे, या वयात शक्य आहे काय? वृद्धांच्या अनुभवाचा अपमान झाला नाही पाहिजे याचा विचार त्यांचे पोटचे गोळे करत नाहीत, तर इतरांचे काय?  ज्येष्ठांचा आदर करा ही आपली शिकवण आहे, पण तसे घडते?

सद्याचे जीवन धावपळीचे आहे मान्य आहे, पण म्हणून आपल्या वृद्ध मातापित्यांना संभाळायला नको काय? आजकालच्या जमान्यात वॄद्ध नोकरी करू शकत नाहीत.

शेवटी काय तर परावलंबी जीवन वाईट, आपल्याला कोणीतरी काहीतरी देईल मग आपण घास घेऊ ही भावना मरणप्राय वेदना देते, पण वाढलेल्या वयाने सर्व दारे बंद केलेली असतात.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तने.


0 comments

समाधान

मी एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे; पण वरिष्ठांनी एखादी चूक दाखवली, की खूप अस्वस्थपण येतो. मुख्य म्हणजे मी खूप काम करुनही मला कामाचे समाधान मिळत नाही. सारखी मनाची घालमेल सुरु असते. त्यातून नुकताच बीपीचा त्रास सुरु झालेला आहे. योग्य मार्ग सुचवावा.

आपण एकंदरीत हुशार आणि कार्यतत्पर अधिकारी आहात. आपले स्वतः बद्दलचे मत आणि इतरांचे आपल्याबद्दलचे मत यांच्या एकत्रीकरणातून आपली स्वतः ची विशिष्ट प्रतिमा आपण तयार करीत असतो. एकदा का ही स्वप्रतिमा तयार झाली, की आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करीत राहतो; मात्र सभोवतालची परिस्थिती व आपली जुळवून घेण्याची क्षमता यातील अंतर वाढत जाते, तेव्हा आपण ' मानसिक ताणाचा ' अनुभव घेतो. सातत्याने तणावाचे दडपण जाणवत राहिल्यामुळे आपणाला इच्छा असूनही आराम करता येत नाही, त्यामुळे शारीरिक थकव्याबरोबरच बौद्धिक थकवा जाणवतो, निराशा वाढते आणि मुख्य म्हणजे वस्तुनिष्ठपणे विचार करता येत नाहीत. सततच्या ताणतणावामुळे झोप लागत नाही. पचनसंस्था, स्नायू यावर अतिरिक्त दाब पडतो आणि डोकेदुखी, रक्तदाब, हदयविकार इत्यादींसारख्या शारीरिक आजारांना सामोरे जाव लागते. आपल्या ताणाचा वाढता भार सहन करावा लागण्यापाठीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण करीत असलेले अवास्तविक विचार होय.
बर्‍याच वेळा आपली स्वतः ची अशी अपेक्षा असते, की आपण कधीही चुकता कामा नये. चूक होणे ही भयानक गोष्ट आहे. आपण स्वतः कडून अशी बिनचुकपणाची अपेक्षा बाळगत असल्यामुळे छोटया चुकीबद्दलही विलक्षण अपराधी वाटते. कदाचित त्यामुळे आपला ताण त्यामुळे कायम राहत असेल; मात्र एक लक्षात घ्यायला हवे , ही चुका न होन्याची खरदारी आपण घेऊ शकतो; परंतु चूक झाली तर मनात अपराधगंड निर्माण होऊ द्यायचा नाही. या प्रकारचा वास्तविक, स्पष्ट आणि तर्काला पटणारा विचार मनात बाळगला, तर मानसिक ताणाचा त्रास होणार नाही. कामाच्या ठिकाणी पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळायला हवे हे खरे आहे; पण आपल्याला हवा तसा, हवा तेव्हा आणि हवा तेवढा पाठिंबा कोणी देऊ शकत नाही, हे वास्तव सत्य आहे. त्यामुळे आपणच आपल्याला प्रोत्साहित ठेवायचे, आपला आत्मविश्वास आपण वाढवायचा आणि आपल्या कामातील आनंद आपणच शोधायचा अशी वृत्ती आपण जोपासली, तर आपल्यावरील मानसिक ताण आपोआप कमी होत जातो. आपण सदैव तणावाखाली काम करत असू, तर अस्वस्थपणा व असमाधन टिकून राहते; पण जास्तीत वास्तविक व तर्कशुद्ध विचारांचा आधार घेत आत्मसमर्थनाची सवय मोडून काढायचा प्रयत्न करीत राहिलो, तर सहजपणे व आनंदाने आपण आपले काम पार पाडू शकू. साहजिकच अस्वस्थपणा कमी होऊन आपला B.P चा त्रासही कमी होईल, त्यासाठी -
* वस्तुनिष्ठ विचार करण्याची सवय लावा.
* विनोदबुद्धी शाबूत ठेवा.
* शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
* ताणरहित स्थितीत राहण्याचे प्रशिक्षण घ्या.
मुख्य म्हणजे ' ताणातही जग जगते, आनंदे हसते ' ही वास्तवता लक्षात ठेवली, तर आपल्यासारखे आनंदी आपणच !!


0 comments