चॅनेलवाल्यांची कमाल

दूरदर्शनवर बातम्यांचे चॅनेल आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा असते, त्यांनी बातम्या वेळेवर आणि योग्य दाखवाव्यात, पण तसे होत नाही, त्यांना काय आणि केव्हा दाखवायचे याचे भान नसते.

आम्ही कंकणाकृती ग्रहण पाहण्यास कन्याकुमारीला जाऊ शकलो नाही म्हणून बातम्यांच्या वाहिन्या पहात होतो, वाटले हे चॅनेल वाले Live दाखवतील आणि आपण कंकणाकृती ग्रहण पाहू शकू, घरात बसल्या बसल्या. पण कसले काय? ते लोक फार हुशार ना. त्यांनी काय दाखवले माहित आहे?

सर्वात जास्त विनोद केला Star News वाल्यांनी. त्यांनी बोलावले होते काही तर्कशास्त्री, वैज्ञानिक आणि ज्योतिषांना, ग्रहणावर चर्चा करण्यासाठी. चर्चा कसली नुसते भांडण. प्रत्येकजण आपली बाजू कशी बरोबर ते ओरडून सांगत होता, अगदी दुसर्‍याच्या हातातील माईक ओढून. सगळे अति शहाणे ना? त्यांना हे भानच नव्हते की ते ज्या विषयावर भांडत आहेत, ते ग्रहण मात्र प्रेक्षकांना दाखवले जात नाही. एवढ्या वर्षानंतर जर अशी संधी येत असेल तर चॅनेलवाल्यांनी फक्त ग्रहण नको दाखवायला? त्य मंडळींना एवढी सधी गोष्ट कळत नव्हती की, एका वेळेस एकानेव बोलायचे असते. ते जे काही बोलत ( भांडत ) होते त्यातील एक अक्षरही समजत नव्हते. झोपडपट्टीतील नळावर बायका भांडतात ना अगदी तसे. चॅनेलवाली मंडळी शांतपणे पहात होती, त्यांना एवढेही कळत नव्हते की, आपल्याच चॅनेलचे नाव खराब होत आहे.

आजतक चॅनेलवर ग्रहणाची दृष्ये दाखवत होते, पण जेव्हा कंकणाकृती ग्रहण अवस्था आली त्यावेळी नेमक्या जाहिराती  दाखवल्या, कंकणाकृती अवस्था संपली आणि त्यांच्या जाहिरातीही संपल्या. आहे की नाही मज्जा.

NDTV, Doordarshan News यांनी वेगळीच कमाल केली, कन्याकुमारीला होत असलेले कंकणाकृती ग्रहण दाखवायचे सोडून, बाकी ठिकाणांचीच ग्रहणे दाखवत होते.  

बातम्यांच्या चॅनेलवाल्यांना खरंच एवढे सुद्धां ज्ञान नसावे, की प्रेक्षकांना काय पाहिजे आहे? आणि आपण काय दाखवत आहोत. हे सर्व जण जे ज्ञानी लोक तारे तोडत होते, ही सर्व माहिती ग्रहणानंतर सुद्धा सांगता आली असती ना?

Unknown

1 comment:

Unknown said...

हा हा हा हा, काय भाऊ, तुम्हीं पण कुणाकडून अपेक्षा ठेवल्या… :)