घोडेबाजार

ऐका हो ऐका, भारतात इंडियन प्रिमियर लीगचा लिलाव सुरू झाला. लिलाव भाग घेणारे मालक सरसावून बसले आहेत. जिंकणार्‍या घोड्यावर पैसे लावले जातील. ज्यांचा लिलाव होणार आहे, ते एखाद्या गुलामाप्रमाणे मालकाची वाट बघत आहेत. १२ मार्चला या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे, आणि या तमाशात कोणाकोण कलाकार आपली कला कोणाकडून सादर करणार आहेत ते कळणार आहे.
यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना टाळण्यात आले आहे. त्याला कारण दहशतवादात पाकिस्तानवर संशय. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर  हल्ले होतायत त्याचेही परिणाम या लिलावावर जाणवू लागले आहेत, कारण त्या खेळाडूंना सुद्धा बाजारभाव नाही. ज्या प्रकारे हा लिलाव चालतो, ते पाहून घोडेबाजाराची आठवण होते. नंतर हे घोडे त्या त्या मालकासाठी जिवाचे रान करून पळणार, नाहीतर पुढ्च्या वेळेस लिलावात भाव मिळणार नाही ना! या वेळेस किरण पोलार्डला सर्वात जास्त म्हणजे ३.५० क्प्टी भाव मिळाला. भारतातील तीन खेळाडूंची लिलावत विक्री झाली. या पुढील का्ळात अजून कशाकशाचा लिलाव होईल, ते एक परमेश्वरच जाणो.
या वेळेस ’ सायलेंट टायब्रेकर ’ हा नवीन नियम करण्यात आला आहे. एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी जास्तीतजास्त ३.५ करोड करोडचीच बोली बोलता येते, पण जर एका पेक्षा अनेकांची बोली समान झाली तर टाय होतो अशा वेळेस या पेक्षा जास्त रक्कम बोलता येते, पण ही जास्तीची रक्क्म खेळाडूला न मिळता आयपीएलला मिळते. आहे की नाही मज्जा!
सर्वात जास्त जळफळाट झाला तो पाकिस्तानी खेळाडूंचा, कारण त्यांना कोणीच लिलावात विकत घेतले नाही.
आतापर्यंत जे खेळाडू मायभूमीसाठी खेळायचे ते आता कोणत्यातरी पैसेवाल्या मालकासाठी खेळणार. खेळाडूंनी आपले अवमूल्यन तरी किती करून घ्यायचे. पैसा मिळतो पण गुलामाप्रमाणे.
आपण सामान्य माणसे हे खेळ पाहणार पण त्यात देशप्रेमाचा जिवंतपणा असणार आहे काय? यात जाहिरातवाल्यांची चांदी, दुसरे काय?
यापुढे हे लिलाव बंद झाले पाहिजेत. प्रत्येकाने देशासाठी खेळावे. याच लिलाववाल्यांजवळ जर एवढा पैसा असेल तर त्यांनी भावी खेळाडू तयार करण्याकडे लक्ष द्यावे, ज्यायोगे आम्ही ऑलिंपीक मध्ये डोळे लावून पदकांची वाट पाहतो ते स्वप्न तरी साकार होईल.   

Unknown

No comments: