कष्ट करावेत का?

जगात लोक यशस्वी होतात, पण ते वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्या यशाची कल्पना, संकल्पना वेगवेगळी असते. आता पहा झरे यशस्वी एकंदर लोकसंख्येच्या किती टक्के असतात, अगदीच नगण्य. आता यशस्वी कशाला म्हणावे? दोन उदाहरणे पाहू यात. एकजण साधा कामगार असतो, पण त्यातल्या त्यात पैसे वाचवून मुलांना चांगले शिक्षण देतो, मुलांना चांगली नोकरी, मिळते, त्यांची चांगल्या घरात लग्ने होतात, आणि मुले आईबापांना कधीही अंतर न देता सुखात ठेवतात. पण दुसरा भरपूर कमावतो आहे, गाड्या घोडे आहेत, भरपूर पैसा आहे, पणा मुलांना व्यसने आहेत याला काहीतरी शारिरीक समस्या आहेत, तसा हा सुखी आहे पैशाची चिंता नाही, म्हातारपणी कष्ट करण्याची गरज नाहे, मग हा सुखी का? तर सुखाची व्याख्या व्यक्तिनुरूप बदलते.

एखाद्याला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण आईवडिलांच्या हट्टाखातर त्याला वकिली करावी लागते तर आता तो आयुष्यभर पैसा मिळवूनही समाधानी असेल काय? त्याची शास्त्रज्ञ होण्याची खंत त्याला टोचतच राहील ना? आपले आयुष्य जेमेतेम पन्नास ते साठ वर्षांचे त्यातील आपण पंचवीस वर्षे शिक्षणात घालवतो, नंतर कामधंदा शोधण्यात दोन चार वर्षे खर्ची पडतात. उरली साधारण तीसएक वर्षे त्यात काय देवे लावणार. म्हणून माणसाला बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग कष्ट आणि परिश्रम यातील फरक ओळखायला शिका. आपल्याला शिकवलेले असते, "आराम हराम आहे","कष्टाला पर्याय नाही", "कष्ट कर फळाची अपेक्षा करू नको ", "मेहनतका फल मिठा होता है" बाबा हे सर्व निबधात लिहायल सोपे आहे, वास्तविक आयुष्यात काय? दिवसभर रस्त्यावर काम करणारा मजूर काबडकष्ट करतो त्याला मिळतात चार हजार रूपये, पणा गल्ल्यावर बसलेला मालक काम न करता, किंवा वकील काहीही कष्ट न करता, काहीही  भांडवल नसताना पैसे किती कमावतो तर महिन्याला वीस हजारांच्या वरच. कारणा त्यांनी बुद्धीचाबा पर करून घेतला आणि आपले ध्येय ठरवले.माण्साने बुद्धीच्या जोरावर मशिन्सचा शोध लावला, मग त्याचा वापर करून कष्ट कमी करायला पाहिजेत ना. 

दुकानात पुस्तके मिळतात, यशस्वी होण्याचे शंभर मार्ग, मी यशस्वी कसा झालो, पण ही पुस्तके लिहीणार्‍याच्या आयुष्यात डॊकावून पाहिले असता, ती अयशस्वी असतात, म्हणून अशी पुस्तके लिहून पैसे कमावून यशस्वी होतात.  यशस्ची होण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, वैयक्तिक स्वभाव या गोष्टी कारणीभूत असतात, मग पुस्तके वाचून काय हॊणार.

खूपशी मुले आजुबाजूला बघून आपले ध्येय ठरवितात, किंवा वडिल म्हणतात त्याप्रमाणे पुढे जातात, मग मुलांच्या मनाचे काय? म्हणून आयुष्याची दिशा ठरवणे अतिशय महत्वाचे आहे. आम्ही दहाचीचे क्लास घेतो, तेव्हा मुलांना समजावून सांगतो, आणि त्याला आयुष्याचे कोष्टक दाखवतो, मग तो मुलगा अंतर्मुख होऊन विचार करूल लागतो आणि मग त्याला काही सांगावे लागत नाही.

दहावीची परिक्षा, फक्त एकच वर्ष कष्ट उत्तम मार्क -डोनेशनची गरज नाही -  चांगले मोठे कॉलेज - चांगले मित्र - चांगले शिक्षण - उत्तम नोकरी - वशिला नको - भरपूर पगार - मग उच्च जीवनमान - उत्तम सुस्वरूप मुलीचे स्थळ सांगून येणार - मुलगी सुद्धा शिकलेली असणार - घरात सुशिक्षीत वातावरण - समाधानी - अपत्ये गुणी होणार - कारण आईवडिल सुशिक्षीत म्हणून संस्कार चांगले - मुलांचं करियर उत्तम - काळजी नाही - म्हातारपण सुखात .

हे सर्व कशामुळे? दहावीचा अभ्यास कष्टाने करून चांगले मार्क मिळविले तर. 

Unknown

No comments: