पुण्यावरील हल्ला

पुण्यात बॉम्बस्फोट झाला आणि पुणे दहशतवादाखाली आले. याला कोण जबाबदार याबद्दल आता उलटसुलट चर्चा होतील. पण ज्यांचे प्राण गेले आणि जे कायमस्वरूपी अधू झाले, त्यांचे काय? पुणॆ शहरातील सर्व पोलीसदल शाहरूखखानाच्या माय नेम इज खान चित्रपटाला संरक्षण देण्यात मोठेपणा समजत होते आणि याच ढिलाईचा अतिरेक्यांनी फायदा घेतला. कोण तो शाहरूखखान त्याच्या चित्रपटाला एवढी सुरक्षित?ता कमाल आहे. बरं यात पोलीसांची तरी चूक म्हणता येईल का, नाही कारणे फायद्याचे राजकारण हे राजकारणीच करतात. म्हणाला असेल शाहरूखखान काहीतरी, पणा त्याकडे दुर्लक्ष करायचे हे या राजकारण्यांना कोण सांगणार. महागाई वाढते आहे याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. असले चाळे मात्र चांगले जमतात. पोलीसही साधा विचार करत नाहीतकी काय बरोबर आहे ते. नसता प्रदर्शित झाला असता त्याचा सिनेमा तर काय बिघडले असते? किती खर्च झाला असेल, पोलीसांवर. तो काय शाहरूखखान देणार आहे.

पण या मानसिकतेचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. आता सर्वत्र नाकाबंदी करतात. सर्वांच्या झडत्या चालू आहेत. अरे काय आता लगेच अतिरेकी येणार आहेत काय? आणि ते काय शस्त्रे घेऊन रांगेत उभारून झडती देणार आहेत? पण झाले ते अतिशय गंभीर झाले. सर्वांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, कारण सामान्य माणसांना कोणीही वाली राहिलेला नाही.

Unknown

No comments: