Sunday, February 21, 2010

भारतीय शिक्षणपद्धती

Sunday, February 21, 2010

भारतात मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सर्व भारतात दहावीचा आणि बारावीचा अभ्यासक्रम एकच असण्याची घोषणा केली. खूप वर्षांनंतर एक चांगला निर्णय होणार आहे. असा निर्णय घ्यायची पाळी का आली तर त्याला विद्यार्थ्यांव्या आत्महत्या कारणीभूत आहेत. बरोबर आहे, सर्व राज्यातून अभ्यासक्रम वेगळा असेल तर, जेव्हा विध्यर्थी उच्च शिक्षणासाठी परराज्यात जातात तेव्हा त्यांना तेथील अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यावे लागते. तसं पाहिलं तर पदविकेचा अभ्यासक्रमही सर्व भारतातून एकच पाहिजे. परदेशात ही पद्धत आहे, त्यामुळे शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, मुलांना ही त्या विषयात अभ्यास करण्यापेक्षा ती आपली भविष्ये घडवता येतात.

एक समान शिक्षणपद्धती असल्यास सबंध भारतातून हुशारीचा कस लागला जाईल. कोणी कोठेही करियर घडवू शकेल. कोणा एका विद्यापीठाची मक्तेदारी संपुष्टात येईल. मग फी वाढीलाही आळा बसेल. अजून एक करता येईल, नव्हे करावे, अभिमत विद्यापीठाचा  दर्जा काढून टाकावा. 

मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, आपलीच मातृभाषा शिकण्याची गरज आहे का? फक्त लिहायवाचायला आले तर  बस नाही का? अलंकार, वृत्त, व्याकरणाचा काय उपयोग आहे रोजच्या जीवनात? ज्याला आवाड असेल त्याने अभ्यास करावा ना? सर्वांना का त्रास? संस्कृत भाषा शिकवतात, मुले अतोनात कष्ट घेतात, परिक्षा झाल्यावर दुसर्‍या दिवशी सगळं विसरून जातात. बाबांनो प्रॅक्टिकल विचार करायला शिका.

आपली भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय तर गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राम्हण अशा  शाकाहारी समाजाला मांसाहारी पदार्थ जबरदस्तीने शिकवण्यासारखे आहे, ज्याचा त्यांना भविष्यात काडीमात्र उपयोग नाही.


0 comments: