कॄपालू महाराजांची कृपा

भारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत? त्यांना हे आधीच का कळले नाही.

सरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.

Unknown

No comments: