महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी एक नवीनच फतवा काढला की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घटक चाचणी परिक्षा लेखी स्वरूपात न घेता फक्त तोंडीच घ्यायची, का तर म्हणे मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो. दिवसेदिवस शिक्षण फारच सोपे होत चालले आहे. आम्ही मागे एकदा ब्लॉग मधून लिहीले होते की मुलाची एवढी काळजी असेल तर सर्व इयत्तांच्या परिक्षाच रद्द कराव्यात, म्हणजे मुलांना परिक्षेचा ताण येणार नाही, पर्यायाने पालकांची सुद्धा या प्रकारातून सुटका होईल. सर्वांना फक्त पुढील वर्गात ढकलायचे. अशा प्रकारे दहावीच्या मुलांना किती सोईस्कर होईल. परिक्षा मंडळाचा किती खर्च वाचेल. शिवाय सगळे पास. टक्केवारी प्रमाणे पुढील प्रवेश द्यावेत. कॉपी अजिबात होणार नाहीत. कॉपी कशासाठी होते पास होण्यासाठीच ना! सगळेच पास तर कॉपी कोण करणार.कल्पना करा परिक्षाच रद्द केल्यातर किती पैसा वाचेल. कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचतील. ज्याला गरज आहेत तो अभ्यास करेल. नाही केला तरी बिघडत नाही पास होणारच आहे. अजून एक सुचवावेसे वाटते, मुलांना विषय ऐच्छिक ठेवावेत, भले त्याने एक विषय का घ्यायना, पण त्याने त्या विषयात पास व्हायचे. मग त्याच्या करियरचा त्यानेच विचार करावा. कशाला त्या बिचार्यावर विषयांचे ओझे लादायचे. मग सर्व मंडळी खुष.
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
काही दिवसांपुर्वी एका गोर्या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
-
१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...
No comments:
Post a Comment