साधारण २००९च्या सुमारास जगात स्वाईन-फ्लूने आपली मस्ती सुरू केली, आणि त्याची लागण भारताही झाली. जागतीक आरोग्य संघटनेने जगाला सावध केले. डॉक्टरांनी लोकांना घाबरवून सोडले. तेव्हा साधं सर्दी पडसे झाले तरी नाना शंका यायच्या आणि लोक तोंड झाकून घेत. प्रत्येकजण घाबरलेला होता. खूप गाजावाजा झाला. भयावह चित्र निर्माण केले गेले. परवाच एका बातमीत W.H.O. संघटनेचे आग्नेय आशियाचे संचालक सॅमली पियानबांग यांनी कबूल केलेकी लोकांच्या मनात भिती निर्माण करायला W.H.O. च कारणीभूत आहे. जगातील एक तॄतीयांश लोकांना बाधा होईल असे W.H.O.ने जाहीर केले, पणा काय झाले रोगाची तीव्रता दिवसेदिवस कमीकमी होत गेली.आज या स्वाईन फ्लूची स्थिती काय आहे. कुठे गेली ती भिती. भारतातील १२० कोटींच्या देशात केवळ ३० हजार रूग्ण आढळून आले, त्यापैकी १४६५ जणांचा मृत्यु झाला.
स्वाईन फ्लूचा बागुलबुवा उभा करून डॉक्टरांनी आणि औषध कंपन्यांनी भरमसाठ फायदा लुटण्याचे कारस्थान W.H.O.च्या मदतीने तर केले नसेल ना? का शंका येऊ नये? यात फक्त औषध कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. भविष्यातील अतिरंजीत, भितीदायक चित्र रंगवून बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताने सुमारे दीड अब्ज डोस आयात केले, ते तसेच पडून आहेत. अशा किती देशात या औषध कंपन्यांनी धंदा केला असेल. शिवाय टॅमी फल्यूचा झटका वेगळाच.
Popular Posts
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...
-
आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...

No comments:
Post a Comment