Tuesday, January 24, 2012

कलियुग

Tuesday, January 24, 2012

कजियुगांत  एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----

पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे

दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे

तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍

चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे

पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे

सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे

अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.

सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.

हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?

 


0 comments: