Thursday, January 26, 2012

वास्तु

Thursday, January 26, 2012

भारतात वास्तुशास्त्राचा विचार १९९० च्या दशकात होऊ लागला. त्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्र पाहात नव्हते. काही लोकांनी मग अर्थार्जनाचे साधन म्हणून याचा प्रसार करावयास सुरूवात केली. लोकांना भिती दाखवून पैसे उकळायला सुरूवात केली. १९९० पूर्वी पार आपण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मागे जाउन पाहिले असता कोणाही संतांच्या अभंगात वास्तुबद्दल उहापोह नाही. मग त्याकाळी वास्तुचे दुष्परिणाम जाणवत होते काय?

कोणताही गड बांधतांना, ताजमहाल बांधतांना, शनिवारवाडा, मंदिरे बांधतांना त्याकाळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला कोणत्याही दप्तरात उल्लेख आढळत नाही. आजसुद्धां हे तथाकथीत वास्तुशास्त्रज्ञ दावे करतात, त्यामध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचाच विषय आहे.

आहे, वास्तुशास्त्रावर मयमतम सार‍खे ग्रंथ आहेत, पण ते नीट समजावून घेऊन कोणीही मार्गदर्शन करीत नाही.

जाणकारांनी मयमतम् ग्रंथ अभासून अवश्य आपल्या वास्तुचा अभ्यास करावा.

 


0 comments: