सवाई माधवरावांचे लग्न - २

श्रीमंत देवास नमस्कार करून स्वारी बाहेर निघाली. थोरला हत्ती विनायक गज आणवून त्याजवर रूप्याची अंबारी ठेवली. त्यांत श्रीमंत बसले. पाठीमागे खवासखान्यांत आप्पा बळवंत व अमृतराव पेठे हाती चवर्‍या घेऊन बसले. पुढें खास जिलबीस बोथाटी-बारदार, विटेदार व बाणदार व लगी, त्यांच्यापुढें खास बारदार अशा जिलीब पुढे निघाली. पुढें वाजंत्र्यांचे ताफे ताशे मरफे दोनशे वाजू लागले. त्यापुढे चौघडे वाजतात. त्याचे पुढें जिलबीचे हत्ती शेपन्नास चालिले आहेत. त्यामागे जरीपटक्याचा हत्ती, मागे कोतवाल घोडे, पांचसातशे सोन्याचे गंडे पट्टे व पाठीवर भरगच्च झुली, गळ्यात मोहोरा-पुतळ्यांच्या माळा असे चाललें. जिलबीच्या हत्तीपुढें पाच हजार खासे घोड्यावर स्वार होऊन बंदुकांचे आवाज करीत चालले. त्यांच्यापुढे दहा हजार स्वार चालला. अशी स्वारी लग्नास वाडा डावा घालून निघाली, तेव्हां आघाडी पानशे यांचे वाड्यापाशी होती. श्रीमंतांच्या अंबारीमागे साहेब नौबती वाजत चालल्या. वाड्यापासून तोफखान्यापावेतो एकसारखा फौजेचा थाट उभा राहिला आहे. सरकारचे अंबारीमागे वर्‍हा‍डिणी बायका याणी चालावे. बायकामध्यें पुरूषांची दाटी न होईल अशा बेताने सभोवती शिपाई चालिले. त्यांच्यामागे भिक्षुक मंडळी, शास्त्री, पुताणिक, अग्निहोत्री, ज्योतिषी व वैदिक असा समुदाय चालला.

पुढील वर्णन पुढील भागात.   

Unknown

No comments: