सत्यमेव जयते

अभिनेता अमिरखानने ‘ सत्यमेव जयते ’ कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल त्याचे प्रथम अभिनंदन.

डॉक्टरांविरूद्ध त्याने आवाज उठवला अशी जी ओरड I.M.A. ने चालविली आहे, त्यात तथ्य नाही, कारण हा आवाज डॉक्टरांविरूद्ध नसून त्यांच्यातील प्रवृत्तींविरूद्ध आहे. आज सर्वत्र हे घडतच आहे. भलेही सर्व डॉक्टर असे नसतील पण काहीतरी आहेतच ना? आजपर्यंत एकाही डॉक्टरचा परवाना I.M.A. ने रद्ध केलेला नाही, म्हणजे भारतात सर्व डॉक्टर धुतल्या तांदळासारखे आहेत काय? भारतातील जनमत घेतल्यास हेच आढळून येईल की, यातून डॉक्टर खूप कमाई करतात.

माझ्या माहितीत अशा कांही केसेस आहेत की, रूग्ण मृत्यु पावल्यावर सुद्धा डॉक्टर नातेवाईकांना न सांगता त्या मेलेल्या रूग्णाचे बिल लावतात. माझ्याच एका भावाची केस आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध नेत्रतज्ञाकडे तो डोळे तपासण्याकरितां गेला असता त्याला सांगण्यांत आले की तुला मोतीबिंदू झाला  आहे आणि त्याचे लगेच ऑपरेशन करून टाकले, यावर कहर म्हणजे लगेचच दुसर्‍या डोळ्याचेही ऑपरेशन केले काय तर ते केव्हातरी करावेच लागणार ना? मग आताच हातासरशी उरकून घेतले.

शेवटी रूग्ण हतबल असतो म्हणून फसवला जातो.

Unknown

No comments: