Wednesday, February 01, 2012

पोवाडा

Wednesday, February 01, 2012

शाहिर, भांड, भालदार, भवय्ये, चितारी, गपी, विनोदी, कथाकारी, नकलाकारी वगैरे गुणीजनांना पदरी बाळगण्याची चाल रीत फार पूर्वीपासून राजे महाराजे, पेशवे पाळीत. शाहीरांसंबंधीचा उल्लेख ११व्या शतकाच्या सुमारास सांपडतो. भाटाला, शाहिरांना खूष होऊन पालखी व घोडा देत. शिवाजीराजांच्या पदरी भूषण कवी, परमानंद, जयराम पिंड्ये आदि गुणीजन होते. शिवाजीराजांनी अज्ञानदास ( अफझलखानाचा पोवाडा रचणारा शाहिर ), आणि तुळशीदास ( तानाजीचा पोवाडा रचणारा शाहिर ) यांना शेरभर सोन्याचा तोडा आणि घोडा दिल्याचा उल्लेख त्यांच्यांच पोवाड्यात सापडतो. संभाजी महाराजांच्या पदरी मोहनलाल व मतिराम असे दोन भाट होते.

शाहिरांची खरी चलती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सुरू होऊन दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत कळस गाठला. गंगुहैबतीचा फड सवाईमाधवरावांच्या वेळी उदयाला आला. होनाजीबाळाला कोंडणपूरचे कुरण इनाम मिळाले होते, शिवाय सालीना ३०० रूपये मिळत.

बडोद्याचे सयाजीरावही खास आश्रय देत. त्यांनी शाहीर बाकेरावास ६० रू. चा तोडा दिला होता.

१८१८ नंतर पोवाड्यांची चलती संपत आली, कारण इंग्रजी अंमलात पोवाड्यांना आश्रय नव्हता.

ज्यांनी कोणी पोवाडे आजपर्यंत जतन करून ठेवलेत, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.


0 comments: