भारतीय जनता

खूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे.
आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू  झालेली.
पण काहीतरी झाले आणि  एका नवीन माणसाने क्रांती घडवून आणली, आणि भल्याभल्यांची दातखीळ बसली, तो गृहस्थ म्हणजे अरविंद केजरीवाल.
दिल्लीत त्याने जो चमत्कार करून दाखवला, खरंच राजकारणाची त्याने भाषाच बदलून टाकली. जी आश्वासने दिली, ती पूर्ण करण्याचे वचन पाळले. दुसर्‍या राज्यातील सरकारांना देखील आपली समीकरणे बदलावी लागतील.

आज लोकांना त्यांच्यातील आणि त्यांची दुःखे समजून घेणारा कोणीतरी पाहिजे, तोच त्यांचा देवदूत असतो.
बघू यात काय होते ते, आज एवढेच पुरे.

Unknown

No comments: