विडा

हिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने धर्मराजाला सुचविले, सर्वांचे भोजन झाले आहे, तरी आता त्यांना तृप्तीचा ढेकर देण्यासाठी, हे धर्मराजा सर्वांना सुवासिक असे कांहीतरी खाण्याची व्यवस्था कर. आणि त्याप्रमाणे सर्वांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न झाली. श्रीकृष्णाचीच इच्छा म्हटल्यावर धर्मराजांनी आणि इतर पांडवांनी वासुकी नागावर ही कामगिरी सोपवली. आता तो वासुकी नागच, जाऊन कोठे जाणार तर तो पोचला थेट पाताळात. आणि काय करावे हे न सुचून त्याने नागराणीची भेट घेतली. यावर नागराणीने लगेच आपल्या करंगळीचा छोटासा तुकडा कापून दिला आणि म्हणाली हेच घेऊन जा. करंगळी कापल्यावर रक्ताची धार लागली आणि काय करावे हे न समजून वासुकीने तो तुकडा पृथ्वीवर आणला आणि जमिनीत पुरला. पुरताना जमिनीवर रक्त सांडले. त्यातून एक वेल उगवली त्यालाच पांडव नागवेल म्हणू लागले. नागाने लावलेली वेल आणि रक्तातून उगवलेली वेल म्हणून या वेलीची पाने खाली असता तोंड सुवासिक होऊन रक्तासारखे लाल रंगू लागले.

विडा शृंगारप्रधान असल्याने ब्रह्मचारी पुरुष अथवा विधवा स्त्रियांनी खाऊ नये.

Unknown

No comments: