एक बरे झाले

एक बरे झाले, कोर्टानेच शाळांना चपराक दिली, मुलाखतीच्या नावावर अगदी डोनेशन ठरवले जायचे. लोअर के.जी. काय? उप्पर के.जी. काय? एवढे लहान वय असते काय मुलांचे शाळेत जाण्याचे. अशी भिती वाटत होती की, लग्नातच येणार्‍या बाळासाठी शालेतील सीट बुक करावी लागते की काय? पालकांची मुलाखत कशासाठी? परदेशात सहा वर्षाव्या मुलांनाच शालेत प्रवेश देतात. खरे तर ही चार वर्षांची मर्यादासुद्धा सहा वर्षांची करावी.
http://www.esakal.com/esakal/12152007/Specialnews8BE1B611A8.htm



नर्सरीत प्रवेशासाठीची वयोमर्यादा चार वर्षे - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, ता. १४ - खासगी शाळांना अधिक स्वायत्तता देतानाच, बालवाडीत (नर्सरी) प्रवेश घेण्यासाठीची वयोमर्यादा चार वर्षेच कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. ....
प्रवेशावेळी पालकांची मुलाखत घेण्याचे कारण नाही; पण अनौपचारिक मुलाखतीस हरकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

- विनाअनुदान शाळा म्हणजे व्यापारी संस्था नव्हे
- तीन वर्षे हे मुलांना शाळेत पाठविण्याचे वय नव्हे
- प्रवेशावेळी पालकांची मुलाखत गरजेची नाही; मात्र गरजेपुरत्या संवादावर निर्बंध नकोत
- पहिलीत प्रवेशाचे वय सहा वर्षेच कायम राहील
----------------------------------------------------------------

Unknown

No comments: