भगवान

एका संन्याशाला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत? त्या व्यक्तिने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. संन्याशाला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरून एक राजबिंडा तरूण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून संन्याशाने विचारले, हेच का ते भगवान? ती व्यक्ति म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना माननारे लोक त्यांच्या मागून जात आहेत.... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर, गुरू नानक, ज्ञानेश्वर वगैरे असे सर्वजण येऊन गेले.

भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. दुसरा दिवस उजाडला. सारे लोक कंटाळून गेले निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक म्हातारा एकटाच आला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज होते. संन्याशाने त्याला विचारले, आपणच भगवान का? म्हातारा म्हणाला, हो. संन्याशाने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही? तो म्हातारा म्हणाला, सारे राम, बुद्ध, येशु, महावीर वगैरेंबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. आतापयंत तू माझी वाट पहात उभा आहेस तर मग चल माझ्या बरोबर. भगवानांनी सांगितले, ते  बघ तिकडे दूरवर मी जातो तू माझ्या मागून ये. असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.

संन्याशाने पाहिले तर समोर एकदम गरम असे वाळवंट त्याला दिसले, तो विचार करू लागला आता आपण कसे जायाचे. मग त्याने  धीर  करून पाऊल पुढे टाकले, तर ती वाळू त्याला भासलीच नाही. तो भराभर पुढे चालू लागला, शेवटी वाळवंटपार पोहोचल्यावर त्याला भगवान भेटले. त्याने भगवानाला विचारले, आपण मला एकट्याला का बरे सोडून आलात, मी एवढ्या गरम वाळवंटातून कसा आलो असतो? तेव्हा भगवान म्हणाले, वेड्या मी तुझ्यासोबतच होतो मागे वळून पहा दोनच पावले दिसताहेत, ती माझी आहेत मी तुला कडेवर उचलून घेतले होते, म्हणून तुझे पाय भाजले नाहीत.

कोणाच्या मागे धावावे, हा विचार आपण करावा, आणि देवाच्या कडेवर बसावे.

Unknown

No comments: