२८ मे २०१० रोजी रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि कित्येक लोकांनी प्राण गमावले हा हल्ला माओवादी संघटनेने केला असे बोलले जाते. या हल्ल्यास जबाबदार असणार्या पीसीएपीए या संघटनेचा नेता म्हणतो, “ सॉरी, मला माफ करा, आम्हाला मालगाडी उडवायची होती पण, चुकीने प्रवासी रेल्वे उडवली गेली ”. अरे वा ! काय पण विनयशीलता ! अगदी क्षमा मागून मोकळे झाले, संघटनेचे नेते, बापी महातो. मग ज्यांचे नातेवाईक गेले, ज्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांचे काय? पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय? त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर? त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर? फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय? प. बंगालचे पोलिस महासंचालक जेव्हा या हल्ल्याचा सूत्रधार बापी महातोच आहे म्हणतात आणि त्याचा शोध घेण्याचे जारी करतात, तेव्हा या बापी महातोला कोलांटी उडी मारण्याची बुध्दी होते, आणि आपले सरकारही त्याने माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करेल.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीच तर औरच, त्यांनी रात्रीच्या गाड्याच बंद करण्याचे फर्मान सोडले. जर दिवसा हल्ले झाले तर मग काय दिवसाही गाड्या बंद करणार? अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल? एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय? हे सरकारचे धोरण आहे, हेच अतिरेक्यांना धीट करते. जर फाशीचे शिक्षा झाली आणि लगेचच त्या आरोपीला फाशी दिली गेली तरच त्या फाशीला अर्थ आहे, नाहीतर कागदोपत्रीच फाशीचा काय उपयोग. कसा आरोपींना धाक राहणार.
संसदेवर हल्ला झाला तर काय लोकसभेचे कामकाज दुसरीकडे जंगलात चालू करणार का? हा शुध्द पळपुटेपणा आहे आणि हा भारतीय नेत्यांनीच करावा, आणि त्याचे परिणाम भारतीय जनतेने भोगावेत, हेच भारतीयांच्या नशीबाचे भोग आहेत. तेव्हा चला पासपोर्ट व्हिसा काढा आणि परदेशी स्थायिक व्हा. मग तिथे बसून म्हणा ‘ मेरा भारत महान ’.
मेरा भारत महान
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
1 comment:
thanks
Post a Comment