१५ ऑगस्ट २०२७ सालचा

खूप वाटले या दिवसाची कल्पना करून मी काही लिहू शकेन म्हणून, पण विचार केला तर फारच भायानक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

मागील पाच वर्षात computer ने जी प्रगती केली, ती गती पाहिली असता २०२७ साली काय होईल देवच जाणे. कोणी ऑफिसातच जाणार नाहीत. आताच अमेरिकेत घरी बसून काम करण्याची सोय आहे. त्यावेळेस picnic ला गेलेले असताना सुद्धा काम करता येईल. मुले e-school मध्ये शिकतील. शाळेचा प्रश्नच राहणार नाही. घरीच computer शाळेचे काम करील. मुले एवढी बिझी होतील, त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळ नसणार, की ते कुठेतरी लहानपणातच पायावर उभारतील. मानवी क्लोनचीप्रगती झाली तर आई कोण आणि बाप कोण? भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार. राहण्यासाठी शेती नष्ट होणार मग काय? असे खूप विचार आले, त्यात १५ ऑगस्ट चे काय होणार, हा तर विचारच विरून गेला. जर कोणाला १५ ऑगस्ट २०२७ या दिवसाची कल्पना करता येईल तर मला जरूर कळवा.

Unknown

No comments: