अक्कल?

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना ’भारतरत्न’ सन्मान, जो भारतात सर्वोच्च आहे, दि.१०-२-२००९ रोजी प्रदान करण्यात आला, त्यांच्या राह्त्या घरी, कारण त्यांची प्रकृती ठीक नसते, म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी तशी विनंती केली होती.

भारताच्या राष्ट्रपतींकडे जे सल्लागार आहेत, त्यांच्या बुद्धीची कीव येते, भारतरत्न पुरस्कार कोणी प्रदान करावा तर, केंद्रीय गृह विभागाचे अतिरिक्त सचिव ए. एफ. अहमद अणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते.

खरे पाहता हा  पुरस्कार रा्ष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देऊन त्याचा सन्मान वाढवायला पाहिजे होता. पण सरकारच्या अकलेच्या दिवाळखोरीचे काय वर्णन करावे. त्या महान गायहाची आणि त्या महान पुरस्काराची तरी लाज ठेवायला पाहिजे होती, त्यांना काय लायकी आहे की नाही? सर्वसामान्य दर्जाचा सचिव एवढा मोठा मानाचा पुरस्कार देतो, म्हण्जे त्या महान गायकावा, पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रात अग्रलेख आले पाहिजेत, आमदा खासदार जनतेने आवाज उठवला पाहिजे. राष्ट्रपतीभवनातून राजशिष्टाचाराचे कारण पुढे करण्यात आले. हे काय कारण झाले.बोरिवलीतील विपश्यना पॅगोडाचे उद्‍घाटन करण्यास, पुण्यातील रुग्णालयाच्या उद्‌घाटनाला त्या जाऊ शकतात, तेव्हा राजशिष्टाचार आडवा येत नाही काय?

महाराष्ट्राला देश पातळीवर किंमत दिली जात नाहे एवढे मात्र खरे.

Unknown

No comments: