सरकारी भेसळ

आजपर्यंत व्यापारी मालात भेसळ करतात, असे ऐकले होते पण सरकार सुद्धा! १९८४ पासून हे सत्र चालू आहे आणि त्या दोषी लोकांवर कारवाई नाही, आश्चर्य आहे. आता त्यांना त्या वजनाच्या सोन्याचे बाजारभावाप्रमाणे पैसे देणार म्हणे. पण आता त्याचा काय उपयोग. आता सर्व प्रकारच्या पदकांबद्दल शंका येते. खरे तर हा  त्या व्यक्तींच्या भावनांशी  खेळ आहे. जर सरकारक्स्डून असे होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? सरकार "सुवर्ण कमळ" म्हणून एक पुरस्कार देते, ते तरी खरे असेल काय? आधीच १४ कॅरेट, २४ नाही आणि त्यात ही भेसळ. आपल्या भारतीयांना एवढे सुद्धा समजत नाही काय, कि ह्या इंटरनेट वर्तमानपत्राद्वारे सर्व जगात या बातम्या वाचल्या जातात, तेव्हा परदेशी लोक काय म्हणत असतील, त्यांचे भारतीयांबद्धल काय मत होत असणार?

http://www.esakal.com/esakal/06282008/SpecialnewsAC5737F20C.htm

सरकारच्या सुवर्णपदकांमध्ये खोट; १९८४ पासून भेसळ
गजानन ताजने - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २७ - राज्यातील कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्‍तींना १९८४ पासून देण्यात आलेल्या सुवर्णपदकांमध्ये किमान दीड ते कमाल साडेनऊ ग्रॅम सोने कमी असल्याचे राज्य शासनाने अखेर कबूल केले आहे.
आता या पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना देण्यात आलेल्या सुवर्णपदकांत जेवढे सोने कमी असेल, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे भरपाई आणि जुन्या पदकासारखे नवे स्मृतिचिन्ह देऊन राज्य शासन चुकीची दुरुस्ती करणार आहे.
कृषी आणि पशुसंवर्धन विकास मंत्रालयाकडून कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात रोख रक्कम, १४ कॅरेट सोन्याचे ५० ग्रॅम किंवा २५ ग्रॅमचे पदक आणि सन्मानपत्र दिले जाते. मात्र, सुवर्णपदक काळे पडत असून, सोन्याचा मुलामाही निघत असल्याचे अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्‍तींना आढळून आले. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वर्षभरापूर्वी अनेक कृषितज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी व संस्थांनी निषेध करीत पुरस्कार परत केले. शासन प्रगतिशील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही विधानसभेत झाला. त्यामुळे कृषी विभागाने सुवर्णपदकांची प्रयोगशाळेत चाचणी घेतली. त्यात सर्व निकष धाब्यावर बसवून संबंधित संस्थेने सुवर्णपदकांची निर्मिती केली असून, त्यात धातूची भेसळ झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. सुरवातीला २००५ मध्ये दिलेल्या पदकांत भेसळ असल्याचा आरोप झाला होता.
मात्र, त्यानंतर त्यापूर्वीच्याही सुवर्णपदकांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी झाल्याने शासनाने १९८४ पासूनच्या पदकांची तपासणी केली. यात १९८४ ते २००४ पर्यंत देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ४.८३ ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत १.८८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले. याशिवाय २००५ मध्ये देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ९.२० ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत ३.०८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले.
कृषी विभागाने पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना त्यांच्या पदकांत सरासरी जेवढे सोने कमी आढळले, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे थेट घरपोच देण्याचे ठरविले आहे.
-------------------
ताम्रपदकांबाबत मौन
कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था, व्यक्‍तीसोबतच स्वातंत्र्यसैनिकांचाही सुवर्ण महोत्सवी वर्षात ताम्रपदक देऊन सरकारने सत्कार केला होता. या पदकांतील धातूतही भेसळ असून, पदके काळी पडली असल्याच्या तक्रारी करण्यात आहेत. मात्र, या तक्रारींबाबत सरकारने अद्यापही मौन बाळगले आहे.

पण नाही याची आम्हाला पर्वाच नाही, आपल्या झोळीत कसे जास्तीतजास्त पडेल याचाच विचार सर्वजण करतात. आता कुठेतरी हे बदलले पाहिजे. गुन्हेगारांना शासन झले तरच पुधील अनर्थ टळतील.

Unknown

No comments: