विशिष्ट समाज

काल धुळ्यात हिंसाचार झाला, बातमी आहे. त्यात शब्द असतात,’विशिष्ट जमात’ आणि हे सर्व बातमीदार स्वतः अनुभवलेले क्षण लिहीतो. असा उल्लेख करण्यापेक्षा सरळ सरळ लिहाना, कोणती विशिष्ट जमात होती ते. बातम्या फारच मजेदार असतात. एखाद्या भागात दंगल झाली तर लिहीतील, त्या भागातील निवडून आलेला राजकीय पुढारी, हे उघड सत्य असताना, शब्दांचे खेळ कशासाठी? पुण्यात तुकाराम महाराजांचे देऊळ, जिथे पालखी वर्षानुवर्षे थांबत असे, ते हलवले गेले, पण काही विशीष्ट, समाजाची प्रार्थनास्थळे, भर रस्ता अडवून उभी आहेत, त्यांचे काय? आडून आडून लिहीण्यापेक्षा सरळ नावालाच हात घालावाना.

B.R.T. चा एवढा खेळ खंडोबा चाललेला असताना वर्तमानपत्राचे अग्रलेख झोपलेत काय? त्यांच्या तलवारीची धार बोथट झाली काय? खरे तर पत्रकारांनी निर्भिडपणे आपली मते मांडावीत.

Unknown

No comments: