आज दि. १० जुलै पुणे मुक्कामी वारकरी समाजाला जेवण असते. जेवण अत्यंत साधे, भाकरी, भाजी, फोडणीचा भात, एखादा गोड पदार्थ. पण त्यात आनंद भरलेला असतो. वारकरी जेव्हा जेऊन तृप्त होतो तेव्हा वाढणार्याला जे समाधान लाभते ते शब्दात सांगता येणार नाही. राती सर्व वारकरी कीर्तन करतात, हरिपाठ होतो, आणि दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून माऊलींना सोबत करायची आहे, संत संगत करायची आहे, या ओढीनेच केव्हा झोप लागते कळत नाही.
दि. ११ जुलै रोजी बरोबर सकाळी ६ वाजता पालख्या आरती करून निघतील. तेव्हा सर्व दिंड्या आपापल्या जागेवरच येणार, नंबराला लागणार. दुपारी ११ वाजता दोन्ही पालख्या हडपसरला थांबणार. जेवण करणार आणि माऊलींची पालखी सासवडमार्गे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला विठ्ठल भेटीसाठी निघणार. सासवडला जाताना रस्त्यात दिवे घाट येतो, पालखीच्या रथाला १२ बैल जुंपतात. घाट चढतानाचे दृश्य फारच अप्रतीम असते. प्र्त्येकाच्या खांद्यावर भगबी पताका. सबंध घाट असा भगवामय होऊन जातो. सासवडला माऊलींचे बंधू सोपानदेव महाराजांची समाधी आहे तिचे दर्शन करून, एक दिवस मुक्काम करून मगच पालखी पंढरपूरला निघते.
पंढरीची वारी-वारकरी
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
No comments:
Post a Comment