अनमोल विचार -२

आचारः फलते धर्ममाचारः फलते धनम् ।*
आचाराच्छ्रियमाप्नोति आचारो हन्त्यलक्षणम् ॥

( महाभारत, उद्योग० ११३।१५ )

अर्थ- सहाचारच धर्म सफल बनवतो, सदाचारापासून धनरूपी फळ मिळते, सदाचारापासून संपत्ती प्राप्त होते, तसेच सहाचार अशुभ लक्षणांचा नाश करते.

कलानि समुपेतानि गोभिः पुरुषतोऽर्थतः ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्ततः ॥
वृत्ततरस्त्वविहीनानि कुलान्यल्पधनान्यपि ।
कुलसंख्या च गच्छति कर्षन्ति च महद् यशः ॥

( महाभारत, उद्योग० ३६।२८-२९ )

अर्थ- ज्या कुळात धन, मनुष्य आणि गाई विपुल प्रमाणात असूनही, जे कुळ सदाचाराने हीन आहे, त्याची गणना उच्च कुळात होत नाही. परंतु जी कुळे धनवान नसूनही सदाचाराने संपन्न आहेत, त्यांची गणना मात्र उच्च कुळात होते आणि त्यांना महान यश प्राप्त होते.

 उद्या- अनमोल विचार - ३

Unknown

No comments: