अनमोल विचार - ५

सर्वोऽयं ब्राह्मणो लोके वृत्तेन तु विधीयते ।
वृत्ते स्थितस्तु शूद्रोऽपि ब्राह्मणत्वं नियच्छति ॥
( महाभारत, अनु० १४३।५१ )

अर्थ- सदाचारी असल्यामुळेच ब्राह्मण समुदाय आपल्या ब्राम्हण पदावर स्थित आहे. सदाचारी शूद्रसुद्धा ब्राह्मणत्व प्राप्त करू (या जन्मी) शकतो. 

आचाराल्लभते चायुराचाराल्लभते प्रजाः ।
आचारादन्नमक्षय्यमाचारो हन्ति पातकम् ॥
आचारः परमो धर्मो नृणां कल्याणकारकः ।
इह लोके सुखी भूत्वा परत्र लभते सुखम् ॥

( देवीभागवत ११।१।१०-११ )

अर्थ- सदाचाराने दीर्घायुष्य, संतान प्राप्ती होते, अन्नाची उपलब्धता वाढते. सदाचार सर्व पापांचा नाश करतो. मानवजातीसाठी सदाचार कल्याणकारी धर्म मानला गेला आहे. सदाचारी मनुष्य इहलोकी सुख भोगून परलोकीही सुखी होतो. 

 

 

07192007

Unknown

No comments: