सकारात्मक विचार

आपलं भूतकाळात चांगलं होतं की, आपण भविष्यकाळात चांगल्याची अपेक्षा करत आहोत, तर हे सर्व विसरा आणि विचार करा, आतचा जो आयुष्यातील बिंदू आहे तोच आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आताचा हा बिंदू आहे तोच आपण होकारात्मक विचार करून एक चांगल्या सकारात्मक आयुष्याची सुरूवात करू यात. समजा जर आपला मेंदू काही नकारात्मक विचार करत असेल तर त्याला थांबवा आणि सकारात्मक विचाराकडे वळवा. एकदा का गाडीने रूळ बदलला ना तर काहीही करून आपण त्या गाडीची दिशा बदलू शकत नाही. तसेच विचारांचे आहे. यालाच म्हणतात विचारांतून बाहेर येणे.

कल्पना करा तुम्ही हॉटेलात बसलात, तेव्हा तुमच्या समोर मेनू येतो, हाच मेनू जर विचारांचा असेल तर? तुम्ही एक किंवा अनेक विचार निवडू शकता, आणि हेच विचार आपल्या भविष्यातील अनुभव ठरतील. बघा आपण एखादे अन्न खातो त्यापासून आजारपणा येते, आपण पुन्हा माहीत नसतांना तेच अन्न खातो पण मग लक्षात आल्यावर खातो का? नाही ना! तसेच विचारांचे आहे, द्या सोडून नकारात्मक विचार. जर समस्या निर्माण झाली तर ती कशी सोडवायची यापेक्षा ती का निर्माण झाली याचा विचार करा मग ती सोडविण्याचा. आपल्या मेंदूतील विचार आपले भविष्य घडवत असतात. 

शाळा कॉलेजातून शिकविले गेले पाहिजे की विचार कसे काम करतात, त्या विचारांना वळण कसे द्यावे. काय शिकून फायदा आहे? की कोण कधी जन्मला आणि मेला. सनावळ्या पाठ करायच्या कशासाठी, तर काय त्यांचे वाढदिवस साजरे करायचेत. कशासाठी पाहिजे, पानिपत युद्ध कधी झाले?. त्यापेक्षा मुलांना शिकवा जगात धन चांगल्या मार्गाने कसे मिळवायचे, भ्रष्टाचार म्हणजे काय, मिळवलेले पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे, चांगले आईवडिल म्हणजे काय. लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करावेत,सकारात्म विचार कसा करावा, बाबा आता अशा ज्ञानाची गरज आहे. कल्पना करा असा अभ्यासक्रम असेल तर भावी पिढी कशी निर्माण होईल.

आकाशात पाहून हात वर करून,एक मंत्र रोज म्हणा ( कितीही वेळा ) -

या विश्वातील सर्व शुभ आणि पवित्र शक्तींचा स्वीकार करण्यास माझा आत्मा तयार आहे आणि या शुभ आणि पवित्र शक्ती माझ्या समस्या दूर करून मला सुख प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे.

आणि बघा काय बदल घडून येतो ते.

Unknown

No comments: