ऑस्ट्रेलियातील भारतीयांवरील हल्ले

मागील काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात भारतीयांवर हल्ले होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी मेलबर्न शहरात नितीन गर्ग नावाच्या इसमाचा खून झाला, म्हण्जे पार खूनाची वेळा आली आहे, याला कारण भारत सरकारचे निष्ककाळजीपणाचे धोरण आणि ऑस्ट्रेलियन सरकारची बेफिकिरी. तेथील पोलीसांच्या म्हणण्यानुसार हे वांशिक हल्ले आहेत. आणि हा खून वंशभेदातून झाला असावा. अरे पण खून झाला ना? त्याचे काय?

आता ऑस्ट्रेलियात चिनी, लेबानीज, मुस्लीम, अफ्रिकन वगैरे देशातील लोक पोटापाण्यासाठी आलेले आहेत. तर मग भारतीय सोडून इतर देशातील नागरीकांवर हल्ले का होत नाहीत? हे तपासून पहायला हवे. भारत सरकारला एक खोड आहे, फक्त कडक शब्दात निंदा करायची. बस एक खलीता पाठवून दिला, की झाले परराष्ट्रमंत्रालयाचे काम. पण ठोस पाऊल उचलले पाहिजे हे आम्हांला माहितच नाही.

पाश्चात्य देशात अशा घटनांना भारतीयांना सामोरे जावे लागत आहे, यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.

पिझ्झा डिलीव्हरी करणार्‍या शिख तरूणाला अमेरिकेत अत्यंत लाजीरवाणी वागणूक दिली गेली होती. अनेक देशात भारतीयांना वंशभेदाच्या हल्ल्यांना बळी पडावे लागत आहे, फक्त ते आपल्या पर्यंत येत नाही. गाजावाजा होत नाही. ऑस्ट्रेलियात माझ्या मुलीच्या घरातून सोने आणि रोख  डॉलर चोरीला गेले, पोलीस तक्रार झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. फ्रान्स मध्ये शिखांच्या पगडीवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ’बिग ब्रदर’ च्या रियालिटी शो मध्ये भाग घेण्यासाठी जेव्हा २००७ मध्ये ब्रिटनमध्ये गेली होती तेव्हा ’जेड गुडी’ या अभिनेत्रीने शिल्पाला, वंशिक भेदावरून काय गहजब केला होता. हे सार्‍या दुनियेला ठाऊक आहे. नंतर तिने माफी मागितली ही गोष्ट वेगळी. गोरे नेहेमीच काळ्यांना कमी लेखतात. कातडीचा रंग बदलला म्हणून काय माणसाची बुद्धी बदलते काय? तो माणूस नसतो काय? रक्ताची गरज लागल्यावर काळ्या माणसाचे रक्त चालते ना? 

मागे चीनच्या नागरीकांवर हल्ले झाले तेव्हा चीनने व्यापारी संबंध बंद करण्याची धमकी दिली तर ते हल्ले बंद झाले.

क्रिकेटच्या मैदानावरही ऑस्ट्रेलियन खेळाडू अशोभनीय वर्तन करतात.

सगळं जग एकत्र येण्याची संकल्पना रूजत असताना, हे वांशिक हल्ले यात अडथळा निर्माण करतील, हे आता सर्वांनी समजले पाहिजे.

Unknown

No comments: